Skip to main content

Full text of "God’avanaan’tiila Priyan’vadaa"

See other formats


11६€ 80072 ४॥॥७$ 
)२९॥४९॥-€0) 

1890 त.४॥॥॥-॥ 
116 8006 0॥-४ 


गाोंडवनांतील 
प्रियंवदा 


डॉ, श्री, व्यं, केतकर 


()॥५॥४/८॥२5७/१|_ 
(13२, र 


0) 192784 


/ ४०६6] 
॥४७0/॥५]) 


0ए7--881---5-8-74---15.000 
0५1१1.111. एपा०1२५$11६₹ 11017२41२2 


ट्याणप०. (१७७ १००७७०० ०. 0?& ३ 165 | 
तै प(०£ «- न > << 
क कर लका ट्‌ ऱ्ज्न रज टया -_* 
धट "९७९ , का ९. ट्थंळक> ९. 
> फड ११९ ज्र उत ७ 


1115 ७०0३ 5101१ लज टापाणाल्त (11 ठा 0)लठि ९ ९ १8 148९171.10तल्ते ७९०७ 


*“  ६द-१२५०-५(-॥  £१५१६१८<6 


शोंडवनांतील प्रियंवदा 
आणि 
घरकुट्रे घराण्याचा इतिहास. 


लेखक 


डॉ० भ्रीधर व्यकटेदा केतकर, 
एम्‌, ए., पीएच्‌, डी. 


आवृत्ति ली १९?६ 
पनसेवत्रण १९५५ 


म्‌ल्य 

रु. 2/४/- 
प्रकाळाका “ 

सो. कीरा ठामो 
१६ हिंडू कॉलनी, 


दादर, सुम्बआऔी-?४. 


सुत्रक » 

सितीठा आणि अदठोक जठार 
कनोटक प्रॉटेंग क्क्स॑, 
धारवाड. 


प्र स्ाावना 


कादंबरीच्या लेखकाचे नांव गूढ ठेवावें काँ स्पष्टपणे पुढे माडावं 
यासंत्रंधानें विचार करून असें ठरविलें कीं कर्त्याच्या नावासंबंधानें अधिक दिवस 
गुसतता राखणे अनवर्य आहे. गुप्तता राखण्याचा मुख्य हेतु एवढाच कीं 
कर्त्याच्या नांबामुळें वाचकवर्गाचे मत टरू नये. बिद्यासेववाच्या संपादकास 
कादंबरीच्या स्तुतिपर जीं अनेकाकडून पत्रें आलीं त्यावरून बऱ्याच व्यक्तीचे स्वतंत्र 
मत व्यक्त झालेंच आहे. 


ही कादंबरी लिहिण्यास प्रवृत्ति कशी झाली हे थोडक्यात सागतों. 
उमरावतीचे सुप्रसिद्ध कादंबरीकार रा. बाळकृष्ण संतुराम गडकरी हे माझे 
ल्हान वयापासून स्नेही आहेत. यानीं मी लिहिलेल्या एक दोन गोष्टी पाहून 
माझी परीक्षा केळी आणि सरळपणें मला सागितले कीं “ तुम्हीं पाहिज तर 
निबंध लिहावेत पण कादंबरीच्या भानगर्डीत पडूं नये. ” ज्ञानकोशाची योजना 
त्यांस जेव्हा कळली तेव्हा तुम्हीं आपल्या योग्य व्यवसाय घेतलात असें ते 
म्हणाले, बोलण्यात खोच अशी कीं, जे कादंबरी लिहावयास लायख नाहींत 
त्यानीं निबंध लिहावेत किवा वाटल्यास किवा झेपल्यास ज्ञानकोराहि लिहावा. 
नागपूर येथें १९१६ च्या उन्हाळ्यात वाकर रोडवर ऑफिस होतें आणि मे 
महिन्याच्या दोवटीं कंपनी रजिस्टर करण्यासाठीं कागद पाठविले होते. ८ जुले 
पर्येत कंपनी रजिस्टर झाली नाही. तोपर्यंत, म्हणजे सबंध जून महिना रिकामा 
होतो; बसला काहीतरी लिहीत. त्या काळात लिहिलेले काहीं लेख जञान- 
कोशालाहि अंगतः उप्योगी पडले. पण त्या वेळेस जे आणखी काहीं लिहिले, 
तेंच “' गोंडवनांतील प्रियंबदे'चें चरित्र ” होय. त्यावेळेस २०२१ प्रकरणें 
लिहिलीं होतीं. ब कादंबरी अपूण स्थितींत नऊ दहा वर्षे पडली होतीं. 
पूर्वीच्या कादंबरींतलीं अलीकडे चार प्रकरणें फाडून टाकली. पह्लीं सोळा 
प्रकरणे जुनीं लिहिलेली आहेत. पुढचीं नवीन आहेत. 


या कादंबरीत कांहीं कालविपर्यासाचे दोष राहून गेळे आहेत, १८९३[९४ 
सालीं रामभाऊ एफ. ए. नापास होऊन कादंबरीच्या कथानकास प्रारंभ होतो. 
व १८९७/९८ सालीं तो विलावतेहून परत येतो, असें असतां आयडाचा 
जन्मकाल त्याला अनुसरून नाहीं, कायसरेद्दिंद पदक मिळवावे म्हणून अनंतराव 
मुलीला सांगतो तें त्यावेळीं बाजारांत आलें नव्हतें. हे दोष सहज दूर करतां 
आले असते. 


श्री. व्य. केतकर 


अनुक्रमणिका 


प्रास्तावक दोन शब्दे  .... श्री. नी. म. केळकर .... 


प्र शल. विलायतेस प्रयाण .... डा 1» 
प्र २रॅ. भोंसलेविजयमिल्स ... च 
प्र २ेरेॅ. प्रियंवदेचा जीवितक्रम वश ठ्य 
प्र ढथ, हरिभाऊंचे आश्रयदाते गता १ 
प्र वे. होरमसजी पेनागवाला स क 
प्र ६वे, रायपूरच्या बुडुया बागेत 

प्र ७वें. अनंतराव घरकुट्टे र 

प्र. ८ बे.  बिंजाबाईचे वैधव्य .... रः वव 
प्र. ९वैं. हरिभय्या मोघे .... म 

प्र. १० वें. रामभाऊंचा उपदेश .... वक 

प्र १२बॅ. रामभाऊंस उपदेश .... 

प्र ९२. भोंसलाविजय मिल्सचीं तीन वर्षे 

प्र १३वं इतिहाससंशोधक ... व वन 
प्र ९१४ ब. शारदाबाईंचा पराक्रम 

प्र. १५ वें.  गोंडवनातील दुसरे आरण्यक .... 

प्र. १६, भम देवालयाच्या परिकरात 

प्र १७वे. एका रात्रींत विद्वान .... 

प्र. १८ बं. उमरावतीची कांग्रेस .... म 

प्र १९वे. प्रोषितभतृका 

प्र २. वें. शारदा आणि प्रियंवदा 

प्र. २१ वे.  वेजनाथशास्त्री  .... 

प्र २२वे, प्रियिविदा आणि पुतळी 

प्र २शवें. भोंसलेविजय मिल्स-उपसंहार ...- 


प्रास्ताविक दान हदाव्द 


आहह . >> 


ज्ञानकोराकर्ते डॉ. श्रीथर व्यंकटेश केतकर याची ही पहिली कादंबरी, 
ही कादंबरी, तत्कालीन कादेजरीतील दुबळेपणा दूर करून, नवे, अधिक सकस, 
अधिक रमणीय ललित लेखन आपण लिहूं शकू अशा आत्मविश्वासाने लिहिली 
गेली. या विश्वासाची सूचक प्रस्तावना डॉ, केतकर यानीं स्वतःच लिहिली 
आहे. 


डॉ, केतकर यानी र्जे कादेबरी लेखन यानंतर केलें, त्या लेखनाने 
आजच्या प्रथितयदा कादंबरीकारात त्यानीं स्वतःसाठीं बहुमानारचें स्थानहि 
निर्माण करून ठेविलें असल्यामुळें त्याचा आत्मविश्वास अकारण नव्हता हें स्पष्ट 
झालें आहे. परंतु अजूनहि डॉ. श्री, व्यं. केतकर याच्या कादंबर्‍या ह्या 
कादंबऱ्याच नव्हत ; ओबडधोबड भाषेंत, विस्कळित कंटाळवाण्या चर्चारचे लेखन 
त्यानीं केले असें लिहिणाऱ्या टीकाकाराचा, पदबीधराचा वर्ग आपली अडाणी 
लेखणी दुराग्रहानें चालवीत आहे. लोकरंजनाबद्दलच्या कोत्या दृष्टीमुळें असे 
हले होतात, म्हणूनच लेखकाची भूमिका सर्व साधारण वाचकास समजण्यासाठी 
हे दोन शब्द लिहिणें अवश्य वाटत आहे. 


: शोंडवनातील प्रियेवदा ' ही कादंबरी लिहिण्यास १९१६ सालीं सुरवात 
झाली व ती नंतर दहा वर्षानी डा. केतकर यांनी प्रसिद्ध केली. दहा वर्षे मिजत 
पडलेली ही कथा अजूनहि वाचनीय आहे असें कायम स्वरूपाचे लालित्य कथेत 
असल्याबद्दल डा. केतकराची खात्री होती. अभिजात वाड्ययाची तीं एक 
कसोटी आहे. अमिजात वाड्ययांतील गोडी शाश्वत टिकाऊ असते. 


वास्तविक ललितकृतींतील विषय तात्कालिक वस्तुनिष्ठ वर्णनात्मक असेल 
तर त्या त्या परिस्थितीबद्दलचें अगत्य संपताच या वाड्ययातील रस आडून गेला 
असता. केवळ विदोष काळच्या सामाजिक स्थितीर्चे वाडनयांत नमूद झालेलें 


न 


ऐतिहासिक स्वरूप एवढेंच या कादंभरीचं महत्त्व नसून एका ज्या प्रथेचे 
कादंबरीकार म्हणून डा. केतकर यानीं महत्त्वाची कामगिरी केली तिची 
सुरवात म्हणूनच या कादंजरीचं महत्त्व आहे. 

१९१२ सालच्या अखेरीस डा, केतकर परदेशाहून स्वबदेशास परत 
आले. या देशाच्याहि सर्व भागात राहून १९१६ च्या सुमारास “ मराठी ज्ञानकोदा ' 
लिहिण्याचे स्वतःचें कायेक्षेत्र त्यांनीं निश्चित केलें. एवढी मोठी जोखीम 
शिरावर घेण्याइतकें शिक्षण ब अनुभव त्यानीं संपादन केला होता. त्यांनीं 
युरोप अमेरिकेंतील वास्तव्यांत एक नवें विश्व पाहिलें व नबी चिकित्सक शास्त्रीय 
हृष्टीहि संपादन केली होती. या नव्या दृष्टीनें ते भारतीय समाजाचें निरीक्षण 
सतत करीत होते. करमणूकीसाठीं स्थानिक वाड्यय वाचे तरी तेहि याच 
नव्या दृष्टीने. भोवतालचें जीवन आणि वाड्यय तपाशीत असता प्रगमनशील 
शक्ति कोणत्या, यातील आास्त्रशुद्ध भाग किती, त्यांत अज्ञानमूलक गैरसमज 
प्रगतीला विरोधक होत असले तर त्या दोघाची आपत्या लोकांस जाणीव करून 
द्यावी, जीवनाबद्दलची आसक्ति ब जोम वाढवावा अशा इच्छेने, आतरिक 
तळमळीने डॉ, केतकर प्रत्येक शब्द लिहीत. 

सर्व क्षेत्रात एकप्रकारचे परावलंञी, इंग्रजी राजसत्तच्या बऱ्या वाईट गुणाचे 
प्रतिबिंब उमटलेले त्याना दिसे. सरकारी नोकर केवळ स्वत:चे हितसंबंध ब 
प्रतिष्ठा बाढविण्यांत दंग, राजकारणी व समाजकारणी नेते स्थानिक परिस्थिति- 
वह्ल अनभिज्ञ व परदेशी लोकाच्या तंत्राने वागण्यात कृतार्थता मानणारे ; 
व्यापारी व कारखानदार या सर्वाची ही एकच गत होती. 


ललित वाडय़याचीहि हीच स्थिति असल्याचे डाक्‍्टरना तीत्रत्वानें जाणवत 
होतें. आजच्या जमान्यांतला ळेवक ललित लेखन करीत असताना स्वतःच्या 
अस्तित्वाची जाणीव वाचकाला होऊं देत नाहीं. कर्थेतील व्यक्ति व त्या कर्थ- 
तील घटनांचे वर्णन वाचणारा वाचक ठेखकाला विसरला तरच स्वतःला विसरून 
कथेशीं समरस होऊं राकतो. डा, केतकर प्रथमच कादंजरी लिहीत असल्यामुळें 
त्यांनीं हे तांत्रिक अवधान पाळले नाहीं, 


रै 


प. वा. हरिभाऊ आपटे याच्या कादंबरींतील एक सुधारक “ गणपतराव 
यांचें एक मत डॅक्‍्टिर केतकरनां आवडले नाहीं. त्यानीं प्रियेषदेच्या पहिध्याच 
प्रकरणात ' गद्धे गणपतराव ? असा उल्लेव केला. किती शिकलेल्या मुलीचें किती 
शिकलेल्या पुरुषाशी लम्न व्हावें यांचे गणीत महाराष्ट्रांतील सुधारक नेत्यांस 
समजलें नाहीं; समाजाला विवाह संस्थेचे कार्य व उदिष्ट समजले नाहीं-- तें 
शिकबिणारे डॉ. केतकर स्वतःचा उद्वेग झाकूं शकले नाहींत. समाजशास्त्री ब 
ललित लेखक यातील अंतर त्यानीं नंतरच्या कादंबऱ्यात पाळले. विचाराने 
अतिदाय आधुनिक असलेले डा. केतकर कथा-निवेदनातील अतिशय जुनें 
सूत शोनकादि त्रदरषीचे तंत्र अवलंबिते झाले, कथन करणारानें स्वत:ची पसंति 
नापसंति ही वाचकाच्या लक्षात आणून द्यावयाची, पण ती अप्रत्यक्षपणे, 
सुचकतेनें -- पण डॉ. केतकर हे स्वभावतः जसे कमालीचे सोजन्यशील तसेच 
प्रामाणिक मताबद्दल आडदाड होते. ( आडदाड हा दाब्द कोणी अशिष्ट 
मानील पण त्या शाब्दानेंच डॉक्टर केतकरांची लढाऊवृत्ति यथार्थतेनें व्यक्त 
होते. ) त्यांना समाज सुधारक वर्ग अडाणी वाटे; याचे कारण हिंदी समाज- 
धूरिणापैकी फारच थोड्या लोकांनीं आधुनिक व पौराणिक या दोन्हीं समाज- 
शास्त्राचा अभ्यास केला होता, व तोहि डॉ. केतकराच्या ज्ञानाच्या पासंगासहि 
पुरण्याइतका नव्हता. संस्कृत अभिजात बाड्ययांतील रसरशीत “रस? न 
चाखल्यामुळें नवशिक्षित कादंबरी लेखक ' प्रेम ' वगेरे विषय हाताळताना निर्जीव 
भासतात असाहि अभिप्राय डॉ. केतकरानीं त्याच प्रकरणांत व्यक्त केला आहे. 
५ अर्वाचीन कादंबऱ्यांतील आणि गोष्टींतील नवऱ्याला चहा पाजण्यांतच केवळ 
रोमान्स मानणाऱ्या मुंबईच्या किचकट आणि स्वतः चहा पिऊन दुबल झालेल्या 
कादंबरींकारांच्या डोक्यांतून निघालेल्या नायिकांप्रमाणें ही प्रियेवदा नव्हती.” 
स्वतःची रगेलं व रंगेल वृत्ति झाकून न ठेविर्ता एखाद्या ' पड्डे बापूरोवाच्या 
अमिंनिवेषानें डी, केतकर ' नव नवतीचा श्रृंगाररस' वाचकांस पाजीत आहित॑. 
या करामतींत डी, केतकरांचा इरसाल निस्पृह रसिक स्वंमाव व भारतीय सैस्कृतींत॑ 
पुरेपूर रमलेली वृत्ति व्यक्त झाली आहे. ' जगंन्नाथरायाच्या, श्रैगारविलासांतींल॑ 
अगर भतुह्रीच्या श्रृगाररतकांतील मौजेचे *छोक घेऊन त्यांचा अर्थ ' निःशंक 


बड 


मनाने नवबऱ्यास विचारणारी डा. केतकराची प्रियंवदा म्हणजे डा. केतकरानीं 
दुभळ्या वृत्तीच्या मराठी कादंबरीकारांस करून दाखविलेले रंगेल प्रात्यक्षिकच 
होय. कलावन्ताना तंत्र अभ्यासताना उस्ताद प्रात्यक्षिकरूपाने शिकवितो -- 
तोच प्रकार डा. केतकरांनीं ' गोंडवनांतील प्रियवदा ' लिहिताना अरंभिला होता. 
जयदेव कवींच्या गीतगोविदाचा उतारा देताना नागपुरी संत्र्यांची साल 
नवऱ्यास फेकून मारणारी डा. केतकरांची नायिका ही अधिक रसरशीत व सजीव 
भासते. ' एकच प्याल्यां !त आधुनिक सुशिक्षित हा सामान्यतः भीरु नेभळट आहे 
असे राम गणेश गडकरी यांनींहि रामलाळ ब भगीरथ या पात्राच्या रूपानें 
दशविलें आहे. तळीराम व सुधाकरासारख्या तुफानी भूमिकाच्यासमोर ही 
सुशिक्षित माणसें दुबळी, हतबुद्ध भासतात. पण कोणतेंहि पात्र दुबळे असण्या- 
पेक्षां मराठी ललित लेखकच रामलाल व भगीरथा च्या वर्गातले आहेत असें 
डाक्टर केतकरांना सुचवायचे आहे व हेंच मराठी ललित वाड्मयाचें दूषण 
दाखवून तें दूर करायचे मार्गे डी. केतकर स्वतः उदाहरण घालून दाखवीत 
आहेत. 


ललितकथेचा संसार आत्मप्रत्ययानें समाजाच्या वस्तुनिष्ठ पहाणींवर आधा र- 
लेला असावा. ही पहाणी शक्‍य तों बदल न करून वाचकांस सादर करावी व 
मंग स्वतःचा अभिप्राय सूचित करावा असें तंत्र डा, केतकर यानीं ' प्रिमवदे'च्या 
कथनांत प्रस्थापित केळे आहे. मराठी कादंबरी व कथालेखक वस्तुनिष्ठ 
परीक्षण करूनच कादंबऱ्या लिहीत असतां डीक्‍टर. केतकरांनीं यांत नवीन 
काय सांगितलें असा प्रश्न स्वाभाविकच उद्‌भवतो. पण 'प्रियंवदे'चें अंतरंग 
नीट अभ्यासले तर या प्रश्नाचे बिनतोड उत्तर वाचकांस मिळतें. 


डॉ, केतकरांच्या कादंबरीचे क्षेत्र भरपूर ऐसपैस आहे. एखादी व्यक्ति 
मुख्य ब तिच्या अंतःकणांतील छोट्याब्ड्या हालचालीचे विक्छषण येथें महत्त्वाचं 
नाहीं. चार चोघींच्या जीवनांत प्रणय व विवाह या विषयाचो वेचित्र्यपूर्ण 
हकीगत पाहून त्यांनीं स्वत च्या समाजशास्त्रीय दृष्टीनें प्रत्येक विवाहांतील आर्थिक 
अनुकूलतेची बाजू पूर्णपर्णे वाचकाच्या लक्षांत आणून दिंळी आहे. सरकारी 


षु 


नोकर, गिरणीचे चालक, कथेकरी, पुराणीक, इतिहास संशोधक वगेरे भिन्न- 
क्षेत्रांतल्या व्यक्तींच्या जीधनांच वैचित्यपूर्ण वळण, उपजीविकेच साधन संपीद- 
ण्याच्या प्रत्येकाच्या भिन्न परिस्थितीने निर्माण होतें. ही अर्थव्यवस्था सर्व 
मनांची घडण बनविण्यांत, निदाम प्रत्येक नीति बनविण्यास कारण होत आहे, 
ही गोष्ट डा. केतकरांनीं या कादंबरींत ठळकपणे दशीविली आहे. अगदीं सूत 
शोनकादि क्रष्रींच्या प्राचीन लकत्रीनें कथा सांगणाऱ्या लेखकाचा अतिशय 
आधुनिक दृष्टिकोन या अर्थेप्रवान समाजविचाराच्या रूपानें मराठींत प्रथमच 
अवतरलेला दित्ततो. सामाजिक प्रतिष्ठेच्या नीतिमत्तेच्या कल्पना हे केवळ 
आर्थिक परिस्थितीचे प्रतिबिंब असतें व या व्यवस्थेचे मूळ समजेल त्याला 
सामाजिक मन व सामाजिक समस्यांचे सत्यस्वरूप समजेल ही डा. केतकराच्या 


कादंबरी वाड्ययाची शिकवण व विशिष्ट दृष्टि आहे. 


“ तुझ्यासारख्या हिंदुस्थानांत जन्म झालेल्या मनुष्यास जर हिंदुस्थानांतील 
सामाजिक स्थिति लक्षात घेऊन विचार करतां येत नाहीं ”...“' बाबारे, खरें प्रेम 
ब खोटें प्रेम असें वर्गीकरण एखाद्या विशेष काळाच्या परिस्थितीसंत्रंधाने मात्र 
म्हणतां येईल ”....'“ खरें प्रेम असले म्हणजे तें चिरकाल टिकेल असं थोडेच 
आहे! ” 

कादंबरीच्या पात्रांच्या संवादांतील अशी थोडीशीं जरी वाक्ये चाळलीं 
तरी कादंबरीकार भावनेच्या उन्मादापेक्षां थंड युक्तिवादावर अधिक भर दैत 
आहे हे स्पष्ट दिसते. क्षणिक उन्माद व बिवाहाची चिर अवस्था यांतील 
फरक चिकित्सापूर्वक वाचकाच्या गळीं उतरेल असा अभ्यासू प्रयत्न डाक्‍्टरनीं 
कादंबरी लेखनांत केल्याचे पदोपदी दिसतें. 


प्रीतिविवाहाची कथा नीट समजायला, प्रियाराधन, सामाजिक जीवन व 
पुढच्या पिढीची तखूद या सवे अवस्थांचे सत्य स्वरूप समजले पाहिजे. प्रेम ही 
वैयक्तिक व नैसर्गिक अवस्था असली तरी विवाह ही समाजिक घटना आहे व 
सामाजिक घटनेत मुलाबाळांची सांस्कृतिक व आर्थिक सुरक्षा महत्वाची आहे हें 
सारें गणित अनेक उदाहरणांनी डॉक्टरनीं आपल्या अनेक कादंबऱ्यांतून पुनः 


६ 


पुनः सोडविळें आहे, प्रत्येक व्यक्तीची कथा स्वतंत्र मनोरम आणि वेगळ्याच 
प्रकारची चित्रिण्यांत डॉक्टरांचा हातखंडा आहे, संस्कृत कवींची रसशता आणि 
युरोपियन समाजाचा ब संस्कृतीचा दृढपरिचय; शिवाय या दोहोंच्या भरीला 
सामाजिक घटनांचे शास्त्रीय दृष्टीने प्रथ्कूकरण करून पहाण्यार्‍ची संवय व शिक्षण 
असतांहि माणुसजातीवर ब जीबनावर सखोल प्रेम या गुणांनीं हा जीवनाचा 
टीकाकार कमालीचा रसाळ बनला आहे. पांडित्य आणि कवित्व यांचा विरोध 
असल्याबद्दल एक प्रवाद वारंवार ऐकू येतो. पण अभिनव साहसपूरणे जीवन, 
जातिवंत रसिकवृत्ति यांनीं हे शासत्रीबोबा कमालीचे आकर्षक लेखक बनले 
आहेत. या चिकित्सक वृत्तीच्या शास्त्री माणसाला ललित लेखन साधणार नाहीं 
असा गैरसमज डॉ. केतकरांच्या मित्रवर्गातहि दिसून आला तर तो पहिल्याच 
कादंबरीने कायमचा पुसून जावा इतके लालित्य या कादंबरींत पुरोपूर भरून 
ओसंडून जात आहे. 

प्रियवदेचें स्वमावलेखन, तिची नवऱ्याला लिहिलेली पत्रे, हरिभय्या-बिंबा 
प्रणय, शारदा-वैजनाथ शास्त्री यांच्या प्रणयांतील संयम, हें सारें विविध खाद्य 
पुरविणारा कारागीर किती बहुश्रुत, किती अभ्यासी, किती रसिक आहे हें पाहून 
बाचक आश्चयेचकित होतो, 

या पहिल्या कादंबरीत डाक्टर केतकरांनीं ज्या एका विषयावर विशेष 
जोर दिला आहे तो इंप्रजांबद्दलची हिंदी लोकांच्या मनांत अकारण आदखुद्धि व 
अनुकरण बुद्धि असेल ती नष्ट करून टाकण्यावर, डाक्टर केतकरांना युरोपियन 
समाजांतील सद्‌गुण भरपूर प्रमाणांत ठाऊक होते, त्यांच्या जीवनांत, विर्देत वा 
कलेत जें जें उदात्त व स्वीकरणीय असेल त्याबद्दल योग्य आदर व प्रेम बाळगूनहि 
हिंदी नबसुशिक्षितातील न्यूनगंड नाहीसा करण्याची जरूरी त्यांना तीव्रतेने भासत 
आहे असें  प्रियंबदे 'त पदोपदीं दिसतें. हिंदी सुधारक वर्गातील सवे वेगुण्य या 
न्यूनगंडानें निर्माण होत आहे असें डाक्टर केतकरांनी ' प्रियंबदें 'त अनेक प्रकारें 
सुचबिलें आहे. इंग्रजी समाजाचे स्त्रीदाक्षिण्य, इंग्रज सरीचा हिंदी सुशिक्षिताशीं 
बिवाहू हे विषय ' प्रियंवदा ' लिहिली त्या काळीं समाजाच्या नित्य चर्चेचे विषय 
होते, उच्च दिक्षणासाठीं परदेद्यांत जावें ब विवाहित अथवा अविवाहितानीं 


१9 


परदेशी स््रीशीं लम़ करून यावें हें अनेकदां घडे व या मिश्र विवाहांवन पुढें 
काय प्रमेयें निर्माण होतात हाहि काळजीचा विषय अनेक कुटुंबांत झाला होळ. 


वस्तुस्थितीच्या पहाणीपेक्षा सोदर्यपूजा व त्यांतूनच उद्‌भवलेला ध्येय- 
वादहि प. वा. हरिभाऊंच्या ' मी * या कादेबरीनें एक आदश म्हणून निर्माण 
करून ठेविला होता, लोककल्याणासाठीं अथवा कांहीं उदात्त कार्यासाठी आजन्म 
अविवाहित रहाणें, देहदंड सोसणे, ' स्वदेशी ' त्रत आचरण्यासाठी “ साखर ? 
( तेव्हा ती बहुराः परदेशी असे ) टाकणें वगेरे स्वार्थेत्यागाचे अनेक प्रकार समाज 
चिकित्साशून्य आदराने स्वीकारीत होता, 


डा, केतकरांनी समाजिक मनावा हा नाजुक भाग ' प्रियेंबदे 'त 
इतक्या हळुबारपणें चिकित्साविषय बनविला आहे कीं, डी. केतकर 
हे ललित लेखनांतील कसबी कारागीर असल्याचे सहजच मनाला पटतें. 
शारदा व वैजनाथशास्त्री यांचे या विषयींचे संवाद म्हणजे हळुवार 
हातानें मराठी मनांतील या नाजूक भागाची शसक्रियाच होय, मिळमिळीत 
मोघमपणाकडून खणखणीत व्यक्त निश्चित ध्येय व ध्येयमार्गाकडे समा- 
जांतल्या शात्यानांहि खेचले पाहिजे ही श्ारदाबाईची जाणीव आणि वेजनाथ- 
शास्त्रींनी पुरुषप्रकृतीच्या तात्विक चर्येपासून कोकणस्थ ब्राह्मणाची स्वराज्यविषयक 
पोटतिडीक या विषयींच्या संवादात एक नबा खेळाडूपणा निर्माण केला आहे, 
एकाद्या व्यक्तीच्या ब समाजाच्या भावना दुखावतील म्हणून सत्यचिक्रित्सा 
टाळण्यापेक्षां त्या भावुकतेच्या चटणीने चर्चेची मेजवानी सजवण्याचें वैजनाथ- 
शास्त्र्यांचं तंत्र चिंतनीय वाटतें. कारदंबरीसारख्या विस्तृत बाड्ययांत ताच्त्रिक 
चर्चेचा वेदात अनातोल प्रान्स, ठाट्स्ठीय, शा वगेरे अनेंक युरोपियन 
लेखकांनीं रूढ करून टाकला आहे. तशाच मनोभूमिकेवरून डा. केतकरांनी 
: प्रियबदे 'चे लेखन केळे आहे. समाजात बोद्धिक पातळीचे व शिक्षणाचं जेबढे 
थर असतील त्या सर्व भ्रणींच्या व्यक्ति कथा विषय होऊं दकतात व त्या त्या 
जीवनाच्या दर्जाची चर्चा प्रसंगरः कादंबरीत निर्माण होऊं शकते, 

मी या असल्या विषयांची येथ मुद्दामच चर्चा करीत आहे, सामान्य 
कथाबाचक वब लेखक यांजमध्यें वितुष्ट निर्माण करण्याचें उपव्य़याप असमंजस 


टि 


टीकाळहार अनेकद्रां करतात; त्यांचे अप्रबुद्ध टीकालेख वाचून वाचक पूर्वग्रह- 
दूष्रिठ बनतो ब वाचनांतील आनंदांत हानी होते. ही आपत्ति टळावी आणि 
बाचकाची मनोभूमिका पुस्तकांतील रसमग्रहमास उत्सुक, पूर्वग्रहरहित आणि 
खेळीमेळीची व्हाबी हा हेतु या प्रास्ताविक चार शब्दांचा आहे. 

डॉ, केतकरांनीं ' गोंडवनांतील प्रियंवदें'तला बराचसा भाग “ विद्यासेवक 
पत्र चालवितानां लिहिला, ज्ञानकोशाच्या लेखनाच्या निमित्ताने अनेक संशोधक, 
अनेक विद्वान डॉक्टरांच्या नित्त्य संबंधांत येत. “ विद्यासेवकां'तीछ बहुतेक लेखन 
हें ज्या प्रातळीबर्च्या वाचकास उद्देशून असे त्याच पातळीवरील वाचकास रम्य 
वाटेल अशा पडतीने ही कादंबरी लिहिली गेली, लो. टिळकांच्या पिढींतील 
ध्येयवाद ब आचार मचे परीक्षण या काळीं समाजाने अंतमुखख होऊन 
करावें हा आहय या कादंजरींत कांहीसा अम्रत्यक्षपणें येतो. स्त्रीच्या जीवनाची 
समाजश्ञास्रीय दृष्टीने पुनरंचना व्हाबी, स्रीच्या हिताच्या दृष्टीनें बिवाह व्हावेत, 
: स्त्रिया म्हणजेच राष्ट्र ' हे बिचार ' प्रियवदे'त व्यक्त झाले त्यांचीच परिणति 
६ ज्ञाह्षणकन्ये'त “ सतरीसत्ताक) समाजाची आवश्‍यकता या विचारांत झाली आहे, 
समाजांत निराधारपणें, हताशपणे जीवित व्यतीत करणाऱ्या वेजनाथशास्त्रीं" 
सारख्या जीबनांबील सुखांची, आश्यांची ओसाडी भयावह वाटते, जीवन- 
वेफऱ्यानें या प्रचंड प्रयत्नवादी मागसाचे मनहि विकृत तर होत नाही ना असें 
त्याचीं मतें वाचून वाटतें. पण लौकिक जीवनांतील तकलादिपणाबद्दलचा वेज- 
नाथशास्त्रींचा आतताई वेवाग घराचसा बस्तुस्थितीवर आधारलेला असल्याचीहि 
बाचकास जाणीव होते, 


या पहिल्या कादंबरींत डॉ. केतकर हे स्वतःच ' सदाशिवपेठी ' बनले 
आहेत, सुसंस्कृत महाराष्ट्रीयांच्या कल्पना सदाशिव पेठेच्या संकुचित क्षेत्रात 
जन्मलेल्या व फेकलेल्या आहेत; या कोत्या भूमिकेवरून अधिक व्यापक क्षेत्रात 
मराठी सुसंस्कृतांचे मन नेलें पाहिजे हा आक्षेप घेणारे डो. केतकर “ सदाशिव 
पेठी ) संस्कृतीचा रसाळ हृदयंगम भाग “ गोंडवनांतीळ प्रियवदेत ! वणेन करीत 
आहेत, मराठी भाषिक जेथं जेथे रहातात तेथ तेथें ही “ सदाशिवपेठी * 
वृत्तिहि आहे. गोंडवनांतील या सदादिबपेठी भागाच्या जीवनाचीच ही 


९ 


कादंबरी आहे. शिकणे, विलायतेस जाणें, ध्येयवादी ' राष्ट्रीय ' वृत्तीचे 
असणें, पुस्तकनिष्ठ जीवन जगणें वगेरे सर्व बरे वाईट “ सदाशिव पेठी! 
गुण हाच या कादंबरीचा कथाभाग आहे. मार्मिक विनोदी खोडकर 
वृत्तीने, रगेल रंगेळ मनोवस्थेत लिहिलेली ' गोंडवनातील प्रियंवदा * ही श्रेगार 
प्रधान कादंबरी आहे, लेखकाचे लय्नविषयक विचार ताजे गरम गरम 
असतांनाच ही कादंबरी लिहिली गेली. नूतन विवाहिताचे तत्कालिन समाजाच्या 
स्थितींत स्थान काय ! कार्यक्षेत्र कोणते, ध्येयबाद योग्य पद्धतीने कसा समजून 
ध्यावा असे अनेक विचार मनांत दुर्दम्य स्वरूपात उतळत असतां भोंबतालच्या 
परिस्थितीचे सहृदय खेळकर वृत्तीने चित्रण करणें ही क्रिया डॉक्टर केतकरानी 
सहज पार पाडली, त्यांनीं प्रचलित वा नवें जुनं कोणतेंच कथन तंत्र महत्वाचे 
मानलें नाहीं. स्वत चा बहुश्रतपणा, रसिकता, सह्ृदयता, विनोदबुद्धि या 
भांडवलावर वित्तबून राहून त्यांनीं कथा कथन केले. त्यांत अनुभव, ज्ञान व 
सोदर्यबुद्धि यांनीं रसरसीत जिवंत व सुरम्य गोष्टी निर्माण केली, आपण र्जे 
रंगवून सागू तें रम्य लालित्यपूणे अस्लेंच पाहिजे अशा आत्मविश्वासाने डी. 
केतकरांनी ललित लेखनाच्या प्रागणांत हे पहिल पाऊल टाकलें. प, वा, हरीभाऊ 
आपटे यांनी सामाजिक ध्येयवादाची जी भूमिका स्वतःच्या कादबंऱ्यांत धारण 
केली तीच भूमिका डा, केतकरानींहि सोडली नाहीं. देशाचे स्वातंत्र्य, 
सामाजिक सुधारणा व ध्येयनिष्ठ जीवनाचें सुखसाफल्य हाच विषय डी, 
केतकऱ्यांच्या कादंबरीत पुनः कथिला गेला. वैयक्तिक अनुभव, मतें भिन्न 
असलीं तरी डा, केतकर हेच मराठी ललित कथेच्या उत्क्रांतीचे पुढारी 
हरिभाऊंच्या पिढीनतर ठरठे, लघुकथेच्या छोट्या क्षेत्रांत मावेळ इतकें थोडं 
लिहिण्याची डा. केतकराची स्वभाव प्रकृति नव्हती. अगदीं सामान्य 
सामाजिक कल्पना व घटनानीं डा. केतकराचं समाजशास्त्रशञ मन व्यापक 
विचाराचा अवाढव्य पट निर्माण करी. समालोचना, समाज प्रथक्करण वगैरे अनेक 
प्रकारच्या शास्त्रीय प्रक्रिया त्यांच्या मनांत सुरू होत, वाचकाला किती 
जमती सांगू आणि किती नको असें त्यांस होऊन जाई, प्रत्यक्ष गप्पांच्या 
त्यांच्या व माझ्या भेठकी निदान आठ ते बारा तास टिकत. एकेका विषयाची 


७ 


अगदीं वरवरची चिकित्सा संपूर्ण रात्रींत पूण होत नसे. संध्याकाळीं ७॥ ला सुरू 
झालेली चर्चा दुसऱ्या दिवशीं सकाळचा चहा घेतल्यावर उजाडल्यावर संपायची. 
अगदीं सामान्य व्यावहारिक विचारांपासून कायदा उपनिषदांपर्यंत क्लिष्ट पेळू 
पडल्यावरच विषयाचे चर्चारूप व्यक्त व्हायचे. श्रोत्याच्या बा वाचकाच्या 
बुद्धीच्या, अनुभवाच्या, आवडीच्या मर्यादा लक्षांत घेण्याचे भान न राहून 
डा. केतकर आपले हृद्वत बोळून दाखवीत तसेंच तं त्यानीं कादंबरींताहे कथन 
केल्याचे आढळतें. ही त्याच्या विचाराची अनावर धाव तंत्रनिष्ठ कथा टीकाकारास 
भावडत नाहीं. प्रियंबदेसारख्या उत्सुंखल तरुणीचे प्रेम व शारदा-वैजनाथांची 
: आरण्यके) सामान्य वाचकाला एका दमांत वाचणें झेपत नाहीं. आध्यात्म- 
चर्चेत रमून नव्हे तर प्रेमाच्या आंतरिक आकषेणानें केवळ परस्पर सहवास- 
पिपासेनें शारदा-वैजनाथ बोलत राहिलीं कीं अप्रबुद्ध वाचकाचा दम उखडतो. 
मादाम क्यूरीच्या चित्रपटांत असेंच शास्त्रचिकित्सेचे निमित्त करून प्रेमविकास 
साधला आहे.  ग्रियर गारतनसारखी डोळ्यानीं, हालचालीनीं प्रेम व्यक्त 
करणारी नटी असल्यामुळेच सामान्य प्रेक्षकाला हा प्रेमप्रसंग आहे याची जाणीव 
झाली -- त्या घनगंभीर संवाद लेषकाने हें अमिनय कोराल्याचं साहाय्य ग्रहीत 
घरून कथा लिहिली. डा. केतकरांनी बिंबाची टीका व फटकळ अभिप्राय 
जोडून त्या प्रणय कथेचें सत्यस्वरूप वाचकास समजाविले. पण ललित 
लेष्वनांतहि असे कित्येक क्षण येतात कीं तेथे लेवकाच्या मनांतील ललित मनोहर 
अभिप्राय वाचकानें स्वतःच्या रसिक वृत्तीनं व कल्पनाशक्तीनें जाणला पाहिजे. 
लेखक व वाचकाची ही समानभूमिका निर्माण करणें हें टीकाकाराचे काम, 
त्या टीकेचं - स्पष्टीकरणाचं प्रयोजन निर्माण होऊं नये ही उत्तम अवस्था, पण 
ललितलेखनाचा वाचक क्रचितच इतक्या सावधपणाने वाचन करतो. अशा बेसाबध 
बाचकाला एवढेंच सुचवायचे कीं, सामान्य रिक्षण, सामान्य अनुभव व 
गोड कथनरेली एवढ्या सामग्रीवर लोकप्रिय कथा सांगणाऱ्यांचे लेखन ब 
असामान्य शिक्षण, असामान्य निरीक्षण व चिकित्सक हृष्टि आणि असामान्य 
रसिकता यांचा परमोत्कषे साधणाऱ्या डा. केतकरांचें ललित वाड्य़य वाचतानां 
वाचकाने जागरूक राहिलें पाहिजे. या लेखनांत फालतू बाक्यच काय 


११ 


विनाकारण वापरलेला शब्दहि सांपडणे कठीण, प्रत्येक योजना -सहेतूक -““- प्रत्येक 
शब्द सहेतुक -- केवळ नादमाधुर्य साधण्यासाठी भाषा, भावमावैभवार्चे खोटें 
नाटक उभारण्यासाठी वणेनाची नक्षी या' ठेखनांत योजलेली नाहीं. सत्य, शिंव 
आणि सुंदर असें हें निवेदन जितक्या सहेतुक विंचारी भूमिकेवरून लिहिले गेलें 
त्या भूमिकेवर पोहोंचून रसग्रहणाचा प्रयत्न करणें हेंच अर्थिक श्रेयस्कर, 
एवढी जागरूकता ठेऊन डाक्टर केतकराचे ललित लेखंन वाचले तर त्यांत 
रसात्मकतेची लयळछूट अनुभवायला मिळेल. 


-- नी. म. केळकर 


प्रकरण १ ले 
विलाथतेस प्रथाण 


सुमारें तीस वर्षापूर्वीची गोष्ट, पण ती आजच्या अनेक नागपूरकरांनां 
कालची म्हणूनच वाटत असली पाहिजे, या कथेतील काहीं व्यक्ती जरी आज 
दिवंगत झाल्या असल्या तरी त्यांस ओळवणारी मंडळी आज हजारों हयात 
आहेत व कथानिदिष्ट कित्येक व्यक्ती आज पेन्शन घेऊन धनतोलीस बंगला बांधून 
राहिल्या आहेत, व आम्ही जे पुढें सांगत आहों त्यांतील कांहीं गोष्टींची आठवण 
तरुणांस सांगून त्या जिवंत ठेवणें हाच त्यांचा दैनिक उद्योग आहे. 

संध्याकाळची वेळ, आज मॉरिस कॉलेजात इंटरमिजिएट परीक्षेचा 
निकाल ( रिझल्ट ) लागणार होता. त्यावेळीं मॉरिस कॉलेज महालातच होतें, 
आणि प्रोफेसर ताम्हने याच्या नेतृत्वास्वालीं चागल्या तऱ्हेने ते चाललें होतें. 
प्रस्तुत संध्याकाळीं कलकत्ता युनिव्हर्सिटीकडून एफ. ए. चा निकाल केव्हा 
येतो आणि त्यात आपण आपला नंबर केव्हा पाहतों या तऱ्हेची उत्कंठा विद्या- 
थ्योत दिसत असून विद्यार्थी येरझारा घालीत होते, .““ आला एकदांचा बाहेर ” 
म्हणून कालेजच्या कारकुनाजवळ सवे विद्यार्थी जमले. कारकुनानें निकालाचे 
कागद दोन काडंबोर्डास चिकटविले आणि एक काडेबोड, नोटीसी लावण्याच्या 
भिगाच्या कपाटांत ठेवून दिला. आणि दुसरा काडंबो्डे हातांत घेऊन एका- 
मागून एक नंबर वाचण्यास सुरबात केली; १३७, १३९, १४३, १५८, १५९ 
असे आकडे तो भराभर वाचू लागला. कांहीं विद्यार्थ्यीचा घोळका बोर्डाभोंबती 
होता आणि कांहीं विद्यार्थी त्या कारकुनाभोंवती जमले होते, 

रामभाऊ गोडबोले हा विद्यार्थी त्यावेळेस आधुनिक विद्यार्थ्यीचें 
: मणिमंगलसूत्र ' घालून व पाटळूणीच्या एका खिश्यात हात घालून व दुसऱ्या 
हातांत टेनीसची बॅट घेऊन ती गरगर फिरवीत आला होता, “ मणिमंगलसूत्र ! 
हा केवळ आमच्या पद्र्चा शब्द नव्हे. हा त्या वेळच्या मारिस कालेजांतील 
विशिष्ट परिभाषेतील महत्त्वाचा शब्द होय, अज्ञ जनांच्या, प्प्न्याविवत न्या 


गॉडवनांतील प्रियंवदा २ 


कॉलर-नेकटाय असें म्हणतात. त्यावेळच्या कांहीं संस्कृतश॒ पंडितांस कॉलर- 
नेकटायसारखे प्राकृत शब्द वापरावेसे वाटत नव्हतें. नंबर १९९ हा केव्हां 
येतो म्हणून रामभाऊ हा मोठ्या उत्कंठेने वाट पहात होता. १९७ हा आंकडा 
उच्चारतांच त्याचा जीव उत्कंठेने व धागधुगीनें अगदीं कासावीस होऊन 
गेला ; पण १९७ नंतर एकदम २०३ हा आंकडा ऐकतांच धघागधुगीची एका 
क्षणांत एकदम निराशा झाली व आज मी “ बोहारी ? पाटळूण घाळून ऐटीने 
आलों पण ती ऐट सगळी एकदम बाहेर निघाली हा विचार त्याच्या मनांत 
आला. तो इकडून तिकडे न पहाता तडक तुळशीबागेकडे गेला; आणि 
तुळशीबागेची ती प्रचंड विहीर पाहून त्या विहिरींत आपण आपला कडेलोट 
करून घ्यावा अशी त्यास अनावर इच्छा झाळी ; आणि तो इकडे तिकडे पाहूं 
लागला, इतक्यात “ काय रामभाऊ! तूं आत्महत्या करावयास निघालास काय?” 
असे उद्गार काहून धांवत येणारा त्याचा स्नेही घरकुद्े त्याच्या दृष्टीस पडला, 


ही तुळशीबाग म्हणजे खरोखरच बाग आहे. ही पुण्यासारखी नामधारी 
तुळशीभाग नाहीं, आणि हें आता रमणीय स्थान तरुण विद्याथ्यीकडून एकातपणें 
अभ्यास करण्याकरिता उपयोगिलें जातें. या तुळशीबागेच्या पाठीमागून 
उन्हाळय़ात शुष्क व पावसाळ्यांत धो धो वाहणारी नाग नदी दृष्टीस पडते. 
आणि तुळशीबागेच्या तटारोजारींच आट्यापाट्या खेळणारे विद्यार्थी आज 
अनेक वर्षे दृष्टीस पडत आहेत. चिटणवीस पाकमध्ये कित्येक तरुण मंडळी 
हाकी खेळोत, अगर क्रॅडीक पार्कमध्ये अगर अंजनी तुरुंगाच्या परिकरांत 
: टेनीस ? खेळोत, कित्येक जण संपर्कास टाळण्यासाठी महाराजबाग छुबात 
ऑक्शनत्रीजरूपी जुगार खेळोत, तथापि तुळशीबागेच्या परिकराची लोकप्रियता 
खऱ्या नागपुऱ्यामध्ये नष्ट होणार नाहीं. 


“ अरे झालें काय ! रामभाऊ तूं असा कावराबावरा कां दिसतोस ? तुझ्या 
मनांत काय आलें आहे? ” 


“ अरे झालें काय म्हणजे ? सर्वेच बुडाले. आता मला घरीं तोंड 
दाखवावयास सोय नाहीं. ” 


-! विळायतेस प्रयाण 


,», “*आणितीकां?१० 
“८ कां म्हणजे इंटरमिजीएटच्या परीक्षेच्या निकालांत आमच्या महत्त्पाची 
परिसमासि झाली. ” 


“ काय नापास झालास कीं काय ? आणि झालास म्हणून काय झालें १ 
अरे, नापास होण्यापासून मोठा फायदा आहे. जे बी. ए, झाले आहेत त्यांनां 
पुढें काय करावें याची भ्रात पडते आणि नापास झालें म्हणजे त्या प्रकारची 
पंचाईत एक वष पुढें गेली, ” 

“ तुला काय सांगावें ? माझ्या घरची सर्ब प्रकारची स्थिति तुझ्या लक्षांत 
येत नाहीं. ? 


£ न यायला काय झालें १ मला सवे ठाऊक आहे. तुझ्या बापाने 
गडगंज पेसे मिळवून ठेविळ आहेत ; तो पसा गाडीधोडा घेऊन कसा उडवावा 
हा प्रश्न तुझ्यापुढे आहे. तूं बी. ए. किवा एलू. एल्‌. बी. नसताना गाडीघोडा 
उडबिणें तुला योग्य वाटत नाहीं आणि ती संधी केन्हा मिळेल असं तुला झालें 
आहे, झरे, या प्रश्नाचे उत्तर एवढेंच कीं, गाडीघोडा उडवायला ओठावर 
मिशा पाहिजेत, व घरी पैसे पाहिजेत, कारण सभ्य ग्ह॒स्थाची लक्षणें एवढीच. 
तूं परीक्षेत पास होस अगर नापास होस आज एकूणवीस वर्षाचा आहेस, तो तूं 
पंचवीस वर्षांचा होणारच; आणि तुला मिशाहि फुटतीलच ! झालें तुझे लमहि 
झालें आहे. लेडी आणि जेटलमन दोघेहि सिव्हिल लाईन्समधून महाराजबागेंत 
दुडक्या चालीनें धावणाऱ्या घोड्याच्या गाडींत बसून “ हिडयन्ते ' करतीलच. 
गाडींत असलास म्हणजे नाक्यावरचा पोलीस तुला सलामहि करीलच. म्युनिसि- 
पालिटींत जाशील, चीफ कमिशनरच्या गाडेनपार्टीस तुला आमंत्रणहि येईलच, 
आणखी काय पाहिजे ! तुझ कोणचें महत्त्व गेलें आहें ? ” 


बंडू घरकुड्याची ही टकळी ऐकून विषण्णवृत्ति झालेल्या रामभाऊची एक 
क्षणभर करमणूक झाली; व परीक्षेच्याखेरीज दुसऱ्या कांहीं गोष्टींना महत्त्व 
आहेच, हाहि एक विचार क्षणभर त्याचा मनांत आला, परंतु लागलीच दुसरा 
एक विचार मनात आला आणि त्या विचारामुळे तो स्तब्ध होऊन कांहीं 


गोंड वनांतील प्रियंवदा 8 
स्वभमय़ चित्राकडे पहात असल्यासारावा दिसला. तो विचार म्हटला म्हणजे 
: लेडी आणि जंटलमन? या उठेलासंबंधीं होता. 

रामभाऊचे लम नुकतेच झालें होते. बायको सतरा अठरा वर्षीची प्रोढवधू 
होती, व त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे सुशिक्षित स्त्रियात मोडण्यासारखी होती. 
ती मॅट्रिक्युलेशनची परीक्षा पास झाली होती. रामभाऊचे वडील वारल्याला 
नुकतेच दोन महिने झाले होते; ब लग्न हे बापाच्या हयातींत ब ब!पाच्या मोठे- 
पणामुळे झाले होतें. मेट्रिक झालेली मुलगी म्हणजे एखाद्या बॅरिस्टरची अगर 
आय. सी. एस्‌. ची बायको असली पाहिजे अस लोकांस बाटत होते; आणि इंग्रजी 
चार पांच इयत्ता शिकलेल्या मुलीला एखाद्या गरजू बेटाच्या गळ्यांत अडकवून 
तिच्या जन्माचे मातेर करूं नका म्हणून आक्रोश करणारे गद्धे गणपतराव हरी 
नारायण आपटे याच्या “ भयंकर दिव्यात? हग्गोचर आहेत. त्या प्रकारचे 
गणपतराव आमच्या नागपूर दाहरात मात्र रगड होते, तीन चार इयत्ता झालेल्या 
मुलीला जर बॅरिस्टर किवा आय, सी. एस, लागेल तर मेट्रिक मुलीला तर 
त्याहूनहि कोणीतरी मोठा पाहिजे असें लोकास वाटे, त्यातल्या त्यात प्रियंबदा 
म्हटली म्हणजे अत्यंत देखणी मुलगी, तिच्यासाठी पुषकळ मंडळी हपापलेली 
आणि ती या गोडबोल्याच्या पोर्स्याने उपटली म्हणून रामभाऊविषयीं पुष्कळ 
तरुणास मत्सरजुद्धि वाटत होती. रामभाऊ हा स्वतःच्या बायकोस योग्य नवरा 
नाहीं असे दावविण्याची पुष्कळाची खटपट असे, आणि हा रामभाऊ इंटरमध्ये 
नापास झाला म्हणजे हा केवळ कलकत्ता एन्टून्सवाला होणार म्हणजे ब्ायको- 
पेक्षांहि हलका ठरणार असे लोक उघड उघड बोलत होते, हलका ठरण्याचे कारण 
हे कीं त्या वेळेस मुंबईच्या मेट्रिक अगर बी. ए. पेक्षां नागपुरचा म्हणजे कल- 
त्याचा एन्ट्रन्स अगर बी, ए, हिणकस अशी लोकांची समजूत झाली होती. 
अर्थात जे विचार लोकांत चोहोंकडे घोळत होते ते रामभाऊच्या मनात आल्या- 
शिवाय कसे रहाणार ! ब परीक्षेत नापास झाल्याबरोबर ते बिचार दत्त म्हणून 
रामभाऊच्या मनात उभे राहिले, रामभाऊ आपल्या वैबाहिक स्थितिविषयीं 
असंतुष्ट होता अशातला भाग नाहीं. उलट प्रियंबदाबाईच्या सोजन्यामुळे आणि 
एका योग्यतेचे सहचर आणि सहचरी यांच्यामध्यें जे अबणेनीय प्रेम आढळतें 


ष्९ विलायतेस प्रयाण 


त्या प्रेपाच्या मधुर अनुभवामुळे हं नवाळीचे दिवस मोठ्या आनंदांत गेले, 
बायको सातारची होती, ल्म़ानंतर ती मधून मधून माहेरी जाई परंतु जरी ती 
माहेरी गेली तरी तिचें मन आपल्या लाडक्या नवऱ्यामध्येच पूर्णपणें गुरफटलेले 
आहे कीं काय असें कोणासहि वाटे. नवऱ्याला दररोजचे एक पत्र ठेवलेलेंच 
आणि तै सुद्धां कधीं कधीं पांच पांच प्रष्ठे लांब असावयाचे, अथोत रामभाऊचीं 
उत्तर जावयाचरींच. परंतु ती आठवड्यातून एक दोन म्हणजे शिकस्त, व या एक 
दोन पत्रांपैकीं सुद्धां एखादे कार्ड निघावयाचें. रामभाऊचे वडील तात्यासाहेब 
यास आपल्या नबपरिणीत मुलाचे आणि सुनेचे हे सख्य आणि त्यांच्या सख्यांतील 
अकृत्रिम भाव पाहून मोठा आनंद होई. प्रियंबदाबाई नवऱ्यास पाहून दूर पळणारी 
नव्हती, 

“ गूढानुपूरमात्र शब्द्मपि मे काता श्रुतौ पातयेत्‌ । 

पश्चादेत्य शनै. करांबुजवृते कुर्वीतवालोचने ।। 


याप्रकारें नवर्‍याचे कोड पुरविणारी प्रियंवदा होती. लहानपणच्या खेळ- 
गड्यापाशीं खेळावें त्याप्रमाणें ही नवऱ्यापाशीं खेळे, भीत भीत दूर पळणाऱ्या 
बायकोस एकटी पाहून तिच्याकडे हरभरे फेंकून मारण्याचे कारण रामभाऊस 
पडलें नाहीं, उलट नवरा अभ्यास करीत असतां संत्र्याची साले त्याच्या अंगावर 
फोकून लपून बसण्याचे तीच स्वतः करी, आणि जगन्नाथरायाच्या शुंगारविला- 
सातील अगर भतैहरीच्या शुंगारशतकांतील मौजेचे 'छोक घेऊन त्याचा अथे 
काय म्हणून नवऱ्यास बिचारावयास जावयाची देखील तिला इहेका वाटत नसे. 
रामभाऊ मध्येंच म्हणावयाचा कीं तुझ्यासारख्या लहान पोरींनां असलीं चावट 
पुस्तर्के वाचण्याचे प्रयोजन काय १ तेव्हां तिने साफ उत्तर दिलें कीं * लम्न झाल्या- 


अर्थ :--- “ स्वतः लपून राहून आपल्या केवळ नुपूराचाच ध्वनि माझी 
लाडकी माझ्या कानावर ( माझी उत्कंठा जाग्रत करण्याकरिता ) पाडो अथवा 
माझ्या पाठीमागून मंद मंद पावलें टाकीत येऊन;आपल्या करकमलांनीं माझे नेत्र 
झांको, ? प्रस्तुत वाक्य राजा पुरूरबस यानें उबशीसंबंधानें कालिदासाच्या 
विक्रमोबशीयांत उ्चारलें आहे. 


गोडवनांतील प्रियंवदा दे 


बरोबर मार्झे पोरपण गेलें, लगन होण्यापूर्वी असली पुस्तर्के वाचावयाची मला म्मनाई 
होती. आतां संस्कृतमध्ये जितकीं म्हणून इुंगारिक उफ तुमच्या भाषेंत चावट 
पुस्तकें असतील तितकी मी वाचून काढणार आणि ' सा विरहेतवदीना, माधव 
मनसिज विशिख्व भयादिव भावनया त्वयिलीना ' अशा तऱ्हेची जयदेवकवीची 
परदे देखील पाठ करणार आणि गाणार, आपण एक नवीन सतार मात्र लबकर 
आणून दिली पाहिजे. माझी जुनी सतार मोडली. ” रामभाऊची आई 
आनंदीबाई हिनें या तऱ्हेची सुनचीं भाषणे ऐकून ' आज-कालच्या मुलींनी 
ताळच सोडला ? असं कोतुकानें म्हणावें. पण तिच्या गोड चेहर्‍याकडे पाहिल्या- 
बरोबर आपल्या मुलावर प्रेम करणारी बायको त्यास मिळाली म्हणून तिला 
आनंदच होई. एखादे वेळी प्रियंवदा आपल्या सासूबाईवर उलटून पडे, तिने 
म्हटलें “ आम्ही तर ताळ सोळा सतराव्या वर्षी सोडला. पण सासूबाई, गेल्या 
पिढींतल्या बायकांनीं तर सहाव्या सातव्वा वर्षीच ताळ सोडला होता. नवरा 
आठ वर्षांचा आणि बायको सहा वर्षांची; चूलबोळक्याचे खेळ देखील खेळत 
असत. आणि त्यामुळें ' जुन्या पिढींतील नवराबायकोंत जे प्रेम असते ते नव्या 
पिढींत नाही ' असे मार्मजीनां कित्येकदां तरी बोलतांनां ऐकले आहे. ” अक्शा 
तऱ्हेचे वाक्‍य सुनेने उच्चारल्याबरोबर जुन्या काळाची आठवण होऊन सासूबाई 
क्षणभर आनंदांत गर्क होत, व “ थाज, ते घरी आल्यावर तुम्ही भलत्या सलत्या 
गोष्टी सुनेदेखत बोलत जाऊं नका असं मी त्यानां बजाबणार आहे ” अर्से सासू- 
बाई म्हणत, एके दिवशीं अर्से वाक्य ऐकल्याबरोबर सून पुन्हा म्हणाली कीं 
“ पहा आजकालच्या पोरीनीं नवऱ्याला हुकूम करण्याचे काम हातीं घेतलें नाहीं.” 

शब्द तेच, पण आवाज आणि त्यांचा उच्चार करतांना हृदयांत खेळत 
असणारा भाव यांच्यामुळेच फरक होत असतो, एखार्दे वाक्य जे उलट उत्तर 
म्हणून समजले जाई तेंच उच्चारणाऱ्याच्या प्रेमाविषयी खात्री असल्यामुळें प्रेम- 
दर्शक वाटतें. सासूर्चे आपल्याबर पूर्णपर्णे प्रेम आहे याची मनास पूर्णपर्णे खात्री 
असल्यामुळे प्रियंवदा सासूशीं निभयपणाने बोले. ज्याप्रमाणे शब्दाचे त्याप्रमाणे 
कृतीच, प्रियंवदा आपल्या लाडक्या नवऱ्याचे प्रत्यक्ष कान उपटण्यास कमी करीत 
नसे; पण त्या कान उपटण्याबद्दल रागावण्याइतका नवरा अरसिक नव्हता, 


७ विलायतेस प्रयाण 


अर्वाचीन कादुंबऱ्यांतील आणि गोष्टींतील नवऱ्याला चहा पाजण्यांतच केवळ 
रोमान्स मानणाऱ्या मुंबईच्या, किचकट आणि स्वतः चहा पिऊन दुबल झालेल्या 
कादंबरीकारांच्या डोक्‍्यांतून निघालेल्या नायिकांप्रमाणे ही प्रियंवदा नव्हती. 


आतांपर्यंत आम्ही वर्णन केलेलें सर्व ग्हचित्र रामभाऊच्या डोळ्यासमोर 
उभें राहिलें आणि आपली बायको जरी आपले सांत्वन करण्यासच प्रवृत्त होईल 
तरी तिच्या मनांतील आपल्याविषयी आदर कमी होईल काय ! असा ल्याच्या 
मनांत विचार आला, शिवाय आपण आपल्या पत्नीस आद्रस्थान वाटावें ही 
स्वाभाविक इच्छा त्याच्या मनांत होतीच. पत्नी सुशील असली आणि नवऱ्यावर 
कितीहि प्रेम करणारी असली तरी तिचें करुणास्थान होण्यापेक्षा आदरस्थान व्हावे 
अस कोणत्या पुरुषास वाटणार नाही ? प्रेमाची अत्युच्च कल्पना म्हणजे सायुज्य- 
तेची होय, सायुज्यता साध्य होण्यासाठीं एक व्यक्ति साध्य-रूप असली पाहिजे 
आणि दुसरी साधक-रूप असली पाहिजे, आपले ध्येय-रूपत्व कायम ठेवण्या- 
साठीं नवऱ्यानें नेहमीं प्रयत्न करीत रहाणे आणि ते॑ अंतर काढून टाकण्यासाठी 
स्वतःच्या मनास, वाचेस आणि आचारास उच्च तऱ्हेची शिस्त लावून साधकाने 
साध्याशीं सायुज्य संपादन करण्यास निकराचा प्रयत्न केला पाहिजे. या प्रकारच्या 
खटपटींत पतिपत्नी-प्रेम उत्कर्षास पावते. आणि कवीस, कादबरीकारास आणि 
त्याचप्रमाणे नीतिविषयक तन्त्ववेत्यास मोहक होते. या पतिपत्नी-प्रेमाची कल्पना 
केवळ समानतेसंबंधाने उखाळ्यापाखाळ्या काढणाऱ्या, संस्कृतच्या ऐवजी फॅंच 
शिकणाऱ्या अर्वाचीन अल्पबयस्क अविवाहित विदुषींस होणार नाहीं. 


बंडू घरकुट्टे हा सांत्वनपर शब्द बोलला तथापि त्यानें रामभाऊच्या मनां- 
तील खरी स्थिति ओळखली नव्हती असें नव्हते. रामभाऊच्या मनांत काय 
विचार वागत असतील याची त्याला उत्तम तर्‍हेनें कल्पना होती, यालाच काय 
पण नागपुरांतील कोणाहि मनुष्यास ती कल्पना सहज झाली असती, तथापि राम- 
भाऊच्या मनाची खरी टोंचणी लक्षांत घेऊन त्यास समपैक इलाज सांगून त्याचे 
सांत्वन करणें त्यास शक्‍य नव्हतें. तथापि कांहीं विचार मनांत आणून तो पुढें 
म्हणाला, “ तुला या एफ्‌ ए.च्या परीक्षेचे काय महत्त्व आहे ? खरोखर तुझें बॅरिस्टर 


गोंडवनांतील प्रियंवदा ८ 
होण्याकरिता विलायतेस जावयाचें पूर्वीपासूनच ठरलें नाहीं काय ! आणि तुळा 
बेरिस्टर व्हावयाचे आहे तर तुला इंटरमिजिएटची किंमत तरी काय ? तुझ इंटर- 
मिजिएट नापास झाल्यानं काडीइतर्के नुकसान झालें नाहीं. रजे काय तुला शिका- 
वयाचे तै तर तूं शिकलासच. तुला पास होऊन तरी करावयाचे काय! आतां तुला 
जर ससें वाटेल कीं नापाशीचा धक्का तुझ्यावर असल्यामुळें तुझी लोकांत अपकीति 
होईल, तर ती कल्पना चुकीची आहे. कारण प्राप्तयौवन वधूशी ज्याचें नुकतेंच लगन 
झालें आहे त्याला निदान एक वर्षे तरी घरीं बसावयास हक्क आहे; आणि जर तूं पास 
झाला असतास तर तुझ्याबिषयीं मला असें वाटलें असतें कीं तूं केवळ व्यवहार- 
दृष्टीचा मनुष्य आहेस. तुला रसिकता मुळींच नाहीं आणि सुंदर स्त्रीबरोबर 
एक-दीड वर्षे आनंदांत कसं घालवावे हें तुला समजत नाहीं. “ कष्टाबास वधु 
परिग्रहसुख यावन्नव विद्यते । ग्रंथालोडनतत्परोहि तरुणो दंडयोनु मन्मंडले || 
आदेदाःकुसुमायुधस्य........ » हा एका अर्वाचीन कवीचा “छोक तुला ठाऊक 
नाहीं काय ? तुझ्या लग्नाच्या वेळेस तुलाच समर्पण केला होता ना ? तर मग 
आतां सांग कीं तू विलायतेस कधीं जाणार आहेस ? ” 


रामभाऊ त्याचे उद्गार ऐकून थोडाबहुत विचारांत गर्क झाल्यासारखा 
दिसला ; आणि बंडोपंताच्या बोलण्याचा त्याच्या मनावर कांहींतरी परिणाम 
झाल्यासारखा दिसला. काहीं अंशीं बंडोपंताच्या बोलण्यांत तथ्य बरेंच होतें. कारण 
त्याच्या गेल्या वर्षांपैकी बराचसा वेळ आपल्या नववबधूबरोबर सुखानें कालक्रमण 
करण्यांत गेला होता; आणि त्याचा विनोदी बाप मधून मधून असेंहि म्हणे कीं, 
“< नुकर्तेंच लम़ झालें आहे तर तूं एक वर्ष घरींच बेस, नुकतेंच!लम़ झालेल्या 
मंडळींच्या पाठीमागे आमच्या बेवकृत्र युनिव्हर्सिट्यांच्या माणसेंमारू परीक्षांचा 
धोशा लावणें बरोबर नव्हे. ”' शिवाय रामभाऊचे वडील याच वर्षी वारले. 
त्यामुळें त्याच्या आजारीपणांत, आणि उत्तरक्रियेंत रामभाऊचें बरेच दिवस गेले, 
वडील वारले त्याच्या सुमारें विसाव्या दिवशीं परीक्षा होती. तथापि वडिलांच्या 
मृत्यूमुळे या तरुण मुलाच्या अंगावर एकदम मोठी जञाबदारी पडल्यामुळें त्याची 
वृत्ति बरीच गंभीर झाली होती; आणि आतां आपण खेडाळूपणांत दिवस घाल- 


९ : भॉसलेबिजय मिल्स! 


*------२---प--ाााप------ “>>>: शशीशण0 प 0?0ीती"ती णा “दया नट पपप पाट---- अनल 


(र व 


विण्यांत अर्थ नाही, आपण आयुष्यक्रमाची जबाबदारी उचलली पाहिजे असें 
त्यास वाटून परीक्षेच्या अगोदर सहा सात दिवस मोठ्या निकराने अभ्यास करून 
रामभाऊ परीक्षेस बसला. त्यास पास होण्याची वरीच आशा वाटत होती. 
तथापि १९९ हा नंबर पास झालेल्या यादींत पहाण्याचे त्याचं भाग्य नव्हते. 

थोडक्यांत सांगावया'चें म्हटलें ग्हणजे आपल्या आईच्या आणि सुशील 
पत्नीच्या संमतीने आणि धाकट्या भावाचा निरोप घेऊन रामभाऊनें एक महि- 
न्याच्या आंतच विलायतेस जाण्यासाठी प्रयाण केलें, 


प्रकरण २रें 
८ ययास नर सर्व्या 
भासलावजय मसल्स 

मागच्या प्रकरणांत बंडूनाना घरकुट्टे यांची वाचकास ओळ'व झाली आहे. 
आतां थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे बंडूनाना हे आमच्या रामभाऊचें 
सहाध्यायी होते. बंडूनाना रामभाऊपेक्षां खरोषरच वडील, परंतु इंग्रजी सहाव्या 
इयत्तेत बंडूनानास रामभाऊनें पकडले. बंडूनानास मालगाडी म्हणत, कारण 
त्याचा दर स्टेशनवर बराच मुक्काम व्हायचा ! उलटपक्षी रामभाऊस मेलगाडी 
म्हणत; कारण एका वषात त्यानें दोन इयत्ता केल्या होत्या. रामभाऊंच्या 
शिक्षणास सुरवात उञ्नीरानें झाली तथापि यया एक दोन कोलांटउड्यामुळे ते 
लबकरचच मेट्रिक झाले, रामभाऊ ज्यावेळेस इंटरमिजीएटला बसला त्यावेळेस 
आमच्या बंडुनानाचें मेट्रिकला बसण्याचे तिसरे वषे होतें. मुलगा “ ढ ? म्हणून 
मास्तरनें काहून ठेवला होता पण तसा तो केवळ “ ढ ? होता असे म्हणता येत 
नाहीं, 

रामभाऊ आणि बंडूनाना यांचें प्रेम मात्र परस्परांवर मोठे होतें. ब्याव- 
हारिक बाबतीत बेडूनानास तीवण दृष्टि उत्पन्न झाली होती, गांवातील निर- 


गॉडथनांतील प्रियंघदा १० 


निराळ्या मंडळांसंबंधाने खडान खडा माहिती बंडूनानास होती. कांहीं अंशीं 
बँडूनानाविपयीं लोकमत वाईट झालें होते. आणि याचें मुख्य कारण म्हटलें 
म्हणजे आमची सदोष पुरुषपरीक्षा होय. युनिव्हर्सिटीच्या परीक्षांत जो भराभर 
पास होईल तो चांगला, जो होणार नाहीं तो वाईट, या तऱ्हेची लोकांत वृत्ति 
झाल्यामुळें बंडूनाना लोकांत वाईट ठरत असें, एवढेंच नव्हे तर त्याच्या प्रत्यक्ष 
बापास हा मुलगा चांगला निघाला नाही असें वाटे, मुलावर बापानें केवढाल्या 
आशा बांधल्या होत्या, याचें शिक्षण चांगलें करून याला सिव्हिल सव्हिसच्या 
परिक्षेस बसण्याकरितां इंग्लंडास पाठवावे, अर्से त्याचे वडील अनंतराव घरकुडे 
यांस वाटे. अनंतराव हे स्वतः डेप्युटी कमिशनरच्या आफिसमर्ध्ये १२ रुपये 
पगारापासून वाहून एक्स्ट्रा असिस्टंट कमिशनरच्या हुद्यापर्येत वाढत गेले होते. 
ओऑफिसचें अगर फिरतीचे काम असो सर्व काम तडफीनें आणि हुषारीनें अनंत- 
रावानीं करून सरकारी अधिकाऱ्यांत चांगलें नांव मिळविले, यांच्या अंगी 
कांहीं जुन्या काळच्या हुषार व मुत्सही म्हणून म्हणवून घेणाऱ्या लोकांचे दोष 
होते, तथापि त्यांशीं आपणांस काहीं कतेन्य नाहीं. आपण सध्यां बंडूनानाकडेच 
लक्ष देऊं. 

बंडूनाना यानीं पुढें काय करावें यासंबंधा'चे कांहीं विर्‍चार त्यांच्या वडि- 
लांच्या मनांत घोळत होतेच. अनंतराव हा ग्रहस्थ इतरानां कसाहि असो, 
पण आपल्या एकुलत्या एक मुलांसंबंधानें याच्या मनांत दृढ प्रेम होतें हँ खास, 
आपला मुलगा बाईट निघाला असें त्यास किती जरी वाटलें तरी लोकांनीं त्यास 
वाईट म्हटलेले अनंतरावांस बिलकूल खपले नसतें, 


मुलगा तीनदां मंट्रिकमध्ये नापास झाला हें पाहून अनंतराबांस फार 
वाईट वाटले, आतां करावें तरी काय ! आपण साहेबापाशीं वजन खचे 
करून यास कसा बसा नायबतहशिलदार करावा, म्हणजे आपण पुढे जसे वाढत 
वाढत इ, ए. सी, च्या हुद्यापर्यंत येऊन पोंचलो तसा हाहि पोंचेल असे वाटले, 
व त्यांनीं वरिड अधिकाऱ्यापाशीं वजन खच करून आपल्या मुलास नायबतह्रिल- 
दारी कशी बशी मिळवून दिली, इकडे गोडबोले विलायतेला गेला तर अनंतराव 


११ ५ पॉसलेविजय मिल्स ' 


नायड तहदिलदार झाला. कमैधर्मसंयोगारने असे झालें कीं याचें आणि तहशिल- 
दाराचें बिलकुल जुळळें नाहीं. तहशिलदांर आपल्या दीड दोनशे पगारातील 
तीनचाररी खच करून पाच-सहा रुपये गिळक टाकणारा मनुष्य होता, चांदा 
जिल्ह्यामध्ये सिरोंचा तहगिलींत बंडूनानाची नेमणूक झाली होती, सिरोचा हें 
ठिकाण चांद्यापासून दोभराहून अधिक मैल दूर आहे आणि तेथें रेल्वेहि नाहीं, 
त्यामुळें तेथील तहठिलदारास असे वाटतें की आपण राजे किंवा बादराहा 
आहोंत, अमुक रस्त्यावर तहजिलदाराखेरीज कोणी गाडीच हांकावयाची नाहीं, 
इत्यादि प्रकारचे त्याने नियम केळे होते आणि तहशिलदारी त्यानें बरीच गाज- 
विली, या तहशिलदाराच्या पैसे खाण्याच्या कांहीं युक्त्या ठरलेल्या होत्या, यानें 
घरीं सत्यनारायण करावा, आणि गावांतल्या पुःकळ कोमटी शोटसावकारास बोल- 
वार्वबे आणि ज्या कोणास जी लाच द्यावयाची असेल ती त्यानं सत्यनारायणापुढें 
दक्षिणा म्हणून ठेवावी, अर्थात सत्यनारायणापुढें ठेवळेली रक्कम ब्राह्मणाच्या 
हातीं पडावयाची नाहीं. ब्राह्मणास फक्त सव्वा रुपया मिळाला म्हणजे पुष्कळ 
झालें, “ महाराज आपल्या सारख्याने दक्षिणा आणखी द्यावी ” अर्धे जर एखाद्या 
ब्राह्मणाने म्हंटले म्हणजे “ भटास लोभ सुटला ” असे उद्गार तहशिलदार साहे- 
बांच्या मुखाबाहेर पडत. 


या तहदिलींत कारकुनापासून तहशिलदारापयेत सवे लोक मोठ्या जुटीनें 
रहात होते. “ सवे लोक एकच साध्याने प्रेरित झाले, ” म्हणजे जूट ही रहाव- 
याचीच, अणि तेथील तेलगू तहशिलदार वीरण्णा पंतलुगारु यानें उत्तम प्रकारें 
जूट कायम राखिली. 


सिरोंच्यामध्ये कोणी नवीन कारकून अगर नायजतहशिलदार आला 
म्हणजे त्याच्यावर छाप पाडून पूर्वापार चाळू असलेल्या पद्धतींत त्यास रुळवावा 
कसा ही एक मोठी कलाच झाली होती. ती कला गोविंद्भापू नरके नावांच्या 
एका कारकुनास साध्य झाली होती. नरके हा अठरा रुपयांवर तेथे कारकून 
होता, पण त्याने आपल्या तीस वर्षांच्या कारकुनींत बरीच कमाई केली होती. 
त्याने दीडशे बिघ्यांची शेती केळी होती, आणि एक विहीर आणि एक घर 


गॉडवनांतील प्रियंबदा १२९ 
बांधले होतें. विहीर आपल्या गावांत हवी म्हणून त्यानें बेघडक वगणी गोळा 
केली आणि ती विहीर मात्र आपल्या घराच्या आवारांतच बांधली. कोणीं कांहीं 
काम करून घ्यावयास आला म्हणजे त्याच्याजवळ त्या विहिरीसाठी काढलेले 
वर्गणीचे पुस्तक पुढे केळें जाई. या गोबिदबापूस वकील म्हणत असत; कारण 
कीं एक तर सर्व तहशिलीचें हे वकील होते. आणि कोणा कारकुनाचे कृष्णकृत्य 
उघडकीस येण्याचा संभव दिसला अगर दुसरी काहीं पंचाईत पडली तर तोड 
काय काढावी या बाबतींत गोविदबापूंचें डोकें चांगळे चाले, 

सिरोंच्यास बंडूनाना हे नवीन “ वांसरू ” आलें. त्या वांतराकडून 
तहहिलीच्या कामाचे गाडें बिनबोभाट हांकण्यास त्यास तयार कसें काय करावें 
असा विचार वीरण्णा आणि गोविदबापू यांच्यामध्ये सुरू झाला. नायबसाहेबांच्या 
घरी जाऊन तालीम देण्याचें काम गोविंदबापूनीं अंगावर घेतलें, बंडूनाना संध्या- 
काळी ऑफीसचें काम घरीं आणून पाहात असता त्या कामाची समजूत करून 
देण्यासाठीं गोविदबापूंस तहशिलदारांनीं नायबसाहेबांच्याकडे पाठविले, 

एके दिवशीं काम साधारणपणें संपत आलें आणि मध्येंच बेडोपंतानां चहा 
आला; बंडोपंतानीं चहाचे दोन कप आणावयास सांगितलें आणि एक कप 
गोविदबापूसहि घेण्यास सांगितलें. तेव्हां गोविंदबापू म्हणाले, 


“५ नायबसाहेब, आपल्या तोंडावर आपली स्तुति मी करीत नाहीं, पण 
आपला थोर स्वभाव आपल्या थोर कुलास साजेसा आहे. कचेरींतली सवे 
कारकूनमंडळी यामुळें आपणांस फार चहातात. ” 


 कृसचा थोर स्वभाव आणि कसचे काय १” बेंडूनानास स्तुति ऐकून 
आनंद होणे सहजच होते. तथापि वरील प्रकारचे त्यानीं उत्तर दिले, 


“ अहो, आपल्यासारख्या राजधानींतल्या लोकांना दरबारी रीती माहीत 
असतात. आम्ही पडलों खेडवळ माणसें, तर गैरमाहितीमुळे आमच्याकडून 
कांहीं अपराध झाला तर आपण आम्हांस क्षमा करावी, आपला थोर स्वभाव 
आणि त्यांत आपल्या अंगी विनय आहे त्यामुळे आपल्या थोर स्वभावाची 


१३ * मॉलसलेविजय मिटत 


म. ----:--॥--५८::>->>->- हब बब िि्््नकाााळााळ्याकााकाकमाडााडााडा 


आपणांस ओळख नाहीं. या सिरोंच्यामध्ये पंधरा रुपयाचा कारकून देखील 
आपणांस राजा समजतो, आपण एवढ्या मोठ्या हुद्यावर असून देखील आपल्या 
अंगी मीपणा नाहीं. त्यामुळें आम्हां कारकून मंडळींत एक तऱ्हेचे आपलें 
उदाहरण पाहून लाज वाटत आहे. ” 

गोविदबापूनीं काढलेले हे उद्गार अगदींच खोटे नव्हते. नुकताच नाग- 
पुराहून आलेला मनुष्य, त्यास नायबतहशिलदारीची जागा फारशी मोठी वाटत 
नव्हती, नागपुरात देखील हा विद्यार्थिदरेतून नुकताच बाहेर पडला होता. 
विद्यार्थिदर्शीत असतांना तरुण मंडळीस आपल्या गांवांत तहशिलदारच काख पण 
डेप्युटी कमिशनर व प्रसंगीं कमिरनरहि कोण आहे याची माहिती नसते, आणि 
नायत्रतहशिलदार म्हणजे कोणी यःकश्चित्‌ मनुष्य अशीच त्यास भावना असते. 
या भावनेमध्येंच आमचे बंडूनाना होते. नायजतहशिलदारी म्हणजे दहावीस 
हजार लोकांच्या दृष्टीनें मोठी जागा आहे, या भावनेचें त्यांच्या मनात अजून 
प्रतिबिभ पडले नव्हते; आणि यामुळे तो सर्वे मंडळीशीं सरळपणे वागे. कोणी 
भेटावयास आलें तर त्यास ताबडतोब भेटे, पण याच्या योगानें बंडूनाना कार- 
कूनमंडळीस फारसा प्रिय झाला होता असे नाही. कारण जोपर्यत वाटेल त्याला 
नायभजतह शिलदार किरसानी लोकांच काम ताबडतोब करीत आहे, तोंपर्यंत तह- 
शिलदारापासून कारकुनापर्यंत मिळणारा “ मामूल ” जरासा बंद झाला होता, 
आणि यासाठींच गोविदबापू बकिलाकडून “ वाठणांतून नुकत्याच सुटून आलेल्या 
ढोरास ?? शिकवणी मिळणे अवदइ्य होतें. 

“ अहो, नायबतहशिलदारीची जागा म्हणजे मोठी अस मी समजत 
नाही. ” बंडूनाना म्हणाले. 

“ बरोबर आहे, आपल्यासारख्या मंडळीच्या योग्यतेच्या मानाने, आणि 
राजभानींतल्या मंडळींच्या दृष्टीने ही जागा मोठी नव्हे हें खर, तथापि या तालु- 
क्याच्या ठिकाणीं हीच जागा म्हणजे आम्हास फार मोठी भासते आणि आपल्या- 
सारख्या मंडळीस जरी ही मोठी नाहीं तरी या जागेच महत्त्व तालुक्‍यांतील 
लोकांच्य़ा दृष्टीने कमी होऊं देणें हे देखील चांगलें नाहीं. 


गोंडवनातील प्रियंवदा १७ 


“८ म्हणजे काय ? ” 


:: मी. बोलतों याचा राग येऊं देऊं नका, तथापि आपल्यासारखा 
ऑफिसर जर लोकास सहज भेटला तर लोकांच्या मनांत त्याच्याविषयींचा आद्र- 
भाव कमी होतो. मोठ्या शहरात ऑफिसरहि चांगळे आणि रयतहि चांगली. 
पण इकडे असा रिबाज पडला आहे कीं ऑफिसराने भेटावयास आलेल्या मनु- 
ष्यास तास तास तिठठत ठेवळे पाहिजे, नाहींतर एक दोन हेलपाटे तरी घालायला 
लावले पाहिजेत. ” 

(44 हॅ असं कां ९ १9 

£ कारण एवढेच कीं आपण मनुष्यास भेटण्यापूर्वी कोण कसा आहे याची 
चौकशी केली पाहिजे. नाहीतर काहीं लबाड लोक येऊन आपल्या मोकळेपणाचा 
फायदा घेतात, आपल्यापाशीं ज्याची ओळख झाली ते लोक आपल्याशीं त्यांचें 
असे वजन आहे अशा खोट्या-नाट्या गोष्टी लोकास सागून व आमच्यामार्फत 
तुम्ही काम करून ध्या असेहि सांगून त्यांच्यापासून पैसे उपटतात, पुष्कळ लोक 
आपल्याशीं लगी करण्याचा प्रयत्न सुरू करतात. ते दररोज आपण सरस्यांत 
सहज मेटलों असे अधिकाऱ्यास भासवितात, आणि पुढें हळू हळू ओळख पक्की 
करीत जातात. यासाठीं अधिकाऱ्याने वाटेल त्यास ओळखता कामा नये. माहिती 
पूणे असली तरी आपणांस बिलकुल नाहीं असे दाखविलें पाहिजे. असे केलें 
म्हणजे टाऊटगिरी करणारे लोक वचकून रहातात, वब एकदम सलगी करीत 
नाहींत, दिवाय आपणांस मेटूं इच्छिणारी मंडळी आपण स्वत. दूर ठेवली 
म्हणजे हाताखालची कारकूनमंडळी देखील संतुष्ट असतात, ” 


कां बरॅ, कारकूनमंडळीच्या मनांत मी कोणास भेटू नये असे आहे. 
काय; ” 


“ अहो, ज्याप्रमाणे देवळांतल्या मूर्तीला मान आहे त्याचप्रमाणे थोडाबहुत 
पायरीलाहि मान आहेच. देवाला नमस्कार करण्यास ज्याना आत जातां येत 
नंघेठ दो सैडडो याय पोसावे डोक ठेऊ संपुड अतयांत, पायऱ्यावर किये? 


१५ ' झॉलळेबिजय मिल्स ' 


डोकें, ठेऊन जातात तर कित्येक पायऱ्या तुडवीत मूर्तीपर्येत जाऊन पोंचतात, इतर 
लोक तुडवून जातात याचा मोबदला कांहीं लोक डोकें ठेवतात या निमित्तार्ने तरी 
पायऱ्यानां मिळतो. आम्ही कारकूनमंडळी किती झाली तरी माणसेच आहोंत. 
कारकूनमंडळीस देखील आपला मान लोकांनीं ठेवावा अस वाटते. आमचें असें 
म्हणणे नाहीं कीं तुम्ही कोणासहि भेटूं नका. नागपूर-वऱ्हाडकडची मंडळी 
चांगळी आहे, पण ही तैलंगी मंडळी एक नंबरची काफर आहे, नाना तऱ्हा 
करून ते आपणांशी ओळखी काढतील व पुढे गोत्यांत घालतील .” 
गोविंदबापून्ने हें वाक्य ऐकताच त्यास आपण नागपूरच्या नील सिटी 
स्कूलमध्ये असतांना मास्तरची पगडी कशी लपविली, आणि माराचा धाक 
मास्तरने घातला असतां एका अशक्त कोमस्याच्या मुलाने आपलें नांव मास्तरला 
सांगून आपणांस मार कसा बसविला याची आठवण झाली, तथापि त्यावेळेच्या 
वर्गातील इतर चार पांच तेलगू विद्याथ्यीनीं चोर ठाऊक असून माराच्या धम- 
कीस न मितां चुगली करण्याचे कसे नाकारले हे मात्र तो विसरला. असतील 
लेकाची तेलंगी मंडळो गोविंदबापू सागतो तशीच हलकट असें त्यासहि वाटलें. 
गोविंदञापूचा सिरोंचा येथील तेलंगी मंडळीसच नायबतहशिलदारापासून 
दूर राखण्यांत मतलब होता. पैसा ज्या लोकांपासून काढावयाचा ते लोक मुख्यत्वें- 
करून कोमटी, रडी, कम्मा, कापेवार, वेलमा इ. जातीचे तेलंगी लोक होते. 
तेथील महाराष्ट्रीय मंडळी थोडी होती, आणि जी होती त्यांत सरकारी नोकरच 
पुष्कळ होते. 
गोविंदबापूनीं पुढें आपले चऱ्हाट सुरू केलें. ते म्हणाले, “ आपले 
तहशडिलदारसाहेब आहेत. मोठा चांगला मनुष्य. आहेत तेलंगी पण अगदीं 
लाख मनुष्य आहेत म्हणूनच सरकारनें त्यास या हुद्यावर ठेवलें आहे. 
तेळंगी “लोकांची वर्मे ते चांगले ओळखतात आणि यासाठीं आपणांस कोणी 
मेंडळो भेटावयास आली तर त्यांच्याकडे पाठवून द्या, नाहीं तर कोणास 
भेट देण्याच्या अगोदर ऑफीसमधल्या मंडळींत चौकशी करा. आपला स्वभाव 
सरळ आणि निष्कपट आहे म्हणून आपणांस माणूस एकदम उमजणार 
नाही. . आपण भेटावयास आलेल्या मनुष्यास तहशिलदारसाहेनांकडे 


गोॉडघनांतील प्रियंघदा १८ 
पाठविलें म्हणजे त्यानाहि आनंद होईल. त्यानां वाटेल कीं, तरुण आधिकारी 
वृद्ध अधिकाऱ्याचा योग्य मान राखतात, ” 


८ मी वृद्ध मंडळीस नेहेमीं मान देत असतों. अहो, वयास आणि अनु- 
भवास मान नाहीं द्यावयाचा तर द्यावयाचा तरी कशास ! ” 


“ आपण कशी लाख गोष्ट बोललात, अहो, खरोखर वृद्ध मंडळीस मान 
देण्यांत मोठा फायदा असतो, स्वतःचा त्रास चुकतो आणि आपण जबाबदारींतून 
पुन्हां मोकळेच. ” 

“: दुसरी आणखी एक गोष्ट आपणांस सांगतों आणि ती म्हटली म्हणजे 
नजराण्यासंबंधानें. सरकारी अधिकाऱ्यास नजराणा पाठविणें ही चाल पूर्वापार 
आहे तथापि या चालीचा दुरुपयोग होतो. कोणी सभ्य मनुष्य नजराणा आपण 
होऊन शिष्टाचार म्हणून अधिकाऱ्यास पाठवितो आणि कोणी आपलें कांहीं काम 
व्हावें म्हणून नजराणा पाठवितो ; तर दुसर्‍या प्रकारच्या मंडळीस जपलें पाहिजे. 
जो नजराणा अधिकाऱ्याकडे खासगी रीतीनें पाठविला जातो तो ल्बराडीचा सम- 
जावा. जो नजराणा उघड उघड कचेरीतल्या कारकुनामार्फत जातो तो खरा 
समजावा, आम्ही नजराणा आला असता तो मनुष्य कसा आहे, त्याला काहीं 
हेतु साध्य करून घ्यावयाचा आहे कीं काय ? याची बाराईनें चौकशी करून 
आपणांस कळवूं. ” 

“ मुला वाटतें की मी कोणताहि नजराणा घेण्याच्या भानगडींत पडणार 
नाहीं कारण जो ग्रहस्थ नजराणा शिष्टाचार म्हणून पाठविणार, त्यास उलट नज- 
राणा करावा लागेळ, आणि आपल्यामार्गे ती पीडा नको, ” 


“ छे छे ! तसें करण्याचें कारण नाहीं. सरकारी अधिकाऱ्यास देणगी 
देणें म्हणजे काहीं वाईट नाहीं, का कीं तो राजाचा प्रतिनिधि आहे. ” 


असो; येणेंप्रमाणें गोविंदमापूंची नव्या अधिकाऱ्यांस दिकवणी चालली 
होती. त्याचा अनुभविक बंडुनानांच्या मनावर थोडाबहुत परिणाम झाला ; फार 
झाला नाहीं, कां की, तोहि जरासा व्यवहारश़ होता, त्याला दोन चार भाषाहि 


१७ ' मॉलळेबिजय मिश्‍्खल 


येत होत्या. नागपुरास तो गुजराथी, मारवाडी, तैलंगी, इत्यादि महाराष्ट्रीयेतर 
मंडळीत बराच मिसळे, आणि ज्याशी त्याशीं ज्याच्या त्याच्या भाषेंत बोल- 
ण्याचा प्रयत्न करी. त्यास थोडे बहुत तेलंगी येत होते ही गोष्ट त्याच्या पथ्यावर 
पडली होती आणि त्यामुळेंच सिरोच्याच्या रिकाम्या झाळेल्या नायब तहशिल- 
दारीवर त्याची नेमणूक झाली. 

त्याने मनातल्या मनात तीन चार गोष्टी ठरविल्या. एक तर स्वतःच 
महत्त्व आणि बोज रहावा यासाठीं इतराशीं फारसें बोलावयाचे नाहीं. लोकांना 
सलगी करूं द्यावयाची नाहीं. कांहीं लोकाचा नजराणा घेण्यास हरकत नाहीं हें 
खरें काय या संने'धानें बापास पत्र घाठून विचारावयाचें आणि तोपर्यंत कोणताच 
नजराणा घ्यावयाचा नार्ही, 

आपण लोकाचा नजराणा ध्यावयाचा तो कारकुनामा्फतच घ्यावा असें 
सागण्यात गोविदबापून्चें एक दोन हेतु होते : नायज तहशिलदाराकडे दाद लाग- 
ण्यास लोकांना नजराणा पाठवून पुरेसें नाहीं, तो कारकुनामाफतच गेला पाहिजे 
हें लोकांना भासवावयाचें; दुसरा हेतु म्हटला म्हणजे ऑफिसातील वरिष्ठापासून 
कारकुनापर्यंत लोकापासून जो “ मामूल ? घ्यावयाचा असतो त्यात निरनिराळ्या 
लोकाचे हिस्से निरनिराळे असें असतें, ती पद्धति बिघडूं द्यावयाची नाही, तर 
नायब तहशिलदारास या पद्धतीत बसवावया*चे. तिसरा हेतु म्हटला म्हणजे 
नायब तहशिलदारास कारकुनामाफत एक दोनदा नजराणा पोचला, म्हणजे नायब 
तहशिलदार पूर्णपणे ताब्यात आला, त्याला पुढें त्याने नजराणा घेतला ही गोष्ट 
उघडकीस आणण्याचा तहशिलदारामाफेत धाक घालून पुढें आपल्या कह्यांत 
बागवाबया'चें. असें झालें म्हणजे गाडे पुन्हा सरळपणे सुरू झालें आणि वबीरण्णा 
पंतलु म्हणत त्याप्रमाणें ऑफिसातील सर्व मंडळी एका ध्येयाने प्रेरित होऊन 
त्यांची जूट झाली ; असो. 

काहीं दिवस गाडी सुरळीत चाललें. तथापि जोपर्यत बंडूनानानें स्वतः 
कांहीं नजराणा घेतला नव्हता, तोपर्यंत बीरण्णा पंतल॒स बंडुनानाविषयी विश्वास 
बाटणें शक्‍य नव्हतें. शिवाय आपली पद्धति बंडूनानाच्या हळू हळू लक्षांत 
घेत आक्दे हेहि वीरण्णास कळून चुकले होतें, 

3 


ग. 


गॉश्‍वनांतीळ वरिर्यवदा १८ 


मध्यप्रांतात तहशिलदार आणि नायतर तहशिलदार याच्याकडे येणारे खटले 
म्हटले म्हणजे दाखलप्वारजीचे. कोणी जमिनीचा मालक मेला म्हणजे ती 
जमीन दुसऱ्या कोण वारसाच्या नावावर लिहिली पाहिजे, आणि ते काम तह- 
शिलदार आणि नायज तहशिलदार याच्याकडे असते. तहशिलींतले दुसरें काम 
म्हटलें म्हणजे ल॑ऊरदारावर देगरेग्व, गाबातील जमिनीचा वसूल सरकारला 
पोचविणे, हें काम “ लंबरदारा ” कडे असते. लंत्ररदार गावचा मुकादम 
देखील असतो ; तेव्हा त्याचें काम गांवातील चोरी वगैरेसंजंधी रिपोर्ट करणें 
इत्यादि असते. एखादा लंबरदार मेला म्हणजे दुसरा लंत्ररदार सरकार 
नेमिते, अगर गावातील मनुष्यांना एलादा लंब्ररार नको असला आणि 
दुसरा लंबरदार हवा असला तर ते देखील सरकारला अजे करून लंबरदार 
बदलवू शकतात. दातवळवारजीच्या आणि लंबरदारीच्या अशा दोन्हीं प्रकारच्या 
खटल्यात तहशिलदारास पैसे खावयास सापडतात. तहशिलदारास आपली 
तहशिलदारी गाजवाबयाचची असली म्हणजे अनेक प्रकाराने गाजविता येते. एक 
तर मालगुजार आणि त्याचें कुळ यांमध्यें तंटे उपस्थित करून देतां येतात. 
हातीं अधिकार असला म्हणजे दुसऱ्यामध्वें तंटे उपस्थित करून देण्याची ऱाक्ति 
वाढते. किवा सरकारचे जे असे अनेक कायदे आहेत जे कोणी कधीं पाळीत 
नाहींत त्या कायद्याची अंमलबजावणी करिता येते. उदाहरणार्थ, फाटकास कडी 
असली आणि फाटक उघडून मालकाच्या परवानगीशिवाय आत आलें कीं, 
झाला ट्रेसयास, जे कायदे केवळ कागदावरच असतात आणि केबळ मूरखे- 
पणाचे आहेत ते जुलमी अधिक्राऱ्यास प्रजेस छळग्याताठीं चांगलेच उपयोगी 
पडतात. 

या सर्व महत्त्वाच्या बाबी आहेत, आणि पगारापेक्षा पुष्कळ पटीने 
उत्पन्न करूं इच्छिगाऱ्या अधिकाऱ्यास फारच महत्त्वाच्या होत. आणि व्यवस्था 
एकदां जुळली तरी तिच्यात घोटाळा होऊं नये म्हणून फारच व्यवहारदक्ष रहावें 
लागतें, तरी पण साहेबांस यामुळें त्रास बराच होई आणि ते आपल्या व्यबस्थेंत 
नसणाऱ्या नायन तहशिलदारास पदच्युत करण्यास अनेक युक्त्या योजीत, 
नायब तहशिलदाराने कसे करून तरी बदली करून मागितली म्हणजे झाले. 


१९ ५ भललेविजय मिल्स ' 


नायब तहशिलदाराचं आणि तहशिलदाराचें जमत नसले म्हणजे तह्िल- 
दार नायब तहशिलदारास अनेक तऱ्हेने छळू दाकतो. एक तर तहगिलदार 
नायब तहशिलदारास नालायक आणि आज्ञाभंग वरणारा टरवूं पहातो. 
पुष्कळदां असं होते कीं खून, मारामाऱ्या इत्यादिकांचा रिपोर्ट डेप्युटी 
कमिअनरकडे गेला म्हणजे तें प्रकरण चोकशीसाठीं तहशिल्दाराकडे येते. 
महत्वार्चे प्रकरण असले म्हणजे ताबडतोब त्याची चौकशी झालीच पाहिजे, व 
चौकशींत जाण्यासाठी तहळिलदार नायब तहशिलदारास सागणारच. तथापि दोन 
अधिकाऱ्यामध्यें वाकडे असल्यास प्रत्येक क्षुलधक प्रसंगीं देखील तहशिलदार 
नायब तहशिलदाराला पाठवू दाकतो, अशा तऱहेने तहरि.लदार नायब तहणिल- 
दारास छळू शकतो, 

वीरण्णा तह्शिलदारसाहेब यानीं प्रथमतः ऑफिसामर्ध्ये एकी राखण्यासाठी 
आणि होईल तितर्के करून लंबरदारांचे आणि दाखलखारजीचे खटले स्वतः 
घेतां यावेत म्हणून नायब तह्शिलदारास कचेरींत फारसें न ठेवतां बाहेरगांवी 
पाठविण्यास सुरवात केली. सपाटून प्रवास करावयास लावल्याने कोणीहि 
कैटाळावयाचाच, आणि त्यातल्यात्यात सिरोच्याचा नायत्र तहशिलदार अधिक 
कंटाळावय़ाचा, कारण चांदा जिल्ह्यात जंगल पुष्कळ आहे, आणि चांदा जिल्हा 
जरी पूर्वी मोठा संपन्न देश असावा असे तेथील ऐतिहासिक अवशेपाबरून 
दिसते, तरी आज जवळ जवळ तेर्थे जंगळीपणाच आहे. पुष्कळ ठिकाणीं पोहे 
किवा तांदूळ याखेरीज खायलाहि मिळत नाहीं. पंचवीस तीस मैल्पर्यत 
ब्राह्मणाचे एखादे घर लागेल तर रदापथ, गोंडांची वस्ती; पुष्कळ ठिकाणीं वाघ 
आणि साप याचा सुळसुळाट फार; इतकें जरी झालें तरी बेडुनाना खंबीर; त्यानां 
मलेरियाचा आजारहि जंगलांत झाला तथापि त्यानीं त्यास जुमानळें नाहीं. त्यानां 
एक तऱ्हेची त्या वन्य स्थितीची मौजच वाटूं लागळी आणि ते कामे आनंदाने 
करूं लागले, 

पुषकळ ठिकाणी प्रबास करावा लागल्यामुळें बंडुनानास तालुक्‍यांतील 
परिस्थितीची स्वरीखुरी माहिती होऊं लागली, तहशिलदार पैसे खाऊन दुष्ट 
लंबरदार कसे नेमीत आहे, ते लबरदार आपली मुकादमगिरी कशी गाजवीत 


गोंडबनांतील प्रियंवदा २० 


अँहेत, याची त्यास कल्पना येऊन चुकली, आणि आता आपण कांहींतरी केलें 
पाहिजे, वरिष्ठ अधिकाऱ्यास भरातमी कशी द्यावी, इत्यादि विचार त्याच्या मनांत 
घोळू लागले. पुषकळ ठिकाणाहून लंबरदार बदलावे म्हणून अजे आले होते, 
पण अज करणाराकडून तहशिलदारास दक्षिणा पोचली नव्हती, म्हणून त्याच्या 
अर्जाची अजून दाद घेतली नव्हती. कोणी डे'युटी कमिदनरकडे अजे दिला, 
तर तें प्रकरण पुन्हा तहशिलदाराकडे चौकशीस येई. तहशिलदार त्यावर शेरा 
मारी की अमुक लंघरदार प्रामाणिक मनुष्य आहे. पण बसूल करण्याच्या बाब- 
तींत कडक मनुष्य आहे. म्हणून तो लोकांस अप्रिय आहे. लंबरदार सरकारचे 
हित पहात आहे, आणि त्यामुळे त्यास कडकपणा करावा लागतो. हा 
रिपोटे डेप्युटी कमिशनरकडे गेला म्हणजे तो त्यास खरा बाटे, कारण सरकारी 
काम कसोशीने केल्यामुळे मनुष्य अप्रिय होतो ही गोष्ट त्यास ठाऊक असे, आणि 
अशा प्रसंगीं सरकारचे हित पहाण्यास सरकारी अघिकाऱ्यांनी पाठिबा दिला 
पाहिजे असेंहि त्यास वाटे, 


प्रस्तुत परिस्थिति बंडुनानानें पाहिली. ज्या लोकांवर जुलुम होतो त्या 
लोकांची स्वसंरक्षण करून घेण्याविषयीं तत्परता पाहिली तर त्याला असें दिसून 
आर्ले कीं सरकारी अधिकार्‍याविरुद्ध साक्ष द्यावयास प्रजा भीत आहे आणि जरी 
त्यांस जुलुम होत आहे तरी तो निवारण करण्यासाठीं अवशय असलेलें घैये 
त्यांत नाहीं. बंडुनानाचा स्वभाव दिलदार होता. देगामिमानप्रचुर लेख त्यानें 
वाचले होते आणि इतर अधिकारी कसेहि असोत आपण मात्र नेकीने रहावें 
असा त्यानें निश्चय सरकारी नोकरी पत्करतानांच केला होता. आपण समक्ष 
पहात आहों, आणि आपणांस गरीबांच्या संरभ्षणासाठीं कांहीं करितां येत नाहीं, 
हें पाहून त्यास काय वाटल असेल याची कटपना वाचकांनींच करावी. 


गोबिंदञञापू आणि वीरण्णासाहेब यांचे मत नव्या नायभ तहशिलदारा- 
विषयीं काय जनत होतें हें पहाण्यासाठीं वाचकहो, आपण त्यांचाच संवाद ऐकू. 


बीरण्णा हे काळेकुळकुळीत, मिश्या काढणारे आणि कपाळास भस्म लावणारे, 
बाहेरच्या देव्वान्यावरून मोठे कमेठ असावे असे दिसत होते. त्यांच्या घरापुढे 


२१ ५ मॉसलेविजय मिल्स ! 


सडा उत्तम तर्‍हेनें टाकून रांगोळींचीं मंगलकारक रेषाचिरत्रे काढलेलीं असत. हे 
राजमहेंद्रीचे आरवेळळ नियोगी जातीचे होते. उत्तरेकडे ज्याप्रमाणें कायस्थ 
म्हणजे सरकारी नोकरींत पुढें असतात त्याप्रमाणेंच तेलिंगणात आरवेळळ नियोगी 
ही राज्यकारभारांत कुशल जात समजली जाते. 


“ ब्रालय्या मालगुजाराकडून चांदीच्या पानदानाचा जो नजराणा आला 
तो कांहीं त्यांनीं घेतला नाहीं,” गोविंद बापू म्हणाले, 


६ ब्रालय्याला काम कोणतें करून घ्यावयाचे होतें १ ” 


५ त्याला कोणतें काम करून घ्यावयाचे होतें ते सध्याच कळत नाहीं. 
बालय्या काय ? तो अगोदर पद्धत लावून ठेवणार आणि मग काहीं दिवसानीं 
आपर्ले काम काढणार, ” 


“ मृग हे काय म्हणाले ? ” 
“ मी सरकारी नोकर आहे म्हणून मी नजराणा घेणार नाहीं. आपणांस 


कचचेरींत कांहीं काम असले तरी जें रास्त व्हावयाचे असेल तर होईल ; त्याच्या- 
साठीं नजराणा नको. ” 


६ मग बालय्याला काय वाटलें १ ” 

€ मग घालय्याला काय वाटायचे £! पण सध्याचे नायब तहशिलदार मोठे 
प्रामाणिक म्हणून गांबांत फार बोभाटा झाला आहे, 

“ अहो, हा अनंतराव घरकुट्ट्यांचा मुलगा प्रामाणिक किती असणार तो 
माहितीच आहे, पण हा याचा एक डाव आहे, त्याला बाटतें कीं तो दुसऱ्या 
कुणास समजणार नाहीं पण माझ्या लक्षात येऊन चुकला आहे. ” 

“ याच्या मनांतला काय डाव! ” 


“ याचा हेतु एवढाच कीं डेप्युटी कमिशनरसाहेब तपासणीला आले 
म्हणजे हे दिवटे मोठे प्रामाणिक असा बोभाटा साहेबांच्या कानावर जावा पण 
याला हे कुठे ठाऊक आहे कीं गांवांत जरी बोभाटा झाला तरी साहेबांच्या कानां- 
पर्यंत जायला किती आयास पडतात ! शिरस्तेदार किंवा दुसरे कोणी अधिकारी 


गोडबनांतील प्रियंवदा २२ 


जी साहेबाला माहिती देतील तीच साहेबाला माहिती. आणि कोणी कोणाचा 
चांगुलपणा दुसऱ्यापाशीं सागण्याची खटपट करीत असतो का ? आणि जरी 
असला तरी त्याच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवीत नाही, “हा चागला ! 
असं जरी साहेबाला कोणी सांगितल तरी सागणारा कोणी स्तुति होते त्याचा 
हस्तक असला पाहिजे हा संदय साहेबाला आलाच, ” 


“ बरें याला आतां कबजांत आणण्यासाठी कांहीं इलाज केला पाहिजे, ” 

“ हो, केला पाहिजे. ” पंतलुगारु म्हणाले, 

* पण मला वाटतं आपण जर एक गोष्ट केली तर हा नोकरीत म्हणून 
टिकणार नाहीं,” 

“ काय म्हगता गोविदबापू १ तुम्हीं तर या सिरोंचा राज्याचे मुत्सही, 
आपल्यापाशीं काय युक्ति आहे? 

“ युक्ति आहे, पण दका एवढीच पडते कीं फर्जीला वीरेंत काढाबा 
कीं नाहीं ! ” 

बुद्धिवळांची रूपके वापरली म्हणजे आपण मुत्सद्दी झालों असें ल्या- 
वेळच्या कांहीं लोकास वाटत होतें. 

“ यांत शंका ती काय पडायची ! अहो पोटचे जरी असलं तरी आडवं 
आलं असता कापून काढलंच पाहिजे. त्यात हें काहीं पोटचे नाहीं, बरं आपला 
उपाय तरी काय आहे १ ” 

“ उपाय एवढाच की, साहेब तपासणीला आले म्हणजे आपण दौऱ्यावर 
जाऊन याला ठेवावं. ” 

“वा! खाह्या, म्हणजे मी दूर असतांना गांबांतळी आपल्या विरुद्ध 
असलेली मंडळी यानें नेऊन आयतीच साहेबांपुढें हजर करावीत, म्हणजे वीरेंत 
तो निघायच्या ऐवजीं आम्हींच निघणार, ” 

“ अहो, ऐकून तर घ्या ; साहेब आले असतां तहदिलीच्या ऑफिसच्या 
तपासणींतच एक दिवस जाईल, दुसऱ्या तिसऱ्या दिवशीं आपण हजर असा 


शह ' बॉसलेनिजय निश्‍ल ! 
म्हणजे झालं. लोकाच्या कागाळ्या कांहीं साहेब पहिल्याच दिवशीं ऐकत 
नाहींत, ” 


५ मग आपण युक्त्या काय योजणार १ ” 


“८ अहो साहेब कसा काय तापट ग्रहस्थ आहे हें आपणास ठाऊक आहे. 
आणि बंडोपंताला अधिकारी पुरुषांची व्यवह्वारनीति ठाऊक नाहीं. वरिठठाशी 
नम्न असलं पाहिजे, आणि मग प्रजेपासून हवे तसे पैसे काढावे, हा करणार 
सगळं उलटं, जी सरकार म्हणून वरिष्ठाला म्हणण्यांत याला लाज वाटते.” 


“६ हो बरोबर, शिवाय याला साहेबाची खुशामत करणं जीवावर येईल, 
आणि त्यामुळें काहीं तरी खटका उडेल. ” 


हाधारणपणें गोविंदजापूंच्या अजमासाप्रमाणेंच बऱ्याच गोष्टी झाल्या. 
डेप्युटी कमिदानरसाहेब आले, तहशिलदार बाहेरगावीं होते तेव्हां काम नायब 
तहशिलदाराच्या अंगावर पडलें. साहेबाच्या सरबराईसाठी काय काय गोष्टी 
पाहिजेत इत्यादि गोष्टी येऊन बटलरानें सांगितल्या, ताबडतोब लागणाऱ्या आणि 
अत्यंत अवश्य वस्तु नायबसाहेआांनी दिल्या आणि इतर सर्वे गोष्टींच्या मागणी- 
संबंधानें साहेबांची सही घेऊन ये म्हणून सागितली. बजटलराला त्याचा मोठा 
राग आला, कारण पुष्कळशा गोष्टी साहेबाच्या नांवावर घेऊन त्या त्यास 
गिळंकृत करावयाच्या असत. “मी डेप्युटी कमिशनर साहेबांचा बटलर, 
तहशिलदार देखील माझ्या कह्यांत असतात, आणि नायत्र तहशिलदारासारख्या 
मनुष्यानें माझे म्हणणें ऐकू नये ! ” इत्यादि विचार त्याच्या मनात येऊन त्यानें 
नायब तहहशिलदाराच वाईट होईल असें आपण काहीं तरी करावें असें ठरविलें. 
संध्याकाळी साहेब “ करी चावल ” खात असतां त्यांत खडे निघाले. तेव्हां 
तसें का म्हणून साहेबानीं विचारलें. बटलर सांगतो, “' नायच तहशिलदारानें 
चावलहि वैसा भेजा उसमेसे मैने बहोत खडा निकाला, लेकिन क्‍या करना ? 
असें उत्तर दिले, दुसऱ्या दिवशीं सकाळीं चहा साहेबाच्या समोर आणला, 
त्याबरोबर दूध नव्हतें. “' क्या करना साब ये देखो ” म्हणून त्यानें नासलेलें 
दूध दाखविलें त्या दुधात सिरका आणि मीठ घाठून दोन तासांत खराब करून 


गोंड्यनांतीक चरित २७४ 
ठेविलें होतें. दिवाय कांहीं पाहिजे असले म्हणजे नायब तहशिलदार खुद 
साहेबांची चिठ्ठी मागतो म्हणून सांगितलें. बटलरला ठाऊक होतें कीं, माग- 
णीची चिठ्ठी देणें साहेबाला नको असतें. साहेबाची नाती बटलरला जेवढी 
ठाऊक होती तितकी बीरण्णासही ठाऊक नव्हती. साहेबास असें वाटे कीं, 
आपणास माल मिळावयाचा तो फुकटांत मिळावा, आपणास किंमत द्यावी 
लागू नये, तहशिलदारानें आपणासाठीं लागणारा माळ लोकास धाकदपटशा 
देऊन त्यापासून उपटावा व आपल्यापुढे हजर करावा. फुकटात दुसर्‍याकडचा 
माल काढावयाचा झाला आणि तो काढतांना बटलरनें आपलीहि एखादी गरज 
भागवून घेतली तरी चालेळ, पण आपल्या हातची चिठ्ठी जावयास नको. 
त्याला हेहि ठाऊक होते कीं, डेप्युटी कमिशनर तहदिलदाराकडून माल मिळ- 
विणार तर तो त्यांत काहीं गोष्टी स्वतःताठीं मिळवून ठेऊन घेणार व तहशिल- 
दारानें कांहीं असा प्रकार केला तर आपणांस लाचलुचपत व लुबाडणे यांची चीड 
आहे असें प्रदर्शन करण्यासाठी डे, कमिशनर त्याच्यावर गुरगुरेल, चोरी 
करत्तोस म्हणेल, नोकरीवरून डिसमिस करवीन, असा धाक देईल पण कांहीं 
एक करणार नाहीं. आणि कधीं साहेज रागावले म्हणजे तहशिलदार, नायब तह- 
शिलदार वगेरे मंडळीस बटलरसाहेब धीर देत असत. आणि बटलर मंडळीर्च 
त्यामुळे तहरिलदारांवर वजनही असे. त्यामुळें बटलरनें कांहीं गोष्ट मागितली 
म्हणजे ती मागणी म्हणजे प्रत्यक्ष साहेबाचा हुकूम असे मामलेदार तहशिलदार 
समजत. आणि बटलरपाशीं मित्रासारखे वागत एवढेंच नव्हे तर बटलरहि 
आपला मालक असें समजत. कधीं कधीं साहेभास असें वाटलें की रात्रीं 
बारा वाजेबर्यत तहशिलदारार्ने आपल्याबरोबर रहावें आणि दुसऱ्या दिवशीं सकाळीं 
सहा वाजतां हजर रहार्वे म्हणजे त्या वेळेचे मामलेदार बटलर किंबा घोडेवाला 
याच्या खोलींत निजत असत आणि त्यांच्याशीं मोठ्या सलगीरने वागत, साहेबाच्या 
अंतेवासी मंडळीचा असा सन्मान जुन्या काळची रुबाबदार दिसणारी मंडळी 
ठेवीत असत, तशी सरकारची एकनिष्ट नोकरी पुढे ' शिकलेल्या ' मंडळीकडून 
कमी कमी होत चालली आहे. जुन्या रुभाबदारांनां ही बटलर-जोपासना आवडे 
अशांतला भाग नाहीं पण “ समर्थाचिवा घरचे श्वान त्यास सर्वहि देती मान ” 


२० । नोसरलविजय मिल्स ' 


बकाााापाा“ाशीशशी00ी00०000 ०” णप्रय 


असें बाक्‍्य म्हणून आपल्या मनाची समजूत करून घेत. आपणाला इंग्रजांची 
नोकरी करावयाची आहे ना तर त्याचा कुत्राहि आपणांस देवरूप आहे ही सेवा- 
धर्माची उच्च भावना, शिकलेल्या मंडळीच्या ठायीं वागत नाहीं. 


दुसऱ्या दिवशीं नायज तह्शिलदाराची आणि डेप्युटी कमिदनरची भेट झाली 
तेव्हां साहेब गरम, तरी सोम्यपणानें म्हणाले, “ मि. घरकुद्रे, तुम्ही तांदूळ 
चांगले नाहीं पाठविले १ ” 


“मी चांगले तांदूळ पाहून आणि आमच्या घरच्या मोलकरणीकडून 
निवडून पाठविले.” 

“ त्यांत खडे होते. ” 

“ हु शक्‍य नाहीं. ” 

“ मी बोलतो खडे होते आणि तूं म्हणतोस कीं शक्‍य नाहीं म्हणून,” 


“: आपण म्हणता त्यांत खडे होते तर ते असलेच पाहिजे, पण मी 
पाठविले तेव्हां त्यात खडे नव्हते. ” 


€ इस्प्ायल, ” 

“ साब ” म्हणून बटलर आंत आला. 

“ इस्मायल, यानीं आणून दिलेले तांदूळ करस होते? ” 

५ त्यांत खडे होते साहेब, ” 

“ तर मग मी ते आणून दिल्यानंतर आत गेले असले पाहिजेत.” 
“ तर मग काय मी घातले ! वाह्बा महाराज. ” 

५ तर मग मला आपल्या मोलकरणीला विचारलें पाहिजे. ” 

“ बरें आजचें दूध का नासकें होतें १ ” साहेबानीं विचारले, 

: मला त्याचें आश्चये वाटतें, ? 


“ तुम्हाला कोणत्याहि कामाबद्दल मेहनत स्वतः घ्यायला नको आणि मग 
कांहीं वाईट गोष्ट उघडकीस आली म्हणजे त्याचे आश्चये बाटते.?' 
१. 


नापाक ० पलायन कका 


गोंडवनांतोल वियंकवा र्ष 


८ मला स्वतः मेदेनत करावयास हवी की नको यासंत्रंधानें यां तहशिलींतील 
लोकमत निराळें असेल. ” 


“ तुम्हीं माझ्या मतापेक्षा लोकाच्या मताला अधिक मान देतां काय १” 


“ मी स्वतः कतेब्यबुद्धीनें काम केल्यामुळे माझ्या मनाला उत्पन्न 
होणाऱ्या ह्यांतीला सर्वांत अधिक मान देतों. ” 


:“ आणि माझ्या मतास मान देत नाहीस, तर मग सरकारी नोकरींत 
कशाला शिरलास ! ” 


येणेंप्रमाणें थोडीशी खडाजंगी झाली. 


संध्याकाळी जेवण चागले झालें होतें. साहेब जेवताना खूष होते. तेव्हा 
इस्माईल म्हणतो “ पहा, नायब तहशिळदारास आपण बोललां तर श्षैध्याकाळच्या 
म्वेपाकाला चागळें सामान आणून दिलें. नायब तहडशिलदार विलक्षण मनुष्य 
दिसतो. आज मी बाजारातून चाललों होतो तेव्हा असे कळलें कीं, काहीं लोकाना 
साहेञास भेटण्यास यावयाचं होते पण नायब तहशिलदारानें लोकांत धाक घाढूम 
ठेवला कीं जर कोणी साहेबापाशीं येऊन त्याच्या विरुद्ध तक्रार केळी तर तोत्या 
लोकांस चांगळें शासन करील. ” 


“ काय, तो असें बोलला ? ? 
“ होय साहेब. ” 


झाले, दुसऱ्या दिवशी सकाळी तहशिलदारसाहेब आले तेव्हां त्यानीं प्रथम 
साहेबांच्या सेवेला मी नव्हता, कामामुळे हुजुरच्या सेबृंत अंतर पडलें असावे 
इत्यादि गोष्टी मोठून साहेबांची क्षमा मागितली, नायब तहशिलदारास कामावर 
पाठविलें असतें, तथापि बाहेरगांवीं जाबश्रास ते फार कुरकुरतात, असेंहि सांगि- 
तळे, त्याच दिवशीं पुर्ढे नायज तहशिलदाराची कित्येक रेकाड॑स्‌ डेप्युटी 
कमिशनरसाहेबानीं तपासळे आणि केव्हां त्यांत कांहीं चुका आढळून आल्या 
तेव्हां “ तूं मूखे गद्धा आहेस ” असें साहेब बोलले, “' साहेब आपण जरा 
संभाळून बोला,?' असें बंडुनाना म्हणाले, तेव्हां, 


>७ : भोसटंचिजय मिल्स 


“ सुवरके अवलाद, काम येत नाहीं आणखी उद्धटपणा, ” 
“ सुवरके अवलाद, ” हे शब्द ऐकतांच बंडुनानानीं रुळ ठगारला, 


त्याचा परिणाम एवढाच झाला कीं थोड्याच दिवसांत राजीनामा देण्यास 
मि. घरकुटटे यांस सांगावें या अर्थाचा हुकूम चांद्याहून सिरोंच्याच्या तहगिलींत 
आला. याप्रमाणें नोकरीचा वृत्तात आटपल्याबवर आपल्या मुलाने आता पुढें 
काय करावें म्हणून अनंतराबांस काळजी उत्पन्न झाली. 


याच सुमारास आपल्या देशात अ योगिक उन्नतीसाठी कांहींतरी करावें 
म्हणून चळवळ सुरू झाली. नागपुरांत पुण्याच्या लोकांची स्वदेशीची वाच्यता 
ऐकणारे लोक बरेच होते. शिवाय पुण्याकडच्या लोकांनां इकडे आल्यावर 
नोकऱ्याहि मोठमोठ्या मिळाल्या. पुष्कळानीं वकिलींत पैसे बरेच मिळविले. 
आता या पैश्याचा विनिमय कसा करावा म्हणून विचार उत्पन्न होऊं लागले. 
वऱ्हाड-नागपूरकडे आलेल्या पुष्कळ लोकाचा आणि त्यात विशेषेकरून कोकणस्थ 
भ्राम्हणांचा येथें कायमचे होण्याचा इरादा नव्हता.पुष्कळाप असें वाटे कीं, पैसे 
मिळविल्यानंतर आपण परत मुंबईस, कोंकणांत, साताऱ्यास अगर पुण्यास -- 
जेथून आपण आलो तेथें परत जावें. या बुद्धीने त्यांनी इकडे जमिनी देखील 
फारशा स्वरेदी केल्या नाहींत. हिंगणघाट इत्यादि गिरण्यांत त्यांनीं शे असे घेतले. 
गव्हर्नमेंट प्रॉमिसरी नोटा आणि बॅकातून ठेव इत्यादि मार्गीनीं आपल्या पैश्याचा 
उपयोग केला, त्या लोकांनीं प्रथमतः इकडे घरे देखील बाघली नाहींत तथापि 
जसजसा वृद्धापकाल येऊं लागला आणि झालेल्या मुलाबाळांची भक्ति येथेंच 
राहण्याकडे दिसूं लागली आणि आपल्या गांवच्या आप्तेष्टांच्या मृत्यूंची पर्त्रे येऊं 
लागली तसतजी त्याची परत जाण्याची उत्कंठा कमी होई. पुष्कळांनीं घरे 
बांधली ती देखील फारच उशीराने ब्राघली. मी जमिनी दहापांच वर्षे अगोदर 
घेतल्या असल्या तर आज लास्व दोन लाखांचा धनी असतों अशा प्रकारचे 
उद्गार पुष्कळांकडून ऐके येतात. 

याशिवाय इंग्लंड देशाशीं औद्योगिक बाजतींत टक्कर दिली पाहिजे अ्या 
तऱ्हेची विधानें वारंवार होत असत. कापूस वऱ्हाडांत पिकतो, तो बिलायतेस 


गोंड वनांतील प्रियंवदा २८ 
जातो आणि तिकडून माल येतो. विलायतेंत मज्राचे दर हिंदुस्थानच्या चौपट 
आहेत असें असतां आपण येथेंच जर माल बनविला तर किती तरी फायदा 
पडेल इत्यादि गोष्टी वारंबार ऐकूं येत आणि अशा काळीं कापडाच्या गिरण्या 
काढण्याची इच्छा वऱ्हाड भर आणि नागपूरमध्ये देखील चांगली जागत झाली 
होती. 


“ झोंसलेविजय मिल्स ” च्या स्थापनेची हकीकत देण्यास आणखी आयास 
नकोत. ही गिरणी वर्‍हाडांत मूर्तिजापूर येथें स्थापन करण्यांत आली. मूर्ते- 
जापूर हें रेल्वेचे ठिकाण असून कारंजाकडून येणारा कापूस मुंबईकडे जावयास 
मूर्तिजापूरास येतो आणि त्यामुळे हे ठिकाणहि चांगलेच होते. 

रावसाहेब अनंतराव घरकुट्टे हे तहशिलदार आणि एक्स्ट्रा असिस्टंट 
कमिशनर या नात्यानें पुष्कळ ठिकाणी हिंडले असल्याकारणानें, त्याच्या ओळखी 
पुष्कळ होत्या आणि त्यानीं त्या गिरणीचे पुःकळ शोअस सहज खपविले, शिवाय 
“ झोंसठेविजय़ मिल्स ” हे नांव गिरणीस दिलें असल्याकारणानें नागपुरच्या 
महाराजाच्या कुटुंबातील पुष्कळ मंडळींनी आणि त्यांच्यावर भक्ति असलेल्या 
आसपासच्या मालगुजारानीं पुष्कळ हिस्से घेतले, शिवाय बंडुनानाविषयीं 
सिरोंच्याच्या कांहीं श्रीमान कोमटी मंडळींत चांगलें मत झालें असल्यामुळें 
त्यांच्यामर्ध्येंच पंचवीस तीस हजाराचे शोअसे खपले, असें होऊन एकदांची 
कंपनी चांगली स्थापन झाली. नागपूरासचच “ होरमसजी पेनांगवाला ” नांवाचा 
एक पारशी कत्रांटी रहात असे त्याचा भाऊ मुंबईत यंत्राचा दलाल होता, 
आणि त्याच्या दुकानांत त्याचीहि पाती होती, मिल जगो अगर तरो, मिलची 
मशीनरी आणण्यांतच आपणांस दहापांच हजार रुपये मारतां येतील ह्या हिशो- 
बाने होरमसजीकाकानें २५० रुपयांचा एक असे दहा भाग घेऊन तो डायरेक्टर 
बनला, या बामण मंडळीस अर्से वाटले की पारशी हा व्यावहारिक हुषारी 
( बिशिनेस टॅक्ट ) चा मनुष्य आहे, तेव्हां त्याच्या योगानें गिरणी चांगली 
चालेल, या पारशाची खरी हुषारी गिरणीचा डायरेक्टर बनण्यांतच होती, 
हे मात्र फार जणांच्या लक्षांत आलें नाहीं. होरमसजीचे खरें आडनांव 
€ मुरगीचोर ” असें होतें. पण त्याचा बाप पांच महिने पेनांगला कारकून म्हणून 


२९ प्रियंवदेचा जी वितक्रम 


एका गोऱ्याबरोबर गेला होता तेव्हांपासून याच्या ब्रापार्ने “ पेनागवाला ” 
हें नांव धारण केले होतें. तेंच नांव पुढें मुलाने चालविले. अनंतराव घरकुटे 
यांनीं पुष्कळच शोअर्स घेतले होते. तेव्हां तें गिरणीच्या डायरेक्टरनर्डाचे 
चेअरमन झाले, 


तहशिलदारी व इतर शासनविषयक कार्मे करतांना धडपड वरण्याची 
संवय आमच्या रावसाहेबानां झालीच होती आणि म्हाताऱ्याने जरी पेन्हान घेतलें 
तरी दहादहा तात आफीस काम करण्याची त्यांची उमेद होती. गिरणींचे काम 
त्यांच्या नेतृत्वाखालीं चागळें चालल असते, तथापि रावसाहेबाना दुर्देवाने दुसर्‍या 
अनेक भानगडी सुचल्या. ऑनररी मॅजिस्ट्रेटी त्यांनी मिळविली आणि जे 
काम ते पूर्वी पैसे घेऊन करीत होते ते फुकट करूं लागले, त्याचे चिरंजीव 
बेडुनाना हे गिरणीचें मॅनेजर होतेच. बोर्डाने त्यांचा पगार दोनशे रुपये 
ठरविला, त्याचा कमींत कमी दोनशे रुपये पगार ठरविण्याच्या बाबतींत सिरोंचा 
येथील कोमटी डायरेक्टरानीं पुढाकार घेतला होता, 


प्रकरण ३ रें 
प्रियवदंचा जावितक्रम 

वाचकहो, मला वाटतें की तुमच्यांतील पुष्कळ मंडळी ऑफिसांत जाऊन 
कारकुनी करणारी असतील, आणि ऑफिसच्या कटकटींतून सुटण्यासाठीं तुम्हीं 
गोष्टींची पुस्तकें बाचणार, तेव्हां पुन्हा ऑफिसातल्या गोष्टीचीच कटकट तुमच्या 
कानापांशीं लावली तुम्हाला चीड येणार हें स्वाभाविकच आहे. असो, झाल तें 


झाले, ऑफिसांतून तुम्हाला आतां घरींच आणतों आणि ग्रहसोख्य दाखवितों, 
आतां तरी माझे थोडेसें आभार माना !!! 


तुम्हांला अही एक पंचाईत पडली असेल की, प्रियंवदेसारखी रसिक 
आणि बिनोदी मुलगी नवरा विलायतेंत गेला असतां काय करीत बसली 


गोडवनांतील प्रियंवदा श० 
असेल ! नको, उगीच तकंवितक नको. खरें खरें काय तें तुम्हाला 
सांगतोच. 


प्रथमत एक गोष्ट सागावयाची म्हटली म्हणजे, प्रियेवदा नागपूर सोडून 
साताऱ्यास आपल्या माहेरीं* गेली नाहीं. तिची सासू तिला माहेरी पोंच- 
वावयास तयार होती, ती म्हणाली “ बये, तुझा नवरा विलायतेस गेला. तूं 
जर कांहीं दिवस माहेरी जाशील तर तुला कदाचित. येथल्यापेक्षा बरें वाटेल,” 
प्रियंवदेने उत्तर केळे “ सासूबाई, माझ्या बडिलानां आणखी दोन मुली व 
तीन मुलगे आहेत. तेथे दिनकर भावोजी शिवाय आपल्याजवळ कोण आहे १ 
शिवाय माझ्या दोघी बहिणी आणि भाऊ आनंदात असतील, त्याना माझे मन 
काय कळणार आहे ? मी विचारात गढून गेले असले तर तीं इंसत खिदळत 
असतील, त्याच्या वियोगाने मला जें दुःख होते ते आणखी जर कोणाला 
तीव्रतेने होत असेल तर तें तुम्हाला, यासाठीं तुम्ही आणि मी अद्गाच दोघीजणी 
बरोबर असलां म्हणजे बरें. शिवाय त्यांना मी दर आठवड्याला पत्र लिहिणार, 
मी जर माहेरी असल तर येथची हकीकत त्यास सविस्तर कळविणें कसें शक्‍य 
होईल ! दिनकर भावोजीना तुम्हीं पत्रे लिहावयास सांगाल. पण पुरुषांना 
कधीं चांगलीं पत्रे लिहिता येतात काय ? आमचा दादा मुंबईतल्या कॉलेजात 
दिकत होता, बाबानीं सागितल्याप्रमाणें त्यांचं पत्रहि दर आठवड्याच्या 
आठवड्याला येत असे, पण आंतला मजकूर म्हटला म्हणजे छापील नमूना. 
म्हणे “मी खुशाल आहे, प्रकृति बरी आहे. अभ्यास बरा चालला आहे. 
काळजी करूं नये, एवढ्या मजकुरापेक्षां अधिक एग्बादा शब्द असेल तर 
दापथ. आमच्या वडिलानी कितीदा तरी त्याला म्हटले, “ बाबारे, जर तुला 
जर एवढेंच लिहावयार्चे असेल तर छापखान्यातून कार्डे छापून तरी घे. दर 
आठवड्याला तारीग्व घालावी आणि काडे टाकावीं. ” तरी आमच्या दादाने 
काडेहि छापून नेली नाहींत आणि ' नवलविशेष कांहीं नाहीं' हें एक वाक्‍य मात्र 
अधिक घालण्याचे सुरूं केळे, दिनकर भावोजी्चे असेंच होईल, मध्यें मी साता- 
ऱ्यास असताना मला नव्हती त्यांचीं पत्रे येत ! पत्रांतला मजकूर सारा तीन ओळी, 
छे ! त्याना दर आठवड्याला पर्त्रे पाठविण्याचे काम मलाच केलें पाहिजे. 


हर मिर्थवदेया जौतितक्रम 
त्यांना जर पर्त्रे पाठवावयाची तर त्यांनां अधिक उत्कंठा कोठल्या माहिती- 
संबंधानें १? सातारच्या की येथच्या ? सातारची आातमी आपणांस पत्नांतून 
कळतेच. त्या पत्राचा सारांश तिकडे पाठवू अगर प्रसंगीं पत्र बाचून तेच 
तिकडे पाठवून देऊं. मी दिनकर भाषोजीना सागणार आहे कीं तुम्हाला त्यानां 
लांबलचक पत्न पाठवावयाचे नसेल तर नका पाठवू. गावांतील जी बातमी 
समजली असता त्याना बरें वाटेळ ती बातमी मात्र तुम्ही पैदा करून आणून 
मजपुढें हजर करा, म्हणजे मी ती बातमी त्याना यथासांग कळवीत जाईन .” 


प्रियवदा पडली अर्वाचीन कालांतील प्रोषित भतुका. माझा 
: प्राणसखा रंगेला कोठें गेला १” म्हणून ती शुकास अगर सारिकेस प्रश्न 
विचारीत नव्हती, अथवा “ प्रियकराचा घरीं यायचा रस्ता चालायला सोपा 
व्हावा म्हणून कीं काय नेत्ररूपीं कमले दररोज रस्त्यास अर्पण करावीं ” असें 
करीत नव्हती, कारण तिला नवरा परत केव्हां येणार हे पर्के ठाऊक होर्ते. 
एवढें मात्र खरें की, 


अपि वीक्षितुमक्षमा सखी त्वदभिन्नेब पुरा विदभजा । 
भवता रहिता दमस्वसा नृपलक्ष्मीश्वच गताद्य शोच्यताम्‌ | 


इत्यादि जुने विप्रलंभशुंगारात्माक 'छोक कधीं कधीं मनाशीं पुटपुटे आणि 
नवीन नवीन शोधून वाची, कारण वियोगामुळें दुखविलेल्या अंतःकरणाविषयीं 
तिच्या मनांत एक तऱ्हेचें सोद्ृद उत्पन्न झाळें होते. दुखाबलेळें अंतःकरण मग 
अर्वाचीन असो अगर प्राचीन असो त्याविषयी तिला सहानुभूति वाटे. 

प्रिमवदा दर आठवड्यास रामभाऊस पत्रे पाठवी. त्या पत्रात घरची माहिती 
चांगली असे, ती रोज १-२ पाने लिही आणि आठवड्याच्या शेवटी भडोळेच्या 
भंडोळें रामभाऊस पाठवी, तिची पत्रें म्हणजे वतेमानपत्रांवरहि ताण' असे. 
फाबल्या वेळांत सुशिक्षित ब्राईे काय करते या प्रश्नास उत्तर देण्यासाठीं, स्त्रियांचा 
तोंडपुजेफ्णा करणाऱ्या मुंबईच्या कित्येक मासिकांतून सुशिक्षित खी फावल्या 
वेळात शाळा काढते आणि इतर स्त्रियांस शिक्षण देते अशी काल्पनिक चिंब 
काढलेली असतात. आमच्या प्रियेवदेचें अशा प्रकारचे कोणतेहि कार्ये नव्हतें. 


गशौंडवनांतील प्रियंवदा 1.1 
ज्यांनां खऱ्या सुशिक्षित आणि रसिक स्त्रियांची माहितीच नाहीं, आणि ज्यांना 
सुशिक्षित स्त्रीचे चरित्र मनोहर कसें करावें देहि समजत नाहीं अशाच कादंबरी- 
काराकडून वरील प्रकारचीं चित्रे निघावयाचीं, प्रियेबदा लोककल्याणाकरिता 
निघालेली स्त्री नव्हती. तिचे मन घरात आणि नवऱ्यात गुरफटलेले होतें. 
नवरा गेल्यानंतर काहीं दिवसांनीं तिनें कित्येक मराठी नकाशे आणविळे आणि 
नवऱ्याची एडन, सुवेझ पोटसय्यद, मसीना, नेपल्स इत्यादि शहरातून पत्रे 
आलीं म्हणजे नेपल्स कोठें आहे, मसीना कोठें आहे हें आपल्या सासूस दाख- 
बित बसे, शिवाय जीं जीं ठिकाणें नवरा हिडला त्याची स्थलवणेनें मराठींत 
कोठें असलीं आणि आमच्या नागपूरच्या महालांतल्या मिकार लायत्ररींत 
सांपडलीं तर तीहि वाचून दाखवी. आपल्या नवर्‍याला कोणकोणत्या इमारती 
इंग्लंडात दिसतील याचा अजमास करून त्यांचीं चित्रे मिळवून ती आपल्या 
सासूस दाखवी. कीं कधीं आपण अमुक पाहिले तमुक पाहिले काय इत्यादि 
प्रश्न आपल्या नवऱ्यास विचारण्यासाठी त्याच्या टिपा करून घेई. शिवाय 
इंग्लंडात परिस्थिति कशी असते याची कल्पना सासूस देण्यासाठी यावर पुस्तकें 
वाचून दास्वबी. एकदां तिनें बॅरिस्टर लोक वृद्ध विद्वान दिसण्याकरतां पाढऱ्या 
अंबाडीचे टोप घालतात त्या टोपासह एका मनुष्याचे चित्र पाहिलें, तेव्हां तिने 
आपल्या नवऱ्याच्या फोटोवरून तो बॅरिस्टर झाला असता कसा दितेल याचें 
काल्पनिक चित्र तयार केळे, तें आपल्या सासूस दाखविलें आणि पुढील डाकेनें 
विलायतेस देखील रवाना केलें. शिवाय आपल्या सासूस पाश्चात्य समाजाची 
चांगली कल्पना व्हावी म्हणून काहीं इंग्रजी कादंबऱ्याच्या गोष्टी विस्तृत तऱ्हेने 
सासूस समाजावून दिल्या. अर्थात्‌ या सर्वोच्या योगानें सासूस मौज वाटे आणि 
प्रसंगीं काळजी उत्पन्न होई. तिनें एक गोष्ट अशी वाचून दाखबिली कीं तींत 
एक बॅरिस्टर होण्यासाठीं जेवणें झोडणारा विद्यार्थी एका नटीच्या मागें लागला 
होता. बिचाऱ्या आहेला हें वाचून मोठी काळजी उत्पन्न झाली, आमचा 
रामू तर नाहींना तसा लागणार ! त्याला तर नाटकें पाहण्याचा नाद आहे ! 
थोडीबहुत तीव्र चिंता आमच्या प्रियेंबदेच्याहि मनांत उत्पन्न झाली ! आणि 
तिनें यासंबंधाने एखाद्या पत्रांत प्रश्न विचारण्याचे मनांत योजिले, 


1. भियंचदेचा जीवितक्रम 


अना पनापलशाण पा फट 


प्रोषितमरतैका या नात्यानें झालेली प्रियंवदेची कारकीदे बरीच मोहक 
आहे. तिची कल्पना पुढील एका प्रकरणावरून येईल, येर्थे एकच गोष्ट 
नमूद करितों. 

प्रियंवदेचा भाऊ डी. भुस्कुटे हा मुंबईचं आपलें शिक्षण संपवून कांही 
दिवस बडोद्यास नोकरीला होता. पुढें त्यास असें बाटल कीं, आतां आपण 
नोकरी न करता स्वतंत्र धंदा करावा, ब या हेतूने तो नागपूर येथें आला, 
त्यानें आपल्या बरोबर एक गवई देखीळ आणला होता, त्याचें नाव हरिभय्या 
मोघे, हरिभय्या मोघे हा मूळचा सागर येथील रहाणारा. गोविंदपंत बुंदेले 
यांच्या बरोबर ब॑ देलखंडांत बरीच कऱ्हाडी मंडळी गेली, त्यापकी हा एका 
घराण्यांतला मनुष्य. मराठी राज्याच्या सूर्यास्ताबरोबर जेथे म्हणून मराठी 
मंडळी आहेत त्यांची दिवसानुदिवस बाताहतच होत आहे. सागरकडील महा- 
राष्ट्रीय कुदुंबाची हीच स्थिति आहे. कोणी कोणच्या निमित्ताने कोठेंतरी जाऊन 
कांहींतरी करीत असतो. हरिभय्याची स्थिति येणेप्रमाणेंच होती, जुन्या 
सागरकर मंडळींत जरा थोर पदवीस साजेलशा गायन-वादनादींच्या अभिरुचि 
बऱ्याच होत्या. त्या गतवैभव सागरात देखील अंशेकरून राहिल्या. हरि- 
भय्याला गायनाचा लहानपणापासून नाद असे. गायनासाठीं म्हणून घर 
सोडून तो बडोद्याला जाऊन राहिला, पुढे राजमहेद्रि, काकीनाडा इत्यादि 
ठिकाणीं जाऊन त्याने तेलगू गाणे अभ्यासिळ आणि पुढें बडोद्यास जाऊन गार्णे 
अधिक शिकण्यासाठी म्हणून राहिला, थोर्डेबहुत गाणे शिकवून तो पोटापुरतें 
दोन पैसे मिळवीत असे. डा. भुस्कुटे हे व हा एकाच मोहोल्यांत रहात 
असत आणि डॉ. भुस्कुटे हरिभय्यापा्शी थोडेबहुत गाणे शिकत. 

डा, भुस्कुटे हे जेव्हां नागपुरास यावयास निघाले तेव्हां ह्रिभय्याने बरोबर 
येण्याची इच्छा प्रदशित केली. तो म्हणाला, “ मी आपणांस शिकवीतच राहीन 
आणि हाक्‍्य झाल्यास नागपुरास एंस्वादी शाळा काढीन म्हणजे माझ्या 
मवरितार्थांची चांगली सोय होईल. तेथें आमची सागरची कांहींतरी मंडळी 
असतीलच त्यांची मला मदत होईल, ” डा, भुस्कुटे यानां ती कश्‍्पना पसंत 

5 


गॉंडवनांतील प्रियेंबदा |) 


कण शा पीकता शणणणण चीच शीण नकळे 


पडली. त्यांनां वाटले आपली बहीण प्रियंवदा हिलाहि गाण्याचा नाद आहे, 
तेव्हा ती देखील याच्यापाशीं शिकेल. परंतु आपल्या बहिणीचे शिक्षणासंबंधी 
विचार काय आहेत याची त्यांस कल्पना देखील नव्हती. डा, भुस्कुटे आले 
तेव्हां प्रियेवदेचा आणि त्यांचा संवाद झाला होता तो येणेप्रमाणे ।-- 

:£ दादा तू मर त्यानां घेऊन आला आहेस तर त्याना राहूं दे या घरीं 
काहीं दिवस, सासूबाई काहीं त्याला नाहीं म्हणणार नाहींत. ” 

५€ घण तूं त्याच्यापाशी कांहीं शिकशील काय ! शिकण्यास सासूबाई 
परवानगी देतील काय? ” 

“ परवानगीची मला फारशी अडचण नाहीं, मी विचारलेच तर त्या 
कांहीं नको म्हणणार नाहींत, पण मला गायन कांहीं अधिक शिकायचँच 
नाहीं. ” 

41 ते कां १ ११ 

“ त्याचा उपयोग काय ? ” 

“ कां अमूक एक शिकल्यापासून उपयोग काय म्हणून तू देखील कां 
विचारायला लागलीस अडाणी बायकांप्रमाणे ? ? 

८ अडाणी बायकांप्रमाणे का? मी अडाणी नाहीं नाहीं म्हणून तुला 
कोणी सांगितलें? ” 

“ पुरुष बी. ए, झाला तरी देखील त्याला अडाणी अगर अशिक्षित 
म्हणण्यास लोक कमी करीत नाहींत. बायकांनां पांढऱ्यावर काळे करतां येऊं 
लागले म्हणजे त्यास मनोरंजन मासिक आणि सुधारक पत्रें देखील सुशिक्षित 
म्हणूं लागतात, तुल अडाण्यांत काढायला हरकत नाहीं, परंतु मॅट्रिक झालेल्या 
मुलीस अडाणी म्हणण्याची फॅशन नाहीं, आणि म्हणून तुला मी अडाणी 
म्हणत नाहो. 

“ मी जर अडाणी नाहीं तर मग माझा प्रश्न हाहाणयणा वा आहे, आणि 
मग त्याला उत्तर दे. ” 


डि प्रियंवदेया जौवितक्रम 


“जे संगीत शास्त्र तूँ* आतांपर्यंत शिकलीस, तेवढ्याचा मात्र तुला 
उपयोग होता आणि आणखी शिकशील त्याचा नाहीं? ” 


: हो अगदीं बरोबर बोललास, ” 
५: अगदी बरोबर ? ” डाक्टरसाहेन ओरडले, 


: घरबां मी बीयीलजीवर -त्याला मराठी भाषेचे अभिमानी काय बरं 
म्हणतील -हो आठवलं, त्याला ग्हणतात “ जीविदास्त्र ”, त्या जीविशास्त्रावर 
एक पुस्तक वाचलं, त्या पुस्तकांत फुलाला रंग कां अततो, याला उत्तर दिलं 
आहे कीं फुलांमध्ये देखील पोरुषमय आणि स्त्रीस्वर्पाचे पराग असतात, 
ते दोन्ही प्रकारचे पराग भ्रमरसाहाय्याने एकत्र झाले म्हणजे ते झाड स्वतःशी 
सहद अशा प्रजोत्पत्तीस समथ होते. फुलांचा वास व रंग पुष्कळ अंशी मदन- 
सहाय्यक म्हणजे प्रजोत्पत्तीस मदत करणारा जो भ्रमर त्याच्या आकषणासाठीं 
आहे, तर्सेच पक्ष्यांमध्ये जे चित्रबिचित्र पक्षी आपणास दृष्टीस पडतात, त्यांतील 
नर जातीचा रंग मादीस आपल्याकडे ओढण्यासाठी असतो. त्याप्रमाणेच 
पक्ष्यांचे सुंदर गायन देखील विरुद्ध जातीस आपल्याकडे ओढून संयोग घडवि- 
साठींच असते. त्या पुस्तकाचा विद्वान ग्रंथकाराचं असे म्हणणे आहे कीं, 
मानव कोटींत देखील स्त्रियांचं सोदर्य त्यांचा नट्टापट्टा, त्यांनां शिकबिलेलें नर्तन 
व संगीत याचा दुसरा तिसरा हेतु कांहीं नाहीं. स्त्री लाजाळू असते आणि 
तिला पुरुषाकडे जाऊन वैवाहिक मागगी करिता येत नाहीं. पुरुषाला कर्से तरी 
करुन आपल्याकडे ओढणं तिला अवश्य आहे आणि एवढ्यासाठींच तिला 
स्वतःला मोहकता आणणें आणि नखरा करणं अवश्य आहे! तुला जास्त 
सांगायला नको. तूं तर जीविशास्त्र शिकला आहेस ना ! ” 


6 क्काय तूं फाजील मुलगी झालीस ! ” 


: गेल्या सालीं वेद्यांस शिव्या देतांनां तू आपल्या शास्त्रश्ततेचा केवढा 
डोंल करीत होतास ; मी शास्त्रीय बिचारसरणी गायनवादनाच्या बाबतींत 
लावली तेव्हां मी झालें फाजील, ” 


नोॉंडयनांतील म्रियंबदा ह. 

“ तुला फाजील म्हणू नये तर काय म्हणावे? अग तूं कदाचित म्हणशील 
की माझं बोलगे खरें आहे, पण तेवढ्याने कायभाग होत नाहीं. कारण 
बायकांनीं खरे बोलावें असे थोडेच कांहीं आहे ? ” 

“ मृग मायकांनीं करस बोलावे १ ” 

“ ब्रायकाच्या तोडीं जी योग्य भाषा म्हणून ठरली आहे ती वापरली 
पाहिजे. ज्या गोष्टींचे अज्ञान पुरुषासमक्ष दाखविलें पाहिजे म्हणून ठरले 
आहि त्या गोष्टींत अज्ञान हें बायकांनीं दाखविलेंच पाहिजे. बरे असो; आतां- 
पर्यंतचे संगीतज्ञान तुला अवश्य होते आगि आतां मात्र अधिक वाढविणें अबश्य 
नाहीं असे म्हटलेंस तें का ? ” 

“ कां म्हणजे, पुरुषाकषणाच्या कामांत मला केव्हांच यश आलें आहे. 
आणि मला नवराहि माझ्या मनाजोगता मिळाला आहे, तो असा चांगला 
वेडबंबू आहे की काय सांगूं ! मी किती वेडी असले तरी मला तो गोड समजून 
घेतो. नवऱ्याचे मन संतुष्ट रावण्यासाठीं मला आहे यापेक्षां अधिक संगीताची 
गरज नादीं, आणि मला असें वाटतें की बऱ्याच बायकानां संगीतादि गोष्टी 
शिकण्याची अवश्यकताच नाहीं. ” 

८ ह्या गोंडवनांत येऊन आमचो प्रियेवदा मात्र अगदीं मागासलेल्या विचा- 
राची बनली, सुधारणादेवीच्या अल्युत्कूड उदाह्रणानीं इतका ताळ सोडला हें पाहून 
सुधारणादेवीनें आतां खुशाल आत्महत्या करावी,” डा, भुल्कुटे हंसतहंसत म्हणाले 

 ब्राबारे तुझी वाखाणणी करण्याची तर्‍हा तरी किती विचित्र ! मी एक 
साधारण शिकलेली वाई आणि ती झाल्य ' सुधारणा देवीचे उदाहरण, ' मी 
तुझी बहीण, तूं माझा भाऊ, म्हणून ठोक आहे, नाहीं तर तुझी गणना 
मला, तरूण बायकाशीं बोलतांना वाटेळ तशी खुश्यामत करणाऱ्या वेड्या पोरांत 
लागली असती, ” 

“ बुरे, त राहूं दे, माझे दोब काढायला फार सोपं आहे. मी पडलों 
डाक्‍टरभाई, वादविवाद करण्याची हुशारी मला नाहीं, पण तूं एवढे साग कीं, 
स्िश्रांनीं काय शिकावे म्हणून सांगणारे विद्दान ते सारे वेडेच १ ” 


३७ प्रियंवदेचा जीवितकम 


“ अरे बाबा, ते सारे पडले ग्रांथिक विद्वान, बायकी शहाणपण 
त्यांनां कुठें आहे ? शिवाय बायकांनी काय शिकावे यासंबंधीच्या आमच्या 
लोकांतल्या वल्पना पूर्वापार ग्रंथातून घेतल्या आहेत की 'ग्रजी शाळा पाहून 
त्यांतून घेतल्या आहेत ? ” 

“ अर्थात सुशिक्षित स्त्रिया ज्या राष्ट्रांत आहेत त्या राष्ट्रांचेच आपणास 
अनुकरण केलें पाहिजे. ” 

“: माझा प्रश्न काय, आणि त्याला तुझ्याकडून उत्तर काय! बाई, बाई, 
दार्थ झाली मला चुकविण्याची, तुला असे वाटते कां, मी आपला प्रश्न सोडून 
तूं जो तात्त्विक सिद्धांत पुढें माडतोस तिकडे मी पळेन ! मला तर तात्त्विक 
वादविवाद बिलकूलच करतां येत नादीं. मला ग्रांथिक विद्वानासारखें उत्तर 
देऊं नको. ” 

: काय, तुझा प्रश्न काय ? आम्हीं स्त्रीशिक्षणाच्या कल्पना कोठून घेतल्या ! 
अर्थात इंग्रजांच्या शिक्षणसंस्थांवरून. ? 

: हु, अस्सं आता आलास ताळ्यावर. मीहि तुला उत्तर देतें कीं इंग्रज 
समाजाला ज्या प्रकारचा सुशिक्षित स्त्रीर्पी माल तयार करावा लागतो तसल्या 
मालाची आमच्याकडे गरज नाहीं, ” 

: तुझे एकेक बोलणे विलक्षणव ! ' सुशिक्षित स्त्रीर्पी माल ! अगर हीच 
भाषा कोणी पुरुषाने वापरली असती तर केवढा काहूर केटा असतास ! असो, 
बरें गरज काना 1?” 


५ ८. 2 जी स्त्रिप्रांस नटून थट्टून आपला नवरा आपल्या कुदालतेने 
मिळवावा लाग,.!, भणि त्यामुळे सतरा पंधरा तऱ्हेचे नखरे त्यास करावे लाग- 
तात, कोणत्या पुरुषांनां काय आवडते ते पाहून त्या पुरुषाच्या स्त्रीविषयक 
आवडीप्रमाणे आपणहि आडोंत अशी प्रतारणा करावी लागते, शृंकडो तऱ्हेच्या 
लबाड्या कराव्या लागतात, आणि नवरा मिळवावा लागतो. हिंदुस्थानांत 
मलीच्या लग्नासाटीं बाप धडपडतो, पन्नास ठिकाणीं नाके घांसतो, आणि यामुळें 


गोंडयनांतील प्रियंथदा ३८ 
येथील स्त्रियांचा नटीपणा चुकतो, नटीपणा इंग्रज स्त्रियांस अवश्य आहे आणि 
त्यांची शिक्षणपद्धति तदनुरूपच असली पाहिजे, केवळ त्यांचे उदाहरण आपल्या- 


पुढे असल्यामुळें त्यांनां अवश्य परंतु आपणांस अनवरय अशा गोष्टींस आमचे 
लोक महत्त्व देतात. 


“ इंग्रजी स्त्रियाच जर तुझ्या मतानें दुदैवी, तर मग त्याची शिक्षणपद्धति 
तुला कोठून पसंत पडणार ! ” 


“ असो; एकंदरींत मला पुन्हां विद्यार्थीवृत्ति नको, तिचा मला कंटाळा 
आला आहे. ” 


प्रकरण चवथे 
हरि भाऊच आश्रयदाते 


बेंडुनाना घरकुद्टे आणि रामभाऊ गोडबोले हे सध्यां अगदीं गाढ मित्र 
खरे, पण रामभाऊ गोडबोले यांचे वडील व अनंतराव यांचं मात्र पूर्वी फार सख्य 
नव्हते. अलोकडे दोघांनांहि वृद्धापकाळ आल्यामुळें दोघेहि आपआपल्या 
पूर्वीच्या गोष्टी विसरून गेले होते आणि दोघांचेंहि एकमेकांकडे जाणेंयेणें असे, 

पूर्वी दोघांचैंहि सख्य नव्हतें याचे कारण सहज समजण्यासाठी नागपुरांतील 
ब्राह्मणांचा आणि त्यातल्या त्यांत कायस्थवृत्तीच्या म्हणजे सरकारी नोकरी कर- 
णाऱ्या ब्राह्मणांचा इतिहास दिला पाहिजे. आज महाराष्ट्रीय भावनेने निरनिराळ्या 
ठिकाणचे महाराष्ट्रीय जरी एकच झाले आहेत तरी ती वृत्ति पन्नास वर्षांपूर्वी येथे 
नव्हती, नोकरीसाठीं पुण्याहून आलेली ब्राह्मणमंडळी, खरी नागपुरची ब्राह्मण 
मंडळी व साताऱ्याकडून आलेली कऱ्हाडे ब्राह्मणमंडळी यांच्यांत फार विरोध 
असे. नोकरींतील स्पर्धा, त्यामुळें परस्परद्वेष पुष्कळ, ज्याप्रमाणें बऱ्हाडांत 
ब्राह्मण आणि परभू यांच्यामध्ये विरोध फारसा नाहीं; ( कारण येर्थे नोकरींत 
परभूची स्पर्धा संख्येच्या अल्पत्वाने भासत नाहीं, ) तथापि ठाण्यास अगर 


३१९ रि ऊंचे आश्रयदाते 


मुंबईस मराठे व तत्सम लोक स्पर्धेसाठी येण्यापूर्वी या दोहोंतच स्पर्धा विशेष 
असून त्यामुळें परस्परद्वेषहि पुष्कळ ; त्याप्रमार्णेच या तीन पार््यामधून परस्परद्वेष 
पुष्कळ होता. इंग्रजांच्या हातीं पेशव्यांचे राज्य १८१८ साठीं गेळ॑ आणि 
नागपूरकर भोंसल्यांचे राज्य १८५६ सालीं डलहोसीने गिळंकृत केलें. इंग्रजी 
शिक्षण मुंबईकडे आणि त्याचप्रमाणे सागरकडे अगोदर सुरूं झालं. सरकारी 
हायस्कूल नागपुरास नव्हतें पण ते सागर येथें अगोदर झाले. आणि मध्य- 
प्रातातील पहिले इंग्रजी गिकलेले गर्ह॒स्थ रा, कृष्णराव रिंगे (जन्म सन १८२७) 
हे सागरकडील ग्रहस्थ होते, केवळ त्यावेळीं इंग्रजी शिकलेला ग्रह्स्थ म्हणून 
त्यांचा सरकाराने मोठा सन्मान केला आणि त्यास रावराव असा किताज दिला, 
नागपुरास नोकरीसाठी पुर्णे व सागर येथून मंडळी येत आणि त्यामुळें खुद्द 
नागपूरच्या ब्राह्मणांच्या तोंडातील घास निघून दुसऱ्यांच्या तोंडी पडे, त्यामुळे 
येथे बाहेरच्या मंडळींविपयीं स्वाभाविक वैषम्य उत्पन्न होई. कोंकणस्थ व देशस्थ 
हा भेद होताच, पण नागपूरकर आणि पुणेकर हा भेद त्याहूनहि अधिक तीब्र 
होता, जो तो आपल्याकडील माणसें नोकरींत घुसवून देऊन दुसरीं माणसें बाहेर 
ठेवावयाचीं असा प्रयत्न करी. आणि त्यामुळें जे पक्ष उतपन्न झाले ते नागपुरांत 
जरी बुझत चालले तरी अजून बंगाल-नागपूर रेल्वेचीं जीं ऑफिसें कटकत्याजवळ 
किडरपुरास आणि स्वडकपुरास आहेत तेथे हे भेद गणपत्युत्सवांत दिसून येत 
असत आणि या भेदामुळें उत्पन्न झालेले निरनिराळे सावेजनिक गणपती अजून 
तेथ प्रथक्तत्वाने बराच काल होते. 


नागपुरास आज ज्यांच्या दहा पिढ्या इकडेच झाल्या आहेत असे ब्राह्मण 
कमी, येथें भोसल्यांच्या बरोवर आलेल्या ब्राह्मणांत देशस्थ ब्राह्मणच बहुतेक 
होते. त्यापूर्वी नागपुरास कुणबी, मराठा आणि महाराष्ट्रीय ब्राह्मण नव्हते असे 
नाहीं, येथ फारच जुने जे महाराष्ट्रीय ब्राह्मण होते त्यांस “गोंडे? या नांबांनें 
इतर लोक संबोधीत, कॉोंकणस्थांस कोंकणस्थ म्हणून घेण्यांत जो अभिमान वाटे 
तो नागपूरकडील जुन्या ब्राह्मणांस “गोडे ' हणवून घेण्यांत वाटे. हे गोंडांची 
उपाध्येगिरी करीत, इकडे दुसरे आणखी ब्राह्मण म्हटले म्हणजे तेलंगी आ्राह्मण 


गोड्यनांतील प्रिथंवदा ४० 


हे होत. त्यांतील कांहीं कुटुंबे हळू हळू तेलंगी भाषा विसरून महाराष्ट्रीय बनली, 
आणि लमव्यवहाराच्या बाबतींत अत्यंत उदार आणि दिलदार असे जे नागपुर- 
कडील देशस्थ ब्राह्मण त्यांत मिसळून गेलीं आहेत. येथे कित्येक फार जुनी 
कोंकणस्थ ब्राह्मणाचीं घराणीं आहेत. त्यांस प्रथमतः इकडे देशस्थांशीं संबंध 
करावे लागले कारण भोंसले नागपुरकर आणि भोंसले सातारकर यांच्या दरम्यान 
निजाम येऊन बसला होता, त्यामुळे आणि दुसऱ्या अडचणीमुळे इकडची मुलगी 
तिकडे आणि तिकडची इकडे करणे कठिण झालं होतें. 


अनंतराव घरकुट्टे यांचें घराणें फार जुन होतें. यांचे वाडवडील भोंसल्यां- 
बरोबरच आले होते, आणि त्यांत अनंतरावांचे वडील वेदमूर्ति साबशिव भटजी 
हे महाराजांच्या अनेक देवळांपेक्रीं एका देवळांतींल पुजारी होते. पूवीच्या काळीं 
जो मतुष्य महाराजांच्या खास देवालयातील पुजारी होता त्याचा केवढा मान !! 
महाराजांच्या घरच्या पुजाऱ्याचे उठणें बसणें आणि ओळखी मोठमोठ्या लोकांत 
होत्या. अर्थात आमचे अनंतराव घरकुद्टे हे खरेखुरे नागपूरी होते. गोडबोले हे 
इंग्रजी राज्य झाल्यानंतर निव्वळ उपरी म्हणजे केवळ इंग्रजी भाषेच्या ज्ञानावर 
आलेल्या मंडळीपॅकीं म्हणजे धरकुट्रथांपेक्षां घरकुट्ट्यांच्या दृष्टीनें फारच कमी 
योग्य तेचे होते. 


पुण्याकडून आलेल्या देगस्थांचा देखील कोकणस्थांप्रमाणेंच नागपुरी मंडळी- 
कडून द्वेष होई; हा द्वेष नोकऱ्यांच्या बाबतींत तेवढा असे, इतर बाबतींत फारसा 
नसे. पुष्कळ वेळां असे होई कीं जो नागपुरी देशस्थ पुणेकरांच्या नांवाने खडे 
फोडी तो आपल्या मुलीच्या लम्नारच जमवावयार्चे झाल्यास मुलीस जांबई पुणेकरच 
पाही कारण पुणेकर शिकून संवरून तयार होतो त्याप्रमार्णे नागपुरी तयार होत 
नाहीं असें त्यास वाटे, 

त्या वेळचे द्वैत आज गेलें आहे, सरकारी नोकरीच्या बाबतींत आज 
निराळ्याच स्पर्धा उत्पन्न झाल्या आहेत, दिवसानुदिवस महाराष्ट्रीय भावना 
दृढ होत चालली आहे ही गोष्ट देखील आनंदाची आहे. नागपुरी लोकांची 
भाषा पुण्यांतल्या मराठीपेक्षा मित्र होती. आज भाषाभेद नाहींसारखा झाला 


14 हरि भाऊंचे आश्रयदाते 


आहे व वर जी स्थिति दिली आहे ती आजच्या मध्यम वयाच्या ग्रहस्थांपेकीं 
पुष्कळांस कांहीं अंशीं आठवत असली पाहिजे. 


नागपूर पूर्वीपासून पूर्वद्ृष्टि होतें. भोसल्यांच्या काळीं बंगाल, ओरिसा 
आणि छोटानागपूर या देशाकडे द्रव्योत्पादनार्थ नागपुरच्या मराठ्यांची दृष्टि 
फिरे. येर्थे प्रथमच्या दिवसांत शिक्षण मिळविण्यासाठी पुष्कळ नागपूरी कल- 
कच्यास जात अ6त आणि नागपुरच्या शिक्षणसंस्था कलकत्ता युनिव्हरर्सिटीस 
जोडल्या जात असत. त्यावेळीं वर्‍हाडांत नागपुरकडचा म्हणजे कलकत्ता 
युनिव्हार्सिटीचा बी, ए. हा हलका आणि मुंबईचा उच्च अशी लोकडुद्धि होती, 
पहिल्या प्रकरणांत आपली बायको मुंबईची मॅट्रिक झालेली आणि आपण फक्त 
कलकत्त्याचे एंट्न्स झालेले, तेव्हां अर्थात आपण आपल्या बायकोपेक्षां हलके 
समजले जाऊं म्हणून र्जे भय बाटत होतें म्हणून दिलें आहे तें एवकालांतील 
अवशिष्ट विचारांचें निदर्शक होतें. 

त्यावेळेस सागरकडील मंडळीमध्यें चांगळी जूट होती आणि सागस्चा 
कोणी नागपूरास आला म्हणजे त्यास ते उत्तेजन देत. मागील प्रकरणांत वाचकांस 
ठाऊक झालेला ह्रिभय्या मोघे यास सागरच्या मंडळीने चांगला आसरा दिल्या- 
मुळें ह्रिभय्यास गायन-वादनाची शाळा काढणें जड गेलें नाहीं. त्यास विद्यार्थी 
लवकरच मिळाले आणि त्याच्या योगाने त्याचें हळू हळू बस्तान बसू लागलं. 
अनंतराव घरकुट्टे यांसहि गायनाचा नाद चांगला होताच आणि त्यामुळें त्यांत 
हरिभय्याच्या गुणाची पारख चांगळी झाली, त्यांतल्या त्यांत हरिभय्याच्या 
लौकिक विशेष वाढण्याचे कारण कीं गायन प्रावीण्य ज्यास असतें अश्लीं माणमें 
विलक्षण वर्तनाची असतात आणि शिवाय नीतिमत्तेच्या बाबतीत त्याचे दारिद्यह्दि 
सर्ववि श्रुत आहेच. हरिभय्या मोघे हा जरि गायनपडु होता तरी तो सभ्याचार- 
युक्त मनुष्य आहे हें पाहून अनंतरावास आनंद झाला आणि त्याच्याकरतां कांहीं 
तरी करावें असे त्यांच्या मनाने घेतले, सागरकडची इतर मंडळी कशीहि 
असोत हा हरिभय्या मात्र फार चांगला मनुष्य आहे असें त्यास बाटे, 
हिंदुस्थानांतील भक्तिपर आणि उपदेशपर अनेक पर्द्चेच त्याच्यापाशी विशिष 


गोंडवरनांतील प्रियंवदा 2२ 


आहेत. हा फाजील गाण्याचा शोकी नाहीं, मंडळीनां पाहिजे असले तर म्हणतो 
एखादें लोकांनां आवडेलसे, असेहि त्यांस दिसून आलें. व हरिभय्यासाठी 
आपण कांहीं तरी करावें असें त्यास वाटूं लागले, आणि यासाठीं भोंसले- 
विजय मिल्सच्या कांही कामानिमित्त समारंभ झाल त्यावेळेत हरिभय्याचें 
गाणे करविण्यात आले. त्या वेळेस जी पत्रिका काढली होती तीमध्ये हरिपडिताचें 
गाणें होणार म्हणून जाहिरात दिली होती. तिचा उपयोगह्दि मोठा झाला, 
हरिपंत पंडित म्हणून नागपूरला जे प्रसिद्ध शिक्षक व लेखक उदयास आलें 
त्यांचेच गाणें होणार असाच कांहीं मंडळीचा समज होऊन पुष्कळ मंडळी आली 
होती. त्या मंडळीना प्रथम आपण नावामुळे फतलों असें जरी वाटलें तरी 
प्रत्यक्ष गाणें ऐकल्यावर आनंद वाटून अनंतरावांनीं मंडळी ओढण्याकरताच हरि- 
भय्यास हरिपंडित असे म्हटलें हे बरेंच केले असे बाटावयास लागल, 

आपले गाणें ऐकून मंडळी आनंदित झाली त्यामुळें आणि आपली 
पुष्कळानां माहिती झाल्यामुळें जरी ह्रिभय्याला आनंद झाला तरी आपल्याला 
या मंडळींनीं जे “ पंडित ” बनविले त्याचे त्यास मोठे ओझे वाटूं लागले. 
कां कीं संस्कृत संगीतविषयक ग्रंथांची माहिती त्यास बेताचीच होती. संगीत 
रत्नाकरांतील काहीं छोक त्यास पाठ होते एवढेच, उलटपक्षी ज्या मंडळींनी 
त्यास पंडित बनविलें त्यास मात्र हरिभय्या पंडित वाटला, कां कीं दोन चार 
संस्कृत ग्रंथांची नांवे घेणारा आणि संगीतविषयक दोन चार संस्कृत “छोक 
म्हणणारा जर गायक मेटला तर त्या वेळच्या नागपूरच्या सुशिक्षितांस तो मोठा 
पंडित आहे असें सहजच वाटे. 


प्रकरण ५ ये 
होरभसजी पेनांगवाला 


नागपूरला सिव्हिल लाईन्समध्यें एका बंगल्याच्या कांपाउंडांत दोघे ग्र्हस्थ 
बसले हाते, त्यापंकीं एक वृद्ध पारशी होता आणि दुसरा तरुण आह्ण होता. 
तो वृद्ध पारशी ज्या फ्रास्तपणारने बसला होता त्यावरून तें घर त्याचेंच होतें असें 


४३ होरमसजी पेनांगवाला 


.पनना-ानाड्टकककळ्लन््ल्ट्ाशफणणाणी 00 शशी णी क 


दिसत होते, कांपाउंडांतील टेबलावर एक व्हिस्कीची बाटली, कांहीं ग्लासें, 
आणि सोड्याच्या बाटल्या दिसत होत्या. 

“ काय तमे व्हिस्की अने सोडा नाय पिते ! येथले तर सगळे बारिस्ट( 
आणि एज्युकेटेड लोक आमच्याकडे आले म्हणजे आमाला सोडा आणि 
व्हिस्की द्यावी लागते. मोठमोठे सगळे चागले लोक व्हिस्की घेते. ” 

५ घेत अश्नतील पण मला नको. ” 

“<< वुमी घ्या, आमी रावसाहेब अनंतराव यासनी नाहीं बोलेल, ” 

“ तरी देखील मला नको. ” 

“ बुरे नको तर आमचा खर्चा वांचला, बरें मिलची हकीगत काय 
आहे १2? 

“ झांडबल सवे जमले आणि गिरणीची इमारत देखील आतां बांधावयास 
सुरवात व्हावयाची आहे, ”? 

€ सरतेशेवटी तुमीं आमचा नाय ऐकिला, मौ तुमाला सांगत होतो कीं 
ही गिरणी बांधायचे कंत्राट तुमी आणि मी मिळून म्हणजे “ घरकुट्टे पेनांगवाला 
आणि कपनी ' कडून घेऊं, कोणी डायरेक्टरनें गडजड केली असती तर 
तेलाबी आपल्या कंपनींत घेतला असता, तुमी तसें केलें असते म्हणजे गिरण 
आतांपासूनच आपल्या आपल्या लोकांला फायदेशीर झाली असती. ” 

£ बरं आतां पुढें आपल्या आणखी काय सूचना आहेत ?”' 

५ तुमच्या गिरणींचा पेसा बॅकेत पडला आहे त्यांचा व्याज फार थोडा 
मिळतो आहे. तुमी तो पैसा तेथून काढून आमच्या दुकानावर ठेऊन द्या, 
तुम्हाला सात * परसेट! ( शेंकडा ) व्याज चालू होईल, ” 

“ बरे आहे, ठेवूं ही सूचना डायरेक्टरांपुढे, ” 

“ डायरेक्टरांपुर्ढे कशाला ठेवायला पाहिजे ! तुमचे वडील मॅनेजिंग 
डिरेक्टर आहेत त्यानां सवे अखत्यार आहेच. आमी दुतरे डिरेक्टर, त्यांनीं 
तसें केलें तर उलट काय करूं दाकणार १” 


गोडवनांतील प्रियंवदा ४४ 


:६ हा प्रश्न कायद्याचा नाहीं, तर हा गिरणीच्या हिताचा आहे. ” 

“ आमी काय गिरणीचे गेरहित पाहते ? ? 

“ तर मग दुसरे डिरेक्टर काय गेरह्दित पाहतात ! गैरह्ित तर कोणीच 
पहात नाहींत आणि म्हणूनच त्यांची सम्मति घेतली पाहिजे, आपण तरी 
आम्ही त्यांची सम्मति न घ्यावी असा आग्रह कां धरतां! 

“ आमचा असा काय म्हनना नाय की तुमी बोर्डाला पुसू नाय. आमचा 
एवढाच ग्हनना कीं, बाराभाईची खेती कोणीबरी पहात नाय, तसा काम 
डिरेक्टरांच्या होनार आणि काम होणार नाहीं, ” 

“ तुम्ही बोर्डामध्ये आहांत, तेव्हां तुम्ही सूचना करालच, ” 

“ हां आमी करेल, पण आपले वडील तेला दुजोरा देईल की नाय? 
नायतर आमी फायदा करायला जावा गिरणीचा, आणि तूमी म्हणेल की, 
पारशी आपल्य फायदा पाहून राहिला, ” 

“ अर्थात आपल्याला रोकडा सात व्याजांत रक्कम मिळाल्यास आपला 
फायदा मुळींच नाहीं. आपण केवळ गिरणीच्या फायद्यासाठी इतके धडपडत 
आहांत तर, ” पिढीजाद श्रीमान बंडुनाना थोडेसे हंसून म्हणाले, 

“£ आमी असें म्हणत नाय आमचा कांहीं फायदा नाय, आपण दोघांचाहि 
आहे. गिरणीला चांगला व्याज मिळेल. आह्ांला रक्कम मिळेल, तुम्ही बँकेत 
वैसे ठेवतां बँकेचा कांही फायदा नाहीं. काय तुमचें डिपाझिट घेण्यांत ! 
तुम्ही आपले पैसे जे बॅकत ठेवतां ते तुमचा कांहीं फायदा नाहीं म्हणून 
ठेवतां ? ” 

“ तुम्हांस गिरणीच्या पैश्शांतून कज द्यावें कीं नाहीं हा माझ्यापुढे प्रश्न 
नाहीं, हा डायरेक्टरांपुढें येणार, ” 

अरे बाबा, हे डिपाझिट हाय कज नाय. ” 

“ तुमचा धंदा कसला आहे? बॅंकेचा अगर कंत्राटाचा किंवा दुकानाचा ! 
तुम्ही पैसे कोणत्या कामास लावाल ? ” 


8५ होरमसजी पेनांगवाळा 


७८-५७. “ण पा ननावरे 


“ अरे आमच्या दुकानांत देखील पुप्कळ लोक डिपाझिट ठेविते, ” 

“ असो, हा सध्यां माझा प्रश्न नाहीं. डायरेक्टरांपुढें प्रश्न आला 
म्हणजे बाबा पहातीलच, ” 

“ तुम्ही दक्षिणी लोकाला बिझिनेस ( व्यवहार ) समजत नाय. गिरणी 
तुमी काढणार खरी पण अांबे सध्ये शोरबाजारांत काय वेव्हार चालते तुम्हाला 
समजते ! तुम्हा दक्षिणी लोकांचा शेरभाजारामध्ये एकभी मेंबर नाय, 

“ आमचे शोअ्स आमच्या मंडळीला जव्हा विकावयास बाहेर काढावे 
लागतील तेव्हा जो तो पूर्णपण चोकशी करीलच. कोणीतरी दलाल गांठीलच, ” 

:: तसे नाय, शेरबाजाराकडे लक्ष ठेऊन गिरणीच्या डायरेक्टर लोकाला 
काम केला पाहिजे, ” 

“ तें कसें काय ! ” 

“ अरे शरावर जास्त व्याज असला म्हणजे शेराची किंमत चढते आणि 
कमी डिव्हिडंड दिला म्हणजे कमी होते. ” 

६ हु सांगायला कोणी रोरबजारवाला नको, हे तर भाजीवाली सागेल, ” 

:: घृण याचा प्राक्टिकळ आपण्िकेरान ( व्यवहारांत उपयोग ) कसा 
करावयाचा हे तुम्हाला कुठे ठाऊक हाय!” 

:: कृता करावयाचा प्राक्टिकलळ आपिकेंशन १ ' 

“ तेचा आणिकेशन असा करायचा की जरी गिरणींत फायदा झाला तरी 
: डिव्हिडंड ! देऊं नये. काहीं तरी कारण दाखवून तोटा दाखवावा. 

“ तोटा कसा दाखवावयाचा ! ” 

“ याला बिशिनेत सेन्स ( व्यावहारिक अक्कल ) लागतो. स्टीक टेकिंग 
( मालाची मोजदाद ) मध्ये जुन्या पुराण्या किंमती घेऊन अंडर एस्टिमेट 
( कमी आकार ) करावा म्हणजे असेटूस ( मालमत्ता ) कमी दिसेल. ” 

“ तोटा दाखवून फायदा काय ? ” 


-न-पपभ-ाप-*णा 


गोंडबनांतील जियवका 1 

५ हां येथेच तर तुमा दक्षिणी लोकाला समजत नाय, तोटा दाखविला 
म्हणजे लोकांची रक्कम तुमच्याकडे पडून राहते ती पुढे भेपारांत घालायला 
सांवडते. पहिली एक दोन वर्षे डिव्हिडंड दिला नाहीं तरी हरकत नाही. 
कारण लोक म्हणतील कीं, काम जरा नवीन हाय. आणि जरी लोकांनीं ओरड 
केली तरी काय हरकत हाय. ” क 

“ तोटा नसला तरी तोटा दाघवबाव. ! ” 

:< अरे यालाच तर “ बिझिनेस टॅक्ट ” ( व्यवहारिक हुषारी ) म्हणतात, 
तोटा झाला नसला तथापि झाला असा लोकामंदी बोभाटा करून दिला म्हेजे 
लोक आपले शेअर्स विकावयास काढतील. दोंभरचा भाव पन्नासावर जाईल; 
मग आपणच ते शेर एका दलालामार्फत खरेदी हूरून टाकावे. ” 

“ आणि मग पुर्ढे १” 

“ पुढें फायदा बराचसा दाखवून मोठा ड्व्हिडंड फायद्याचा (हिस्सा ) 
डिकेअर करावा ( सागावा ). म्हणजे हेभरच्या शेअरची किंमत २५० होऊन 
जाईल. आणि मग ते पन्नासाला खरीद केलेले शेर २५०ला विकून टाकून 
आपण पसार! ” 

५ घृण या प्रकारे काम करणें म्हणजे लोकांनां फतविणें नाहीं काय ? ” 

“ छे! मुळींच नाहीं! लोकांना “ बिझिनेस सेन्स ' शिकवणें आहे. 
तात्या ! लोक शाळेंत शिकविण्याची फी नाहीं घेत, तर लोकांनां बिझिनेस सेन्स 
शिकबिण्यास फी नको घ्यायला ! ” 

“: मला एका इंग्रज अधिकाऱ्याने एका ज्यूची गोष्ट सांगितली. ” 


“ साहेबानीं गोष्ट सांगितली !. काय गोष्ट सागितली ? ” 


“ साहेबानी गोष्ट सांगितली कीं, एका इंग्रजाने एका ज्यूला पातीदार 
म्हणून घेतला, त्या इंग्रजाला व्यवहाराचा अनुभव नव्हता तथापि त्याचा हातीं 
पैसा पृष्कळ होता, आणि त्या ज्य़पाशीं व्यवहाराचा अनभव होता. झाळे. धंदा 


७७ होरमसजी पेनांगवाळा 


सुरूं झाला, सहा महिने झाले, सहा महिन्यानंतर त्या ज्यूच्या हातीं पैसा आला 
आणि इंप्रजापा्शीं व्यवहाराचा अनुभव मात्र उरला, ? 

ही गोष्ट ऐकतांच पेनांगवाला शेटजींस खूप हंसू कोसळले. आणि ते 
म्हणाले “ शाबास, ज्यू लोक व्यवहारांत मोठे हुशार, पण आमच्या पारशांसारखी 
हुशारी ज्यूमंदी देखील नाहीं असे इंग्रज लोक देखील कबूल करतात, ” 

“ आणि मी देस्वरील कबूल करतों, ” बंडुनाना घरकुद्टे म्हणाले, 

“ ज्यू लोक व्यापारांत हुशार खरा पण मोठा अप्रामाणिक लोक आहे. 
आमचा पारशी लोक मोठा प्रामाणिक आहे आणि त्याचा इमानदारीमुळेंच त्यांनां 
सरकार मोठमोठ्या जागा देते आणि मोठ्या पदवीला चढविते. त्यांनां बेपारांत 
येश यायला त्यांची इमानदारीच कारण, ” 


£ खरोखरच पारशी लोकांसारखी इमानदार जात जगांत नाहीं. सरकारी 
अघिकाऱ्यास कायाबाचामनेंकरून खूष करतात, आम्हां ब्राह्मण लोकांना तशी 
हुशारी साधत नाहों. ” 

“< तुमचा ब्राह्मण लोकभी कांहीं वाईट नाहीं, पण तो वेडा आहे जरासा. 
मानापमानाच्या भलभलत्या कल्पना तेच्या डोक्यामंदी आहेत, आम्ही पारशी 
लोक प्रामाणिकपणा आणि व्यवहाखुद्धि ( बिझिनेस सेन्स ) याची सागड घालतो, 
पण तुम्हाला व्यवहारबुद्धि नाहीं आणि ज्यू लोकांत प्रामाणिकपणा नाहीं, ” 

“ बरें मधघांच्या गोष्टींतल्या ज्यूनें तरी काय बाईट केलें १? आपल्या 
पातीदाराचे सगळें द्रव्य आपल्यापाशीं घेतले हीं गोष्ट खरी, पण त्यानें तेवढ्यांत 
त्याला दाहाणपणा नाहीं का शिकविला ? ” 

“ तें मी बाईेटच म्हणतो, कारण त्यानें त्या साहेजास जे शहाणपण 
शिकविले त्याबद्दल त्याला फार खर्चात टाकलें, ” 

“ आणि आपण शेअर खोटेपणानें ५० रुपयांस घेऊन खोटेपणानेंच त्याचा 
भाव २५० करून तो दुसऱ्याच्या गळयांत बांधवयाचा हा प्रामाणिकच व्यवहार 
काय; ” 


शान 


बरॉडयनांतील प्रियंवदा ठ्ट 


“हां ते लेजिटिमेट ( धरमयुक्त) आहे. लेजिटिमेट काय आणि काय नाय 
हं तुम्हां व्यवहारांत नसलेल्या ब्राह्मण लोकांस कळावयाचे नाहीं. ” 


“ बरें असो, आता बरीच संध्याकाळ झाली, आतां मला ऊुबांत गेलें 
पाहिजे, ” 

असें म्हणून बंडूनानानीं शोटजीच्या निरोप घेतला, शेटजी गाडीपर्यंत 
पोचवावयास आले आणि म्हणाले “ बरे आम्ही डिपाझिटसंबंधी बोललेल्या 
गोष्टींचा विचार करा बरं कां. ” 


“ हो! याविषयीं विचार मोठ्या आनंदानें करूं. ” 


" बरं, गावामंदी घेग जर वाढला तर गांवांत राहूं नका बरं, हें घर 
आपलंच आहे असं समजा, आमी घरातला पुढला भाग रिकामा करून 
तुमाला देऊं. ” 

“ वा | शेटजींची मोठी मेहरभानगी होईल. ” 

असे म्हणून शेटजींशी हस्तादोळन करून बंडुनानानीं निरोप घेतला 
आणि गाडी भरघधांब निघून गेली, 


गाडी भरधांब गेली तेव्हां त्याच स्स्त्यानें दुसरी एक] गाडी शेटजींच्याच 
घराकडे येताना दिसली. ती पाहून शेटजी स्वागतयुक्त हास्यमुद्रेने तिची अपेक्षा 
करीत़ राहिले, आणि गाडी जेव्हां उभी राहिली तेव्हां “ बानु केम छो ” असें 
वाक्‍य हास्ययुक्तमुद्रेन उ्चारून त्याने गाडींतून उतरणाऱ्या तरुणीचं स्वागत केलें. 
ती तरुणी दुसरी कोणी नसून शेटजींची मुलगी पुतळीबाई होती. 

“ आलीस का आपल्या नव्या मैत्रिणीकडून, कशी काय आहे ? मिसेस 
रामभाऊ गडबोले, ति'चें नांव काय प्रियेवंदा आहे नाहीं! ” 


“ होय तेंच तिचें नांव आहे आणि अगदीं आपल्या नांवाप्रमाणेंच ती 
मुलगी आहे. ” 

५ तिला इंग्रजौ येते नाहीं, ती काय मेट्रिक वगैरे कांहीं झाली आहे 
नाहीं ? ” 


७२९. दहोरमसजी पैनतांगधाला 


17 होय. १9 

“ आणि तूं अजून कांहीं मॅट्रिक वगेरे झालीस नाहीस, ती झाल्याने 
तिला कसा फायदा मिळाला ! अग आपण मि, टाउनसेड डेप्युटी कमिशनरकडे 
जातों, आणि डेप्युटी कमिशनर आणि त्याची बायको आपणांस परतमेट देत 
नाहींत. मिसेस टाऊनसड ही तिला एकदा भेटावयास गेली होती असें 
ऐकतो. ” 


:£ आणि एवढेंच नव्हे तर प्रियेबदाबाईनें उलट मिसेस टाउनसेंडला 
सांगितलें कीं, माझा नवरा येथें नाहीं तेव्हा माझ्या नवऱ्याच्या परोक्ष मी कोठली 
आमंत्रणे स्वीवारली तर आमच्या समाजांत ते बर दिसत नाहीं, आणि त्यामुळें 
मला येतां येणार नाहीं, ” 


“ मुलगी मोठी चीट आणि गर्विष्ट दिसते ” असें शेटजी म्हणाले पण 
त्याच प्रसंगी एक दोन देखावे त्यांच्या दृष्टीसमोर उभे राहिले. 


पहिला देखावा उमरावतीचा होता. उमरावतीत यूरोपीयन सोसायटी- 
मध्यें आपला थोडाबहुत प्रवेश कसा होत होता, आपण तपत्नीक उमरावतीस 
डिस्ट्रिक्ट बोर्डात कीनसर्ट पहावयास गेलों होतों तेव्हां मेजर वाइल्डओट यानें 
आपल्या बायकोस अगदी पुढच्या रागेंत खुर्ची कशी दिली, आपण अलक्षित 
कर्स राहिलों आणि निरनिराळे ऑफिसर लोक आपल्या बायकोशीं कसं ओळख 
करून घेत होते, इत्यादि गोष्टी त्याच्या दृष्टीतमोर आल्या. 


पब्लिक वक्‍्से डिपाटमेंटमध्ये आपणांस कंत्राट पाहिजे होते, ब आपली 
एक्झिक्यूटिव्ह इंजिनिअरशीं झभोळख नव्हती तरी आपल्या बायकोची होती, 
तेव्हां तिच्या मार्फत आपण कसें त्यास जेवण्यास सहकुटुंब आमंत्रण केलें, आणि 
तें कंत्राट कसें मिळविले, पुढें अशी कंत्राटे आपली बायको आपणास मिळवून 
देत होती हें त्यांस आठवले. पण त्याबरोबर हेंहि आठवि कीं, आपणांस 
कंत्राटे बायको मिळवून देई त्यामुळें तिला स्वत' आपण आश्रयदात्याच्या वर्गातले 
आहोंत; आणि आपला नवरा आपल्या आश्रितांपैकींच आहे असें कसें वाटे; 

7 


झोंडयसांतील मिधषदा "५७ 


हि” क्या ऱ्य 


"णी. ४७-७१ 000 शशश 


आपण कोठें बाहेर गेलों असतां आपल्या बायकोस कोणी साहेब मेटावयास आला 
तर आपणांस म.सर कसा होई, तथापि आपण रानबट, मत्सरी आणखी आपल्या 
बायकोवर विनाकारण संराय घेणारे असे समजळे जाऊं नये म्हणून आपणांस 
आपल्या मनांतील भाव कसा दाबून टाकावा लागे; आपली बायको साहेबाशीं 
बोलते आणि त्या गप्पात आपल्याला तर फारसे गम्य नाहीं यामुळे साहेबाच्या 
कोटींतली मी आहे आणि नवरा निराळ्या कोटींतला आहे असे बायकोस कसें 
वाटे; यूरोपीयन सोसायटीच्या, शिकारीच्या इत्यादि गोष्टी यूरोपीयन लोकांपाशीं 
बोलायला बायको निकलेली, आणि त्या प्रकारच्या गोष्टी नेहेमी अपल्या देखत 
चालतात आणि यामुळें आपणांस ए'वाद्या बहिष्कृतासारखे बसून कसं रहावें लागे, 
इत्या दि गोष्टी त्याच्या एकदम डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. आपण धंद्यात पैसे 
मिळबिळे, पण आपणास ग्रह्सीख्य काही मिळाळें काय ! इत्यादि प्रश्न देखील 
त्यांच्यापुढे उभे राहिले. पण हा सर्व खे5 एका दोन मिनिटांतच झाला, डोळ्या- 
पुढून हे देखावे इतक्या जलदीने निघून दुसरे येत कीं ते विचारास वेळच 
ठेवीत नव्हते, 


आपला बाप काहीं गहून विःारांत गुंतला आहे आणि त्यामुळें तो बोलत 
नाहीं असें पुतळीस वाटलें. तिनें बापास विचारळें, “ आपण विचार कसला 
करतां ? 

शेटजी जागे झाळे आणि म्हणाले “ विचार कतलाहि नाहीं. तूं 
म्हणत काय होतीस कीं प्रियेवदाबाईनीं नवऱ्याच्या गेरहजेरींत कोणास भेटावयास 
वगैरे जायचें नाकारले, ” 

11 होय, ११ 

चांगले केलें. » 

“६ त्यांत चांगले तें काय ! ” 

शेटजीस विचार पडळा कीं आता याला उत्तर काय द्यावें! रेटजींच्या 
मनांत पुतळीवाईस आपल्या मुत आईची हकीकत सांगावयाची नव्हती, पुतळी- 


ण्श होरमसजी पेनांगवाळीा 


बाई लहान असतानांच आई नवऱ्यापासून निराळी राहूं. लागली होती. 
नवऱ्याने कांहीं दिवस एक मुसलमानीण ठेवली होती. आणि त्रायको्नें रुसून 
मुंबईस प्रयाण केलें होतें. तेथें एका पारशी सॉठिसिटरचा आणि तिचा 
विद्वेष स्नेह जुळला होता आणि तिनें नवऱ्याकडे परत येण्याचे नाकारले होतें. 
हेटजींनीं बायकोनें परत यावें म्हणून पुष्कळ विनवणी करून पाहिली; बायको 
परत कां येत नाही, आपल्याला ग्रह आडवे आले आहेत काय म्हणून 
ज्योतिष्याकडे जाऊन चौकशी केली. भार्यास्थानीं केतु असल्यामुळें हे प्रकार 
झालें अशी ज्योतिष्यानें दिलेल्या सल्ल्यामुळें स्वात्री होऊन ग्रहण्ाति होण्यासाठीं 
भुलेश्वरांतल्या काहीं ब्राह्मणांस धर्मादायहि केला, पण उपय्रोग झाला नाहीं. 
पुढें बायको एकाएकीं ऐंगनें मृत्यु पावली. 

त्या वेळेस पुतळी चार वर्षांची होती. या सर्व गोष्टीस १४-१५ वर्षे 
होऊन गेली. पुतळी आईच्या मृत्यूनंतर बापाकडे परत आली. मरतेवेळीं 
बायकोनें नवऱ्यास बोलाविले, सर्व अपराधाची क्षमा मागितली आणि ' मुलीची 
काळजी ध्या, दुसरी बायको केली तर ती मुलीचा दुस्वास करिल म्हणून मुली- 
कडे लक्ष दिलें पाहिजे ) इत्यादि गोष्टी बायकोने नबऱ्यास जजावबिल्या, 

या सर्व गोष्टींची आठवण शेटजीस झाली आणि आतां मुलीस उत्तर काय 
द्यावें हा विचार करून ते म्हणाले, 

“ हिंदू लोकामध्ये नवरे फार मत्सरी असतात आणि साहेबाच्या घरीं 
बायकोने जावें हें हिंदू लोकांस आवडत नाहीं तर तिनें केलें तें चागलें केलें, ” 

: मिसेस गोडबोल्यांकडे एक उत्तम गाणारा वस्ताद उतरला आहे. तो 
नुकताच बडोद्याहून आला असें प्रियेवदाबाईनीं सांगितलें, तो हॉलमध्ये कांहीं 
मंडळीस गाऊन दाखवीत होता, माजधरांतून आम्ही त्याचें गाणें ऐकत होतों. 
तो चांगळा गातो, सतारही चांगली वाजवतो व दिलस्बाहि वाजवितो. ” 

£ बरें मग? ” 

“६ मला असें वाटतें कीं त्याला मला गायन सिंकवण्यासाठीं बोलबावें., ?? 


गोड्यनांतील प्रियंवदा ष्र 

“ मला असें वाटतें कीं तूं. या भानगडींत पडूं नकोस, ” 

र बां १ ११ 

“ त्याचा उपयोग काय ! आजकाल हिंदु संगीताची ' सोसायटींत ! 
चहा नाहीं. आपल्याकडे साहेबलोक आले किंवा साहेबलोकांच्या ' अँट होम ? 
ला आपण गेलीं तर तेर्थे दिलरुबा कोण ऐकेल ? तूं पियानो शीक. ” 

“ हिंदु म्यूझिक ( संगीत ) चा उपयोग कांहींच नाहीं ? ” 

“ आपल्याकडे हिंदु लोकांनां केव्हां आमलण करावयाचा प्रसंग येतो ! 
आणि जरी आला तरी त्यांच्यादेखत तू काय गात बसणार ! त्या दिवशीं 
दहापांच रुपये टाकून कोणी वस्ताद बोलावून घेऊं. ” 

£ घण मला शिकायची इच्छा आहे ना! 

५ असेल तुला पाहिजे तर शीक; पण तुला त्याचा पुढे फारसा उपयोग 
नाहीं. तुझे पुढें लग्न जुळण्यासाठीं तुला पियानो जर वाजवावयास येत असला 
तर तोच उपयोगी पडेल, ” 

“६ कां ! आपल्या पारशी लोकांनां देखील इकडचेंच संगीत आवडते, ” 


“ होय; तें ऐकण्यासाठी तें गवई बोलावतील किंवा नाटक पहायला 
जातील. तेवढ्याकरतांच आपला बायकांनां हिंदु संगीत शिकवणें कांहीं जरूर 


नाहीं टु १ 


प्रकरण दे चें 
रायप्रच्या बढूया बार्गत 

छत्तिसगड हा मागासलेला मुलुख असेल कदाचित्‌ , पण रहावयास मोठा 
चांगला मुळ व आहे. येथील लोकांची साधी रहाणी आणि दिलदार स्वभाव 
हीं पाहून कोणालाहि आनंदच होईल, तुम्हांला कांहीं हुनर येत असेल तर 
खुशाल रायपूर वरिश्ालपूर येथं जाऊन रहा, पैसे बरे मिळतील, राहण्यास 


रडे रायपूरच्या बुठ्या बागेत 
खच थोडका येईल. येथें पूर्वी तांदूळ व दूध याची जी स्वस्ताई होती ती मात्र 
आज नाहीं. आगगाडीने छत्तिसगडांत देखील प्रवेश करून येथील स्वम्ताई 
पळवून नेली आणि तंबाखू , दारू, विलायती कपडे या गोष्टी मात्र तेथें 
आणून ठेवल्या असें रायपूरचें तत्त्ववेत्ते सांगतात. रायपुरास देखील तत्त्ववेत्ते 
आहितच, ते केवळ पुण्यासच भरले नाहींत. रायपुरचा महाराट्रीय ब्राह्मण शिंपी 
. घ्या अगर चहावाला घ्या, केतरी वाचून स्वदेशामिमानाच्या गप्पा बोलायला तो 
कोणत्याही पुणेकरास हार जाणार नाहीं. 


रायपुरास आणखी कित्येक चांगल्या गोष्टी म्हटल्या म्हणजे येथील रस्ते 
होत. रस्ते कसे असावेत हा कोणी प्रश्न केला तर शिल्पशास्त्राच्या इंजिनिअरची 
उत्तरें निराळीं, अथेशास्तरयांची निराळीं आणि कादंबरीकारांचीं त्याहून निराळीं. 
आरोग्याची जबाबदारी ज्या लोकांवर असते त्यांचींहि उत्तरे निराळीं. आज- 
कालच्या कादंभरीकारांचें उत्तर एवढेंच कीं ज्या रस्त्यावरून बायका आणि पुरुष 
एकत्र फिरावयास जात आहेत असें वणेन ज्या रस्त्यासंबंधाने देतां येईल ते रस्ते 
चांगले, इतर लोकांच्या कसोटीपेक्षां कादंभरीकारांची कसोटी मोठी प्रखर आहे. 
तरुणांस आणि तरुणींस एकत्र फिरण्यास योग्य असा स्स्ता पाहिजे असल्यास 
अर्थात तेर्थे धूळ नको. साडेचार पांच वाजतां फिरावयास गेलीं अर्से वर्णेन 
द्यावयाचे असल्यास तरुणीस ऊन लागून तिचा नाजूकपणा कमी होऊं नये 
म्हणून आणि संध्याकाळीं काळोखांतून परत येतां यावें अशी इच्छा असतां तो 
काळोख वाढविण्यासाठीं, आणि तरुणीचे तरुणावर अवलंबित्व वाढविण्यासाठी, 
रस्त्यांच्या दोन्हीं बाजूंनीं झाडी आली पाहिजे. रस्याच्या बाजूस एखाद दुसरें 
तळे असलें तर चांगळेंच, कारण त्याच्य़ा योगानें वणेनाचें अद्भतरसत्ब वाढतें. 


रायपुराच्या परिकरांत रस्ते चांगळे आहेत आणि रायपुरास लागूनच 
सरकारी बगिचा आहे. त्यांत हिरळी, चित्रविचित्र झाडे, आणि लताकुज असून 
बतावयास ठिकाणें अनेक आहेत. शिवाय त्या बगिच्यांतील तलावाच्या कांठच्या 
बुरुजांवर बसून तळ्यांतील हत्तीच्या कानासारखीं कमलिनीपत्रे व तांबडी व 
पांढरी कमलें पाहून अर्वाचीन छत्तिसगडी कवींनां काव्यस्फूर्ति होते. 


गोंड्षनांतील प्रियंवदा क) 


ऱ्न्ट 


छत्तिसगडी सामान्यजन जरी काव्य करीत नाहींत तरी त्यांस चंदनरदायीच्या 
पृथ्विराजरासा, अल्हखंड, आणि तुलसीदासा'चें रामायण यांतील सरोवणेनांची 
आठवण होते, असो! 

रायपूरच्या बागेत आज दोन स्त्रिया एका मुलास घेऊन गाडींत बसून 
फिरावयास आल्या होत्या. या दोघीजणी विधवा होत्या असे त्यांच्या कपाळावर 
कुंकू नसल्यामुळे अनुमान काढतां येण्याजोणें होते. या दोघींपैकी एक सोळा . 
वर्षीची होती व दुसरी पंचविशीच्या भरात होती. 

ते नेत्र ते कुरळ कुंतल ते कपोल | 

ती नासिका सरळ ते मृदु ओ6ष्ट लाल । 
सौभाग्यहीन ललना मुख तें कवीस । 
आहे मनोहर तरी गमते उदास | -- 

हें वणेन त्या दोघींसही उत्तम तर्‍हेनें लागू पडण्यासारखें होतें, त्या 
दोघी स्त्रिया गाडींतून उतरून चालूं लागल्या, थोरलीनें मूल घेतलें ह तें. 

6 ब्रिंगाबाई, तुझ्यावर हा वैधव्यप्रसंग आला हें पाहून मला फार वाईट 
वाटतें हे तुला सांगावयास नकोच, तुला मी लहानपणापासून पाहिलेले आणि 
माझा हातालालीं तूं शिकलेली, शिवाय माझ्या विद्यार्थिनींमध्यें तूं साधारणपणें 
सुग्वांत होतीस, तुझ्यावर काय प्रसंग ओढवेळ याची तू पांच वर्षापूर्वी नागपुरास 
माझ्यापाशीं शिकत होतीस तेव्हा मटा कोठे कल्पना होती १” शारदाजाई म्हणाल्या. 

५८ माझ्या बाबानीं माझे ज्या बेळेस लग्न करून दिलें त्यावेळेस त्यानां तरी 
कोठें कल्पना होती कीं माझ्यावर अस आकाश कोसळेल १ ” 

: ब्रिंबाबाह आज जं दुःस्व तुला वाटते तें उद्यां वाटणार नाहीं, एका 
वर्षाच्या आंत तूं या स्थितींत रळशील आणि वैधव्यानें जे सर्वसामान्य दुःग्व 
आहे तेंच मात्र कायम राहील, ? 


[ -- महाराष्ट्र वाग्विलास मासिकांत ' आहे मनोहर तरी गमते उदास ! 
ही ओळ समस्यापूर्तीसाठीं आली असतां एका कवीकडून आलेलें पद्य,] 


कळ वडमकडलडाकडवन 


जण शॉडबनांतील तिर्थतवा 


णस वील्ताटसकच्दणीशीण 0कताणीणी 


“ त्यांच्या मृत्यूच्या पहिल्या दिवशीं जे दुःख वाटत होतें तें आज बरेंच 
नाहींसे झाळे आहे. तथापि जग मला अगदी उदास वाटत आहे. नाहीं 
म्हणावयास या प्रभाकराकडे मात्र अधिकाधिक लक्ष वाढत आहे. आतां मला 
आधार म्हणजे हाच, याचे संगोपन मात्र मला चागले केलें पाहिजे, ? 

“ झय्यासाहेबांचे तुला विस्मरण पडणे शक्‍य नाहीं, पण त्यांच्याविषयीचा 
शोक मात्र तुझा कमी होत जाईल. ” 

“ मळा राहून राहून असे वाटतें कीं अगोदर लोभ उत्पन्न व्हावा, आणि 
नंतर प्रेमाच्या माणसांचा वियोग व्हावा, असें होण्यापेक्षा अगोदर मुळीं लोभाचे 
पाश उत्पन्न झालें नाहींत तर चागळे नाहीं काय ? माझे लग्नच झाले नसते तर 
ते किती तरी चागले झाले असते. ” 

6 ब्रिंबाबाई, तं असें म्हणूं नकोस, प्रेमाचा अनुभव मग तो फारच 
थोडके दिवस कां मिळाला असेना -तो थोडके दिवस तरी मिळणें हें अगदींच न 
मिळण्यापेक्षां चांगले, ? 

6 ताई पाहे, तुम्ही कौमाये आणि वैधःय यांतील काय पत्कराल १ ” 

:' मी वैध्यच फ्करीन, कौमार्याची मला फारशी अभिरुचि नाहीं. ” 

“: आपल्याकडे मुलींचीं बाराव्या वर्षी लभ होतात; अशी कल्पना करा 
कीं, मुलीस सहा महिन्यांनी वैधव्य आले तर त्यापेक्षां तिचे लम्न झाले नसते तर 
बरें झाले नसते कां? ” 

:: तुलना करतांना दोन सारख्या गोष्टींची तुळना केली पाहिजे. बाराव्या 
चर्षी बिधवा झालेली मुलगी आणि तेराव्या वर्षी सवाष्ण रहाणारी मुलगी यांची 
तुलना करणें बरोभर नाहीं; तर बाराव्या वर्षा वैघओःय आलेली मुलगी आणि 
आजन्म जिला अनूढ रहावें लागळे अशा मुलीची तुलना केडी पाहिजे. आणि 
तशीं केली असता बारा वर्षांची विधवा झालेली मुलगी अधिक जरी असें .मला 
बाटते. कारण ल्म्न झाल्यामुळें त्या मुलीचे हिताहित पहाणारे घराणें पूर्वी 
एकच असते, तीं दोन होतात. ” 


एाथपूरच्या धुदपावार्गत दै 


६ लें जर फार लबकर झालीं तर समाजांत पुष्कळ विधवा नाहीं कां 
होणार ? ” 

“ समाजांतले पुरुष नियमित असतात ते समाजांत असलेल्या बायकांच्या 
वांत्यास यावयाचे. लयन उशीरा केलें म्हणजे पुरुष जास्त होतात अशांतला 
भाग नाहीं ; तथापि ज्या कांहीं स्त्रियां अल्पवयांत मृत्यु पाबतील तितक्‍या 
ल्य़ास उमेदवार बायकाहि कमी होतील, आणि पुरुष व बायका यांच्या 
लग्नाच्या वयातलें अंतर जर कमी कमी होत चाललें तर लग्नाच्या मुलींची संख्या 
कमी होऊन मुलीच्या लग्नाला अडचण कमी पडेल आणि थोडीबहुत सौख्यवृद्धि 
देखील होईल. आतां नवरा कधी मरणार हें भविष्य कोणास कधीं करतां येत 
नाहीं ; आणि सोळाव्या वर्षीच्या आणि बाराव्या वर्षातल्या मुलीस वैधव्य 
येण्याचे संभव जवळ जवळ सारखाच आहे. बाराव्या वर्षाच्या मुलीनें सोळाव्या 
वर्षांच्या मुलाशी लम्न करणें आणि सोळाव्या वर्षाच्या मुलीने विसाव्या वर्षाच्या 
पुरुषाशीं लझ करणें या गोष्टी जवळ जवळ सारख्याच होत. केवळ चार वर्षे 
उशीराने लम होण्यानेंच स्त्रियांस लग्नाची संधि जास्त मिळणार नाहीं त्यामुळे 
आई बापावरचा लम्न खचे कांहींच्या बाबतीत वांचेलळ, बारा ते सोळापर्यंत ज्या 
मुली मरतात त्यांच्या आईबापांच्या लम खचे फुकट गेला आणि त्यांच्या नवऱ्यांनां 
दुसरें लम करावें लागणार, त्यावेळेला नवीन खचच पडणार म्हणजे उशीरां लग्न 
झालें म्हणजे नवऱ्यांच्या आईबापांचाहि खे वांचेलळ पण दुसरा फायदा विशेष 
नाहीं. ” 

6 ताईसाहेब, चुकलां तुम्ही, तुम्ही एक फायदा विसरलां. ” 

“ काय बाई धीटपणानें बोलायला लागली, वर्गात कधीं असें बोलली 
असती कां? मला असें वाटते वीं तुळा हा धीटपणा लग्न झाल्यामुळें आला, 
माझ्यापेक्षांहि जास्त वयाच्या पुरुषांबरोबर बरोबरीच्या नात्यानें बोलायची आणि 
भांडायची संवय लग्न झाल्यामुळे आली, ” 

हें वाक्य शारदाबाई उच्चारतात तोच बिंज्राबाईचे लक्ष आपल्या बोलण्या- 
कडे नाहीं तर दुसऱ्याच कांहीं स्मतिचित्रांनीं तिचे मन व्यात्त झालें आढे असें 


"७ रायपूरच्या बुड॒या बागेत 


शारदाबाईस दिसे. तिनें एक मिनिटभर वेळ पूर्वीच्या आठवणीसाठीं 
बिंबाबाईस देऊन पुन्हां विचारलें कीं, “ वधूवरांच्या बयांतील अंतरांत बदल न 
करतां केवळ उशीराने लयन करण्यांत होणारा कोणता फायदा मी विसरळें, चार 
वर्षे ल्न उशीराने केल्यामुळे जो उशीराने खच करावा लागणार आणि ल्म्मासाठीं 
सचे करावा लागणाऱ्या रकमेचे चार वर्षीचे व्याज बांचेल हाच फायदा काय? ” 

:: तो फायदा माझ्या मनांत नव्हता. तुम्ही पडला मास्तरीणनाई, तुवचे 
सरळ व्याज चक्रवाढ व्याज या गोष्टीकडेसच लक्ष जातें मला चक्रवाढ व्याज 
अजून काढतां येत नाहीं. ” 

:: तर मग तुमच्या मनांत काय फायदा होता ? ” शारदाबाईनीं साशंक 
पृच्छा केली. 

£ माझ्या मनांत विचार आला तो असा, फायदा असा कीं, ज्या मुली 
सुद्दढ नाहींत त्या, आणि ज्या आहेत त्या, या दोघी मिळून त्यांतली निबड 
लयमासाठीं होते, आणि ती दोन्ही पक्षाच्या पैशाकडे पाहून होते. चार वर्षे 
उशीराने लम्न झालें तर, अधिक सुदृढ मुलींची लग्ने अधिक सुदृढ पुरुषांशी 
लागून चांगली प्रजा होणार नाहीं कायं १ योग्य नवऱ्याला योग्य बायको मिळावी 
ही गोष्ट जरा उशीराने लग्न झाले तर अधिक साध्य नाहीं कां होणार ? ” 

“६ हा मुद्दा माझ्या लक्षांत आला नाहीं. मला एवढेंच म्हणावयार्चे आहे 
कीं, जर स्त्रियांमधील वैधव्य कमी करावयार्चे असेल, आणि प्रत्येक स्रीची 
लयन करण्याची संचि जर अधिक पुद्धंगत करावयाची असेल तर स्त्रियांचे त्यांच्या 
समवयस्क पुरुषांशी लम करून द्यावे. अलीकडे आपले होतें काय, कीं मुलगी 
आठ बर्षांची आणि मुलगा वीस वर्षाचा. या पद्धतीमुळे समाजाचें मोठें 
नुकसान होत आहे. ही पद्धति कोणी जाणून बुजून आणली नाहीं. कांहीं अंशीं 
या पद्धतीबद्दल कोणास दोष द्यावयाचा असेळ तर तो सरकारला दिला पाहिजे, 
कारण अलीकडे मनोकरींत येण्यासाठी पूर्ण शिक्षण म्हणून ज सरकारनें योजिले 
आहे त्याचा परिणाम असा होतो कीं, मुलगा बीस बावीस वर्षाचा होईपर्यंत 
शिकत रहावें लागतें. ” 

8 


लाक ा------:-॥ ४४ टून 


गोंडषनांतील प्रियंवदा ष्ट 


५ सरकारचा अपराध काय ? ” 


: सरकारनें ही भीति कांहीं जाणून बुजून उत्पन्न केली नाहीं, पण 
सरकारनें उत्पन्न केलेल्या परिस्थितीचा हा परिणाम आहे हें खचित. ” 


५ आपल्या देशामध्ये आज जितक्या विधवा आहेत तितक्‍या विधवा 
स्त्रियांची लग्ने जर उशीराने झालीं असती तर आज विधवा असत्या कां?” 


: विधवा कदाचित नसत्या, पण पुष्कळ कुमारी अवित्राहित राहिल्या 
असत्या, कारण समाजातील परुषाची संख्या नियमितच आहे. कोणीहि कांहीं 
जरी सुधारणा केली तरी तो काय करणार? फार झालें तर तो पुरुषांची जी 
बांय2णी आज होते ती तो उद्यां निराळ्या प्रकारें करणार, ” 


“ पुरुषांची वांटणी निराळी करण्यासाठीं म्हणूनच केवळ पुनर्विवाहासारखे 
उपाय योजावयाचें कीं ते दुसऱ्या कोणत्या कारणासाठीं पुरुष ब स्त्रिया यांत 
समता असावी वगैरेसाठी योजावयाचें १ ”? 


“ कां करावयाचे हे मी सांगत नाहीं. सध्यांचे सुधार म्हणविणारे लोक 
हे तर पूर्णपणे नालायक आहेत, कारण समाजाचा शास्त्रीय अभ्यास कोणीच 
केलेला नाहीं. अगर हे शहाणेसुरते म्हणविणारे लोक किती परस्परविरुद्ध उपदेश 
करतात म्हणून सांगू £ हुंडा घेऊं नका म्हणून म्हणणारे लोक हेच, आणि 
विधबांनीं पुनर्विवाह करावा असे म्हणणारे लोक हेच. पुनर्बिवाह जर आपल्या 
समाजांत वाढूं लागला तर कुमारिकांस लभ्य अशा पुरुषांची संख्या कमी होऊन 
हुंडा नाहीं कां वाढणार ! तर असल्या बेशिस्त विचाराच्या मंडळींच्या पुन- 
रविबाहाच्या तरफदारींत असलेल्या हेतूंचें प्रथकरण तरी कशाला करा! ” 


: काय बाई तुम्ही पुनर्बिबाहाच्या विरुद्ध आहांत £ ” 


“ झी पुनर्विवाहाच्या विरुद्धहि नाही. आणि कशाच्याच विरुद्ध नाहीं. 
मी प्रसंग पडल्यास एकदां सोडून दोनदां पुनर्विवाह करीन, परंतु वादविवाद 
करतांना जें कांहीं खरेंतरें आहे तें सांगितलें पाहिजे, ” 


५९ रायपूरच्या बुढया बागेत 


अटापा--० -*- ---- जन आणा पापाला 


“ तुमच्या मताने जर विधवानी पुनर्विवाह केल्याच्या योगाने कुमारिकांचीं 
लञञें करण्याची संधि कमी होत असेल तुम्ही एक तरी पुनर्विवाह का करणार? ” 

“ बाई गे, जगांत जो तो मनुष्य आपल्या फायद्याकरितां खटपट करीत 
असतो. लक्षाधीश दोन लक्ष रुपये मिळविण्यासाठी खटपट करीत असतो; किंबा 
त्यास दुर्दैवाने गरिबी आली असतां पुम्हा श्रीमंत होण्याची खटपट करीत असतो 
तो कुठें मनात विचार करतो कीं, मी एकदा भ्रीमंती उपभोगिली; आतां मी 
पुन्हां कशाला श्रीमंत होऊं! जगात दुसरे लोक गरीब आहेत, त्यानीं आतां 
श्रीमंत व्हावे म्हणजे झालें. ” 

“ तुम्ही मधाशीं म्हणाला कीं थोडका वेळ तरी सौभाग्याचा उपभोग घेणें 
हें अविवाहित स्थितीपेक्षां पुष्कळ चागले, तुमचे असें मत आहे काय, कीं 
आपल्या देशात विधवा पुष्कळ आहेत आणि मोठ्या वयाच्या कुमारिका 
नाहींतच. ही स्थिति विलायतेंतल्या स्थितीपेक्षां वरी आहे. मी असें ऐकते 
की विलायतेमध्यें हजारों उपवर प्रौढ स्त्रिया लय्माविरहित आहेत. ” 


“६ मी विलायतेला कधीं गेलें नाहीं, त्यामुळें विलायतेची स्थिति आणि 
येथची स्थिती याची तुलना मला करतां येणार नाहीं. 

“ तरी पण तर्कानें आपण काय सांगू शकाल £ ” 

“ज्याप्रमाणे आपल्या विधवाचे कनवाळू सुधारक येथील विधवाच्या 
अश्रूंबदहद. आक्रोश करीत आहेत त्याप्रमाणेच तिकडचीं विचारी माणसे 
अविवाहित स्त्रियांचा प्रश्न घेऊन त्यावर भाराभर पुस्तकें लिहीत आहेत. तिकडे 
असेंहि कांहीं तत्त्ववेत्ते म्हणत आहेत कीं, तरुण पुरुषानीं व बायकांनी लग्न 
करण्याच्या भानगडींत पडण्याचे कांहीं कारण नाहीं त्या दोघांनीं दिल जमल्यास 
एकत्र रहावें आणि पुर्ढें न जुळल्यास वेगळें व्हावे, आतां तिकडच्या नीति- 
कल्पना जर आपल्या कल्पनांपेक्षां निराळ्या असल्या तर जी विवाहहीन स्थिति 
आपणास तर्काने दुःखमय बटेल ती कदाचित तशी नसेल, ” 

“ आपल्या इकडची स्थिति घेऊन तके कसा काब चालतो! * 


गोॉंडवनांतील प्रियंवदा ६० 

“ आपल्या समाजांत विधवा पुष्कळ असणें हें कुमारिका पुष्कळ असण्या- 
पेक्षां बाईट असे मी म्हणावयास तयार नाहीं. आणि शिघाय पुनविवाहाच्या 
प्रश्नाविषयी आजच्या सुधारकांची मतें मळा मान्य नाहीत. सव स्त्रियांचे केवारी 
सुधारक स्त्रियांच्याच मनाची तपासणी करून पुस्तके लिहीत नाहींत. बरेचसे 
सुधारक स्त्रियांचे हित कशांत आहे याची स्वतःच कल्पना करून तकॅटें रचतात, 
आणि ज्या स्त्रियांना आजकाल शिक्षण थोडेबद्धुत मिळतें त्यांनां सुधारकांच्याच 
ग्रंथांची संथा दिली जाते. माझें मत असें आहे कीं, त्या बाबतींत बायकांनी 
स्वतः विचार करून मतें बनविलीं पाहिजेत, आणि सुधारक मतें घेण्याची जीं 
आज कांद्दीं अशीं बळजबरी भायकांवर होत आहे तिच्यांतून त्यानीं बाहेर पडावे, ” 


: स्त्रिप्रांवर सुधारक नवऱ्याकडून जलम होतो तो कसा? ” 


५: पुष्कळ सुधारक आपल्या बायकांस आपलीं धमविषयक मतें पाळूं देत 
नाहींत. देवीच्या देवळांत जावयास चोरी ज्या सुधारकांच्या जायकांनां आहे 
असे सुधारक मी पुषकळ पाहिळे आहेत. ” 


6 नुवऱ्यास आपल्या मताप्रमार्णे बायकोस वागावयास लावण्याचा अधिकार 
नाहीं काय १? ” 


“ मी अगदींच नाहीं असे म्हणत नाहीं, पण स्त्रीस्वातंत्र्याचे चहाते 
सुधारणेच्या नांवाखाली जायकांवर कसा जुटूम करतात हें मी पाहिलें आहे. 
परंपरागत गोष्टी कोणी जायकांस करावयास लावल्या म्हणजे तो झाला जुलूम, 
आणि नवीन गोष्टी बायकांस दडपेशाहीनें करावयास लावल्या म्हणजे ती झाली 
सुधारणा !! 


“ म्हणजे आपलें म्हणणें असें आहे कीं काय कीं, पूर्वीच्या जुन्या लोकां- 
इतक्रे अर्वाचीन सुधारक स्त्रिप्रांस आपल्या हुकमतींत ठेवण्याचा प्रयत्न करतात, ” 

“ वूर्बीच्या इतकाच नव्हे तर पूर्वीपेक्षाह्ि अधिक. ” 

“ तें कसें काय? ” 


६१ रायपूर च्या बुठुया बागेत 

“ माझे बडील दामोदरशास्त्री हे पक्के वेदांती होते. त्यांचा त्रते, उद्यापन 
जञाग्रगे इत्यादिकावर विश्वास नव्हता; आईला ह्या गोष्टी हव्या होत्या, तथापि 
त्यानीं त्या टाकून देण्यासाठीं आईस कधींच छळलें माही, ते नुसते एवढेच 
म्हणत की, ' व्रते, उद्यापनें इत्यादि कमे हीं अज्ञानमूलक आहेत. ' ज्ञानादेव 
तु केबल्यं ' याची प्रतीति तुला झाली नाहीं म्हणून तुझी अशी वृत्ति आहे. तूं 
सध्या खरी भक्ति मनांत ठेव म्हणजे कालांतराने तुला श्ञानप्राप्ति होईल ? असें 
म्हणून ते आईच्या नेहमीच्या वाचनाच्या शिवलीलामृतांतील दोन तीन ओळी- 
कडे तिचे लक्ष ओढीत. 


“ त्या कोणत्या दोन तीन ओळी १” 
“त्याह्या-< 


वेदभ्यास नको व्रते मस्त नको तीत्रे तपें तीं नको 
काळाचे भय मानसीं धरू नको, दुष्टांसि दकू नको 
ज्याचीया स्मरणे पतीत करती तो शभु सोडूं नको | 
ही आमच्या वडिलांची उदारता !! पण आजकालच्या सुधारकांची स्थिति 
तशी नाहीं, ” 
“ त्यांची कशी काय आहे? ” 
हा प्रश्न विचारतांच आमच्या शारदाबाई मास्तरीण यानीं डाकिणीची पुद्रा 
धारण केली. त्यांच्या अगांत भयंकर आवेश चढला आणि त्या म्हणाल्या, 
“ आमची आजची नामर्द सुधारक मंडळी आपली तत्त्वें बायकांवर 
लादून त्यांचा खून करण्यास कमी करीत नाहीं. ” 
14 स्वून । $) 
“ हेय कोणे योजं 
होय खून; मी त्यास दुसरा कोणेताहि शब्द योज इच्छीत नाही, माझी 


बिचारी ताई कशी वारली हें आठवतांच माझ्या अंगाचा तिळपापड होतो आणि 
मी आपल्या मेहुण्यास कोणते भयंकर शासम करूं असें मला वाटतें. ? 


गोंडथनांतील प्रियंषदा दर 


चा ची नन: “१८०००० पाटया पका 


6 बाई झाळे काय ? आपली बहीण तर आज्ञारी पडून वारली. तिचा 
खून झाल्याचे मी कोठे ऐकलं नाहीं, * 

“ आपण ऐकलं नाहीं; कारण कायद्याच्या दृष्टीनें हा खून नव्हता. 
परंतु असलेच खून जास्त भर्यकर होत, ? 

८ पण बाई झालं काय? ” 

“ झालं एवढेंच कीं आमचे मेहुणे फ्रान्समधून शिकून आले. त्यानां 
भलते सलते पदाथे खाण्याची संवय लागली आणि जातिमभद मोडण्याच्या मिषाने 
त्यानीं स्वर्यंपाकाकरितां एक मुसुलमान बनर्जी ठेवला. ” 


“ अलीकडे मुसुलमानी नोकर ठेवणें आणि प्रसंगीं स्वयंपाकी हि ठेवणें ही 
एक पद्धतच पडूं लागली आहे खरी; परवां मी नागपूरला गेलें होतें तेव्हां तेथें 
पाहिलें कीं बहुतेक बंगाली मंडळींच्याकडे नोकर मुसुलमान! त्या बंगाली मुली 
देखील मुसुलमानणीप्रमाणें दोन नाकपुड्यांच्या मधल्या पाळीला टोंचून लोल- 
कांच्या नथा घालतात. ” 

“ आमचे शहाणे मेहुणे कलकत्यास होते, तेथे:त्यानीं असा आग्रह धरला 
कीं, बायकोने मुसुलमानांच्या हाततेंच खाले पाहिजे. अर्थात त्याला आमची 
ताई कबूंल होईना, तेव्हां त्यानीं तिला दुसरें कांहीं खाण्याची बंदी केली, तेव्हां 
ती नुसत्या दुधावर दिवस काढूं लागली, कलकत्त्यांतळें ते दूध, स्वच्छ म्हणून 
कर्धीहि नसावयारचे, आणि स्वदेशीची चळवळ करणारे कलकत्त्यांतले ळोक 
विलायती डब्यांतील गोठविळेल्या दुधाचा चहा करणारे, आमच्या ताईला 
कलकत्तयांतल्या त्या घाणेरड्या दुधावर राहण्याने क्षय झाला; आणि ती पुढें मेली. 
आतां याला खून म्हणूं नये तर दुसरें काय म्हणार्वे £ ” 


थोडका वेळ आमच्या शारदाबाई स्तब्ध झाल्या,, समोरून कोणी पुरुष 
येत आहेत असे दिसले, तेव्हां ते गेल्यानंतर त्यानीं पुन्हा बोलण्यास सुरवात केली, 
८८ मी थोडक्यांत म्हणते या पुरुषांनां बायकांनी पुनर्विवाह करावा कीं करूं 
नये यासंबंधाने बोलावयाचा बिलकूल हक्क नाहो. सध्यां या संबंधानें तेच बादविवाद 


द्र रायपूरच्या वुढुया बागेत 


न:>>>>-__>>- 2... क, हटा धाक कय क काक, क ळक डया टफोणेयणणणणणीणण 


करीत आणि आहेत. यावरून असें दिवतें कीं त्यांनां असे वाटतं को, बायकांची 

विल्हेवाट कशी लावावी हें ठरविणें हें काम त्यांचें आहे. वृत्ति तर अशा 

प्रकारची आणि पुन्हां स्रीस्वात>्यावर लेव लिहिण्यास देखील हे गुलाम तयारच ! 

पर्वा स्त्रीस्वातंत्र्याबद्दल खटपट करणारे आम्ही असें दंभ करणाऱ्या मुंबईला प्रसिद्ध 

होणाऱ्या पत्नांतळा एक लेख पाहिला तेव्हा मला अस वाटलें को, एक चागला नऊ 

वाद्यांचा कोरडा ध्यावा आगि त्या सुधारणावादी पत्रकाराची चांबडी लोंबवावी. !? 
“ अग, त्यानीं केलें काय? ” 


“ अग ! तो मेला पत्रकार एका प्रसिद्ध सुधारकाच्या दुटप्पी वर्तनावर 
टीका करीत होता. तो म्हणतो कीं, नवरा सुधारणेवर व्याख्याने देतो आणि यानें 
घरांत सुघारणा किती आणली हें पाहिळे तर बायको त्रतं-उद्यापनें करते असें 
दिसेल. म्हणजे याचा अथे असा कीं, नवऱ्याने ब्रायकोला आपल्या धममतां- 
प्रमाणे वागू देतां कामा नये. बाहेर कोठें कतृत्व दाखवितां येत नाही म्हणून 
बायकोची व्रतें उद्यापने मोडण्यासाठी उपदेश करणारे असले हे सव सुधारक 
पत्रकार घ्यावेत आणि एका दोरीनें अगदीं जवळच्या झाडाच्या फांदीस टांगून 
फांशी द्यावेत. ” 


:< बरं पुरुष-सुधारकार्ची मतं राहोत, कांही सुधारणावादी आपल्या बायका 
तर आहेत ना! ” 


“ आहेत; पण त्यांपैकीं बहुतेक अडाणी सुधारकांची गचाळ पुस्तर्के वाचून 
पोपटपंची करण्यास शिकलेल्या अणि सुधारक पत्रकारांकडून स्तुति मिळवून 
प्रसिद्धीस येऊं पहाणाऱ्या. अलीकडेहि अशा कांहीं विदुषी दिसतात कीं ज्यांना 
ल म्हणजे काय हें ठाऊकच नाहीं; आणि चालल्या पुनर्विवाहावर व्याख्यान 
द्यावबाला ! त्यांनां असें वाटत असेल कीं, हे मेले दुष्ट पुरुष ' प्रपोज * च 
करीत नाहींत, ” 


6 बरं बाई ! तुम्ही कोमार्यापेक्षां वैधघः्य अधिक पसंत करतां अणि 
विधवाची स्थिति कुमारीपेक्षां चांगळी म्हणतां बाचा अथ काय ! ” 


गशोडबलांतील प्रियंवदा ६४ 


नन म पो >-पाम------> “५-८: 


५ हुं पहा बिंबानाई, आज तुझे बय सोळा वर्षांचे आहे आणि तुला आज 
वेथव्य प्राप्त झालें आहे; तुझी ही स्थिति आजन्म कौमार्यापेक्षां अधिक सुखकर 
आहे असें मी समजतें, कारण कीं प्रत्येक मनुष्यास अगर बायकोस नगांत 
कांहींतरी दिवस काढण्यास हेतु लागतो. या मुलाचे संगोपन करणें आणि या 
मुलाचीच काळजी वाहून त्याला मोठे करणें यातच तुझे आयुष्य जाईल, आणि 
तुला जीवितक्रम इतका कंटाळवाणा वाटणार नाहीं. पुरुषाला जगात रहाण्यास 
खटाटोप करण्यास उत्साहाने इकडले डोगर तिकडे करण्यास एक ध्येय लागतें, 
अविवाहित पुरुष बहुतेक सवे गोष्टींविषयीं बेफिकीर अततात; आणि त्यांच्या 
पुढें जर कोणतेंहि प्रापंचिक किंबा सामाजिक ध्येय नसलें तर ते पूर्णपणें दुवृत्त 
बनतात. आपल्या बायकापोराचें पोट भरणें हे कर्तव्य पुरुषापुढें नसतें तर 
बहुतेक सर्वे पुरुष जगाला उपद्रव बनले असते. बायकाची गोष्ट तशीच. 
प्रथमतः नवऱ्याची काळजी करावी, नवऱ्यास सुखी ठेवावे या हेतूमुळें त्यांच्या 
आयुष्याला एक दिशा लागते. वैधव्यानंतर जर मुले असलीं तर त्या मुलांचें 
संगोपन करण्यात आणि आपलें प्रेमसर्वस्व त्यानां देण्यात त्यांस मोठी धन्यता 
वाटते. या निरस आणि कंटाळवाण्या जगात कालक्रमणा करण्यास आयुष्याला 
हेतु लागतो, तर नित्राबाई, तुझ्या आयुष्याला हेतु आहेच आहे. यूरोपातील 
सोळा वर्षांची एखादी मुलगी तुझ्या जागीं असती तर तिचें आतापर्यंत लम्नहि 
झालें नसतें ; आणि सोळा वर्षीचा पुढील सर्व काळ जर तिला कौमार्यावस्थेंतच 
कंठावयाचा असता तर तिची स्थिति तुझ्यापेक्षाहि अघिकच शोचनीय असती. 
मी खरोग्वर्च सागतें कीं तूं माझ्यापेक्षा अधिक सुखी आहेस. मी पुस्तकें 
वाचतें, प्रसंगीं वर्तमानपत्रातून लिहिते; कधींकधीं व्याख्यानेंहि देते, तथापि 
या सर्वाच्यामुळें माझ्या आयुष्याला स्पष्ट हेतु उत्पन्न होत नाहीं. आम्ही 
आयुष्यांत करावयाचें काय ! आम्ही स्त्री-शिक्षण देणार; पण आम्ही स्त्री 
रिक्षण देणार म्हणजे तरी काय करणार १ स्त्रियांचे जीवित माझ्यासारखीच्या 
प्रयत्नाने खरोग्वर्च अधिक सु'वकरच होत आहे की काय असा संदेह वारंवार 
उत्पन्न होतो. मी विलेल्या शिक्षणामुळे क्षियांचें कुढंबसौड्य अधिक वाढलें 


क्ष्प रायपूरच्या बुतृधा बानेत 
आहे! अशी माझी खात्री होत नाही आणि मी जरी कल्याण होतें अशी आपल्या 
ममाची कशीनशी समजूत करून घेती तरी त्यानें समाधान होत नाहीं. 
आजकाळ कोणतीहि योजना मनात आणली तरी तिनें होणारें देव्यकल्याण हे 
हवेंत पसरणाऱ्या धुराप्रमाणें अस्पष्ट आहे. व तें तरी झालें आहे वीं हेंहि 
अजमावतां येत नाहीं. ज्याप्रमाणें निञाचर आणि विश्वव्यापी आणि निगुण 
परमेश्वर खोटें जोलणाऱ्या' प्राथनासमाजिस्टांखेरीज कोणाला कल्पिता येत नाही 
आणि ज्याप्रमाणें त्या ईश्वराचं अस्तित्व मनास पटण्याकरितां त्याची मूर्ति करून 
आपण त्याचें पूजन करतों, त्याप्रमाणं माझी स्थिति झाली आहे. मी कांहीं 
खिस्ती" लोकांत तें निराकार परमेश्वराची कशी कल्पना करतात म्हून प्रश्न 
केला, तेव्हां.मला असें कळून आलें कीं त्याच्या कल्पनेत परमेश्वर साकार 
येतो. आणि सो देस्खील मनुभ्याकार आणि त्यातल्या त्यात पुक्ठिंगी येतो. मला 
माझ्या आयुष्याला देशकल्याणापेक्षा अगर समाजकल्याणापेक्षां अधिक स्पष्ट 
हेतु पाहिजे!” 


“ तर मगं तुम्ही असें करा कीं समाजकल्याणेच्छु पुरुष कोणी शोधून 
काढून त्यांच्याशीं लम्न करा, म्हणजे त्यास सुखी करून त्याच्याकडून देशकाये 
करविर्ण्यांत तुमच्याकडूनहि देशकाय होईल.” 


“या प्रकाराचा बिचार माझ्या मनास अपरिचित नाहीं; पण देश- 
कार्यासाठी उत्सुक असलेले पुरूष काय वाटेवर आहेत १” 


प्रकरण ७ घे 
अनेतराव' घरकुड् 

अनंतराव हे, थोड्या पगाराच्या नोकरोपासून पुढें इ. ए. सी. झाले. ही 
गोष्ट पाठीमार्गे सांगितलठीच आहे. अनंतरावांस आजकाल वाई महणयारे . 


9 


गोंवनांतील प्रियेवदा १६ 
लोक पुष्कळ आहेत, कारण साहेब आणि त्याचा कारकून यांचा परस्पर संबंध 
कसा असावा याविषयींची आजची आणि पन्नास वर्षांची समजूत यांमध्यें 
महदंतर आहे. भोंतलेशाही आणि पेशवाई या दोन्हीं ठिकाणीं असें होतें कीं 
सरकारी नोकर आणि स्वासगी नोकर यांमध्यें तीक्ण अंतर नसे. तालुकदार 
म्हणजे जवळ जवळ त्या प्रदेशाचा राजा, तो कांहीं विवक्षित रकम तरकारांत 
पाठवावयाचा; बाकी त्या प्रदेशाचा तो पूर्णपणे सत्ताधीश, असें असतां खो 
मनुष्य सरकारी नोकर होई, तो खरोखर त्या तालुकदारांचा स्यतःच नोकर 
होई. धन्याच्या हिताविषयीं दक्ष असणें, धनी सांगेल ते काम त्रिनबोभाट 
दुसर्‍या कांहीं एक गोष्टी मनांत न आणतां बज्ञावणें या सर्व गोष्टी तेव्हां सेबक- 
धम होत्या. पूर्वीचे घनी जाऊन तेथें इंग्रज आल्यामुळे सर्वच मनु पालटला, 
मनःपूर्वक सेवा परक्या जातीची होणें शकय नाहीं. मनाची पूर्वीची प्रवृत्ति 
तर अशी कीं धन्याला देवाप्रमाणें मानावे. पूर्वीची दुसरी प्रवृत्ति म्हणजे बाह्य 
लोक सर्व हलके आहेत, आणि त्यांचा विटाळ झाल्याबरोबर स्नान केलें पाहिजे 
हेहि परंपरागत तत्त्वज्ञान, दोहोचें मिश्रण झाल्यानंतर मनुष्याचे भाचरण कसें 
असावें याबद्दल वारंवार संदेह उत्पन्न होतो. सरकारचा नोकर साहेब व देशी 
संस्थानिक यांत फरक होई तो असा. कोणी तालुक्‍्याएवढ्या संस्थानच्या 
राजाचें स्तवन केल्यानें वाईट होत नाहीं, पण जर कोणी डेप्युटी कमिदनरावर 
काब्य लिहिलें तर “ फोब्से विलास ” “ क्राफड महाकाव्य ? करणाऱ्या 
“ अबाच्य नांवाच्या ” कवीच्या कोटींत जाऊन बसतो, आज कचेरींतला 
कारकून साहेजच्या घरची भाजी आणि अंडी विकत भाणण्यासाठीं बाजारांत 
गेल्यास त्यास लोक नांबेंच ठेवतील, परंतु स्वजातीय राजा अगर गुरु यांच्या 
सेवेस कोणी अहोरात्र राहिल्यास त्याळा कोणी नांबें ठेवील काय ! ; ४ 


अनंतराव घरकुट्रे यास लोक नांवेंच ठेवीत होते. त्याचे वर्तनहि 
महाराज काय आशा आहे ! ” असे म्हणून डेप्युटी कमिरनरच्या सेवेंत दंग 
राहणार्‍्याचे होतें. यावर त्यांचा कटाक्ष होता. अनंतराव कारकुनाचे 
ई, ए, सी, झाळे आणि वार्चे कारण त्याच्या आश्रयदाता साहेब हाहि मोठ्या 


९७ अनंतराव भरकुर्रे 


पदवीस चढला होता हें होय. साहेब जसे मोठे झाले तसे त्यांचे प्रिय नोकरहि 
मोठे झाले, 


अनंतराव हे जुन्या काळचे मुत्सही म्हणून समजले जात, जुन्या काळच्या 
मुत्सद्दीपणाची मुर्य लक्षणें दोन तीन होती; एक तर कोणा अधिकाऱ्याचे 
सरकारांत मोठें वजन आहे हे ओळखून त्याचा आपणावर लोभ जडवून घेणें 
आणि आपणहि त्याच्या सुखासाठीं आणि बडेजावासाठी खटपटी करणें, मुत्स- 
ह्वीपणाचें दुसरें उपांग म्हटलें म्हणजे आपलें ताहेबांपाशीं वजन आहे असें 
लोकांस भासवून लोकांस आपल्या भोंवतालीं घिरट्या घालावयास लावणें, आणि 
प्रसंगविषयीं लोकांची कामे करून देऊन त्यांच्याकडून बक्षिसी मिळविणे. 
शिवाय सरकारी अधिकाऱ्यांच्या मनांत कांहीं खुळे अगर आवडीनिवडी 
असल्या तर आपल्या आवडीनिवडी तशाच बनवून लोकांस सरकारी अधिका- 
ऱयांच्या इच्छा सफल करण्यासाठीं बनविणे. उदाहरणार्थ, गांबांत अमूक 
युरोपीयन वस्तीच्या शेजारीं एखादा पार्क पाहिजे असें कांहीं अधिकाऱ्यास 
वाटलें तर तो पाक घडवून आणण्यासाठी फंड तयार करावयाचा, त्या फंडांत 
गांवांतील शेट सवावकारांनाच पैसे घालावयास सांगावयाचें. इकडे तुम्हीं असें 
केल्यानें सरकारची आपणावर मेहेरनजर होईल हे लोकांस भासवयाचे आणि 
त्या मनुष्याची शिफारस अधिकाऱ्यापाशीं वेळ काहून करावयाची. मराठे- 
शाहींत हलक्या हुजऱ्याचें महत्त्व असं, तें महत्तव आणि दिवाणाचे महत्त्व हीं 
दोन्हीं महत्त्वें साहेबांकडे एकसारखं जाऊन त्याच्यापाशो नेहमीं हजर असणाऱ्या 
शिरस्तेदारास अव्बल इंग्रजींत होतीं, त्याला जर कोणाचा मत्सर झाला तर 
साहेमाच्या घटरलचा होई, अनंतराव घर्कुट्रे यांस जरी इंग्रजी बगेरे कांहीं 
एक येत नव्हतें तरी एकनिष्ठ साहेबसेवेमुळेंच त्यांनां महत्पदाबर चढतां आलें. 
ज्याप्रमाणें एका नवऱ्याला दोन बायका असल्या म्हणजे त्यांतल्या त्यांत जी 
त्मडकी असेल ती दुसरीने नवऱ्याच्या आसपास फिरकू देखील नये म्हणून 
प्रयत्न करते त्याप्रमाणें साहेबाची संनिधि दुसऱ्या कोणास प्रास होऊे नये ग्हणून 
ब साहेबाची मर्जी स्वतःवरच रहावी म्हणून धडपडणाऱ्या कारकुनास कर्वे 


गोंडघनांतीळ 'प्रियंवदा ,द८ 


अन्ना 7 पण प पटापट ---*--ा-ा- >> £-२८---५॥:2-शशाण 0 री अ > भक १४० “णाय णच 


लागतें, आणि या प्रकारची मत्सरयुक्त खबरदारी अनंतरावानीं चांगली ठेविली 
होती आणि या ग्वबरदारीच्या साहाय्यानेंच तें पुढें डेप्युटी कमिरानरचे शिरस्ते- 
दार झाले; पुढें कालान्तरानें तहशिलदार झाले. ते तहशिलदार असतांना 
अनंतरावानीं आपल्या अधिकाराचा उपयोग करून काहीं मालगुजारी गांवें 
आणि अराच जमीनजुमला खरेदी केला होता. जमीन लिलांबानें विकावयास 
काढली आणि तहदिलदारसाहेब ती स्वत: घेणार आहेत हे गावात खासगी 
रीतिनें जाहीर असलें म्हणजे तह॒शिलदाराच्या भावावर कोणी भाव चढवूं इच्छित 
नाहीं, कारण अधिकाऱ्याशीं वांकडे लोकांस नको असते. तह्रिलदार स्वतःच्या 
नांवावर जमीन घेतच नसत. पण बहुधा बायकोच्या नांबावर घेत, तसें 
केलें म्हणजे कायद्याच्या फटींतून त्यास सुटतां येई. 


अनंतराव हा लहान पदापासून मोठा झाला. पुष्कळ लोकांस मोट्या 
पदावर चढत असता जी द्रव्यलोभाची हाब सुटते तिचा अमनंतराबांच्या 
मनावर पगडा इतका काहीं भयंकर होता कीं त्याच्या योगानें त्यांची सदसद्विवेक 
बुद्धी देखील बरीच हीणकस झाली होती. त्यांनी आपली व्यवहार दृष्टी लय्न- 
संजंथातहि ठेविली. 

त्यांची मुंगी जिजाबाई जसजशी मोठी होऊं लागली तेव्हां त्यांच्या मनांत 
तिच्या लम़ाविषयीं विचाराचे काहूर माजले. लग्नसंबंध हा जो जोडावयाचा 
असतो तो जराच विचारपूर्वक जोडावयाचा असतो, आणि अनेक दृष्टीनें व 
मुत्सहीपणानें आम्ही विचार करतों या प्रकारचा बाणा बाळगणाऱ्या अनंत्रावास 
मुलीच लग्न म्हणजे देखील मुत्सहीपणाचाच एक डाव अशी; त्यांची ससनू"त 
झाली, आणि आपल्या मलीचा त्या दृष्टीनें ते विचार कह लागले. 


: लय़ म्हणजे काय १ ” तर गरीभ लोकांनां 'अगर सामान्य छोकानां 
मोठ्या लोकांशीं संत्रंध जोडण्याची संधि होय, आपली मुलगी मोठ्यांच्या 
घरीं पडली पाहिजे पण'त्याच्यासाठीं आपल्याला सचे येतां कामा मये, मुलगी 
मोठ्या श्रीमंत मनुष्यास विकावया ची असे करण्यांत अर्थ माही, त्याच्या योगानें 
आपल्याविषयी जांअजप्राचे मत खरात्र होते, आणि दिवाय मतुष्य बराच म्हातारा 


९९ अनंतराव 'घरकुटट 
असल्याशिवाय पैसे भरून मुलगी विकत घेणार नाहीं. पैसे भरून विकत 
घेणारा "म्हातारा म्हणजे देणार किती ? हजार बारारी रुपये. त्याच्या योगानें 
ऑपले काय होतें १! शिवाय आवण पडलों तहशिलदार. मुलगी विकणें गरीज 
निक्षुकास शक्‍य होतें पण आपणांस लोक काय म्हणतील ! शिवाय पैसे भरून 
ज्याला मुळ्गी ककत घ्यावयाची असेल असा म्हातारा आमच्याकडे कशाला 
येतो ! तो कोणातरी गरीब मिक्षुकाकडे जाणार आणि जिकडे मुलगी अत्यंत 
स्वस्त द्रात मिळेल तिकडे तिकडे तो वळणार ! तर आता तहशिलदाराच्या 
पद्थीच्या मनुष्याने आपल्या मुलीचे लम़ तरी कसें करावें, कीं ज्याच्या योगानें 
मुलगी मोठ्यांच्या घरीं पडेल, म्हाताऱ्याला द्यावी लागणार नाहीं, लग्नाला 
आपल्याला खच येणार नाहीं आणि पुढें मार्गे झाला तर फायदाच होईल. 


या कठिण प्रश्नास पोक्त मुत्सद्दी अनंतराब घरकुट्टे यानीं जें उत्तर शोधून 
काढिले आणि अमलात आणिलें तें येणेंप्रमाणें. 

साधारणपणें तीस पसतिशीच्या सुमाराचा बिनवर नवरा पहावा आणि तो 
देसखतील जुन्या सरदार अगर मालगुजार याच्या घराण्यांतला पहावा, बिजवराक्षीं 
वझ लवकर जुळविता यावें यासाठीं मुलगी १४ वर्षापर्यत वाढूं द्यावी, नवरा त्या 
वयान्वा असला म्हणजे मुळीचेंहि फारसें अकल्याण नाहीं, सबंध थोरामोठ्याशीं 
जुळेल आणि हुंडाहि द्यावा लागणार नाहीं. मालगुजार इत्यादि मंडळीमध्ये 
शिकलेले लोक थोडकेच अप्ततात आणि त्यामुळें जांबयाच्या घरचा कारभार 
हळूहळू आपल्याच हातात येईल. हा कारभार आपल्या हातीं आला म्हणजे 
आपलें पेन्हान घेतल्यासुळें होणारें नुकसान होणार नाहीं. 

याप्रमाणें पोक्त विबार करून अनंतरावानीं आपल्या मुलीचे लम १४ व्या 
करावयाचे ठरविलें, 

मुलीचे लम झालें तोपर्यत अनंतराव एस्ट्रा असिस्टंट कमिशनर होऊन 
त्यानीं पेन्शनहि घेतलें होतें. 

मुलीचे ल्न रायबूरच्या हरिहरराव तांबडे या मालगुजाराशीं झाळे, या 
मालयगुजाराचा राषपुरास तात्यापाऱ्यांत एक मोठा वाडा होता. तेथेंच आमच्या 


गोड चनांतीळ प्रियंवदा ७० 


८-2: -->-----:>----*- क ३०३ कानाला कक क का 


अनंतरावांचे न्नावई रहात असत, हरिहरराव तांबडे यांची प्रकृति चागल्यापॅकीं 
नव्हती पण आजकाल किती आईबाप नवऱ्यामुलांच्या प्रकृतिकडे पहातात ? 
त्यांतल्यात्यांत भ्रीमंताचे पांघरूण वर असलें म्हणजे दुसऱ्या कोणत्याहि गोष्टींकडे 
लक्ष जात नाही. हरिहरराव तांबडे मालगुजार हे लयन झाल्यानंतर चार वर्षा- 
तच मृत्यू पावले आणि अनंतराव घरकुट्टे यांची कन्या बरिंबाबाई हिला वैधव्य- 
दशा प्रास झाली. हरिहरराव गेले पण आपल्या इस्टेटीला प्रभाकर हा वारस 
ठेवून गेले आणि त्यामुळें बिंबाबाईस भावी आयुष्य अगदींच दुःखमय झाले 
असतें तें काहीं दिवस तरी झालें नाहीं. गेल्या प्रकरणात शारदाबाईंची 
विद्यार्थनी बिंबाबाई हीच अनेतरावांची चिरंजीविनी हे वाचकांच्या लक्षात 
आले असेल 


प्रककण ८ व 
बिंबाबाइईचें येघव्य 


बिंच्राबाईची ओळख वाचकास झालीच आहे. वाचकांची ओळष् झ्या 
वेळेस झाली त्या वेळेस तिचा नवरा नुकताच वार्याने ती दुःखीकष्टी होती. 
अशा प्रसंगीं झालेली ओळख मनुष्यस्वमाव कळण्यास मुळींच उपयोगाची नाही, 
कारण अशा वेळेस शोकाच, शोकमय आठवणींचे आणि या दोहोंपासून उत्पन्न 
होणाऱ्या गं भीरतेचं आवरण मनुष्याच्या मनावर असतें. 


बिंबाबाईचा नवरा हरिहरराव तांबडे हा एक प्रसिद्ध मालगुजार होता 
आणि त्यामुळें त्याच्या मृत्यूने पुष्कळांस वाईट वाटले, बिंबाबाईच्या सांत्वना- 
साठीं पुष्कळ बायका येत. एके दिवशीं रायपूरचा कमिशनर मि, कर्कवूड 
यांच्या पत्नीने ' मी आज दुपारी समाचारासाठी येई्देन ) म्हणून कळविले, ज्या 
दिवशीं मिसेस ककेवूडचें पत्र आलें त्या दिवशी अनंतराव घरकुडे हे आपल्या 
मुलीच्याकडे आलेच होते. अनंतराबांस आतां या मालगुबारीचा मॅनेजरीचा 


७१ बिबाबाईचं वेघव्य 


मुखत्यारनामा मिळवावयाचा होता, कारण आतां मुलीचे आणि तिचें 
अल्पवयस्क अभक जो प्रभाकर त्याचे पालक दुसरें कोण होणार! आमच्या 
अनंतरावांवरच तो प्रसंग येऊन पडला. 


“ ब्रिंब्राबाईस मिसेस ककंवूडबाई भेटावयास येणार तर त्याच्या स्वागताकरितां 
कांहों विशेष तयारी नको करायला ! ब्राह्मण ब्रायकांचे काय १ त्या आल्या आणि 
गेल्या. घरोघर मातीच्याच चुली या नात्यानं जी रोजची स्थिति आपल्याकडे 
असते तीच दुसरीकडे, त्याच्याकरितां काळजी घेऊन करावयाचे काय ! 
मिसेस कर्कवूडसारखी मोठ्या अधिकाऱ्याची बायको आपल्याकडे येणार तर 
तिच्या मनावर ' इंप्रेशन ' (ठसा ) चागले झाले पाहिजे. ” या प्रकारचे 
विचार आमच्या अनंतरावांच्या डोक्यांत घोळत होते आणि यासाठीं त्यांनीं 
विचार करून त्या दिवसाची तालीम घरांत कशी काय ठेवावी हें ठरविलें. 


प्रथमतः म्हटलें म्हणजे साहेब लोकांचे दाराशी जोड्यांची रांग नसते. 
आपल्या घरांच्या दारातच फाटक्या जोड्यांची माळ दिसेल, म्हणून ती दूर 
करण्याचे अनंतरावानीं ठरविलें, शिवाय त्या घरात साधारण अशी पद्धत होती 
की पुढें ओटी, मग आंत पडवीवजा खोली, त्याच्या आंत माजघर आणि 
त्याच्या पुर्ढे स्ैपाकघर. ओटीवरच्या खोलींत दुपारच्या वेळेस मंडळी जेऊन 
जाऊन वामकुक्षी करीत. मडमसाहेब जर भलत्याच वेळेवर आल्या तर त्यांनां 
मंडळी पाय पसरून कोणी सदर्‍्याने तर कोणी सदऱ्याशिवाय त्या ओटीवर 
असलेल्या चौरंगावरच्या गादीवर लोळत पडली असली म्हणजे तें पाहून हे 
हिंदु लोक कसें गचाळ आहेत असे म्हणतील असं अनंतरावास वाटले, 


मडमसाहेबांनी येण्याची नकी वेळी दिली नव्हती, '' चित्त 
आफ्टरनून » (आज दोन प्रहर टळह्य़रावर) एवढेच लिहिलें होतें. कमिशनरीण 
बाई गाडींतून येणार, त्या दुपारींच कोणाच्या घरीं पांच तर कोणाच्या घरीं दहा 
मिनिर्टे बसून सात आठ घेरे एका ““ आफ्टरनून ”' मध्ये खलास करणार. 
त्याच्यासाठी केबढी तयारी !  “ प्रथमतः बिंजञआाबाईस उंच टाचांचे, पाय 
चिमटणारे बूट आणून दिले पाहिजेत, नाहींतर आपल्या घराण्यास त्या असंस्कृत 


मोंडवनांतील प्रिथेंघदा ७२ 


ब-र---:----------::>---->->->_>------०- >> नन 0 कान्न पा “न -  -< 


म्हणतील ' असें बाटून त्यांनीं मुद्दाम त्या दिवशीं बाजारांतून आपल्य़ा मुलीच्या 
पायांचे बूट आणविले. ते प्रथमतः घाळून बिबाबाईस चालणे जड, जाऊं 
लागलें. कारण पाय मुरगळतोसा वाटे, झोंक पुढें जातोस बाटे आणि चात्ग्रयठा 
लागले म्हणज पायास कळा लागत, तथापि आज कमिरनरीण बाई. येणार 
म्हणून सर्व सायास केळेच पाहिजेत. 

कमिरानरीणबाई आल्या आणि फक्त पाचच मिनिटे असल्या, तेव्हां 
त्या वेळचा संवाद देण्यास ह्रकत नाहीं. अनंतराव घरकुटे हे मधून मधून 
येत, आगि काहीं मोडक्‍या तोडक्या भाषेत सागावयाचा प्रयत्न करीत, 


मिसेस ककंवूड यानीं प्रथमत निबाबाईच्या दुःस्थितीबद्दल आपणास 
फार फार दुःख होतें आहे, हें कळविळें, “ तुमची तबीय्रत तर ठौक आहे ना? 
मला'ची प्रकृति कशी काय आहे ? ? असा बिंबाबाईस प्रश्न केला, मुलाला 
पाहिले, त्याच्या गालाला हात लावून हंसविले, आपण आपला वेळ कसा 
घालविता, आपल्याल्य गाता येते काय इत्यादि प्रश्न केलें, पूर्वीच्या प्रश्नास 
काय उत्तर येतें याची बाट मुळीच न पाहता मिसेस ककंवूडबाई दुसरा प्रश्न 
विचारीत. यापेक्षां जास्त प्रश्न त्यानीं न विचारता * आजची हवा ब्रीच गरम 
आहे नाहीं १* हा प्रश्न केला. 


या प्रश्नास उत्तरें देग्वीळ ठराविकच यावयाची, ' निञाबाईंची प्रकृती 
बरी आहे >, ' तिला गातां येत नाहीं? आणि ' होय, हवा आज गरम आहे *,. 


पुढ मिसेस ककवूडला देणगी म्हणून एका चादीच्या तजकांल संत्री 
आणली, तेव्हां प्रारंभी नको नको म्हणत, व पुढे फार आग्रह झाला म्हणून 
देणगीबददळ आभार प्रदर्शित करून मिसेस ककंवूडनीं संत्री चांदीच्या तबकासहु 
आपल्या शिपायामार्फत गाडींत पोचविली. हें पाहून बिंबाबाह आपल्या बापाकडे 
पाहूं लागल्या. बिंत्राबाईस वाटले होते कीं ही बाई या तबकातला एखाद दुसस 
संत्रा ग्वाईल, तबकच्या तबक घेऊन जाईल असें तिला बाटळं नव्हतें तथापि 
तिकडे दुळेश्न करून मिसेस ककव्ूडनी आणखी पक दोन औपचारिक प्रश्न 


७३ अनंतराव घरकुड्टे 


गन मरा, पणा एप" पपपणप"001)?0ण >> 
1.22 ७ पनल कण हह हह ह आड कड. जा हकक डक या 


केले, अनंतरावाची ओळख करून घतली, आणि थोडक्या वेळांत सवांचा 
निरोप घेतला. 


मिसस कर्कवूड गेल्यानंतर बाप आणि मुटगी यात बोलणें सुरू झाले, 
: ही बया आतां तबक आणून देईल की नाहीं १ ” 

ि देईल आणून, न द्यायला काय झालें १ 

£ मला शंका येते. ? 


£ तिनें जरी आणून दिले नाही तरी आपलें कल्याण दुसऱ्या काहीं 
उपायानें ती करील, 


“ ती केव्हा कल्याण करणार आणि काय करणार! पण आज घरातल्या 
चांदीच्या तकाला चट्टा बसला, ” 


अनंतराबाची त्यासबंधानें ग्वात्रीच होती. पण आताच फारशी गडबड 
करूं नये, उलट आपल्या मुलीस आश्वासन द्यावें असें त्यांनां वाटले, 


मिसेस ककवूड म्हणजे फार चागली बाई म्हणून नेटिवात तिची वाखाणणी 
होत असे, तिला आपल्याकडची नेसगी फार आवडतात अस म्हणून तिनें 
काहीं लोकाच्या कडून पैठण्या उपटल्य़रा अता बभ्रा, सर्व मुलाचा चव्हाटा जो 
वकीलांची खोली तेथे झाला होता. तथापि पुष्कळ लोकाना साहेब अगर मडम 
आवडू लागावयाला आणि लोकप्रिय मानायला फार थोडी कारणें पुरतात. 
साहेबाने आपल्याकडचे काहीं स्वाणें खायला मागितले आणि खाले म्हणजे लोक 
झाले खूप. साहेञानें आपण एक पगडी घेतली पाहिजे, असें म्हटलें कीं 
कोणाकडून तरी देणगी म्हणून आलीच, साहेबानीं आभार मानून पुढें फॅन्सी 
ड्रेस बीलला उपयोगी पडेल अशा भावनेने ती ठेवून घेतली म्हणजे पगडी 
देणारास कृतक्रत्यता वाटे, आणि साहेबाना आपल्या कडील रिवाज आवडतो 
म्हणून साहेबांची स्तुतियुक्त जाहीरात कराबयास तो तयारच. साहेबानी ' नल 
आणि दमयंती ” याची गोष्ट काय आहे असा प्रश्न केला म्हणजे ' साहेबास 


र्गोडघनांतील प्रियंवदा ७४ 
आपल्पाडील गोष्टीची किती तरी माहिती ' म्हणून आपल्या लोकांस मोठा 
आनंद होतो. ज्या लोकांना कोणी विचारीत नाहीं त्यांच्या कोणत्याहि वस्तूला 
त्या लोकांवर मालकी गाजविणाच्या लोकांनीं महत्त्व दिळ तर हलक्या स्थितीतील 
लोकांना आनंदच होणार यांत काय नवल आहे ! ! 

अनंतराबानां कमिरनरची बायको आपल्याकडे येऊन गेली एवढ्याबद्दल 
जो आनंद झाला त्यात आपे चादीच तबक गेले हें दुःख ते विसरले, राय- 
पूरच्या कमिशनरशी ओळख झाल्यानें पोलिटिकल एजंटशीं संधान होईल 
आणि पोलिटिकल एजंटशीं संधान झाल्यानें संस्थानांत आपले वजन वाढेल, 
आणि तेणेंकरून पुढें मागे आपला फायदाच होईल, तबक गेले खरें पण तें 
घरकुट्ट्यांचें गेळें नाहीं तर तें श्रीमंत हरिहरराव तांबडे मालगुजार यांचे गेलें 
होते. एकढ्या मोठ्या श्रीमंत घराण्यास तबक म्हणजे काय शै दीडश॑ रुपये, 
अगदीं कःपदार्थ. एवंच आता आपल्या मुलीची आणि कमिदानरीण बाईची 
जी ओळख झाली ती अधिक्राधिक वाढविली पाहिजे आणि त्याचा पुढें फायदा 
करून घेतला पाहिजे असा अनंतरावांनीं विचार केला. 

कांही वेळ गेल्यानंतर अनंतराव आपल्या मुलीस म्हणाळे, '' काय ग मडम 
साहेबांनी तुला काय विचारलें ? तुसा गायला येतं कां म्हणून विचारल नाहीं! ” 

(ट्‌ हो, ११ 

: पहा, हेंच जर तुला गातां येत असतें तर मला गातां येत नाहीं असें 
म्हणावें लागलें असते का? ” 

“ मला गातां येत नाहीं हा जर दोष असला तर तो कोणाचा, माझा कीं 
मळा गाणं शिकविले नाहीं त्या आईबापांचा ? ” 

“ बरं, त्याचा सध्यां वादविवाद नको. आम्हांला काय ठाऊक कीं 
“ तूं श्रीमंत पतीची राणी ' होणार म्हणून ? ” 

: बुरे मग आतां काय त्यारये ! !? 

“ आतां तूं गाणं शीक, ” 


> क 
७५ अनंतराव घरकुट्ट 


“ ळोक त्याला म्हणतील तरी काय ? कपडालत्ता, गाणें इत्यादि गोष्टी 
करायचे होते तेव्हां नाहीं केल्या, आणि आतां करीत आहे. ” 

“€ अंग लोकाना काय समजतं, आणि लोकनिंदेची पर्वा करून चालेल 
तरी कसें १” 

: मृग इतर बायकानीं तसं का करूं नये? ” 

“ याचें कारण एवढेंच कीं तूं मालगुजारीण आहेत आणि जें काम पूर्वी 
नवर्‍याला करावे लागत होतें तें तुला करावें लागणार, नवऱ्याला गांबां- 
तल्या अधिकाऱ्याशीं स्नेह जुळवावा लागला होता ; आतां तुला त्याच्या 
बायकांशी जुळवावा लागणार आणि यासाठीं या सर्व खटपटी तुला केल्या 
पाहिजेत, ” 

£ आजपर्यंत मी बूट कधीं बापरला नाही. आज बूट वापरला तर पाय 
कसे चिमटून गेळें आहेत. मला वाटतं कीं, बुटाचा हा खच उगाच झाला. 
तें तभक गेलं आहे ते परत आलं म्हणजे मिळबिली, मला या भानगडी 


आवडत नाहींत,” 

“< अग या सर्व गोष्टी कर्त्या पुरुषाला आणि स्त्रीला कराव्या लागतात. ” 

“ शारदाबाई मास्तरीण या कां बूट नाहीं घालीत! त्या तर बी. ए. 
झाल्या आहेत, ”? 

“< अग या पदव्यांनां आणि परीक्षांना विचारतो कोण ! शारदाबाईला 
 होकांतला ? मोठेपणा आहे काय ? बी, ए. ची परीक्षा एवढेंच तिचें 
भांडवल, ?” 

“ आणि माझे काय आहे ?” 


“तूं एथची स्थाईक, येथच्या मालगुजाराची बायको. शारदाबाई- 
प्रमाणें वाऱ्यावर वरात थोडीच आहे! ”" 


“ त्र मग मी मी काय गाणं शिकायचं १ आणखी काय करायचे ? ” 


गोंडवनांतील प्रियंचदा ७९ 


क न 


"नाणा *>------२.:-----२>>>>->>--2-५--------॥ा८ापा ल 


“: आणखी थोडेसें इंग्रजी शिकायला सुरुवात करावयाची, निदान कोणी 
इंग्रज बाईेशीं बोलणें झालें तर ' व्हरि छीझडू ढ मीट यू ' म्हणजे तुमच्या 
भेटीने फार आनंद होतो, असें बोलतां यावें. ” 


“ तर मग तो शब्द हिंदुस्थानींत नाहीं तर मराठीत बोललं तर नाहीं कां 
चालणार ? » 


: इंग्रजींत बोलले म्हणजे साहेब लोकांच्या लेडीजना वाटेल कीं ही कोणी 
तरी थोरामोऱ्या घराण्यांतळी आहे. ” 


६९ ज्यांना आपल घराणं ठाऊक नसेल अशानां भेटावयांच कशाला, त्या 
तरी आपल्याकडे कशाला येतील भेटायला, आणि येऊन आणखी एखादे तञक 
घेऊनच जाणार कीं नाहीं ? त्यापेक्षां त्यांच्याशीं संबंध नाहीं ठेवला तर बरं 
नाहीं ९ 9१9 


५ आमचा ' वाईल्ड ओटस्‌ ? साहेब की नाहीं. आपल्या ब्रायकोसह 
एका ६. ए, सी. कडे उतरत असे, त्या ई. ए, सी, च्या बायकोला इंग्रजी 
येत होतें. त्या ई. ए. सीची बढती किती लवकर झाढी. तो पुढें रावबहादुर 
देखील झाला. ” 


“ मुला थोडंच व्हायचं आहे रावबहादुर! ” 
: घुण तुला ' क्ेतरे हिंद ) पदक मिळेल ना!” 
:£ तै पदक त॑ काय? ” 


६ ते मोठमोठ्या सुशिक्षित आणि लोकोपकारी बायकांनां मिळत असतें. 
त्या बायकांची नांवें मुंबई कलकर्‍्याच्या इंग्रजी बर्तैमानपत्रांतून येतात, ” 


£ त्यांत काय फायदा ? ” 
: हिंदुस्थानांतल्या मोठमोठय़ा बायकांत तुझी गणना होईल. ” 
मला नको ती व्हायला, ” 


णा. पपप“. 


७७ हरिभय्या मोघे 


नापप-----ऱा 


“ बुरे ते असो, तुला आतां एक महिन्या दीड महिन्याने तरी मिसेस 
ककंवूडला परतमेट दिली पाहिजे. ” 


“ शेलंच पाहिजे कां?” 

“: हो नाहीं तर १ ” 

“ बरं जाईन, गेलें तर येतांना तें तबकहि परत घेऊन येईन. ” 

“ तजकार्चे राहूं दे, तबकाचें मी पाहीन, तूं जाणारना ? ” 

“ तुम्ही जाच म्हणत असाल तर जाईन बापडी, मला काय? ” 

अनंतराव घरकुदे, मुलगी कमिशनरकडे जाणार आपली तेव्हां तिनें 
कशा पोषास्वांत जावें याचा विचार करीत असले. 


“ ती स्वरागड संस्थानची अगर दुसऱ्या कोणत्यातरी संस्थानची दिवाण- 
गिरी मिळवली पाहिजे, आपल्या काहीं ओळणी साहेबापाशही आहेतच. 
माझ्या बिंबाच्या मार्फत काहीं युरोपीयन लेडिजशी ओळ'व जमली तर कार्यभाग 
सोपा होईल ” इत्यादि विचारहि अनंतराबांच्या मनांत येत होते. 


प्रकरण ९ ६. 
हरि भय्या मोघ 


रायपूरच्या हरिह्रराव तांबडे यांच्या बाड्यांत एक तरुण बिंबाबाईच्या 
समोर बसला होता. अलीकडील बिंबाबाईच्या स्वरूपात पुष्कळच फरक पडला. 
कमिदनरीणबाईच्या घरीं बिंबाबाई जाऊं येऊं लागली. आणि त्यामुळें अनंत- 
राबांना तिच्या मालमत्तेच्या वहिचाटीचा अधिकार सहजच मिळाला. आतां 
साधल्यास रायपूरासच राहून कोटे ऑफ वार्डस्‌ माफत आणखी एखाद्या इस्टेटीची 
वहिवाट पहाण्याची नोकरी मिळेल तर फार बरें होईल असें अनंतरावास वाटलें, 
साहेब लोकांत संधान बांधावयास आतां सोप जाईल, मुलीच्या मार्फत मडमाशीं 


गोंडषनांतील प्रियघदा ७८ 


ब अ>>>_>_>--__----4----५०८-ाा------ पाना -- --------प-----:--॥----ा--->--२:२>-८५८ -<>->>-:---शकशा बनाल 


वहिला लागेल, इत्यादि गोष्टी मनांत आणून ' हिदु युरोपीयन लेडीज छुब ' 
आपण स्थापन करवावा अशी त्यानी कमिरनरिणीस सूचना केली आणि छुब 
जर स्थापन झाला तर त्या बाईंचें नाव छुबला देण्यासाठी तिची परवानगी देखील 
मागून घेतली, छुब स्थापन करावयाचा झाला म्हणजे आता निरनिराळ्या 
मालगुजारांकडे वर्गणी मागावयास जावें लागेल म्हणजे मालगुजारांनां हा मनुष्य 
साहेबांस आवुड डता आहे असें कळेळ, जन्मभर तहशिलदारीसारख्या नोकरी- 
मध्यें असतांना लोकानीं आपल्याकडे यावें अशीं संवय पडून गेली होती आणि 
हातीं अधिकार असता जे लोकावर वजन होतें ते आता नाहींसे झालें असें 
पाहून त्यास चुकल्याचुकल्यासारखें वाटत होतें आणि यासाठी ऑनररी मंजिम्ट्रेटी 
मिळाल्यास पहावी असेंही त्यास वाटून त्यानीं ती मिळविली. सरकारी नोकरीचे 
दिवस संपे तरो अधिकारलालसा आणि महत्त्वलालसा संपत नाहीं, 
आणि घरचें खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजावयास लोक याचमुळे तयार 
होतात अशी त्याच्या “ स्वार्थत्यागाची मीमांसा ? एका विद्वानाने केली 
आहे. 


युरोपीयन स्त्रियाशी मिसळताना आपल्या मुलीचें कांही तरी वजन पडावें 
आणि छुञ्ांतील बायकांना साजतील असें गुण तिच्यांत यावेत या हेतूनें बिंब्रा- 
घाईने गाणें दिकावें म्हणून अनंतरावानी आग्रह धरिला, आणि तिला गाणें 
शिकविण्यासाठी हरिभय्याची नेमणूक झाली, 


प्रथमतः हरिभय्याच्या समोर येऊन बसण्यास बिंबानाई स्वाभाविकपणानें 
लाजत असे. बेठकींत येऊन सतार मांडीवर घेऊन परक्या पुरुषासमोर बसणें 
तिला कसेसेंच वाटे. तथापि अनंतरावहि तेथें बसत असत त्यामुळें तिला घैये 
येई, बिंबाभाईचा आवाज गोड होता आणि तिला गाण्याची आवडहि होती. 
नागपुरास ती मधून मधून जेव्हां येत असे तेव्हां नाटकें पहाण्यासहि जात असे, 
हरिभय्याला रायपुरास जेव्हां अनंतराबानीं आणिलें तेव्हां त्याची रहाण्याची 
सोय वाड्यांतच करावी असा अनंतरावांचा विचार होता. तथापि हरिभय्यानें 
गांवंतः खोली घेतली होती आणि दुपारच्या दोनपासून चार वाजेपर्यंत तो 


७९ हरिभय्या मोघे 
शिकविण्यासाठी वाड्यांत जाई. तेथे आल्याने हरिभय्याची द्रव्यदृष्टीने 
चांगलीच सोय झाली. 


केलासवासी हरिहरराब ताबडे याच्या इस्टेटीतून ख्चे व्हावयाचा. त्या 
इस्टेटीच्या एकंदर उत्पन्नाच्या मानानें हरिभय्या मोघे यास मिळणारा चाळीस 
रुपये पगार म्हणजे कांहींच नव्हता. शिवाय त्यास गांवात दुसऱ्या शिकवण्या 
पत्करावयाळा कोणत्याच प्रकारची अडचण नव्हती. रायपुरासू, दुसरें कांहीं 
उत्पन्न व्हाबयास क्षेत्र पुष्कळ चांगलें होतें अत्तांतला माग नाहीं. ठत्तिसगडी 
मुलुख तो ; चमार वगेरे लोकांची वस्ती जास्त. मारवाडी आणि परदेशी 
यांसारखी मंडळी, एकतर ईश्वर भजन करणारे लोक उदल अल्ल्ह यांची गीते 
गाणारे फिरस्ते मृद्‌गे याच्या गायनावर संतुष्ट, महाराष्ट्रीय मंडळीमर्ध्ये एक दोन 
मालगुजार जर सोडून दिलें तर बाकीचा सर्व वग म्हटला म्हणजे कारकुनी 
आणि कारकुनीवजा दुतरे धदे म्हणजे वकिली वगेरे करणारा. त्याच्याजवळ काय 
असावयाचे आहे! रायपुरच्या विठोबा मंदिरामध्ये ह्रिभय्याचें भजनरूपी गाणें 
बगैरे होऊन त्याच्या गानमाधुर्यामुळें तेथील महाराष्ट्रीय श्रोतवंद तजछीन होऊन 
गेला. तेथील मंडळीपैकीं एका जुन्या ग्रहस्थानें त्यास एक मराठी अंगरण्वा आणि 
नागपुरी पागोटें देऊन कीतैनकार देस्त्रील वनविलें आणि तुम्हीं कीतन करीत 
जा म्हणून उपदेश केला. त्याच्याकडून कीतेन होऊं लागलें. हरिभय्याचे 
दुसरे इतर गुण प्रकाशित होऊं लागले, हरिभय्या पन्नास ठिकाणें हिंडला 
असल्याकारणानें त्याला माहिती पुष्कळ होती. त्यानें अनेक गावांतल्या अनेक 
गोष्टी ऐकल्या होत्या, त्याच्या ह्या विनोदपर गोष्टी पुढें येत आणि 
श्रोतृवृंदास प्रिय होत. कीतन करविणें आणि निःवळ गाणे करविणें 
यांत पुःकळ फरक आहे. ज्या लोकांच्या अंगीं स्त्रियांविषयी दाक्षिण्य 
आहे ते घरांत कौर्तन करवितील, कारण बायका कीर्तनाला गेल्या 
तर तें चांगलें अशी लोकांची बुद्धि आहे. तथापि बायकांनीं गाण्याला 
जावें ही गोड शिटसंमत नाहीं. मधर गाण्याचा आस्वाद पुरुषानां मिळतो 
तसा श्रिय्रांनांडि मिळावा अशी ज्या गहस्थाची इच्छा असेल त्यानें कीर्तन 


गॉडवनांतील प्रियंवदा ८० 
आणि भजन यांस उत्तेजन द्यावें असे नागपुरच्या बर्डीवरौल एक विद्वान 
परंतु चेष्टेखोर, तसंच स्वतः सुधारक असून सुधारकाची चेष्टा करणारे एक भले 
ग्रहूस्थ सांगत असत, रायपूरच्या मंडळींनी हरिभय्यास कीतैनकार बनविले 
तेव्हां त्यास अशा प्रकारचे मोजेचे तथापि स्त्रियांच्या हक्काचे कारण पुढें 
करून उपदेश केला नाहीं. ज्या वृद्ध ग्हस्थानीं त्यास पागोटें दिले त्यांनीं 
म्हटलें बाबा रे मधुर आवाज ही ईश्वरी देणगी आहे. त्या मधुर आवाजाने 
ईश्वराची स्तुती करावी की नाटकांतली पदे म्हणाबीं ! तूं हा आपला आवाज 
इश्वर सेवेला लावलास म्हणजे तूं खरोखरच आपलें अक्षय्य कल्याण करून 
दुसऱ्याचेंहि कल्याण करशील. 


हरिभय्या मोघे हे कीर्तनकार बनळे आणि त्याचा उदय या गुणामुळेंच 
विरोष होऊं लागला. कीर्तन पुढ मराठीत करावयाचे तसेंच हिदीतहि करूं 
लाम. त्यामुळ त्याचे गावात बस्तान अधिकाधिक जुळूं लागले. गावातील 
परदेशी, छत्तीसगडी आणि मारवाडी इत्यादी पैसेवाल्या लोकावर याची छाप 
बर्सू लागली आणि त्या लोकाचा “ पंडतजी ?”' बर जसजसा भाव बाहू लागला 
तसतशी याची पेदासही वाढली. दोन श्रैसे जसजसे जळू लागले आणि 
कीतनकार आपण आहोत ही भावना वाळू*छांगली तेव्हा त्यास अधिक अमि- 
मानाने रहाता येऊं लागलें. हरिभय्यात प्रथमत आपण मालगुजारीणबाईचं 
केवळ एक नोकर अगर आश्रित आहोत ही भावना होतो, पण अलीकडे ती 
बदळूं लागळी. आता आपणे गाबांतील एक प्रसिद्ध आणि ज्याविषयीं इतरांस 
आदर आहे असे एक हरिदास आहोंत आणि आपण ब्रिज्राबाईस केवळ 
शिकविण्यासाठी तिच्या घरीं जात आहोंत अशी भावना उत्पन्न झाळी आणि 
त्याचे बिंजाबाईशीं वतैन बरोबरीच्या, प्रसंगी गुरुत्वाच्या नात्याने होऊं लागले, 
पेश्शाचे अस्तित्व आणि अभाव याच्या योगाने समाजांतील पदवी बदलते एवढेंच 
नव्हे तर मनुष्याच्या मनावरच त्याचा परिणाम पडतो. प्रथमतः भय्या जे 
दूर बसत ब साघारणपण भीत भीत बोलत ते आतां अधिक वैर्याने प्रसंमी 
विनोदाने असेहि जिंत्राबाहपाशीं बोळत, बोलताना पूर्वी त्यास प्रत्यक्ष गायन 


टर हरिभय्या मोघे 


शिकवण्याच्या गोष्टी संबंधानें खेरीज करून इतर गोष्टी बोलण्याचे घेय होत नसें. 
आतां, मधून मधून त्यागराजनूच्या, तानसेनाच्या, तेन्नाली रामनूच्या गोष्टी 
सांगत, स्वतः गाऊन दाखविण्याच्या प्रसंगी रागास अनुरूप अशा रसाने युक्त 
अशी आपली मुद्रा बनवीत, कधी हिदुस्थानातील काही गबयांची माहिती 
सागत, कधीं कधीं कांहीं नायकिणींची माहिती सागत, दिल्ली, लघनो आणि 
आप्रा येथीळ नायकिशी कोट्या करण्यांत कशा हुशार असतात हें सागत, संदल 
नायकीण कशी कोट्या करी, कळण नायकीण खुद्द हरी भय्यावर कशी एकदां 
आषक झाली होती हेंहि सांगत. कधीं कधीं स्त्रियाविषयीं भाषण सुरू झाल 
म्हणजे मद्रास, बंगाल, पंजाब, येथील स्त्रिप्राच्या सोदर्याविषयीं अगर 
कुरुपतेविषयीं ज्या कांहीं आमच्या हरिभय्याच्या कल्पना होत्या त्या मुखोद्रीण 


होत. 


बिब्राबाई ही देखील स्वभावतः चौकस, विनोदी आणि रसिक होती. 
ती देखील भय्या अथवा पंडतजी यांस अनेक प्रश्न विचारण्यात कुशल होती, 
आणि प्रसंगीं विनोदाची भाषणें देखील तिला करावीशीं वाटत. एखादी स्त्री 
वैधत्यदशेस पाबली म्चणजे तिच्या मनोवृत्ती वृद्ध स्रीस साजतील अशा प्रकारें 
गंभीर होतात असें नाहीं. कारण मनुष्याच्या मनोवृत्तीस शारीरिक कारणें 
असतात. मनोविकाराबरोबर मनुष्याच्या मरूवर परिणाम होतो आणि 
शरीरांतील क्रियांबरोजर मनुष्याच्या मनावर परिणाम होतो. तरुणपणींच्या 
रक्ता्शी कांहीं प्रकारच्या भावनांचा निकट संबंध असतो, आणि त्या रक्ताच्या 
अभावी भावनाचाहि विलय होतो. बाहेरच्या हवेने जर मनुष्याच्या मनावर 
परिणाम होतो तर दारीरांतील रक्तमासांच्या स्थितीनें कां होऊ नयेत ? असो. 


हरिह्ररावांच्या मृत्यूनंतर आमच्या बिंबाबाईची स्प्रिति फार विलक्षण 
झाली, एवढ्या मोठ्या इस्टेटीची मालकीण मी आहे ही भावना तिच्या 
गेल्या दोन तीन वर्षात चांगल्या तऱ्हेने मनावर ठसली होती. कारकून, नोकर 
इत्यादिकांवरोबर ती मालकिणीसारखी वागे. हरीहररावांच्या मरणानंतर तिला 
मोकळेपगानें जोलावय्रास कोगी उरलें नाहीं यासार'ब झाठें होते, हरिह्रराबांची 
1 


गोंडवनांतील प्रियंवदा 4-4 


आई ही केव्हांच मृत झाली होती. हरिहररावाच्या पहिल्या कुदुंबाची 
कांहीं आप्तमंडळीं हरिहररावाच्या आश्रयास होती. पण त्यांस देखील घरच्या 
माणसासारखे न वागवितां बिंभाजाई आश्रितामाराचे वागवी, आणि त्यांस तुच्छ 
समजे. यामुळें हरिहररावांच्या मृत्यूनंतर जवळचें कोणी उरलें नव्हतें. 
अनंतराव मधून मधून रायपुरास येत, आणि कधीं कधीं बंडूनानाहि येई. 
बँंडूनाना आले म्हणजे मात्र जिंमाबाईस मोकळेपणाने बोलतां येई. तथापि 
अनंतरावांशीं मात्र तिला मोकळेपणाने बोलता येत नसे. बित्राबाईचं अंतःकरण 
स्नेही शोधीत होतें, आणि त्यामुळें हरिभय्या जेव्हा तिला गायन शिकविण्यास 
येऊं लागले तेःहा ज्या मतुष्याभरोजर साधारणपणें बरोबरीच्या नात्यानें 
चोलतां येईल असा एक तरी मतुष्य सापडळा हे पाहून तिला आनंद 
झाला. 


हरिभय्याच्या आणि नवऱ्याच्या नांब्रात साहृर्य असल्याकारणानें बिंबाजाई 
ही आपल्या संगीताचार्यास हरिभय्या असें न म्हणता भय्यासाहेब अगर 
भय्याजी असें म्हणे. पुढे पुढें जेव्हा गावांतील लोक हरिभय्यास पंडतजी 
म्हणूं लागले तेव्हां ही दे वील पंडतजी म्हणूं लागली. 


प्रथमतः ' पंडतजी ' तिला ईश्वरभजनपर, आध्यात्मिक गाणीं शिकवू 
लागले. पुढें या गाण्यापेक्षा काहीं ' दुसऱ्या प्रकारची ' किंवा ' नेहमींचीं ! 
गाणीं आपण शिकवावींत अशी इच्छा बिंभाबाईनें व्यक्त केल्यावरून तो “ दुसऱ्या 
प्रकारचीं ' गाणीं शिकवू लागला. रामजोशाची छेकापन्हुति, कांहीं नाटका- 
तील पदें या प्रकारची गाणीं कशीं म्हणावी ह तिला ह्रिभय्या शिकवू 
लागला, 
सज्करुनि चाप मदन येत मागुनि । 
मार्ग दावी इंदु मळा तम निवारुनी ॥ 


इं पद जेव्हां बिंभाबाई गाऊन दा'ववी तेव्हां पंडतजी वाहता, बाहवा म्हणत 
आणि बिंब्राब्राहईत पंडतजीना आपण गागीं म्हणून खूप करावें असेंहि वाटूं 


८२ हरिभय्या मोघे 


लागलें. कधीं कधीं त्यांचे गाणें बाजूला राहून गप्पाच होत, एके दिवशीं 
एक गाणें पंडतजीनीं स्वतः म्हणून दाखविले, 
अरसिक विधि हा दिसतो मजला विचित्र कृति हा करी । 
स्तबुनिया रिणवूं कां वेस्वरी । 
काव्यरसाचा स्वाद घेति जे कविदर दारिद्यानें । 
पीडिले कितीक या दृष्टाने ।| 
कुंदरदांचे रसिक जे खरे पत्निविण हिंडती । 
चोरिल्या सुसुस्यि धघनवती || 
स्त्री जरि लाघे कुणा सुंदरा, वस्त्रभूषणें तिला | 
द्यावया समथ पति नच केला ॥ 
देवें लाघे सुंदर बाळे द्रव्ये जे अनुकूळ । 
तिजला रसज्ञ दुर्मीळ ।॥ 
सुंदर बाला मधुतरशीला पीनपयोधर जीची । 
चंद्रनिनसम काति दिसे वदनाची ॥ 
वैधव्यानल दाह करितसे तिच्या सोदर्याचा । 
दुष्ट हा ब्रह्मदेव ननु साचा । 
एका वदनें वचनें देई सुखकाक्षा या जीवा । 
दुसरे योजी पुरुषा कार्या || 
ठेवि असंगति विश्वीं कार्यी जीवा त्रासायला । 
चतुमुस्व यास्तव तो ज्ञाहला ॥ 
हें गाणें हरिभय्यानें म्हणून दाखविले त्या बेळेस त्याने आपलें सवे 
कोदाल्यच ओतलें कीं काय कोण जाणे. आकमसाक्षात्कारी अर्थामुळे, आणि 
गाणारा स्वतः तन्मय झाल्यामुळे जो रस उत्पन्न होतो तो श्रोत्यास अगदीं हालवून 
सोडतो. हरिभय्या मोघे हे स्वतः ज्याप्रमाणे रंगून गेलें त्या प्रमागे त्यांची दिष्या 
बिंबाबाई देखील रंगून गेली. विधीच्या दुष्टत्वाला आपण आणि त्याचप्रमाणे 
शायनाचाय हरिभय्या हीं दोघेहि बळी पडत आहेत असें वाटलें, आणि या 


गोंडवनांतील प्रियंवदा ८४ 


२-1: --:>>->:>>>-<<--ाट 


भावनेमुळे आपण एकाच होडींत बसून जाणारीं माणसें आहोंत आणि गावना- 
चा्ये आणि आपण यांच्यामध्ये बरेंच साहइय आहे अश कल्पना होऊन एक- 
भाव उत्पन्न झाला आणि गायनाचार्याचे ह्ृदवत काढून घेण्यासाठीं ती तयार 
झाली, तिनें हरिभय्याचे गाणें संपल्यानंतर विचारलें: 


“ हे गाणें कोठून घेतलें आहे १ ” 

“ तें आमच्या एका स्नेही कवीने लिहिलें आहे. ” 

“ आपले ते स्नेही रायपुरांतच असतील ? ” 

५ होय - नाहीं, ते कधीं कधीं रायपुरांत येतात. ” 

“< मनुष्यानें आपले गुण लपवावेत कां ? खरं कां बोठू नये, सागा पाहूं 
तें गाण आपलंच कीं नाहीं १ ” 

“ होय, तसेहि म्हटल्यास हरकत नाहीं, ” 

“ बुवासाहेब, आपण आपल्या गाण्यावरून तर रसिक दिसतां. आपण 
लझ कां केलें नाहीं ? 


“ माझ्यासारख्याचे लग्न व्हावयाला दोन गोष्टी लागतात. एक तर 
कोणीतरी मनुष्य आपल्या मुलीचें लग्न कसें होईल म्हणून अडचणींत सांपडावा 
लागतो, किंवा-- ” 


:£: किवा काय? ” 


“ पुरुषाचे कान दिसूं लागायच्या पूवी बापानेंच मुलाचें लयन बापाच्या 
जिनगीवर करून द्यावे लागतें. नाहीं तर गाणारे, नाटकी, हरिदास, शास्त्री, 
पंडित इत्यादि लोकांचीं लये होणें शक्‍य नाहीं. ”? 


“ कांबररे १६” 


“ लञझ़ करतेवेळेत आपल्या जांवयाची कायमची सोय काय झाली आहे 
हें सासरा पहाणार, आमच्यासारख्याची कायमची सोय कोर्ठे झाली आहे ? ” । 


र 


८५ हरिभसय्या मोघे 


न ८ अन्न > बटा 00-> नर्र अडी मव. 0. कज नयी न्य, नन णा ए*णणा ह. “2 टणापशणाश0 णा >--><>__.__>“< >...“ 0ै?0ण0ण. णी एप 


“६: त्र मग आतां आपण काय करणार? लग्न कधीं करणारच नाहीं 
काय? ” 

“ असं मुळींच नाहीं. माझ्यापाशीं पैसे जरा सांचले म्हणजे मग 
लोक आपली मुलगी द्यायला तयार होतील, मग त्यावेळेस मी चाळीस वर्षाचा 
असलो तरी हरकत नाहीं. शिवाय कांहीं एकडोळ्या, कांहीं मुक्या अगर बहिऱ्या 
मुली असतीलच, त्याच्यापैकीं एग्वादी आमच्या बांटणीस येईल, ” 


“८ छे! छे! आपण असली मुलगी मुळींच करतां कामा नये. ” 
:: तुर मग काय करावें? ” 


“: काय म्हणजे ? पुनर्विवाह करावा. आपलें वब पंचवीसाच्या वर आहे. 
आपणांस बायको १०-१२ वर्षांची योग्य नाहीं. 


“ पुनर्विवाह ! तो तर बिलकुल शक्‍य नाहीं. ” 

“ कां बरे, तुम्ही काय त्याच्या विरुद्ध आहांत? ” 

५: छे मुळींच नाहीं, पुनर्विवाह शक्‍य नाहीं एवढेच मी म्हणतों. ” 
“£ शक्‍य कसा नाहीं १? ” 


“- पुनर्विवाह जुळवावयाचा कसा £ विलायतेत पुरुष व बायका यांचा 
संबंध वारंवार येतो. आपल्या लोकांत तर्स कोठें होते ? आमचा अगोदर संबंध 
बायकांशी येतच नाहीं. बरें आपल्याकडे कोणी विधवांची ओळख करून द्या 
अर्से म्हटलें म्हणजे लोक म्हणतील कशाला ओळष् पाहिजे ! आज पुनर्विवाह 
करायचा झाला म्हणजे तात्पुरती ओळख व्हावयाची. आज पुनर्विवाहाचे 
प्रचलित मार्ग म्हटलें म्हणजे एखाद्या सुधारक पक्षाच्या पत्रांत जाहिरात द्यावयाची 
अगर पुनर्विबाहोत्तेजक मंडळीच्या सेक्रेटरीमाफंत त्यांच्या सर्टिफिकिटावर लग्न 
जुळबावयाचें. अशा तऱ्हेने बायको मिळवून संसार काय चालणार तें दिसतेंच 
आहे. ११ 


गोंडवनांतील प्रियंवदा ८९ 

“ तथापि आपण वर्तेमानपत्रात जाहिरात देऊन पुनर्विवाह जरी केा 
नाहीं तरी अविवाहित प्रौढ मुलगी का पहात नाहीं ! अलीकडे मुंबई पुण्यास 
तर अश्या मुली पुष्कळ अहेत असें ऐकते. ” 


“ ल॒य़ न होण्यास जीं कारणे सागितलीं तींच प्रोढ वधूबरोबर लम्न न 
होण्यास कारण आहेत,” 


इतक्यांत संध्याकाळची डाक घेऊन एक नोकर आला; त्यानें बिंबाबाईस 
काहीं पत्रे आणून दिलीं. त्यांतील एक पत्र उघडून बित्राबाईनें पाहिलें, तें पत्र 
शारदाबाईचें होतें. 
चिरंजीव बित्रात्रई यांस 

आ. वि. आपले वडिलानी ते रायपुरास असतांनाच मला विचारलें कीं मी 
आपणांस शिकवावयास तयार आहे काय? मौ त्यांस उत्तर दिलें कीं, आपणांस 
विचार करून उत्तर देईन. त्यांच्या मतानें आपण इंग्रजी शिकावे अशी 
इच्छा आहे. आपली यासंबंधीची खरीखुरी इच्छा काय आहे तें कळवावे. 
केवळ आपल्या वडिलाच्या इच्छेमुळें आपल्याकडील द्विकवणी पत्करावयास मी 
तयार नाहीं, कारण आता आपण काहीं लहान नाहीं. तुम्हांला इंग्रजीचा 
उपयोग कितपत होईल याचा विचार करावा, साधारण इंग्रजी येण्यास पांच 
वर्षे तरी अभ्यास करावा लागेल हेंहि लक्षांत ठेवावें, आणि मग उत्तर द्यावें. 
पांच-सहा महिने शिकून सोडून द्यावयाचें असें करण्यांत अर्थे नाहीं, यासाठीं 
आपण विचार करून जे काय ठरवावयाचें तें ठरवावे. हे आशीर्वाद, 


आपली, 
शारदाबाई 
हें पत्र वाचून पाहिल्यानंतर बिंभाजाईनीं पंडितजींस ऐकू जावें या बुद्धीनें 


तें मोठ्याने वाचल आणि पत्र वाचल्यानंतर “ आपणांस या संबंधाने काय वाटते? ” 
म्हणून पंडितजीनां विचारलें, 


८७ राम भाऊंचा उपदेश 
“ इग्रजी शिकून तुम्हांस काय करावयाचें आहे? ” 
“ आमच्या वडिलांची तशी इच्छा आहे. ” 
:£ आपल्या वडिलानीं आपल्यापाशी यार्संभधानें गोष्ट काढली होती काय! ” 
1 होय ११ 
: त्यावेळीं आपण काय उत्तर दिलें १ ” 
“ मी स्पष्ट उत्तर दिलें नाहीं, मी केवळ “* पाहीन ' एवढेंच उत्तर दिले, ” 
“६ यावरून आपली शिकण्याची इच्छा दिसत नाहीं. ” 


“< मला शिकण्याचा कंटाळा आहे. तथापि शारदावराईनी दररोज आपल्या- 
कडे यावें, बोलत जावें, त्यांच्या सहवासांत वेळ जावा असें वाटतें. मला 
एकटीला करमत नाहीं म्हणून शिकविण्याच्या निमित्ताने जरी शारदाबाई येत 
गेल्या तरी करमणूक होईल असे वाटतें, ” 

€ तुम्हांस शिकण्याची आवड नाहीं तर मग आपण गायन तरी कशा 
शिकायला लागलां ! ” 


“ एक तर गायन मला थोडेंबहुत आवडते. हा करमणुकीचा (विषय 
आहे, आणि खरेंच सांगायचे म्हटलें म्हणज आपण गायन शिकविता त्यापेक्षां 
ज्या इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतां त्याच मला अधिक आवडतात. ” 


प्रकरण १० यं 
रामभाऊंचा उपददा 


वाचकहो, इंम्रजींतल्या पुष्कळ कादंबऱ्या वाचतांना आपल्याला अर्से नाही 
कां वाटत, की आपला देश आणि शाळा अगदीं मिळमिळीत. इंग्लंडांत 
गेलेलीं आणि बॅरिस्टरी मिळविणें यासार'वें कोणतें तरी गतकृत्य केलेलीं माणसें 
तुम्हांला असेंच नाहीं कां येऊन भासवीत ! तिथची जनता काय सुशिक्षित, 


गोंडवनांतील प्रियंवदा ८८ 


.- ---:--५---८--< --7-:- ण “४४ शप, 
ब >. >>>>_ालाााा काक आ जयणा 


तिथच्या स्त्रिया सुंदर, आणि मनोरंजक कादंजऱ्यांस साजेल्ह्ा गोष्टी तेथें दररोज 
घडतात, अशीच तुमची समजूत असेल नाहीं ! असेल आणि त्यांत तथ्यहि 
आहे. जेथ संपत्ति, शौय आणि स्वराज्य आहे तेथील स्थिति येथच्यापेक्षां 
निराळीच असावयाची. इंग्लंड देशांतील वर्णनें बाचून तेथील जनतेंत मात्र गक 
होऊन जाऊं नका. निरनिराळ्या प्रकारच्या आयुष्यक्रमातींल चित्तवेधक भागाची 
माहिती झाली म्हणजे भोगाव्या लागणाऱ्या आयुष्यक्रमांविषयीं जुगुप्सा उत्पन्न 
होते, म्हणजे आयुष्यक्रम सुखावह न होतां नीरस होतो. वाचकहो यासाठीं 
अन्यदेशीय परिस्थितीच्या मनोराज्यात राहूं नका. तेथीळ संपत्तीचा मनोहर 
परिस्थितीचा आणि तेथील सुंदर स्त्रियांचा आमच्या लोकांस काय उपयोग १ 
आपल्या घरीं जी मीठभाकर असेल ती गोड करून घेतली पाहिजे, कादंबरी- 
कारानें इंग्लंडची स्थिति बणेन करून आपल्या लोकांचीं मनें रिझवून फायदा 
नाहीं. आपल्या देशांत मोहकता पुष्कळ आहे, कादंबऱ्या लिहिण्यास साहित्यहि 
पुष्कळ आहे. तेंच चांगलें धुडाळून कादंबरीकारानों, उपयोगांत आणा, लोकरंज- 
नाच्या बाबतींत देखील सुशिक्षित स्वदेशी त्रत पाहिजे, परक्या देशांतील कादंबऱ्या 
आणून त्यांवर स्वदेशी पेहेराव तुम्ही किती चढविणार ! येयेंच जें सांपडेल 
त्याची मनोवेधकता ओळग्वा आणि आपल्या लोकांच्या नजरेस आणा. 


परक्या देशात मधून मधून जाण्यास हरकत नाहीं आणि परकीय समा- 
जाच्या वर्णनात्मक अद्भुत रसात एखाद्या वेळेस अवगाहन करण्यास हरकत नाहीं. 
आपले लोक परक्या देशात जातात, त्या अर्थी स्वजनांचे ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्या 
कादंभरीकारानें त्याच्यावरोबरहि विदेशांत गेळे पाहिजे, वाचकहो, तुम्हांस 
येथून आतां मी एकदम नेतों आणि शोपडंबुदाच्या प्रदश्धनांत नेऊन सोडतों. 
तुम्हांला आमच्या विदेशी गेलेल्या प्रियंवदेच्या प्रिय रामभाऊची काळजीच 
पडली असेल. 


रामभाऊंची स्थिति त्याच्या आइस काळजी बाळगण्यासारखीच होती. 
एकोणीस वर्षांचा तरुण आणि तो अनेक मोहांनीं भरलेल्या इंग्लंडांत गेला 


८९ रामभाऊंचा उपदेदा 
आणि त्यांतल्या त्यांत लंडन येथें ! या प्रकारें स्थिति असता कोणत्या आईच्या 
मनांत काळजी उत्पन्न होणार नाहीं ! 


रामभाऊ लंडन येथ मिडल टेंपल नावाच्या एका इन्‌मध्ये बॅरिस्टरीचे 
दिवस भरण्यासाठीं जेवणें खात होता. जेवणें स्वात होता याचा अर्थ काय हें 
बऱ्याच वाचकांस ठाऊक असेलच. ज्याप्रमाणें इकडे विद्यार्थ्रा काळेजांत किती 
दिवस हजर होता हें पाहतात त्याप्रमाणें तिकडे कायदेपंडिताच्या खाणावळींत 
हा किती दिवस जेवायला होता हे पाहतात. 


रामभाऊला इंग्लंडास जाऊन आज दीड-दोन वर्षे होऊन गेली होतीं. 
आज संध्याकाळीं तो शहशिपाद लाहा नावाच्या एका जंगाली विद्यार्थ्यारोजर 
आणि त्याच्या एका “ गळे ” बरोजर शोफडंबुरचें प्रदशन पाहण्यासाठी गेला 
होता. शशिपाद आणि आयडा हीं हातांत हात घाठून काहीं प्रेमोन्मादित 
वाक्यें आपापसात बोलत चाललीं होतीं. रामभाऊ साधारणतः मुग्ध होता 
आणि मधून मधून त्याला उद्देश्यून काहीं बोललें तर त्याची उत्तरे तो देत असें. 


“ मि. गॉडबॉल, आज आपण अगदींच मुग्ध १ ” 


“ दोहोंमध्ये सहवाससौख्य मिळतें, दोहोंचीं तीन झालीं म्हणजे ती 
गर्दी वाटावयाला लागते. मी म्हटलें तुम्हा दोघांच्या सुखसहवासात आपण 
गर्दी कां करां ? ? 

“ मि. गाडबॉल, तुम्हीं आपल्याबरोबर आणखी एक तरुणी कां घेतली 
नाहीं ! तुम्हीं आपल्याबरोबर एक घेतली असती म्हणजे तुम्हांला एकटें 
नसतें चालावें लागलें. तुम्हाला आमची मात्र गर्दी झाली भसती. ” 


“ मीं तसें केळे असतें पण माझी बायको मारील ना मला, तिला असं 
कळलं तर! ” 
“ काय तुमचे लम झालें आहे! ' 
ट्‌ होय. १9 
12 


गोंडवनांतील मियंघदा ९७ 
“: आणि तुमची बायको हिंदुस्थानांत दुसऱ्या कोणावरोजर फिरावबास 
गेली तर! ” 
“६ शेली तर गेली, तिळा ठाऊक आहे कीं मी तिला बिलकूल हरकत 
करणार नाहीं, ” 


“५ किती भाग्यवान बायको ! नवरा इतक्रा मत्सरविरहित मिळाला ! ”? 
आयडाच्य़ा बोलण्यात खोंच होती तरी ' गॉडबील ? नें ती आपणास समजलीच 
नाहीं असें दाग्वविलें. काहीं पावलें पुढें गेल्यावर आयडा पुन्हा म्हणाली-- 


“ तुमची बायको कितपत गोरी आहे! त्या समोर तंत्राखूचें आणि 
खेळण्याचे दुकान आहे त्यात बसलेल्या हिंदुस्थानी बाईइतकी आहे काय ? ” 
असें म्हणून आयडा फिदी फिदी हसू लागली, 


शेफडेबुडाच्या प्रदेशनात कांहों हिंदुस्थानी स्त्रीपुरुष दुकानदार म्हणून 
आणली होती. एका दुकानांत हुक्के, बाहुल्या गुडाखू इत्यादि पदार्थ ठेविलें 
होते. त्या दुकानात काहीं मद्रासी आया देखील आल्या होत्या ; त्याच्याकडे 
या तरुण मंडळीने बोट दाखविळ. काहीं मद्रासी आयास इंग्लडमध्येंच नोक- 
रीकर घेऊन ठेवले होतें कारण इंग्लंडमध्ये मद्रासी आया, मुसलमान ग्वलाशी 
आणि मुसलमान स्वयंपाकी रस्त्यातून हिडताना आढळतात, पुष्कळदां कित्येक 
बिश्वासघातकी इंग्रज दिंदुस्थानी आयांनां बरोबर नेतात आणि पुढें त्यांचे जुळले 
नाहीं म्हणजे त्यास बेधडक रस्त्यात ढकळून देतात, त्या आयांनां आणि 
रिकाम्या खलाशाना अडचणीच्या वेळेस रहाण्यासाठीं ' आंग्लोइंडियन 
लोकांनीं एक ग्रह काढलें आहे आणि त्या ग्रहासाठीं म्हणून हिंदु राजेरजवाडे, 
काहीं आंग्ल देशस्थ सुखवस्तु हिंदु इत्यादिकांपासून वगणी काढली जाते 
आणि ती वर्गणी गोळा करणार्‍या इंग्रज कमिटीचे हिंदुस्थानवर उपकार लागूं 


होतात. 


पॅरिस दाहरांत १९११ साली १०-१२ हिंदुस्थानी बायका वेद्यावृत्तीने 
रहात होत्या. पॅरिस येथील हिंदुस्थानी वेश्यासंभंधीं उछे'व इंग्रज आणि फ्रेंच 


९२ रामभाऊंचा उपदेश 


र-:--><>>>>-:-:>:->>२>> 


बेद्यकीय वाड्मयांतून कधीं कधी येतो. या बायका हा धंदा करण्याकरिता इतक्या 
दूर कशा आल्या अश्शी चौकशी केली असतां त्या मूळच्या मालकाने त्याग 
केलेल्या आया ! आहेत असा पत्ता लागतो, अशाच कोणत्या तरी बायकापेकीं 
एखादीस पापमारगापासून सोडवून तिला ईश्वरमजनी लावण्याचे श्रेय कोणी 
मुक्तिफोजेचा लेफ्टनंट खिस्तास देतो आणि तिच्या हातीं डफ अगर टाळ 
देऊन तिला न्यूयॉक आणि न्यूजसीच्या रस्त्यातून फिरवितो आणि आपल्या 
फौजेसाठीं पैसा मिळवितो. 

आयडाच्या प्रश्नास रामभाऊनें उत्तर दिलें कीं-- 

< माझी बायको मजपेक्षा गोरी आहे, तिचा गोरेपणा इटालियन बायकां- 
इतपत येईल. ” 

“ एका क्वाटरभर फ्रेंच काफींत किती दूध मिसळले म्हणजे त्या कांफींत 
तुझ्या बायकोचा रंग येईल ! ” 

रामभाऊनें प्रश्नास उत्तरादाखल म्हणून स्मितमुख केलं. नतर काही 
वेळानें एक जवळच फराळाचे दुकान दिसले, त्यांत तिन्ही माणसें फराळास 
बसलीं. फराळ आटोपल्यानंतर शशिपाद लाहा यानें सिगारेट्‌ काढल्या, त्यापैकीं 
एक आपल्या प्रियकर आयडास दिली आणि एक आपण घेऊन, सिगारेटांचे 
घर रामभाऊपुढें केले, आणि ' माफ करा, तुम्ही ओढीत नाहीं म्हणून विसरलो 
होतों ' असे म्हणून तीं परत घेतली. 


आयडास “ गाडबॉल ” वर टीका करण्यास तेवढेच पुरं झालें; तिने 
सिगारेट पेटवून तिचे झुरके घेत घेत “ तूं काय आतां धर्मोपदेशक होणार 
आहेस १ ” असा प्रश्न केला. हा एवढा हुशारीचा प्रश्न ऐकून दशिपाद मोठ- 
मोठ्याने हंसू लागला, 

ही त्रयी तेथे बराच वेळ बसली होती. त्यांच्या गप्पा देखील बऱ्याच 


झाल्या, पण त्या गप्पांची विविधता फारशी नव्हती किंवा त्या गग्पांचें स्वरूप 
सुशिक्षित वर्गास मोठें रुचकर वाटेल अश्शांतलें नव्हते. सामान्य हायस्कुली 


भोड्यनांतील ब्रियंवदा "९४ 


असाल म्हणून बेधडक बोलावें आणि तिची सोळापासून बीस वर्षीची मुलगी 
बरोबर असली तर ती ' आपलो धाकटी बहीण वाटतें ? असें म्हणावे. असो, 
मला आणखी काहीं सागाबयाचे नाहीं. हें सागतां सांगता मला थोडीबहुत 
धास्तीच वाटते आहे की हें वय लपविण्याचे ढंग आपल्याकडील आतांच्या 
सुशिक्षित बायका तर नाहीं ना उचलणार ! 


“ शाबास |! मि. रामचंद्रराव, बायकांची गुह्य काढून घेण्याची तुझी कला 
अवर्णनीय आहे, ” 

:: बरें तर मग, तिचा तूं जन्मकाल कशासाठीं आणला आहेस £ ” 

“ पत्रिका पाहून तिचें आणि माझें जमेल कीं नाहीं हें पहाण्यासाठी, ” 

“ तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय £ ” 

“८ माझ्या मनात तिला मागणी कराबयाचची आहे. ” 

“ आणि यासाठीं तूं फलज्योतिष पाहून विचार करणार ! ” 

दट होय, 293 

“ तूं अगदींच वेडा आहेस, ” 

“: तो रे कसा ? तुझा फल्ज्योतिषावर विश्वास नाहीं काय ? ” 

£ अरे बाबा, ' उद्यां सूर्योदय होणार कीं नाहीं? * या प्रश्नावर किंवा ' दोन 


आणि दोन मिळवून चार होतात कीं पांच होतात! या प्रश्नावर उत्तर मिळ- 
बिण्यास तूं फलज्योतिघ्राकडे का धाव घेत नाहींस ? ” 


“ कारण खरा निर्णय जर सहज साधारण अकलेच्या माणसास करतां येतो 
तर मी फलज्योतिषाकडे कां धांव घ्यावी? ” 


: स्पष्ट ज्ञान जर इतर गोष्टींच्या सहाय्याने होत आहे तर फलज्योतिषांकडे 
जाणें योग्य नाही. आणि शिवाय फल्ज्योतिषानें केवळ अदमायच काढतां 
ब्रेणार ही गोष्ट तुला ठाऊक आहे एकूण? 


गी रामभाऊंचा इफ्केदा 


“ ठाऊक नसायला काय झालें १ ” 

“ समजत भसून उमजले नाहीं असें दिसते, ? 

“ तें कसें १ ” 

“ तुला सहज तर्काने समजणार आहे की आयडाधरोबर लम केल्याने 
तुला सुख होणार नाहीं. ” 

“ हें तूं खात्रीपूवेक सांगतोस १ ? 

6 अगदीं खात्रीपूवक. » 

“६ आणि केवळ साधारण तर्काने ? ” 

“< अगदीं साधारण तर्काने. ” 

“ अरे लोकमत माझ्याविरुद्ध होईल एवढें सांगितल्यानेच माझे समाधान 
होणार नाहीं. लोकमतास फांशी देऊन टाक, ” 

“: लोकमत तुझ्या तर्फेने होणार नाद्दी, कारण त्याच्यायोगाने समाजाचें 
अकल्याण होणार आहे. तथापि लोकमत विरुद्ध होऊन तुझें नुकसान झोण्या- 
सारखी देखील स्थिति नाही, ” 

कां?” 

“6 लोकमत आज पूणपणे नपुंसक बनले आहे. कसंतरी करून पोटाची 
खळी भरावी. शक्‍य झाल्यास इंग्रजांकडून मान मिळवाक याखेरीज ज्या 
लोकांपुढे ध्येय नाहं, असा हिंदुस्थानांतील सुशिक्षितांचा मध्यम वग बनला 
आहे. असल्या नपुंसक हिंदु लोकमतास न मितां, आम्ही अमुक अमुक करतों 
अशा तऱ्हेची बढाई किलक नपुंसकांस मारण्यास ' लोकमत ' हा शब्द उपयोगी 
पडतो एवढेच. ” 

“६ छहोकमत विदद्ध होईल तरी तेगेंकल्न आयुःय सुखाने जाण्यास अडचण 


होणार नाहीं, अशी जर तुझी विचार्पद्धति असेल, तर तूं कोणत्या दृष्टीने हे. लनन 
सुपरिगामी होणार नाहीं असें म्हणतोस ! ” 


गोॉडवनांतील प्रियंवदा ९६ 


नना “नना 
पट ----८-प:---- "दप पपशशशश0शीश0ी0श0 णत ीण0ण0 0 "शी 0ीशी 0010 ?0)”ी?0ी0ीए७0ी 00 शी 0 ती शी 0 ती 


£ केवळ तुझ्या हिताच्या दृष्टीने आणि- ” 
“६ आणि ' काय? ” 
४६: आयडाच्या हिताच्या दृष्टीने. ” 


तुझे मत असे अहे काय, कीं माझ्यासारख्या हलक्या जातीच्या ( इन्फिरि- 
यर रेस ) मनुष्याशीं लम केल्यामुळें आयडा फशी पडेल १ तिला आपलें कल्याण 
अगर अकल्याण कळत नाहीं काय! ” 


“ तुझ्यासारख्या द्दिंदुस्थानांत जन्म झालेल्या मनुष्यास जर हिंदुस्थानांतील 
सामाजिक स्थिति लक्षांत घेऊन विचार करतां येत नाहीं. तर आयडातारख्या 
मुलीला काय बिचार येणार ? ” 

“ घृण आयडाला जर स्वार्थत्याग करून मजबरोबर लग्न लावावयाचे 
असेल, आणि जी स्थिति माझी तीच तिची अर्से समजून घ्यावयाचे असेल तर 
काय हरकत आहे? ”? 

“ आयडा तुझ्याबरोबर लय़ करण्यांत मोठासा स्वार्थत्याग करीत नाहीं.” 

“ कांबरें? 

“ तूं जित राष्ट्राचा खरा ! तथापि जित राष्ट्रातले ते सर्व लोक हलके असे 


ज्याप्रमाणें हिंदुस्थानातील इंग्रजास वाटतें तसें येथील इग्रजास वाटत 
नाहीं, ? 


“ तर मग आयडाला माझ्याशीं लयन लावण्यात काहीं फायदा आहे कीं 
काय । 29 


“ चाभाराच्या मुलीस भावी ब्यारिस्टरशीं लम्न लावण्यात कांहीं फायदा 
काद्दींय नाहीं काय ! ” 


€ तिचा माझ्याक्षीं लग्न लावण्यात जर फायदा आहे तर तिच्या हिताच्या 
दृष्टीने तूं या ल्झाचा निषेध कसा करतोस ? ” 


“ कारण आयडास दुसरी बाजू अजून दिसली नाहीं, ” 


९७ रामभाऊंया उपदेश 

: तर मग आयडाची माझ्याबरोबर लग्न करण्याची जी इच्छा आहे ती 
केवळ स्वार्थमूलक आहे ? रामचंद्रराव, तूं आयडाविषयीं निष्कारण वाईट मत 
बनविलें आहेस, तुला आयडाचा स्वभाव कळला नाहीं. ” 


“ बुरे आहे; शाक्षिपाद, आयडा आहे फाकडु आणि गोड मुलगी, 
मोठी निष्कपटी पण तरी देखील सांगतों कीं तूं तिच्याबरोबर लम्न करणें हितावह 
नाही, ” 

“ कां बरें ? तिचा स्वमाव मला आवडतो, ती सुंदर आहे, मी तिला 
आवडतों असं जें ती दाखविते तें देखील सरळ दिसतें, ” 


“ माझे असें म्हणणे मुळींच नाहीं कीं ती ज॑ प्रेम दाखविते तें वरवरचे 
आहे. तें तिचे प्रेम आज अगदीं मनापासून आहे. ” 

“ तिचे प्रेम मजवर आहे तें खरे नव्हे काय? ” 

“ बाबारे, खरे प्रेम आणि खोटें प्रेम असे वर्गीकरण एखाद्या विशेष 
कालाच्या परिस्थितीसंबेंधाने मात्र म्हणतां येईल. आनन एखाद्या स्त्रीचे 
तुझ्यावर आणि तुझे तिच्यावर खरें प्रेम असलें म्हणजे तें चिरकाल टिकेल अस 
थोडेच भाहे ? ” 

“ बाबारे, प्रेम जर चिरकाल टिकणारे नसेळ तर ते खरें प्रेमच 
नव्हे, 

“ चिरकाल जें प्रेम टिकेंल तेच खरें अशी जर व्याख्या केली तर खरें 
प्रेम असे जगांत कोठेंच आढळून येणार नाही. ” 


“ तुझे मनच मला हलकें दिसतें, नाहीं तर स्वेच प्रेम खोटें असे वू 
म्हणाला नसतास, ” 


:: असेल माझे मन हलके, मी त्या टीकेस आक्षेप घेत नाहीं. मला 
एवढे ठाऊक आहे कीं, स्त्रीपुरुषांमध्यें जे प्रेम असतें त्यास भरती ओझहोटीचे 
नियम लागू पडतात, स्त्रीपुरुषांमध्ये होणारे प्रेमकल्हृ सोडून दिळे तरी, 

13 


गोंडवंनांतॉठि प्रियंवदा ९ टॅ. 


ज्यांच्या योगाने स्त्रीपुरुषांमध्ये परकेपणा येतो अगर अंतर उत्पन्न होते असले 
प्रसर्ग अनेक आहेत. 


त॑ मनात योजितोस त्याप्रमागे मिश्रलझ सोडून सामान्य प्रतीचे लम 
जरी घेतले तरी देखील, स्त्री पुरुषांत अंतर पाडणारे अनेक प्रसंग उत्पन्न होतात.” 

“ उदाहरणाथ ? ?? 

:: नुवरा आणि बायको याच्या स्वभावातील आणि विचारातील अंतर 
हा एक, घरातील दुसर्‍या मंडळीशीं म्हणजे भाऊ, आई इत्यादि मंडळीशीं 
बायकोच न जुळल्यास आणि पुरुष बायकोच्या तंत्राने न चालल्यास बायकोच्या 
मनांत नवऱ्यावर होणारी इतराजी, या दोन गोष्टी इंग्रजी आणि आपल्या अशा 
दोन्ही समाजांत आढळतात, शिवाय अनेक गोष्टींमुळे इंग्रज बायकांस आपलें 
नवरे आवडेनासे होतात. ” 


€ त्या गोष्टी कोणत्या ? 


६ पाश्चात्य समाजांत पुरुषांमध्ये एग्वादी स्त्री प्राप्त करून घेण्यासाठीं 
आणि त्याचप्रमाणे स्त्रियामध्य एग्वादा विशेष पुरुष प्रात्त करून घेण्यासाठीं जी 
धडपड लय़ापूर्वी असते, ती बर्‍याच अंशीं लम्नानेतरहि कायम रहाते. समाजा- 
मध्ये निरनिराळे पुरुष आणि निरनिराळ्या स्त्रिया याचा संपर्क झाल्यामुळें त्या 
प्रसंगीं आपल्या नवऱ्याचे प्रेम कायम रहावें म्हणून बायकाना अशी धडपड 
करावी लागते तशीच पुरुषांसही करावी लागते. आपल्याकडे देखीळ थोडा- 
बहुत हाच प्रकार आढळून येतो. बिजवर नवऱ्याला तरुण नवरीचे प्रेम कायम 
ठेवण्यासाठी काय सायास पडतात ! 


वैवाहिक संबंध कायम रहावा म्हणून स्त्रीपुरुषांना अनेक प्रकारचे शिक्षण 
दिले जातें. पातित्रत्य धम, एकपत्नी व्रत इत्यादि धमेतत््वे शिकविली जातात, 
तुझी परंपरागत उपदेशावर श्रद्धा नाहीं, तुहंया आयडास तूं आपल्याकडील 
धर्माची आणि संस्कृतीची गोडी उत्पन्न करून दिली नाहीत त्यामुळें ज्या कल्पना 
तुला आदरणीय होऊन, त्याचे तुम्हां दोघावर वजन पडून तुम्हां दोघांस 


९९ रामभाऊंचा उपद्रेश्ा 
नीतिमार्गात ठेवतील अश्या कल्पना देखील तुमच्यापाशी नाहींत. आज आपण 
बहुतेक नास्तिक मंडळी झालों आहोंत. वेदव्यासाचे अमुक वाक्य म्हणून 
तें आपण पाळलें पाहिजे असें आपणांस वाटत नाहीं. ब केवळ उपयुक्ततेच्या 
दृष्टीनें विचार करून जे नीति नियम काढतो त्या प्रमाणे आपण वागूंच असें 
नाहीं. त्यांत आपण कायदा शिकलेली मंडळी, पुढें वकिलीच्या धद्यांत 
पडणार, त्याच्या योगानें आपणास आज अशी संवय लागूं लागली आहे काँ 
आपण वाटेल तें करावें, आणि आपण जें करूं तें सिद्ध करण्याकरितां कायद्याचें, 
नीतींचें अगर धमेशास्त्राचें समर्थन पुढें करावें आणि जे आपणास ज्या काळीं 
फायदेशीर पडेल त्याचे आपण समर्थन करून मनाची समजूत करून घेऊं 
लागलों आहां. ” 

“ पडितजी, आपण मला लग्नाविषयी मत सांगणार कीं धमेशास्त्रावर 
मजपुढें व्याख्यान देणार १ ” 

“ व्याख्यानाला घाबरू नकोस, माझ्या बोलण्यांतील मुख्य सारांश असा 
कीं लम़ झालें तरी नवराब्रायकोस एकत्र जोडून ठेवण्यास त्याच्यामधलें प्रेम 
पुरेसे होत नाहीं. त्यास जोडून ठेवण्यास प्रेमा शिवाय अनेक गोष्टी लागतात. 
एकतर त्यांस होणारी मुलें, दुसरें नीतिकल्पना व तिसरें लोकमत, नीतिकल्प- 
नाच्या बाबतीत तुझें लम अपुरे जोडलें जाईल, आणि लोकमतहि तुम्हांस 
संयामक होईल असें वाटत नाहीं. तुम्ही नवराबायको, इंग्रजी समाजांतून त्या 
प्रमाणेंच हिंदु समाजांतून वगळली जाणार, अर्थात्‌ हिदु समाजांतील ढोक- 
मताचा पगडा तुझ्या मनावर रहाणार नाहीं आणि इंग्रजी पमाजातील लोकमताचा 
पगडा तुझ्या बायकोवर बसणार नाहीं.” 

“६ जळो तें लोकमत ! ” लाहा उद्गारला, 

“ या तुझ्या उद्गारांनीं माझ्या मनाची अधिकच खात्री झाली. ” 

“ बरें तें असो, आपण सर्व लोक इंग्रजांची बरोबरी करूं इच्छितो ना! 
तर मग इंग्रज जातीशी आपला संबंध डळल्यानें आपली पदवी उच्च नाहीं कां 
होणार ? ” 


गोंडबनांतील प्रियंवदा १०० 


“ मला जे पाहिजे होतें तें आपोआपच तुझ्या तोंडांतून आलें, तुला 
इंग्रजांशी समता पाहिजे काय ! तर मग तू इंग्रज पोरीशीं लम़ करूं नकोस; कां 
कीं तूं ज्या अर्थी इंग्रज पोरीशीं लम करण्यासाठीं हपापठेला आहेस अर्से :दाख- 
वितोस त्या अर्थी इंग्रजापेक्षां मी हलका आहे असें कबूल करतोत असें झालें, 
ज्या जुन्या लोकांवर तुम्ही वेडगळ ब्रह्मो तोंडसुख घेतां ते हिंदु इंग्रजांस तुच्छच 
मानितात आणि त्यांच्याबरोबर लम करण्यासाठीं तुझ्यासारखे ते हपापणार 
नाहींत, ” 

: बरें तें राहूं दे. आह्यां दोघांचे आयुष्य सुरवानें जाईल कीं नाहीं ? ” 

“ मी तुला एवढेंच विचारतो कीं, सध्यां तुम्ही प्रेममय वाक्यें बोलत 
आहां तीं तंपून गेलीं अगर तुम्हांस तीं बोलण्याचा कंटाळा आला तर तुम्ही 
परस्परांपाशीं बोलत तरी काय बसाल ? ” 

£ मि. रामचंद्रशव, तुम्ही अगदीं पेसिमिस्ट आहां. प्रत्येक गोष्ट तुम्ही 
दुःवसूचकच समजतां. 

:£: माझा नाइलाज आहे. मला जें ग्वरें वाटलें ते सांगितलें 
पाहिजे. ” 


प्रकरण ११ 
राम भाऊंस उपदेदा 


शशिपाद निघून गेल्यानंतर रामभाऊ स्वतःच्या मनाशी विचार करीत 
पड, “ बरें झालें आपलें लम्न झालें आहे, नाहीं तर या इंग्रज तरुणींच्या 
मोहपाशांत आपणहि नसतो कां सांपडलों ! ” इत्यादि विचार त्यांच्या मनांत 
घोळू लागठे, “ अहाहा ! माझ्या प्रियेंवदेसारखी एक तरी मुलगी येथ माझ्या 
दृष्टीला पडत आहे काय ! काय येथच्या पोरींचा थिळरपणा ! पण प्रियेवदेसारख्या 
रतनाचा आणि माझा जो हृढ परिचय झाला, तो माझे लम्न झालें नसतें तर कोठून 


१०१ रामभाऊंस ढपदेदा 


झाला असता । स्त्रियांशी प्रत्यक्ष सहवास जर मला झाला नसता तर येथील 
स्त्रियांच्या स्पर्शाने, कटाक्षाने, व स्मिताने मी किती हुरळून गेलों असतों ? ” 
इत्यादि गोष्टी रामभाऊंच्या मनांत आल्या. हिंदुस्थान सोडल्यापासून असा 
एकहि दिवस गेला नाहीं कीं, ज्या दिवशीं रामभाऊंस प्रियंवदेची आठवण 
झाली नाहीं. आज रात्रीं मात्र त्यांस प्रियवदेची फारच आठवण होत होती. 
६ काय तिचे आमंदी वर्तन ! गोड बोळून दुसऱ्यास आनंदांत ठेवण्यांत ती किती 
तत्पर ! तिचा विनोद तरी किती उच्च तऱ्हेचा ! रसिकता तिच्यापाशी किती 
तरी ! तिच्या तोंडांतून योग्य प्रसंगी सुभाषितमय संस्कृत 'छोक ऐकला म्हणजे 
त्यानं जो आनंद होई आणि त्यानें ज॑ तादात्म्य वाटे ते कोणत्या तरी इंग्रज 
मुलीच्या सहवासानें वाटेल काय १ ” इत्यादि विचारांत गर्क झाल्यामुळे राम- 
भाऊंस झोंप येईना, त्यांतल्यात्यांत ते जूनमधळे दिवस, संध्याकाळ नऊ वाजतां 
होई, रात्रीं घरांत थोडासा ऊष्माच वाटे आणि क्वचितच दिसणारे बाहेर स्वच्छ 
चांदणे, अश्या वेळेस रामभाऊंस अगदींच झोंप येईना, तो उठून उभा राहिला 
आणि बटन दाबून त्यानें खोली विद्युद्दीपप्रकाशमय केली. आणि टेबलावर 
स्मितमुख जो प्रियंवदेच्या फोटो ठेविला होता, तो उचलून त्याचें अनेकवार चुंबन 
घेतळे, *“* प्रियंवदे, तूं आतां काय करीत असशील? निजली असशील? हे, 
यावेळेस तर नागपुरास दिवस आहे, यावेळीं तूं कांहींतरी कामांत गक झाली 
असशील. प्रियंवदे, तूं माझी संरक्षणकती आहेस ! पुरुषास स्त्रीचा संरक्षणकर्ता 
म्हणतात पण हें किती तरी खोटें! आजकाल या जगांत जे अनेक मोह आहेत 
त्यांपासून पुरुषाचं संरक्षण करणारी खरोखर सद्रुणी भार्याच होय. पुरुषाचे 
जीवनवृत्त एक-कललीपणारचें होणार असल्यास, अगर वाजवीपेक्षा बेफिकीर होणार 
असल्यास, मनांत येणाऱ्या अनेक कल्पनांनीं उत्पन्न केलेल्या मृगजळाप्रमाणें 
विनाश पावणारे असल्यास, त्यास नाजुकपणानें आणि मोहकतेनें स्रीपासून अव- 
रोध होतो आणि त्यामुळें जे संरक्षण मिळतें तें दुसऱ्या कशाने मिळणार आहे??? 


याप्रमाणें विचार करीत रामभाऊनें टेबलांतून एक कागदी पेटी काढली; 
या पेटींत अनेक पत्रे होतीं, तीं रामभाऊ वाचून पाहूं लागला, वाचकहो, त्या 


गॉंडवनांतील प्रियंवदा १०२ 


प्रज्ञांकडे आपण नजर फेंकूं नका, त्यांतलीं जीं तुम्हांस दाखवण्यासारखीं कांहीं 
पत्ने आहेत तीं मी तुम्हास दाखवितोंच, 


पत्र १, 
मुक्काम नागपूर, ता. १३ डिसेंबर. 
माह्या लाडक्या नवऱ्या, 


कसें काय पतिराज ! या तऱ्हेची सलामी आपणांस कशी काय आवडते ! 
आतां -आपण इंग्लंडमध्ये गेला, आणि आपल्या चवी देखील आजकाल इंग्रजीच 
ब्रनल्या असतील, म्हणून नेहमींचा आफ्ला मराठी मायना टाकून आज मी 
इंग्रजी पद्धत स्वीकारीत आहे, तुम्हांला ही षद्धत आवडत असेल तर कळबा; 
नाहीं तर मला माझ्या जुन्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, 


माझ्या दोन महिन्यापूवीच्या पत्रावरची आपली टीका वाचली, मी 
प्तासूजाईना जी इंग्रजी कादंबरी वाचून वाखविली व जिच्यात रॉबटे म्याकफील्ड 
हा बेरिस्टरीचा अभ्यास करणारा विद्यार्थी एका तरुण नटीच्या नादीं .लागून 
यानें आपल्या आयुष्याची नासाडी करून घेतली हें दाखविलं होतें, तिचे 
तंविधानक लिहून आपणाकडे पाठविलें, आणि सासूब्राडेना कशी काळजी लामली 
हे त्या सोबत लिहिलें होते. आपण त्याच्यावर जे मार्मिक उत्तर लिहिलें तें मी 
भले. आपल्याला असं वाटतं का कीं सासूबाईनां काळजी लागली म्हणून जे 
प्री लिहिलें तें सवे खोटें ! आपण उत्तरी लिहितां कीं काळजी मलाच लागली 
आहे, आणि सासूबाईनां काळजी लागली म्हणून जे मी लिहिलें ते केवळ, 
स्वतःची भीति ल्पविण्यासाठीं केलेलें मिष आहे. आपण थोडक्यांत घसरळा, 
बायकांना, आणि आजकालच्या बायकांनां, खोटें बोलावयाश्चें असलें ( आगि 
खोटें सवेच बायकांनां बोलावें लागतें ) म्हणजे त्या सगळेंच खोटें बोलत अगर 
लिहीत नाहींत, त्यांच खोटें बोलगेंहि अधिक सुशिक्षित झालें आहे, ही गोष 
क्ञीशिक्षणाचे वेरीदेखील कबूल करतात, मी कोणत्याशा इंग्रजी पुस्तकाच्या 
मराठी भाषातरांत परवां असं वाचलं कीं, हुशार इंग्रजी बाईस जर नवबऱ्यास 


१०२ रामभाऊंस उपदेश 


अप्रिय अशा एखाद्या घरीं जायचें झाळें तर नबर्‍्यास प्रिय अशा एखाद्या घरी 
ती' मुदहराम जाते आणखी त्याबरोबरच ती नवऱ्यास आप्रिय अश्या घरीं देखील 
जाते आणि बाहेर कोठें गेलीस असा नवऱ्याने प्रश्न केला म्हणजे त्या नवऱ्याच्या 
आवडत्या कुटुंभाचें नाव सांगते. आणि असं झालं भ्हणजे-- 
न चारिहिंसा विजयश्च हस्ते । 

असं होत, खोटं बोलण्याचेंहि पाप लागत नाही. आणि स्वतःचा कार्यभाग 
होतो. तें पुस्तक वाचल्यानंतर मला वाटूं लागलें कीं, एवढेंच शिकण्यासाठी 
इंग्लंडांत कशाला जावयास पाहिजे ? एवढी हुशारी आपल्याकडच्या बायकां- 
तहि आहे, सर्व बायकांत अवगत असलेली ही कला मला अवगत नाहीं 
असा आरोप मजवर कां करतां ? इंग्लंडमधल्या नटीसंबंधानें मला कांय धास्ती 
पडली हें मी कोठे लिहिलं ? मीं फक्त सासूब्राईनां काय धास्ती पडली हेंच 
लिंहिळे, मी स्वतःच्या मनोवृत्ती विषयीं मुग्धता ठेवली. 

नवऱ्यावर अविश्वास ! काय ही प्रियंवदा फाजील पोर झाली हो! 
असं कां आपण म्हणता? हा विचार जर आपल्या मनात आला असेल तर 
तो आपल्या त्या सुंदर कुरळ्य़ा केसाच्या खालीं लपलेल्या मेदूतून एकदम काढून 
टाका, मी जर तुमच्या त्या लंडनळा अपतें तर ब्रशानें आपले केंस विंचराव- 
याचे निमित्त करून आणि आपली त्या प्रसंगीं चुंबनावर चुवनें घेऊन तों 
विचार केव्हांच काटून टाकला असता. 

बायकांविषयीं पुरुषांस संशय का येतो, याचे मुख्य कारण एक जायकोंनां 
आपल्या न्नातीच्या सामथ्योवर विश्वास असतो, आणि त्यामुळें इतर बायकांची 
त्यांस भीति वाटत असते, त्यांस वाटतें कीं, माझ्या भोळ्या नवर्‍याला दुसऱ्या 
कोंणी तरी लांघवी स्त्रिया फसवून तर नाहींना नेणार ! शिवाय इंग्लंडमध्यें 
मेमका धृताची वगैरे अप्सरा पुष्कळ आहेत, म्हणून आम्हीं येथें ऐकतो. 
शिवाय आपल्याकडील स्त्रियांपेक्षा विलायतेंतील स्त्रियांच्या अंगीं सोदर्याभिज्ञता 
देखील अधिक आहे असें देखीळ आमच्या कानांवर येते. आणि तसें ण्‌कूं 
अहिं म्हणजे ज्याचा नबरा देखणा असतो त्यांच्या पोटांत धस्स होते. आपलां 


गोंडवनांतीळ प्रियंवदा १०४ 


नवरा या परिस्थितींत सांपडला आहे असें ऐकून जर भोळ्या हिंदुस्थानच्या बायका 
घाबरल्या तर नवऱ्यानें आपल्यावर बायको विश्वास ठेवीत नाहीं म्हणून रागाव- 
ण्याचें कारण नाहीं. उलट आपली बायको आपणांस किती ' आपलासा 
समजते हें पाहून आनंदित व्हावें. मत्सर हा प्रेमाशिवाय येत नाहीं. 
“ आप कूछ चाहेसो करो, मे भी्कुछ चाहेसे करूंगी ” असें म्हणून नवऱ्याला 


शक 


निमत्सरपणानें वागविणाऱ्या बायका कोणत्या नवऱ्याला आवडतील ! शी 

तुम्ही लिहितां कीं तुमच्या घरवालीच्या ' लिझी ? नांवाच्या मुलीस, 
आपलें खरोखरच लग्न झालें आहे काय म्हणून फारच जिज्ञासा झाली आहे, 
थांब म्हणावें इग्रजाच्या कारटे, तुझे तेथें येऊन कॅस उपटीन तेव्हां तुला कळेल 
कीं, ' मि. गॉडवॉल हा विवाहित की अविवाहित आहे! तिला म्हणावं 
की तिचे ते पियानो वाजवून दाखविणं निरुपयोगी आहे. तिनें आपलें जाळे 
पाहिजे तर दुसऱ्यावर टाकावे, पण माझ्या मार्गात आणि माझ्या हृक्काच्या 
नवऱ्याच्या प्रेमांत आडवे येऊं नये. 


आपली दररोज आठवण करणारी, 
प्रियवदा. 
२ 

सा, न. वि, वि.-- 

आपले इंग्रज लोकांच्या नाचासंबंधींचं वर्णन पोचले, त्याची कल्पना 
आपण पूर्वी एकदां दिली होतीच. पण आजचे प्रत्यक्षावलोकन केल्यानंतरच 
वर्णन अविक चित्रमय भासतें. आपल्या एका इंग्रज परिचितेस हिंदुस्तानांतील 
स्त्रियांस पुरुषाजरोबर नाचतां येत नाही म्हणून दुःख वाटतें काय! त्या टव- 
ळीला म्हणाबं बाईसाहेब आपण किती सुखी आहांत. पुरुषांच्या स्पर्हानें 
तुम्हांला मधून मधून आनंदहि होत असेल, पण त्याबरोबरच आपल्या नवऱ्याचे 
आपणावरील प्रेम दुसरी कोणी हिरावून नेईल अशी भीती तुमच्या ह्ृृदयकपा- 
टाच्या चोरखणांत लपून आहे तिची तुम्हाला आठवण नाहीं काय ! चुकले 
असेल कशाला, तिच लम्नच कुठें झाले आहे! तिला अर्थात जें थोडका 


१०५ रामभाऊंस उपदेश 


ललल --------------८---२---५पा---:-->--2>4ापपपलललॉशिशक0ी0?0? प?" -प>ापश 0000000000 ? 0 000 नी /शी?0े तश १00 0 शी त 


वेळ पुरुषापासून स्पशसुख मिळतें तेंच पुरेसे झाले, कारण लिहितां कीं, जे 
पुरुष दुसऱ्याच्या बायकोच्या कमरेस विळखा घालून नाचतात त्यांत त्यांचा वाईट 
हेतु नसतो, ब बायकांचाहि बाईट हेतु नसतो, केवळ पुरुष हा दुसऱ्या बाईशी 
नाचून आपला तिच्याविषयींचा आदर व्यक्त करितो ! मी आपणांस एवढीच 
पाया पडून प्रार्थना करिते कीं आपण असा आदर दाखवू नका, मला माझा 
रामचंद्र सबंध पाहिजे आणि मला तो एकटीला पाहिजे. माझ्या रामचंद्राशीं 
सलगी जोडण्यास दुसरी कोणतीहि खञ्ोी आलेली मला आवडणार नाहीं. मी 
फार मत्सरी बायको आहें. “ शुश्ररस्व गुरून ” हे माझ्या हातून होईल पण 
“ कुरु प्रियससीवृ्ति सपत्नीजने ” हें या कलियुगांत वाढलेल्या मज बापडीच्या 
हातून होणार नाहीं. जेवून दुपारची मी जरा पडलें होते तेव्हां मला स्वप्न 
पडले कीं आपण विलायतेहून आणखी एक बायक्रो करून आलात आणि 
सासूब्राई नीं आपले मुखावलोकन केळें नाहीं. पण मला बाई राहवेना, मी 
जखीणीसारखी त्या बाईवर घरांतठी कोयती घेऊन धांवत गेले, तेव्हां तिनें 
किंकाळी फोडली तेव्हां मी जागी झालं, आणि जरी शेजारच्या बबीनें बिछान्या- 
वरून पडल्यामुळें ती किकाळीं खरोखर फोडली होती तरी तिकडे माझें दुलेक्ष 
झालें कारण, एक दोन मिनिर्टे मी देहभानावर येत होते. आणि ते केवळ स्वभ 
आहे अशी जरी मला खात्री पटली तरी त्या स्वझाच्या योगानें उत्पन्न झालेली 
व्यप्रता माझ्या मनांत दिवसभर होती. कशी मी विचित्र आहे हें मलाच 
कळत नाहीं ! 

दिनकर भावोजींचा अभ्यास चांगला चालला भाहे. सासूभाई खुशाल 
आहेत. त्यानां आपल्या पत्रांतील कांहीं भाग वाचून दाखविला आणि 
विलायतेस स्त्री-पृरुषांच्या नाचाचीं चित्रेहि दाखविलीं, त्यानां त्यापासून बरीच 
मोज वाटली. दादाची प्राकिटिस आतां सुरू झाली आहे आणि पहिल्या दोन तीन 
महिन्यांतच आलेल्या कामावरून पुढें चांगली चालेल असा अंदाज दिसतो. 


आपली 
वेडी व मत्सरी 
प्रियंवदा 


गॉडवनांसील प्रियंवदा १७६ 


२ 
साष्टांग नमस्कार, विज्ञापना विशोष-- 
मी आज तुम्हांला पत्र लिहीत नाहीं. मला तुमचा फार राग आला 
आहे. तो मी आज कवितारूपाने व्यक्त करीत आहे. कालच नबनीतांत 
सीतागीत वाचले. आणि मला काव्यस्कूर्ति झाली. आणि मी एक काव्य तयार 
केलें, त्या काव्यास नास्तिकनिष्रध म्हणून नाव देत आहे. 
थांबा घाबरू नका; प्रियंवदा ही रागावली म्हणजे तुम्हांस नास्तिक 
बनवून तुमवा निषेध करण्यास उद्युक्त होत नाहीं. कारण मी खरी 
प्रियवदा आहे. 
नास्तिकनिषेध. 
(१) 
रामचंद्र नामा । होता एक वीर । 
बुद्धीने जो धीर । पूर्वी गेला । 
स्वपत्नी शोधार्थ । राक्षसाच्या लोकी । 
वानरसेनीकीं । साह्य त्याते । 
अंतर त थोडे । गेला ओलाडून । 
सेतुतं बांधूनी । पाघाणाहीं । 
आज रामचंद्र । सोडोनी पत्नीत । 
सातां समुद्राते । ओलाडीतो । 
कोणत्या लोकांते । जातो भक्तप्राण । 
जाणायाते कोण । शक्तीमान । 
(२) 
बोलती जी लोक । बार्ता त्या देशाची । 
असे काय साची । देव जाणे । 
सीताप्रसादारने । वानर झाले जे । 


१०७ 


रामभाऊस उपदेन् 


सणा पापणी प)? १)?0 


देशाचे या राजे । राष्ट्र यांचे । 
आहे दूरवर । भारतापासोन । 
त्याचें नसे ज्ञान । आम्हा लोकां । 
माझे प्रिय मित्र | सुखें वागताती । 
अथवा भांडती ।! जाणायातें । 
पत्नीतें सोडोब गेला रामचंद्र । 
ब्रत द्दे कठोर । प्राणेगाचें । 


(३) 


भक्तांची काळजी असे ईश्वरातें । 

ठावें हे सर्वातें । पूर्णपणे । 

रुक्मिणी सोडोन । भक्तीसाठी धांवे । 
कृष्ण त्याचे गावे | गाणें नित्य । 
लोकहितासाठों । सागे महिपती । 
संतलीलामृतीं स्पष्ट वाक्‍्यीं । 

त्याचाहि प्रत्यक्ष । आजच्या नास्तिकां । 
येई न, ये शंका । दुष्टां लोकां । 

आज रामचंद्र । वानरभक्तांच्या । 
देशी गेला साचा । पत्नी त्यागी । 


(४) 
नास्तिकांच्या जिव्हा । थाबोत त्या नित्य । 
पाहोनी हृदय । सर्वेशाचे । 
वानर हृदर्भी । राहे रामचंद्र । 
मूर्ती ती सुंद्र । इयामलांग । 
कांतेते मत्सर । होतसे भक्तांचा । 
तरी देवा त्याचा । खेद नाहीं । 


गोॉडवनांतील प्रियंवदा १०८ 
पत्नीच्या भक्ती'ची । सत्यता पाहाया । 
राही रामराया दूरदेशी 
येथ ना अश्ोक । शोक वारायातें । 
यास्तव खंतते । प्रियंवदा । 
कां १ कसें आहे हें काव्य ! मला आतां असें वाटूं लागले आहे कीं, मी 
मोठी कवयित्री झालें आहे. आता माझी तुलना जनाबाईशीं करावयाची कीं 
गोणाईशीं करावयाची, हाच तेवढा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर सोडवि- 
ण्यांत आज मी गर्क झाले आहे, त्यामुळे आज जास्त लिहितां येंत नाहीं. 
आपणांस मधून मधून नकोशी वाटणारी 
तरी देखील भापलीच, 
प्रियेवदा. 
ता, क, अहो लबाड ग्रहस्थ, मला त्या लिझीकडून तुम्हाला ती 
नाताळची आलेली भेट केवळ पाहायास पाठवून माझा मत्सर जाग्रत करू 
पाहातां नाहीं ! तुम्हांला काय वाटते की मी मत्सरानें पूणेपर्णे प्रस्त होऊन 
जाईन ! आपण लिझीनें दिलेली देणगी मला देऊन त्या लिझीबाईला भते- 
हरीच्या “ यां चिंतयामि सततं मयि सा विरक्ता ” या “छोकाची प्रतीति दिलीत 
(*यां'च्या जागीं ' यं) पाहिजे आणि “सा?च्या ठिकाणी 'स पाहिजे ), 
लिझीबाईला म्हणावं कीं “ तूं आतां भतृहरीप्रमाणे अरण्यांत निघून जा. ” 
प्रियवदा. 
सा. न. वि. बि, 
मला असे वाटलें कीं मी जर गांवढळ मुलगी असतें आपल्याला 
बायकोचा मत्सर जागत करून तिला रडकुंडीस भाणावयाचे आहे. 
नाहीं ? काय हा तेवढ्यासाठी आटोकाट प्रयत्न ! मी इकडे त्या लिझीला 


शिव्या हांसडीतच आहे. आणि आपण तिथच्यासंबंधाने अधिकाषिक 
लिहितां. आणि म्हणतां की तिचा आकार ग्रीक मूर्तीप्रमाणें अगदी बांधेसूद 


१०९ रामभाऊंस उपदेदा 
आहे, तिचा वण जरी फारच गौर आहे तरी म्हणे तिच्या गालावर गुलाबी 
छटा दिसते आणि तकाळीं बिछान्यांतय पडलों असतां ती ज्यावेळेस ट्रेमध्ये 
चहा आणि टोस्ट घेऊन येते तेव्हां तिचें मुख बालारकाप्रमार्णे दिसते, वाहवा ! 
आतां तर आपण कवीच झालांत । छे! कवीपणा होईल तितका लोकर सोडून 
द्या. कारण कायदेवाज वकीलाला तो बिलकूल शोभत नाहीं. तुम्हांला केस 
पिकलेल्या म्हाताऱ्याप्रमाणें गंभीरमुद्रा घारण करून ह्ृदयांत द्रव्यलोभाशिवाय 
दुसरा कोणताहि विकार ठेवावयाचा नाहीं हे भासविण्यासाठींच ना टोप घाढाव- 
याची रीत पडली आहे ? कवित्व, आणि त्यास साजतील असे इतर गुण म्हणजे 
रसिकता आणि देशाभिमान इत्यादि सवे श्रीमंत होऊं पाहणाऱ्यास शोभत 
नाहींत, आणखी काय म्हणतां --“ माझे लग्न झालें नसतें तर किती तरी बरे झालें 
असतें असेंहि मधून मधून वाटते ! '” आणि याचें कारण देतां कीं, “ कोणीतरी 
आंग्लसुंद्री हिंदुस्थानांत घेऊन आलों असतों आणि महाराज बागेंत हिंडावयास 
गेलों असतों, म्हणजे लोक माझ्याकडे टकमक पहात राहिले असते. '' खाशा | 
तुम्हांला असें वाटलें कां, आपण जें जें कांहीं लिहितां त्यावर मी विश्वास ठेवतें 
म्हणून ! खरें कोणतें आणि थट्धेचें कोणतें हें ओळखण्यास पुरुषांची मुद्रा समोर 
पाहिजे असें थोडेच आहे ! बायकांनां लिहिण्यांतूनहि तें ओळखतां येते. मला 
दिवसानुदिवस अशी हांका पडूं लागली आहे कीं तुमची ती ' लीझी ' कोणी 
खरोखरीची बाई आहे कीं काल्पनिक आहे १ पुरुषांच्या बोलण्यावरून गूर्ढेंगित 
ताडण्याची कला बायकांनां जन्मसिद्धच आहे. पुरुष जेव्हां दुसऱ्या बायकांच्या- 
वर लक्ष देतात तेव्हां आपल्या बायकोच्या लक्षांत ती गोष्ट येऊ नये म्हणून 
बाहेरून अधिकाधिक संभावितपणा धारण करतात. जेव्हां ते आपल्याविषयी 
संशय उत्पन्न करूं पहातात तेव्हां त्यांचे वतैन निराळें म्हणजे निर्मल अस्ते, 
:< अन्यसंक्रांत प्रेमाणः नागरिका अधिक दक्षिणा भवन्ति ” हे सांगावयास 
कोणी कालिदास नको, हूं प्रत्येक बाईस कळत असतें, 


या आठवड्यांत लिहावयास बातमी पुष्कळ आहे, तथापि याच आठव- 
ड्यांत मला घरीं काम पुष्कळ पडलें, याचे कारण आपली मोलकरीण राघा 


गोडवनांतील ब्रियंघदा ११७ 


६ नीच रतली रायासी । तिसी कोण म्हणेल दासी ॥ ” या न्यायानें फार उच्च 
पदावर चढली आहे, आणि याच कारणास्तव ती नोकरी सोडून गेलीं. तिला 
एका क्‍ऱ्हाडांतील वकिलानीं एक स्वतंत्र घर भाड्याने घेऊन दिलें आहे, 
मागील पत्री, मजवर गायन शिकण्याचा प्रसंग आला होता तो मी कसा 
टाळला हें लिहिलेच हीते. गवयी हरिभय्या मोघे यानीं आतां गायनाची शाळा 
काढली आहे, चार पांच विद्यार्थी असतात, त्याची खाणावळ आतां बाहेर पडूं 
लागली आहे, असें तें सांगतात, त्यांस आपल्या बंडूनानाचे वडील अनंतराव हे 
भेटले होते आगि त्यानीं आपल्यासाठीं कांहीं खटपट करूं असें अभिवचन दिलें. 


बंडूनानांचे मेहुणे रा. हरिहरराव वारले. त्यांच्या संबंधींचा मृत्युलेख 
छत्तिसगडसेवकात प्रसिद्ध झाला आहे. तो अंक सोबत पाठविला आहे. 


दोन तीन दिवसापूवी मजकडे पेनांगवाला शेटजींची मुलगी पुतळीबाई 
ही आली होती. ती, गेल्या आठवड्याला चीफ कमिशनरकडे पार्टी झाली 
तिला गेली होती, आणि त्या पार्टीचे ती मोठें रसभरित वणेन देत होती. त्या 
पार्टीला आपल्या गांवांतट्या सभ्य सभ्य म्हणविणाऱ्या कितीतरी ग्हस्थांच्या 
बायका गेल्या होत्या म्हणून सांगू? काय हो, जे ग्रहस्थ आपल्या बायकांना 
आपल्या समाजांत फारसे फिरकूं देत नाहींत तेच शहाणे सुधे इंग्रज लोकांच्या 
घरीं आपल्या बायकांना कशाला हो घेऊन जातात आपण प्रागतिक आहोंत 
हें तर त्यांनां इंग्रजांनां भासवावयाचे नाहीं ना? त्या बायकांत एक राव- 
बहादुरीण होती, तिला जिन्यावरून उतरतांना हात देण्याचें मानार्चे काम चीफ 
कॅमिदानर साहेबांचा एक इंग्रज हुजऱ्या म्हणजे ए, डी, सी. होता त्यानें केले. 
आपण पूवी गोष्ट सांगत होतां ना की उत्तर हिंदुस्थानांत एक मराठी संस्थान 
आहे, तेथील अल्पवयस्क राजाची आई दशी लोकांसमोर पडदा बाळगते आणि 
पोलिटिकल एजेटबरोबर मात्र टेनिस खेळते. आपल्या लोकांबरोबर वागतांना 
बायका घरांत लपवून ठेवावयाच्या आणि इंग्रजासमोर मात्र ब्रायका घेऊन जायचें 
ही सुधारणा अलीकडे फार बोकाळली आहे. बरें झालें आपण सुधारक नाहीं! 
नाहींतर माझे धिंडवडेहि तेच झाले असते. 


१११ भोसला विजय मिल्सचीं तीन ववे 


जळ -टापन--- ५->-८-५८----->-- 
->->>->::--::८८- ५:४४ कक पटा "-र-------------------नन लनन यक्व 


असो, यंदा माझी मंगळगोर करायची नाहींच आहे, उरलेल्या चार 
मंगळगोरी आपण आल्यानंतरच करावयाच्या या बेताला सासूनाईनीं संमति दिली. 
आपली 
बायकोला चिडविण्याचा कामांत 
नवऱ्याच्या पराभव करणारी 
प्रियबदा 
ता. क, 
आपल्याला सुंदर सुंदर बायका पहाण्याची फार इच्छा आहे. म्हणूनन्व 
मी मंगळगोर पुढे ढकलली, आपले लग्न झालें नसते आणि आपण इंग्रज बायको 
करून आणली असती, म्हणजे कुठे आपल्याकडे देखण्या नायका मंगळागोरीत 
आणि चेत्राच्या हळदीकुंकबाच्या दिवशीं बोलावता आल्या असत्या ! 
प्रियक्दा 
वाचकहो, गुप्त पक्र्यवहार पहाण्याची फार इच्छा धरूं नये. पाहिला 
तेवढा पुष्कळ झाला, आता प्रियबदेच्या रामभाऊस देखील झोंप येऊं लागली 
आहे. त्याला निजण्याला परवानगी द्या. 


प्रकरण १२वं 
२७ ४” &”> &>७ €"३ *र्र 
नालला वजथ नल्सचा तान वष 
बँडुनाना मोठ्या तडफीचा आणि मेहनत करणारा मनुष्य होता. त्यानें 
कॅपनी स्थापन करण्यापासून मिल बांधण्याचे ब ती सुरू करण्याच काम धडाडीने 
उरकले, तथापि घातलेल्या पैशाला व्याज किंवा मुनाफा ताबडतोब मिळावा 
म्हणून लोकांत अधीरता उत्पन्न झाली आणि तीमुळें बंडुनानास फारच त्रास 
झाला, शेअर गोळा करणें चाळू असतां कापडाच्या गिरणींच्या कामाची मुख्य 
माहिती त्यानं मिळविली व अनेक गोष्टींवर प्रत्यक्ष माहिती मिळवून काम सुरू 
केलें, भोंसला विजय मिल्स स्थापन झाली, तिच्या स्थापनेसाठी चार लक्षांचें 


गॉडवनांतील प्रियंवदा ११२ 


धााापापपपप"१ॅपा पा? 0 ४0. ऑॅलशरशशः?कसॅॅिॅ00?" “न: 


भांडवल तयार झाले तथापि मिलची स्थापना झाली ती अंदाजाबाहेर खर्चाची 
तयार केळी गेली. तीन लाख रुपये तर गिरणीच्या इमारतीसच लागले आणि 
सूत तयार करण्याची यंत्रे बोलावून बसवून एकंदर खच ७ लक्ष रुपये झाला, हें 
इतर तीन लाखांचं भांडवल मिळविले ते कजे काढून मिळविले. कजे देण्याच्या 
वेळेस रूपराम मारवाड्यानें त्या गिरणीचे सर्वे सामान गहाण म्हणून लिहून 
घेतल. त्या कर्जावर रूपराम माखाड्याचें होकडा ९ व्याज सुरू झालं, ही 
परिस्थिति पाहून बंडुनानांस वाईट वाटले, कारण जर तीन लाख रुपयांवर 
शंकडा नऊप्रमाणें व्याज द्यावे लागणार, आणि पुढें ज्या ज्या रकमा आपणांस 
लागतील त्यावरहि तसेंच जबर व्याज पडणार तर आपण लोकांस नफा तरी कसा 
देणार £ एक वर्षात त्याला असें दिसून येऊं लागलें कीं दीड दोन लक्ष तर 
नेहमींच्या व्यवहारास लागतात, तर येणेंप्रमाणें पांच लाखांबर रोकडा ९ प्रमाणें 
जर आपण व्याज देऊं लागलों तर गिरणी लवकरच मारवाड्याच्या थरांत जाते 
असें त्यास दिसून येऊं लागलें, 


भांडवलाची तूट ही व्यापार बुडविण्यास मोठी कारण आहे. जेव्हां 
एखादा मनुष्य काहीं आपल्या पैशाने आणि कांहीं कर्जाऊ रकमेनें भरून मोठें 
घर बांधावयाची योजना करतो आणि दाकडा ९। १० दरानें पैसे काढतो तेव्हां 
तो व्यवहार फायदेशीर पडत नाहीं आणि घर पुढें लबकरच आपल्या मूळ 
रकमेसह सावकाराच्या घश्यात जातें हा अनुभव पुष्कळांस आहेच. 

रूपराम मारवाड्याचं दोकडा ९ दरानें व्याज सुरु झालं एवर्ढेच त्यांत बाईट 
नव्हते, तर होरमसजी पेनांगवाला हा रूपराम मारबाडी आपल्या तंत्राने आहे असें 
दाखवी आणि त्यामुळें ती रक्कम कायम ठेवण्यासाठी होरमसजी पेनांगवाल्ा 
दरमहा दोनशे पगार मागे आणि डायरेक्टरांनां निरुपायानें तें कबूल करावें लागे. 

आतां ही गिरणी अक्याच स्थितींत चाळू राहिली आणि अल्पदरानें व्याज 
मिळण्याची सोय झाली नाहीं तर ही खात्रीनें बुडणार आणि त्यामुळें आपल्या 
वडिलांचा आणि आपला दुलीकिक होणार या गोष्टी बंडुनानांच्या डोळ्यापुढे 
खेळूं लागल्या, 


११३ भॉसला विजय मिल्सचीं तीन वषे 


०2 > १-0 न्हा पण ण१णणिण्णाणा 


डायरेक्टरांकडे जाऊन सल्ला घेण्याची सोय नाहीं. कां कीं मिलची जी 
डायरेक्टर मंडळी होती, त्यात कित्येक मतलबी माणसें होतीं, कित्येक रूपरामाचे 
हस्तक होते व कित्येक अल्पदृष्टीचे लोक होते. जास्त भाडवल वाढवून रूप- 
रामाच्या कचाट्यातून सुटण्याची योजनाच कित्येकांना पसंत नव्हती. त्यांचे 
म्हणणें असें पडे कीं, हाकडा नऊ टक्के व्याज नागपुरास लोकाना घरीं बसल्या 
मिळत आहे. तुम्हांस नऊ टक्क्यापेक्षा अधिक नफा मिळविण्याची धमक नाहीं 
तर गिरणीचा खटाटोप केला तरी कशासाटीं ? जर नऊ टक्क्यापेक्षा जास्त 
व्याज तुम्हास मिळविता येत असलें तर राहीना रूपरामाचा पैता आपल्या- 
पाशी ! त्यांत फायदाच आहे. डायरेक्टरानीं कामात विभ्ने आणण्यासच प्रारंभ 
केला. शिवाय डायरेक्टरानीं आपल्या घरचीं अनेक कामे गिरणीच्या खर्चाने 
करून घ्यावयास सुरवात केली, कुणाचा बूट फाटला कीं, पाठवा तो गिरणीच्या 
मोच्याकडे, कांहीं पट्टयाचे कातड उरल तर ध्या तळवे करून आपल्या घरच्या 
जोड्यांना. कोणाचा पाट मोडला तर पाठवा गिरणीच्या सुताराकडे. पेनागवबाला 
शेठजीची गाडी मोडली तर ती देखील दुरस्त करून घेतली. गिरणीमध्यें 
कित्येक खोगीरभरती कारकून होते. त्यात गिरणीस कारकून लागतात हा प्रश्न 
पुढे नसून आमच्या भाचेसुनेच्या चुलत भावाची सोय कशी करून द्यावी हा प्रश्न 
डायरेक्टरापुढें असे. डायरेक्टराच्या घरच काम आले आणि त जर अगोदर 
करून दिलें नाहीं तर डायरेक्टरांस घुस्सा येई, नोकराना आपली नोकरी 
कायम ठेवण्यासाठीं डायरेक्टराच्या घरच्या कामाकडे अधिक लक्ष द्यावें लागे. 
गिरणीचें काम दहा मिनिटें डायरेक्टराच्या कामाकरिता अडून राहिलें तर फक्त 
दहा मिनिटें कामास उशीर झाला एवर्ढेंच त्यास वाटे. तथापि '५०० लोकांचीं 
दहा-दहा मिनिटे व्यर्थ जाऊन दहा-पाच रुपयाचें नुकसान तेवढ्याच दहा मिनि- 
टांत होतें हें त्यास कळत नसे. तथापि बंडुनानानें या सवे गोष्टी बंद केल्या. 


बंडुनानांच्या हातून काहीं चुका झाल्याच, उदाहरणार्थ, त्यास कापसाची 

चांगली पारख नसल्यामुळें चागला कापूस कोणता, वाईट कोणता हें कळत नसे. 

कापसाचा भाव अमुक आहे, तरी दोन रुपये कमी अशा हिशोबाने कापूस 
5 


गोंडवनांतील प्रियंवदा ११४ 


तुम्हाला देतो असें कोणीं सांगितल्यास त्यानें त्यावर विश्वास ठेऊन कापूस 
घ्यावयाचा. शिवाय हाताखालच्या कारकुनास लांच मिळाल्यामुळे कापूस वजन 
करून घेतांना कारकूनाकडून कशी काय लवाडी होते हेंहि त्यास कांहीं दिवस 
कळलें नाहीं. गिरणींतील स्पिनिंग ( सुतकामाचे ) मास्तर, वीव्हिंग ( विण- 
कामाचे ) मास्तर हे साधारणपणें बऱ्यापेकीं होते. व कापडहि बरें निघे व त्या- 
मुळें त्याला गिम्हाइकी देखील बरी येई तथापि विकण्याची व्यवस्था चागली 
नव्ह्ती, पुष्कळ व्यापारी आंत माल बराचसा साचला आहे अशी बातमी 
कळली म्हणजे मागणी करीत आणि त्यावेळेस एकदम पुष्कळ माळ आम्ही 
घेतो आहों, आम्हाला स्वस्ता दर द्या म्हणून भाव पाडून घेत. एकदम 
पुष्कळशी विक्री झाली म्हणजे बंडुनानास आनंद होई. पण त्याच्या हें लवकरच 
लक्षात आलें कीं एकदम पुष्कळशी विक्री होण्यात फायदा नाहीं. कारण जे 
व्यापारी मोठी खरेदी करीत ते बिकत घेतलेला माल बाजारात ताबडतोब फैला- 
वून देत आणि त्यामुळें स्वरेदी करण्यास दुसरे व्यापारी लवकर येत नसत. 
त्याच्या लवकरच लक्षात आलें को, गिरणीनेंच चोहोकडे एजंट ठेवून विक्री केली 
पाहिजे. ही कल्पना अमलात आणावयास त्यास त्रास पडला, कारण जे व्यापारी 
खरेदी करणारे होते त्याचें डायरेक्टराशीं सूत जमलेले होतें, ब त्यामुळें त्यांचा 
विचार डायरेक्टराकडून पास व्हावयासच पंचाईत पडली. 

भोसले विजय मिल्सच्या स्थितीविषयीं व प्रगतीविपयीं काहीं माहिती 
बडूनानाच्या रामभाऊस गेलेल्या पत्रावरून मिळेल. 

रामभाऊस नागपुराहून जी पत्रे जात असत, तीं केवळ घरचींच पत्रे 
नव्हती; त्यास घरकुट्ट्याकडून पत्रे येतच असत व तीं पत्रे नागपुरची स्थानिक 
बातमी वेळोवेळीं कळवीत असत. घरकुट्टे याच्या पत्रांतींल बराचसा भाग जर 
प्रसिद्ध केला तर त्यावेळच्या नागपूरच्या राज्यव्यवस्थेवर व शासक वर्गाच्या 
आसपास हिंडणाऱ्या ' नेटीव ' लोकांच्या रीतींबर बराच प्रकाश पाडील. 
त्याप्रकारची कल्पना तत्कालीन वर्तमानपत्रांवरून कधींच यावयाच्ची नाहीं. कारण 
सव वर्तमानपत्रे राज्यद्रोहाच्या किंबा लायवेलच्य़ा कायद्यानें बद्ध असतात, 


११५ भोॉसळा विजय मिल्सचीं तीन वषे 


खासगी गग्पांत ती अडचण नसते, त्यामुळें जर कोणास स्वकालीन इतिहासाची 
ग्वरी माहिती पाहिजे असेल तर कोर्टातील कारकुनांच्या गप्पा वगेरे गोळा केल्या 
पाहिजेत, यूरोपियन छुबांमध्यें जेव्हां दोन ग्रहस्थ सहज बाजूला जाऊन चार 
शब्द बोलतात तेहि मिळविले पाहिजेत, ब या दोहोंची कागदपत्राशीं संगति 
लावली पाहिजे. नागपूरच्या परिस्थितीचे दर्शक असे बंडुनाना घरकुट्े यांच्या 
पत्रांतील कांहीं उतारे येथ देतो, त्या उताऱ्यातच भोंसळे विजय मिल्स चालवीत 
असतांना बंडुनानास आलले अनुभव व्यक्त झालेलें आहेत. 


“: मृर्व आहेस तूं रामभाऊ ! तुला वाटतें कीं शिकून आलास तर तुला 
मोठी जागा मिळेल, पण केबळ शिकण्यानें थोडीच ती मिळणार आहे ! तू वेड्या- 
सारखे जे शिकण्यात पैसे ख्चे करतोस ते करूं नकोस, चीफ कमिरानरला लांच 
देण्यासाटीं ते पेसे शिलक ठेव. नागपूरला आजकाल नोकरीचे भाव येणेंप्रमाणें 
आहेत -- इ. ए. सी. ची जागा पाहिजे असल्यास ५००० रुपये भरावे, तह- 
शिलदारी पाहिजे असल्यास अडीच हजार रुपये आणि नायब तहशिलदारीची 
जाणा पाहिजे असेल तर १००० रुपये पुरतील, चीफ कमिदनरसारख्या मोठ्या 
साहेबाला लाच देण्याला एकदम जावें तरी कसें ! ' अशो शंका घेण्याचे तुला 
बिलकुल कारण नाहीं. दयाळू चीफ कमीशनरनें तुमच्या मिडस्तपणाबर उपाय 
म्हणून सोथ करून ठेवलीच आहे, त्यांचा लाचेची देण्वरेख करणारा एजंट 
गोपाळ चादे म्हणून गावात आहे. त्याच्यापाशी जावें, तो सर्व प्रकारची कामें 
करून देईल. 

जर पुरेसे पेसे नसळे तर एक युक्ति आहे. येथ इन्घुरस कंपनीचा एक 
गोवानीज एलेट आहे, त्याच्या मार्फत तुम्ही दहापंधरा हजाराचा विमा 
उतरावा म्हणजे तो व गोपाळ चादे मिळून तुम्हास रकम देणारा सावकार 
कोणीतरी गांठून देतील आणि तुमची रकम चीफ कमिशनरकडे बिनचूक नेऊन 
पोंचविण्याचे काम गोपाळ चांदेच करील. गोपाळ चांदे तुला ठाऊकच आहे. 
आमच्या बाबांचा तो मोठा स्नेही, निदान बाबा तरी असें सांगतात. मी 
पुष्कळदां लहानपणापासून गोपाळ चांद्याकडे जात आहे आणि त्याच्याकडे फार 


गोंडवनांतील प्रियंवदा ११९ 
मोठमोठाले लोक भेटावयास येतात म्हणून पहात आहे. आमचे बाबा त्यांच्यांच- 
पेकी. आमच्या घरीं आईला ते सांगत असत कीं गोपाळ चांदे माझा मोठा 
स्नेही आहे; पण वस्तुतः तशी गोष्ट नव्हती. जे अनेक अधिकारी गोपाळ 
चांद्याकडे जात त्यातच आमचे बावा. लांच देण्यासाठीं ब ती लांच फलद्रूप 
करण्यासाठी गे'पाळ चांद्याकडे जातों म्हणून ते आईला कसें सांगणार ! म्हणून 
सांगत कीं, तो आमचा स्नेही आहे. गोपाळ चांदे यानें पैसा जरी सपाटून 
मिळविला आहे, तरी त्यानें आपल्या घरातला अरंद काळोखी जिना देखील 
दुरुस्त केला नाहीं. जर तुम्हीं कधीं त्या जिन्याने गेला, तर एखाद्या बड्या 
घडाजरोभर धक्काबुक्की व्हावयाची, नोकरी मिळाल्यानंतर देखील बड्या धेडांनां 
गोपाळ चांद्याची गरज लागतेच, कोणाला बदली करून घ्यावयाची असली तर, 
कोणाला पेन्दान घ्यावें न लागून एक्स्टेन्हान मिळवावया'चें असलें किंबा कोणाला 
ज्या जागीं जम बसला असेल त्या जागेवरून हळू न लागावे अशी इच्छा असेल 
तर त्यानें गोपाळ चाद्याची अवश्य भेट घ्यावी. नाहींतर ता'चें ह्या रियासतींत 
तरी वजन रहणार नाहीं. कांहीं दिवसापूवी मला लोकांनीं असा सला दिला कीं, 
भोंपळे विजय मिल्सच्या डायरेक्टरामध्ये त्याचं नांव घालावें म्हणजे चीफ कमि- 
शनरची व सरकारची कृपादृष्टि ह्या कंपनीवर राहील, तेव्हां, ' आपण डायरेक्टर 
होण्यास लागणारे शेअर घेण्यास तय्रार आहात काय १ म्हणून विचारण्याकरितां 
मी गोपाळ चांद्याकडे गेलों तेव्हां त्याची वागणूक कित्ता घेण्याजोगी आहे असें 
आढळून आलें. तो, कोणीहि मनुष्य आला तरी त्यास मोठ्या स्मित मुद्रेने 
सत्कारितो; मी गेलों तेव्हां व्यवहाराचा प्रश्न पुढें आला तेव्हां त्यानें सरळ उत्तर 
दिलें कीं, कंपनीने मला पांच हजारांचे शेअर फुकट द्यावे म्हणजे मी डायरेक्टर 
होईन, आणि हे जे शेअर द्यावयाचे ते सुद्धां साडेसात परसेंट प्रिफडे स्टॉकपैकीं 
द्यावेत; म्हणजे त्यास २७'५ रुपयांचे वर्षासन द्यावें आणि डायरेक्टरच्या मीटिंग- 
बद्दलचे कमिठान होईल तें निराळेच. असें केलें म्हणजे ते आम्हांस आंत येऊम 
नेहमीं मदत करतील, व गऱ्हनेमेंट संबंधाच्या कांहीं अडचणी आल्या तर लाहि 
पार पाडतीळ, त्या दिवशीं मला त्याच्या बोलण्याचा फार राग आल्यामुळें मी 


११७ भॉसखला विजय मिल्सरची तीन वषे 


बेथून निघून गेलों, तो जिन्यामध्यें मला वीरण्णा पंतळू भेटले. बीरण्णा पंतठूना 
मी तेथें दिसल्याबरोबर मोठा आनंद झाल्यासारखे वाटलें आगि ते म्हणाले, 
: काय नानासाहेभ तुम्ही तर फार सोंबळे, तुम्हीं येथे कसें १? काय मिल सोडून 
देणार काय ? आणि पुन्हां सरकारी नोकरींत दिरणार ? मला वाटलेंच होतें 
कीं ला स्वदेशी मिलमध्ये कांहीं अर्थ नाहीं. ' मला त्या वीरण्णाचा फार राग 
आला पण मी तो ऑकमसंय्रमानें दाबून टाकटा. मी त्याला सहज उत्तर दिलें 
कीं ' मी येथें पैसे घेण्याकरिता आलों आहे, देण्याकरितां नाहीं ! तुमच्या- 
सारख्यानीं गोपळ चांदे झाला पेलले द्यावेत आणि माझ्यासारख्यानीं घ्यावेत, ! 
मल्भ जरी मनांत अत्यंत संताप आला होता तरी हे ठाब्द मी अत्यंत स्मित- 
मुद्रेने बोळलों होतो. 


>< >< >< 


“ काय ! मला ती इ, ए. सी, ची जागाहि नको आणि चीफ कमिरान- 
रना ५ हजार रुपये देणेंहि नको ! अरे निदान माझ्यासार'वा मूग्वेपणा तूं तरी 
करू नकोस, पुष्कळते पसे न खाण्याचा बाणा बाळगणारे ऑफितर आपल्या 
आयुष्याच्या उत्तरार्धात पस्तावतात, आणि खोट्या तच्वानीं उगाच आपल्याला 
बांधून घेतलें असें तें म्हणू लागतात. पेसा न स्वाणाऱ्या कारकुनास किंवा 
सरकारी अधिकाऱ्यास स्वर्गलोकांत मान मिळत असेल, येथे मात्र मिळावयाचा 
नाहीं ! येथे आजकाल तर अशी फॅशन झाली आहे कीं, प्रत्येक सरकारी 
नोकराने इंग्रजी अमदानींत पैसे खाऊन गबर व्हावें, मालगुजारी गावें विकत 
घ्यावीत आणि जाता मात्र प्रामाणिकपणाच्या माराव्यात व आपणच मिळविलेली 
आपली श्रीमंती भोंसळेशा हीपासून किंवा पेशवाईपासून किवा वाटल्यास ब्राह्मणी 
राज्यायासून आली आ? म्हणून सांगावें. परवां नागपूरला एक वऱ्हाडांतला 
वरील आला, त्याचा बाव झांगीला भाकऱ्या भाजीत होता. झांशीच्या 
राणीच्या विरुद्ध यानें हेरपणा चांगला केला म्हणून सर ह्यू रोझच्या कृपेनें त्याला 
बऱ्हाडांत नोकरी मिळाली. नोकरींत असतांना सपाटून पैसे खाऊन बरीच 


गोड वनांतील प्रियंवदा ११८ 
इष्टेट पैदा केली आणि त्याचा हा लेक आता देशाभिमानाच्या गप्पा सांगत आढे; 
आणि आपल्या श्रीमंतीचा पेशवाईत झालेल्या मोठमोठ्या लढायांशीं संबंध 
लावीत आहे. आणि भोंवतालची मंडळीं देखील त्याला श्रीमंत हें उपपद 
लावीत आहेत. दुनिया आहे ती अशा प्रकारची. तू आपला प्रामाणिक- 
पणाचा मूग्येपणा कोठें घेऊन बसणार? अरे, मीच मोठ्या प्रामाणिकपणाचा डोल 
मारणारा, मला पेसेखाऊ मंडळीचा फार तिरस्कार, पण माझीच वृत्ति व्यवहारांत 
पडल्यापासून काय झाली आहे पहा ! 


ह्या पैसेग्वाऊ श्रीमंतांच्या घरीं मी जातो, त्यांनां त्यांच्या अंत करणांत 
असलेल्या स्वदेशीबहलच्या प्रेमाची मी फार तारीफ करतों, आपल्याला इंग्लंड- 
बरोषर टक्कर कशी द्यावयाची आहे ह्यांचं चित्र मी त्यांच्या पुढें रंगवितों, व 
त्यांच्याकडून हजार बाराशाचे शे अर घेण्याचें लेखी अभिवचन मिळालें म्हणजे 
तेथून उठतो. आणि त्याच्या देगाभिमानाची तारीफ मी आणखी दुसऱ्या दोघां- 
जवळ करतो. परवा मला एक सजरजिस्ट्रार भेटला, ओळखीचाच आहे तो तुझ्या- 
तो महालांत कोठीजवळ रहाणारा सोन्याबापूच तो, त्या सोन्याबापूर्‍ची माहिती 
तुला चागलीच आहे-तो कशा प्रकारचा माणूस आहे, त्यालाहि पाचशे रुपयांचा 
शेअर घ्यावयाला लावलाच, आणि तो रस्त्याने मला भेटला तर ' कसें काय बापु- 
साहेब १ ) म्हणून मी त्याला नमस्कार करतों, यावरून मी देग्वील कसा बिघडत 
किंवा सुधारत चाललों आहें हे तुझ्य़ा लक्षांत येईल. पेसे खाण्याचें काम आणि 
लांच देण्याचं काम सगळे मोठे लोक करतात, त्या बन्सीलाल अबीरचंदाला 
विचारा ना वीं एग्वाद्या बॉयलर इन्स्पेकटरला तो लवून सलाम करील किंबा नाहीं ! 
बन्सीलाल अबीरचंद म्ठणजे आपल्या मध्यप्रांत सरकारचा सावकार, चीफ 
कमीरानरच्या हिशोबाचे खातें त्याच्याकडे, व चीफ कमीदनरला मात्र त्याच्या 
ठेवीबर नऊ परसेंट व्याज, साहेब लोकांनां छुब काढावयाचा झाला तर छुबाला 
लागणारी रक्कम थोड्या व्याजाने बन्सीलाल द्यावयास तयार; पण इतका मोठा 
मनुष्य असून त्याला अगदीं सामान्य सरकारी अधिकाऱ्याला “ खूप ! करावें 
लागत नाहीं काय ? थोडक्यांत सांगावयाचे म्हटलें ग्हणजे पैसे खाऊं नयेत किंवा 


११९ भोसला विजय मिल्सचीं तीन वर्षे 


चोरू नयेत हें तत्वज्ञान व्यवहारशून्याकरितां आहे; व्यवहारज्ञाकरितां खास 


नाही. ” 


> >< > > 


“ तूं बॅरिस्टर होऊन येणार तर आल्यानंतर तुझी मळा फार मदत होईल. 
कायदा जाणणारा एखादा स्नेही असला आणि विदोपकरून डायरेक्टराच्या 
मंडळांत असला तर फार चागले होईल, आमच्या डायरेक्टर मंडळींत कांहीं 
बकोल आहेत. परंतु त्याची हुशारी व त्याची मु"्सद्वेगिरी मनेजरला पगार फारसा 
कसा मिळूं नये, मनेजरळा आपल्या पैंचांत कसा ठेवावा, मॅनेजरकडून एखादा 
गुन्हा होईल तर तोहि चागला , म्हणजे तो गुन्हा लोकाच्या नजरेस आणण्याचा 
धाक वारंवार दास्वविता येईल असा विचार करणारी असते, गिरणीच्या मॅनेजरने 
जे काम करावयाचे तें लोककल्याणाच आह, त्यात त्याच्या फायद्याचा लवलेश 
नसावा, फायद्याच्या विचाराने कार्याचे पावित्य कमी होते, आपल्या फायद्या" 
करिता त्याने गिरणी काढली असा लोकांकडून प्रवाद येऊं नये म्हणून केवळ 
गिरणीच्या मॅनेजरच्या कल्याणासाठी व त्याच्या इभ्रतीचे रक्षण करण्यासाठीं त्यानें 
मुळींच पगार घेऊं नये आणि घ्यावयाचा अतला तर अगदींच पोटापुरता - 
खाणावळ बाहेर पडण्याइतका - घ्यावा अशी तत्त्वे ते नेहमीं प्रतिपादित असतात, 
आणि त्याच्या त्या प्रतिपादनास कांडी भागीदार मंडळी उत्तेजन देत असतात, 
येथील एक बडे वकील आमच्या बोर्डात डायरेक्टर आहेत; तें पुण्याला काहीं 
स्वाथेत्यागी मंडळीनीं कसले एक कालेज काढलें आहे, त्याची तारीफ करीत 
असतात, पण त्या वकीलाना आपली उपवर मुलगी त्या कालेजातल्या एका- 
तरुण प्रोफेसरला देण्याचे घैय होत नाहीं. आणि त्या कालेजातल्या प्रोफे- 
सराचं उदाहरण आम्हाला सागतात. एकदां छुबांमध्ये त्या प्रोफेसरांची स्तुति 
त्यांच्या समक्ष हे वकीलजौ करीत बसले होते तेव्हा मीं सरळ सागितले कौ 
तुमच्यासारख्या मंडळींच्या स्तुतीने हुरळून जातील इतके हे प्रोफेसर मूख 
खास नाहींत. त्यानां हें ठाऊक आहे कीं ते जर आजारी पडले तर त्यांची 
तुमच्याप्रमाणेंच तारीफ करणारे हे डी. लटपटे ( युक्रवार तलावाजवळ रहाणारे ) 


गॉडवनांतील प्रियंवदा १२० 


अगोदर पे सेवाल्यांची केस पहातीळ आणि तुमच्याकडे जावयाचे किंवा नाहीं 
ह्याचा सावकाश विचार करतील. भोळसर तरुण मंडळी पाहून त्याची स्तुति 
करावयाची आगि त्यांनां थोडक्या पगारांत काम करावयाला लावावयाचे ही वडील 
मंडळीची हुझ्यारी ह्यांना अजिमात ठाऊक नाहीं असें नाहीं, पुण्याच्या स्वार्थ 
त्यागाची कल्पना आपल्याकडेहि उत्पन्न होऊन येथेहि आपल्या लोकानीं मारिस 
कीलेज काढल परंतु नागपूरच्या मंडळींनां हा चतकोर भाकरीच्या गुलामगिरीचा 
मूखपणा लौकरच पटेल व तें कालेज सरकारच्या गळ्यांत बांधलें जाऊन येथल्या 
मंडळींच्या स्वाथेत्यागाचं थोतांड कमी होत जाणार आढे. परंतु तें थोतांड 
कालेजच्या कमिटीच्या डोक्यांतून निघून भोंसले विजय मिल्सच्या डायरेक्टरांच्या 
डोक्यांत दिरूं्पषहात आहे. ” 
>< >< >< >< 


प्रकरण !३ व 
इतिहाससंशोधक 

रत्नपूर हवे गांव विलासपूरपासून बारा मेळांबर आहे. याच्या भोंबतालीं 
टेकड्या आहेत आणि इं गाव मध्ये आई, त्या टेकड्या इतक्या सभोंबताली 
आहत कीं या गावांत असता आपण एक मोठ्या खडकाच्या द्रोणांत तर नाहींना 
असा भास होतो. या गावांचे क्षेत्रफळ पंधरा चोरस मेळ येईल. पण यावरून 
हें गांव आज फार मोठे आहे अते समजू नये, जीं शहरें नष्ट इत आहेत, आणि 
तेथील सुंदर इमारती धुळीस मिळत आहेत त्यापेकींच ईं एक आहे. इं शाहर 
अनेक शतकें चालत आलिल्य़ा रजपूल राज्याची राजधानी होतें. तथापि पुढें 
तें राज्य भोसल्याच्या वाढत्या साम्राज्यात विळीन झाले, आणि तें भोसल्यांचं 
साम्राज्य पुढें इंग्रजी साम्राज्यांत विरघळले. या सत्रे परिवर्तनाचे परिणाम 
रतनपुरांत दिसून येतात, जीण झालेल्या इमारती. व इतर अवशेष १'१ चौरस 
मेल पसरळे आहेत. त्यांत शेकडों तळीं अगर कुंडे आहेत. लहान कुंडे 
आणि मोठी तळीं यांची गोळाबेरीज केली तर तीनरछेवर मरतील, आणि ल्हान 


१२९ इतिहास संशोधक 


पपपरऱऱ्टा: >>-----२:२>>>>>>>>>: 


मोठी देवळें, छत्र्या, सती गेलेल्या स्त्रियांची स्मारकें या सर्वांची मोजदाद केलीं 
असतां चार-पांचशे भरतील, येर्थे ब्राह्मणवस्ती बरीच आहे, आणि त्यांत 
सुशिक्षित ब्राह्मण -सुशिक्षित याचा अर्थ जुन्या विद्येच्या दृष्टीनें सुशिक्षित - अव्वल 
इंप्रजींत बरेच होते, अजून एखादा चागला व्युत्पक्न शास्त्रीहि नजरेस येतो. 
या ब्राह्मणांची उपजीविका आसपासच्या गांबाची मालकी त्याच्याकडे असल्यानें 
बरी चाळे. आज गांवांत स्थाईक आणि जो शहराचे जीवन आहे असा वर्ग 
हाच. बाकी कोठें कासाराचीं घरे, कोठें घनगरापासुन लास विकत घेऊन 
त्यांचा व्यापार करणारे त्र्यापारी, कोठें बांगडी तयार करणारे छत्तिसगडी 
बांगडीगार, आणि इतर हलक्या जाती यांशिवाय गांवांत कांहीं दिसत नाहीं. 
लक्ष्मीच्या चैचलतेचा, अगर, अर्वाचीन सुशिक्षितांच्या भाषेत बोलावयाचे 
झाल्यास, राजकीय घडामोडीमुळें होणाऱ्या अर्थशास्त्रविधययक फेरफाराचा नमुना 
पहायया'चा झाल्यास यासारखे दुसरें स्थान नाहीं. जुने राज्य चालूं होते त्या 
वेळेस येथील लोकवस्ती कांय असेल ती असो, गेल्या चाळीस वर्षातच ती साडे- 
आठ हजाराची साडेपाच हजारावर आली आहे, येथचा जो कांहीं व्यापार 
होता तो विलासपूरला गेला, 


रत्नपूरच्या रस्त्यावर आज चार दमण्या मागे आक्रमीत होत्या. . त्या 
बिलासपूरहून मार्ग क्रमावयास आधळ्या रात्रीं लागल्या असाव्यात असें दिसतें. 
पहिल्या दमणींत दोघे ब्राह्मण पुरुष बसले होते व दुसरींत दोघी स्त्रिया होत्या, 
त्यांच्या त्या विचित्र नेसण्याच्या चालीवरून - तथापि उंची रेशमी लगड्यावरून 
ब्राह्मणेतर, तथापि श्रीमान अशा कोणी स्त्रिया असाव्यात अर्से दिसत होतें. 
त्यांस स्थिया म्हणण्यापेक्षा मुली म्हटलें तर अधिक शोभेल. त्यांत एक तेराचोदा 
वर्षींची आणि दुसरी तिच्या पेक्षां दोन वर्षानी वडील अशी होती. आणि 
शेवटच्या गाडींत नोकरमंडळी बसली होतीं. 

ही मंडळी कोण होती हे वाचकास स्पष्ट सांगून टाकतो. त्यांचें संभाषण 
येथ देत नाहीं आणि संभाषणावरून ती मंडळी कोण होती हं ताडण्याचा परिश्रम 
बाचकांस करावयास लावीत नाहीं, 

16 


भोंडवनांतील प्रियंवदा १२२ 


आज शारदाबाई आपल्या तीन विद्या्थिनींसह ब त्यांच्या परिवारासह 
रत्नपूर येथें जुने अवशेष पहाण्यासाठीं व विद्यार्थिनीस समजावून देण्यासाठीं 
आली होती. तीन विद्यार्थिनी ज्या उछेखिल्य़ा त्यात आमची एक बिंब्राबाई 
होय. आणि दुसर्‍या दोघीजणी गोंड राजकन्या होत्या, 

शारदाबाईची हकीकत येथे थोडीशी सांगितली पाहिजे. या मूळच्या 
सातार येथल्या ; त्याचा चुलता बऱ्हाडांत वकिली करीत होता. त्यानां वैधव्य- 
दशा नञव्या वर्षीच आली. त्याच्या वडिलानींच लहानपणी घरीच संस्कृत 
शिकविले. लम्नापूर्वीच त्याच्याकडून भतहरीचे नीतिशतक, रामरक्षादि 
स्तोत्रे पाठ झाली होतीं. वैधव्यदशा मुलीस आलेली पाहून तिनें आतां पुढे 
काय करावें हा बिचार दामोदरशारूयास उत्पन्न झाला. तिनें पुढें पोळपाट- 
लाटणें घेऊन बरोबर हिडावें हेंहि त्यास बरें वाटले नाहीं. कारण पोरगी मोठी 
“तेल ! बुद्धीची आहे, ही गोष्ट त्यानीं ओळखून ठेवली होती. हिला जी 
बिद्या आपल्याजवळ आहे ती द्यावी ; मग पुढें हिचे नशीब जे असेल तें 
होईल अशी गोष्ट मनांत योजून त्यानीं तिला संस्कृत व्याकरण आणि काहीं 
गणित इतके स्वतः रिकवावयास सुरवात केली. पुढे दोन वर्षानी एके दिवशीं 
त्याचे बऱ्हांडांत वकील असलेले धाकटे बंधु साताऱ्यास आले तेव्हा त्यानीं 
पाहिलें कीं मुलींची संस्कृतमध्ये प्रगति चागळी झाली आहे. का कीं, तिचे 
आतापर्यंत लघुकोमुदी, अमरकोडदा पाठ म्हणणें, आणि रघूर्चे तीन सर्ग, इतका 
अभ्यास चागला झाला होता. आप्पासाहेब लेले बकील यास असे बाटले कीं, 
शारंदेसारखी ' तेल ” बुद्धीची मुलगी इंग्रजी शिकून तयार झाली तर महाराष्ट्रास 
भूषणभूत होहेल या हेतूने आपल्या बंधुंचे मन वळवून त्यानीं तिला इंग्रजी 
शिकविण्याची संमति घेतली, ही संमति मिळविण्याचे काम मात्र सोपे नव्हतें; 
कारण इंग्रजी विद्या म्हणजे विद्याच आहे काय याबद्दल दामोदरशार्यास भ्रांत 
पडली होती. अ्याप्रमाणे स॒तारकीचा धंदा शिकून सुतार बनावें, न्हाव्याचा 
धंदा शिकून न्हावी बनावें, त्याचप्रमा्गे बकीलाचा धंदा शिकून वकील बनावे ; 
आपत्धम म्हणून वकीलीचा धंदा करण्यास ह्रकत नाहीं. पण इंग्रजी शिक्षण हे 


१२३ इतिहास संशोधक 


कांहीं शिक्षण नव्हे. ही केवळ राजदरबारात प्रवेश होण्याची अट आहे; 
कारण या इंग्रजी शिकलेल्या मंडळींत एस्वादा घड विद्वान सापडेल तर शपथ ! 
केवळ म्लेंच्छ राजाच्या सहाय्याने तो शास्त्रीमंडळापुडें तोरा मिरवूं राकतो, आणि 
गरीब शास्त्री मंडळीस तुच्छ समजतो, असें त्याचे मत होते. 'मप्रजी शिक्षण 
जर नोकरीसाठीं किवा दुसऱ्या काहीं पोट भरण्याच्या धंद्यासाठी मिळविणे 
अवइय असेल तर मिळबावे, पण ते काही ज्ञान नव्हे, त्याने बुद्धीचा 
विकास कोठे होतो ? इंग्रजी तकशास्त्र गिकून लाजीक, कां काय म्हणतात 
त्याचा प्रोफेसर आमच्या मीमासकापुढे काय वादविवाद करूं शाकेलळ !' केबळ 
दुनिया झुकती आहे, देश जिवणारा म्लेंच्छ राजा ज्यानां विद्वान 
म्हणेल त्याना आम्ही विद्वान म्हणणेहि भाग आहे. हा संसाराचा गाडा 
कसातरी हाकावा हें निराश्रित ब्राम्हणास कतेब्य उ । झाल्यामुळें ज्या 
अविद्येस लीक विद्या म्हणतील, तिला विद्या समजून तिच ग्रहणहि केलें 
पाहिजे, पण ती ग्रहण करण्याचे बायकांत कां भाग पाडावें ? म्लॅंच्छत्वापासून 
पुरुष जर अस्पष्ट रहात नसेल तर नाइलाज म्हणून प्रसंगास मान देण्यास ह्रकत 
नाहीं, परंतु केवळ महदायासानें अल्प मिळणारी ही इंग्रजी विद्या बायकांवर कां 
लाद्रावी ? बायकांना काय नोकऱ्या करावयाच्या आहेत? सरकारी नोकरींत 
ब्राह्मणांसारख्या त्राह्मणानां लाथा) मिळतात तर त्या लाथा आमच्या बायकाना 
मिळतील असें केलें पाहिजे काय ? इत्यादि अनेक प्रश्न दामोदरशास्त्र्यानीं 
विचारले आणि त्याचीं उत्तरें देतां देता अप्पासाहेबास नाकींनव आळे. आमच्या 
बायकांना नोकरीवर लावावयाचे म्हणजे वरिष्ठ इंग्रजी अधिकाऱ्याचे स्मितमुख 
मिळविण्यासाठीं आम्ही जसे धडपडतो त्याप्रमाणे आमच्या बायकांनाहि घड- 
पडावयास लाववय़रांचे कीं काय १? आणि इंग्रज अधिकारी जर आमच्या बायकांशी 
लाडीगोडी लावावयास लागला तर सरकारी नोकर जायकांनीं अभिमान बाळगावा, 
अगर त्याचा तिरस्कार करावा, या विषयीं तुमच्या आधुनिक सुधारकांचे नीति- 
शास्र काय सांगते ! इत्यादि अनेक प्रश्ांस बिचारा आप्पासाहेब काय उत्तर 
देणार ! तथापि या मुलीस कोठें सरकारी नोकरीसाठी पाठवाबयाचं नाहीं 


गोंडवनांतील प्रियंवदा १२४ 
इत्यादि गोष्टी ठरवून आमच्या शारदाबाईस इंग्रजी शिकण्यास परवानगी 
मिळाली. 

पुढील हकीकत थोडक्यांतच सांगतों. शारदाबाई पंधराव्या वर्षी मॅट्रिक 
पास झाली, एकोणीसाव्या वर्षी बी, ए, झाली आणि पुढें नागपुरास तिने एक 
मुलींकरितां खासगी शाळा उघडली. 


शारदा हुषार, त्यांत तरुण आणि त्यांत देखणी, पुन्हां तिची संस्कृतमध्ये 
गति चांगली आणि तिच्यामध्ये थोडीशी रसिकता दृष्टीस पडे, कालेजांत 
जाणाऱ्या मुली साधारण ज्याप्रमाणें प्रोफेसराचें व्याख्यान पुराणासारष्वे मुग्धपणानें 
ऐकत बसतात त्याप्रमाणें हिनें केलें नाहीं. ही वर्गात स्पष्ठपणें प्रोफेसरांस प्रश्न 
करी, शाळेंत अगर कॉलिजांत जाणाऱ्या मुलींस विद्यार्थांच्या आणि तरुण 
अध्यापकांच्या प्रेम-पत्रिका यावयाच्याच. त्यांतल्यात्यांत कॉलर नेकटॉय वापर- 
णाऱ्या विद्यार्थ्यांस सुशिक्षिस विद्यार्थिनींस ' लव्ह लेटर ' पाठविण्याचा अधिक 
हक्क आहे असें वाटे, तथापि असल्या कॉलर नेकटायबाल्या विद्यार्थ्याच्या पत्ना- 
कडे हिनें दुंकूनहि पाहिलें नाहीं. पत्र पाठविणारे एकच जातीचे नव्हते, त्यांत 
कांहीं शेणवी, काहों सोनार, काहीं परभू इत्यादि जातींचेहि तरुण होते. 

एखाद दुसरा तरुण जर प्रेमाच्या तडाख्यांत सांपडून आपणांस गं भीरतेनें 
लिहीत आहे असें दिसल्यास त्यास शारदानाईनीं पत्र लिहावे. तथापि त्यानीं 
एक खतरदारी ठेविली होती ती हीं कीं, ज्याप्रमाणें कित्येक विद्यार्थनीं आपल्या 
निष्कलंकतेचा दंम माजविण्यासाठीं आपल्यास आलेलें एखादे सामान्य पत्रहि 
आपल्या प्रिन्सिपॉलकडे घेऊन जातात तसें हिनें केलें नाहीं, पत्राचा एक तर 
सरळ जबाब द्यावयाचा, नाहीं तर उत्तरच द्यावयाचें नाही. अश्या तऱ्हेने तिनें 
व्यवहार ठेविल्यामुळें ती विद्यार्थिबर्गाच्या आदरास पात्र झाली, 

तिला स्वतःच्या शिक्षणाबद्दल दुसऱ्याचे पैसे घेण्याचें कारण पडलें नाहीं, 
एक तर तिला स्कॉलरशिपा मिळत; आणि त्या जरी नसत्या मिळाल्या तरी तिला 
आपल्या चुलत्याची उत्तम प्रकारे मदत मिळत होतीच, आणि यामुळें स्त्री- 
शिक्षणाचे अभिमानी जनून स्त्रीपा्ी लाडीगोडी लावणारे आणि दोस्ती संपादन 


१२५ इतिहास संशोधक 


-नपणापप पाप)?" 


करूं इच्छिणारे जे स्त्रियांचे अनेक कनवाळू आहेत त्यांच्याशीं तिला प्रसंग पडला 
नाहीं. तिच्या पुनर्बिवाहासंबंधाने पुष्कळाना काळजी पडली होती. तिचा 
पुनर्विबाह लावून देण्याचे भ्रय पुष्कळच लोक मिळवू पहाणार होते; परंतु त्य 
सर्वोस तिने निष्रेधात्मक पत्रे लिहिलीं. चुलत्यानेंहि अश्भ केला होता तेव्हां तिनें 
त्यास सांगितलें कीं, “ आप्पा, मी पुनर्विवाहाच्या विरुद्ध नाहीं; बथापि मला 
दुसरें लयन करण्याची घाईहि वाटत नाहीं, ब्रह्मचर्यावस्थेत दिवस काढणें कठिण 
आहे, हेंहि मी ओळषतें, आणि पाय घसरण्यास जागा पुष्कळ आहेत, 
हंहि मला ठाऊक आहे; तथापि सध्यां माझी लम्न करण्याची इच्छा नाहीं, 
आणि पुढें इच्छा झाल्यास मी आपणांस निःदोकपणानें कळवीन ». पाय 
घसरण्यासंबंधार्न आणि त्रह्मचर्याच्या काठिण्यासंबंधाने शारदाबाई जे॑आपल्या 
चुलत्यापाशीं बोलल्या तें केवळ पुस्तकी वाक्‍य नव्हतें. विधवांसच काय परंतु 
अर्वाचीन सुशिक्षित कुमारिकांस मुळें होतात, हें पंढरपुरच्या रिपो्टेवरून सुघा- 
रकांस नाकारता न येण्याइतर्के जरी आजकालच बाहेर पडलें, तरी समाजास ही 
गोष्ट पुष्कळ दिवत्त ठाऊक आहे. ज्याप्रमाणें एकाद्या लोकमान्य पुढाऱ्यावर टीका 
केली, तरी तिच्याबद्दल त्या लोकमान्यास वाईट वाटत नाहीं व ते लोकमान्य ती 
टीका निष्कपटपणाने लक्षांत घतात, तथापि लोकमान्यांच्या अनुयायांचा मात्र 
तिळपापड होतो, त्याप्रमाणेंच सुधारकांचे देव ज्या शिकलेल्या बायका त्यांची 
गोष्ट होय, सुशिक्षित स्त्रियांवर होणारी कठोर टीका पाहून सुधारक जरी घड- 
धडीत खऱ्या गोष्टी खोट्या म्हणून अकाड-तांडव करण्यास प्रवृत्त होतात तरी 
आमच्या शारदाबाई त्या टीकांचे पूणेपणें अवलोकन करीत. 

शारदाबाईंच्या मनाची घडण समजण्यास आतांपर्यंत दिलेल्या त्यांचा 
वृत्तांत पुर आहे असं वाटतें. 

रत्नपुरास आज शारदाबाई आल्या होत्या त्यांत त्यांचे दोन तीन हेतू होते. 
एक तर रनपुरचे प्रसिद्ध अवशेष पहाण्याची त्यांस इच्छा होती, शिवाय त्यानां 
असेंहि वाटे कीं स्त्रियांस इतिहासाचे ज्ञान पाहिज आणि स्वदेशाच्या इतिहासा- 
विषयीं अभिमान उतपन्न झाला पाहिजे, आजच्या स्त्रियांच्या शिक्षणक्रमांत 


गोड्यनांतील प्रियंवदा १२६ 


---__पन>>>>-_-- 


इतिहासाकडे बरेंच दुलेक्ष केलें जातें आणि पूवेपरंपरागत संस्कार उलट 
नष्ट करण्याकडे प्रवृत्ति दिसते. तिनें आजकालचें स्त्रीशिक्षण स्त्रियांना अभिमान- 
शून्य करतें असें ऐकलें होतें. आणि आपण ज्या स्त्रियाचें रिक्षण हातीं घेऊं 
त्यांचा देशविषयक आणि जातिविषयक अभिमान नाहींसा होऊं नये म्हणून 
शारदाबाई जपत असे. स्त्रिशिक्षणाविषयीं तिनें तरुण मंडळींचीहि कांहीं टीका 
ऐकली होती ती पुढीलप्रमाणें होती !-- 

आजचें स्त्रियांचे शिक्षणच असें होत चाललें आहे कीं त्यांचा जात्यामि- 
मान एकीकडे कमी करावयाचा, नब्या तऱ्हेच्या राहणीकडे लक्ष ओढावयाचे, 
पारश्िणींची आणि खिस्तिणींची संगति त्यांस जोडून द्यावयाची, आणि अर्वाचीन 
फ्याान्स ज्यांच्यामध्ये शिरल्या नाहींत अश्या स्वजातीय जनतेविषयीं त्यांस 
विस्स्कार उत्पन्न करून द्यावयाचा, जुन्या बायकांस खिस्त्तिणी, पारशिणी यांच्या 
पेक्षां आपण पुष्कळ श्रेष्ठ आहोंत हा अभिमान असतो, पण आजकालच्या 
सुशिक्षित पोरींपुढें इंग्रज मडमेच ध्येय ठेवून दिलें असल्यामुळें इंग्रज मडमेशीं 
जी जितक्री अधिक सदृश ती तितकी अधिक सुशिक्षित आणि अधिक रिफाइण्ड, 
अर्थात्‌ युरेजियन बायका, पारशिणी, खिस्तिणी या ब्राम्हण बायकांपेक्षां उच्च. 
शाळेंत पोरी शिकावयास पाठवावयाच्या तेर्थे मास्तरणी कोण, तर वरील अस्पृशय 
जातीच्या बायका. या तीनहि जातींची गलिच्छ संगति अहितकारक आहे हे 
आप विसरतां कामा नये. मद्रास आणि कलकत्ता येथें “ यूरेजियन गले ” या 
गाब्दाचा अर्थ काय होतो याची थोडी तरी चोकशी करा असें कित्येक समवयस्क 
तरुण वारंवार बोलत असत तें तिनें ऐकले होतें. 


शारदाबाई पुन्हां बिंबाबाईच्या गुरुस्थानी या वेळेस स्थापन झाल्या त्या 
बिंबाबाईच्या इच्छेने, व त्या इच्छेस हरिभय्याची संमति मिळून दाखल झाल्या 
होत्या. बिंबाबाईस इंग्रजी शिकावयाचे नव्हतें पण बहु श्रुतता मिळवाबयाची होती. 
धिंब्ाबाईनीं, शारदाबाईंचा प्रश्न निघाला तेव्हां हरिभय्यास सरळ सांगितले की, 
केवळ कलारिक्षक हरिभय्या, यापेक्षां मनोरंजक हरिभय्या, हाच तीस जास्त 
आवडता आहे व शारदाबाई हीहि बिबाबाईस शिक्षक या नात्यानें हवी नसून 


१२७ इतिहास सशोधक 


मेत्रिण या नात्यानें हवी होती. दोघांचे एकमेकासंबंधानें बोलणें होई तेव्हां तीं 
पुष्कळदां प्रकृत विषय विसरून जात. त्याचप्रमाणें श्ञारदाबाईंच्या आगमनाच्या 
प्रश्नहि ती दोघे विसरून गेलीं. तथापि हरिभय्यानें ते बोलणें पुन्हां उकरून 
काढले, हरिभय्यास आपली गायनशिक्षक या नात्यानें किंमत कमी झाली याबद्दल 
थोडेसें वैपम्य बाटल्यासारखे दिसतें, तथापि आपण दुसऱ्या कोणत्या तरी 
कारणामुळे हवेसे आहोंत ही गोष्ट त्यास बिंबाबाईकडून वदवावयाची होती आणि 
त्यासाठीं त्यानें शारदाबाईचा विषय पुन्हां काढला आणि म्हटले : 


“ वा! आमच्या गायनकलेची आपण खूपच किमत केलीत. ” 


“ अहो गायनकलेची किंमत मी केली नाहीं. मला गायनकलेच महत्त्व 
कितपत आहे हें स्पष्ट सागून मी स्वतःचीच किंमत करून घेतली. शिवाय 
आपल्या गुगांपैकी मला कोणता गुण अधिक आवडतो हें सांगितलें तर आपल्याला 
राग कां यावा ? ” 

: मळा राग येत नाहीं. मला थोडीशी मौज वाटली. ” 

“ तर शारदाबाईला काय लिहावें १ ” 

“ जसे मनात असेल तर्से लिहावे. ” 

“ छे पण त्या येणार नाहींत. त्यानीं दररोज येत जावें, याला युक्ति 
योजिली पाहिजे, ” 

“ तर मग त्यानां लिहावें की इंग्रजीपेक्षां, कांहीं काव्य इतिहास इत्यादि 
गोष्टी शिकावयाची आपणांस इच्छा आहे, ”? 

“६ तर मग त्या येतील काय ! ” 

“ हो, लिहून पहावें म्हणजे समजेल. हे बिषय घेतले म्हणजे शारदाबाई- 
कडून कांहीं मनोरंजक असेंच विषय तुम्हांला ऐकावयास सांपडतील ! 


“ शिवाय “ अंबरगत परि पयोधरांनें रगडुनि पळतो दुरि ' अद्य 
ओळींचे अथे सागण्यास लाजणार नाहींत. ” 


गोडवनांतील प्रियंवदा १२८ 


“५ आम्ही देखील लाजणार नाही. पण अधिक परिचय झाल्याशिवाय 
असल्या गोष्टी सांगावयास जरा संकोच होतो. ” 


“ आपण शिकवितां ते मनांत संकोच न धरितां शिकवावे. ” 

“६ वा! फारच चांगले, मी आपणांस बिल्हणाच्या चौरपंचाशिकेवर 
मराठी गाणीं केलीं आहेत ती एकदां म्हणून दाखवीन. ” 

“ कसली आहेत तीं गाणीं १? एक तर आज दाखवा म्हणून, ” 


“ आजच नको, पुढें कधी तरी, ” 
>< >< >< >< 


एवंच काव्य आणि इतिहास इत्यादिकांच्या गोष्टी सांगून मनोरंजन 
करण्यासाठींच शारदाबाईंची नेमणूक झाली असें म्हटल्यास हरकत नाहीं आणि 
याचमुळें इतिहास अधिक मनोरंजक करण्यापाठीं जुनें अवशेष वगैरे पहावें या 
गोष्टीस बिंबाबाईची हि संमति मिळाली. 


शारदाबाई ज्या दिवशीं येथे आल्या होत्या त्या दिवशीं तेथें सुमार पस्तिशी 
उलटलेला असा एक ग्रहस्थ बारकाईने तेथील प्रत्येक अवशेषांचे निरीक्षण 
करण्यांत गुंतला होता. या ग्रहस्थाकडे पाहिले म्हणजे कोणा चैहि लक्ष त्याच्या 
कडे वेधलेंच असते, त्यांचं तें पंचावजा थोतर, एक सदरा, तो देखील 
प्रवासाने मळलेला आणि डोक्यासा एक पांढरा रुमाल एवढेंच त्याच्या अंगाला 
दिसत होतें. त्याचं प्रबासांतळें सामान म्हटलें म्हणजे एक लठ्ठ टीपा घेण्याची 
बह्ी, एक पडशी, तींत कांहीं पोढे, एक तांब्या पंचपात्री आणि एक धाबळी, 
त्याच्याजवळचे सामान एवढेंच. शारदाबाईनी प्रथम त्या ग्रह्स्थाकडे लक्ष 
दिलें न दिलें असेंच केले, तथापि हा काय करतो, कोठें जातो, इकडे मात्र 
त्यानीं सुक्ष्म दृष्टि ठेविली आणि त्याच्यासाठी तो ग्रह्स्थ दृष्टिआड होणार नाहीं 
अशा बेतानें तथापि त्याच्या फारसं लक्षांत येणार नाहीं अशा बेतानें त्याच्यावर 
हृष्टि ठेविली आणि हा ग्रहस्थ हृष्टिआड ज्या ठिकाणावरून होणार नाहीं 
अशा ठिकाणचे अवशेष आपल्या सहचरींबरोबर पाहण्यास सुरवात केली. 


१२९ इतिहास संशोधक 


त्या ग्हस्थानें तेथील एका तलावांत स्नान केळे, आपले धोतर धुतले 
आणि तें बाळत टाकलें. थोडासा वेळ संध्यावंदूनांत घालवून नंतर पोह्यांत पाणी 
घाळून आणि त्यांत एक गुळाच्या खड्याचा चूर घालून पोह्यावरच दुपारची भूक 
शात केली, 

हा प्रकार दुरून शारदाबाई पहात होत्या आणि त्या ग्रहस्थाला बोलावून 
कांहीं तरी फराळाचें त्यास द्यावें असें त्यांस वाटलें तथापि त्याला एकदम कांडी 
खावयास देऊं केल्यास तें बरोबर दिसणार नाहीं असेंहि वाटून त्या स्वस्थ 
बसल्या. 


श्र श्र 3 


संष्याकाळची वेळ; सुमारें चार वाजतां रतनपुरातील एका भग्न देवाल्याच्या 
गभग्हांत तो ग्ह्स्थ एक शिलालेख ओला फडक्याने धुवून स्वच्छ करीत होता. 
तो दिलाळेख धुबून स्वच्छ झाल्यावर त्यानें त्यावर ओले कागद घातले आणि 
ते तसेच वाळू द्यावेत आणि तोपर्यंत आपण जरा स्वस्थ बसावें या हेतूने तो 
-आपल्या खिदांतील एक विडी काढून ती पेटवीत बाहेर आला. बाहर येऊन 
पाहतो तों आपल्या पुढें दिसण्यांत देखणी उंची नागपुरी लगरडे नेसलेली अंगावर 
शाल घेतलेळी आणि पायांत पुणेरी जोडा घातलेली एक स्त्री उभी आहे. ही 
स्री कोण असावी म्हणून तो ग्रहस्थ बुचकळ्यात पडला असेल; पण आमच्या 
प्रिय वाचकांस संदेहांत पडण्या'चें कारण नाहीं. त्यानीं ताडलेंच असेल कीं ती 
दुसरी तिसरी कोणी नसून त्याच्या परिचयाची ही शारदाबाई होय. 


“ आपण येथे काय करीत आहां १ मला तें जाणण्याची इच्छा आहे. ” 
“ मी येथ एक दिलाळेख दिसला त्याचा छाप घेत आहे. ” 

“हा कशासाठी ! ” 

“ याचा कांहीं इतिहासार्थ उपयोग शाला तर पहावा या हेतूनें, * 


“ आपण काय इतिहासकार आहांत ? ” 
17 


गोंडवनांतील प्रियंवदा १३० 


ब्न>><>:<>>>>>>>>>><<<२<<>><->- 


“ नाहीं, पुढें मार्गे आपल्या देशात कोणी इतिहासकार झाला तर त्याला 
त्याला कांहीं पूर्वी झालेला अभ्यास आणि पूबी गोळा केलेलें साहित्य उपयोगी 
पडावें म्हणून तें साहित्य जमा करण्याचे आणि कांहीं सापडलेल्या साहित्याचा 
अर्थ लावण्याचे हमाली काम मी सध्या करीत आहें. 

“ तर मग आपण काय इतिहास संशोधक आहांत ! ”? 

“ इतिहासकार आणि इतिहास संशोधक यांतील फरक आपल्याला कळतो 
वाटतें ? ” 

“ न समजायला काय झालें ! आपल्या देशांत कांहीं विशेष उद्योग 
माणसें करूं लागलीं म्हणजे त्या उद्योगाचे नांवहि लोकपरिचित होतें. ? 

: बरं तर मग माझ्या उद्योगाला इतिहाससंशोधनारचे नाव देतां येईल. ” 

£ हें काम फार कठिण आहे. ” 

: नाहीं, विशेष नाहीं. करूं लागले म्हणजे येतें. का आपल्याला तें 
करायच आहे काय? इच्छा असली तर अशक्‍य नाहीं, ?) 

“६ हु. काम कठिण नसेल तरी माझ्यासारखीला कठिणच आहे. तसले 
काम धुळ्याच्या वेजनाथशास्त्र्यांसारखींच माणसें करूं जाणतील. ? 

: घुळ्याचे वेजनाथशास्त्री आपल्या ओळखीचे आहेत काय? " 

£ त्याना कधीं पाहिलें नाहीं पण त्याचीं पुस्तकें मजजवळ आहेत. ” 

“ वैजनाथशास्त्री काहीं मोठा विद्दान नाहीं किंवा अलोकिक बुद्धिमत्तेचा 
मनुष्य नाहीं. तो मेहेनत करणारा मनुष्य आहे एवढेंच. ” 

: वैजनाथशास्त्री कांहीं मोठा विद्वान नसेळ तथापि आज जीं माणसें 
हिंदुस्थानांत अस्तित्वात आहेत तेवढ्यांत तो अत्यंत विद्वान आहे ही गोष्ट 
कोणास नाहीं म्हणता यावयाची नाहीं. ” 


“ दुसरें कोणी म्हणणार नाहीं तरी मी म्हणतो कीं वैजनाथशास्त्री हा 
अत्यंत सामान्य बुद्धीचा मनुष्य आहे आणि हें देखील पूणे ओळखून सांगतों. ” 


१३१ शारदाबाईचा पराक्रम 
: वेजनाथशारूयांस अत्यंत सामान्य म्हणणारे आपण; तर आपल्या- 
सारख्यां विद्वानाचें नांब आम्हांस कळलें पाहिजे, ”' 


“ काय, माझे नांव १ ? 
ट्ट होम, 99 


५ तें तर आपणांस ठाऊकच आहे. ” 
44 तें कसें १ १9१ 
५ वैजनाथदशास्त्री मीच. 


प्रकरण १०व 
दारदाबाहचा पराक्रम 


५ वैजनाथदास्त्री | ” 


[ शब्द शारदाबाईनीं चकित वृत्तीने उद्घारला कारण तें नांव ऐकतांच 
त्यांस मोठें आश्चये वाटले. 


“महाराष्ट्रीय विद्वानांचा मुकुटमणी म्हणून ज्याची ख्याति आहे आणि ज्या 
मनुष्याचे नांब सर्वतोमुखी आहे आणि जो मनुष्य मोठा बुद्धिमान, प्राचीन दुर्वास 
ब्रशथ्रीचा जर कोणी अवतार आजच्या दुर्दैवी भारतभूमींत असला तर हा एवढाच 
असेल म्हणून ज्याविषयीं त्याचे भक्त आदरयुक्त वाकयांनीं बोलत आहेत, तोच 
काय हा वैननाथशास्त्री ? अरेरे ! काय ही स्थिति !! ज्याचे खरें संन्यस्तातारखें 
वर्तन पाहून आपला देश जर स्वतंत्र अततां तर देकडों राजांनीं ज्याचें अत्यंत 
आदरानें स्वागत केले असतें, तोच काय हा महर्षि! आजची दुपार यास पोहे 
आणि गुळाचा खडा एवढ्यावर काढावी लागलीं ! सज्नास कष्टमय स्थितींत 
पाहून देखील त्याचा सेवेस न धावून जाणें हाच का आमचा शिष्टाचार! 
कशाला दुपारच्या वेळेस मी लाज धरली? पुढें त्यास जेवणास आमंत्रण करणें 
माझ कतैव्य नव्हतें काय ! जरदे, तुला एवढें समजावयास पाहिजे होते कीं, 


गोॉडवनांतील प्रियंवदा ११९ 


आजच्या या कतेब्यशून्य आणि प्रत्येक फालतू गोष्टींची टिमकी वाजविणाऱ्या 
आणि कांहीं विचार न करतां अगर शोध न करतां वतमानपत्रे आणि मासिके 
यांत लिहिण्यास प्रवृत्त होणाऱ्या महाराष्ट्रांत छे, सर्व हिंदुस्थानांत जो जुन्या 
अवशोषांची माहिती गोळा करीत हिंडत आहे आणि थंडी, वारा, ऊन 
इत्यादिकांकडे दुलेक्ष करीत आहे तो प्रत्यक्ष वैजनाथशास्त्री नसला तरी कोणी 
दुसरा पुरुष आहे हें लक्षांत न आणतां शारदे तू आज दुपारीं सुखानें जेवण 
जेवलीस ! ? 


या प्रकारच्या भावना शारदाबाईंच्या मनांत जाणत झाल्या आणि शारदाबाई 
समोरच्या ग्रहस्थांकडे मोठ्या आदखुद्धीने आणि स्वतःकडूस मोठा प्रमाद 
घडला आहे कीं काय अक्शा प्रकारची मुद्रा करून पाहूं लागली. हें पाहून 
वेजनाथशारूयास मात्र थोडा बहुत विस्मय वाटला असेल. आपली योग्यता 
जाणणारा पुरुषबगौत देखील दुलभ सांपडतो आणि केवळ वरच्यावर आजकाल 
लोक विद्वेत्ता मोजित असतात आणि जो स्वतःस विद्वान समजणारा मनुष्य 
अडाणी गव्हनेराकडे आपलीं इंग्रजॉंत लिहिलेलीं पुस्तके पाठवून आणि त्यांचे 
अभिप्राय मागवून स्वतःची किंमत लोकांमध्यें बाढवीत बसतो, आणि तो 
स्वजनास तुच्छ तमजतो अश्याचाच लोकांत बडेजाव होतो. समाजांत ज्याच्या- 
पाशीं दोन पैसे जास्त आहेत अशाच वर्गाशीं स्त्रिया आणि त्यांतल्या त्यांत 
सुदिक्षित स्त्रिया संबंध ठेवूं इच्छितात, सुशिक्षित आणि त्यांतल्या त्यांत आज- 
कालच्या फ्याशन्सनी परिवेष्टित झालेली स्त्री, उघडपणे रंडी ठेवणाऱ्या पण 
पु$कळ पैसे मिळविणाऱ्या डाक्टराझीं अगर वकिलाशीं संबंध ठेवूं इच्छील, पण 
दारिद्यांत दिवस काढणाऱ्यां विद्वानाशीं संबध ठेवूं इच्छिणार नाहीं, संस्कृत 
विद्याविभूषित शास्त्रीवर्गास आजकाल लग्न करण्याची पंचाईत पडूं ढागली 
आहे, 

“ आपण तर महाराष्ट्रीय इतिहासाचे संशोधक आणि आपण येथं रल- 
पुरास कसें आलां ! ” विस्मयामुळें उत्पन्न झालेला मुग्धतेचा बांध फोडून 
शारदाबाई म्हणाल्या, 


4-1. शारदावाईचा पराक्रम 


“ मी केवळ महाराष्ट्राच्याच इतिहासाकडे लक्ष देतों असें नाहीं. 
महाराष्ट्राकडे अधिक देतों एवढेंच. आणि शिवाय हें र्नपूरचे राज्य महाराष्ट्रीय 
इतिहासाशीं संबडू आहे, ” 

६ संग्रंध एवढाच ना दीं भास्करपंडितानीं हे राज्य १७४१ सालीं शास्त्र 
उगारल्याशिवाय खालसा केल. ” 


“ झास्करपंडिताचा पराक्रम आपणास ठाऊक आहे वाटतें ? 


“ होय, त्यांतल्या त्यांत ठाऊक असायचें कारण म्हटलें म्हणजे, त्यांच्या 
वंशातला एक ग्रहस्थ मला मेटला होता. भास्करपंडितास बंगालचा सुभेदार 
अलिवर्दी वान याने भेटण्याकरितां जोडावे आणि विश्वासघातानें ठार मारले 
आणि पुढें त्यास पश्चात्ताप वाटून त्यानें त्यांच्या घराण्यास एका गांवाची 
जहागीर करून दिली असेंहि त्या ग्रह॒स्थानीं सांगितले, आणि भास्करपंडिताच्या 
बैंगल्यामध्यें झालेल्या पराक्रमावर बंगाली भाषेंत एक काव्यहि असल्याचे त्यानें 
सांगितळें, त्या काव्याचे नांव ' महाराष्ट्रपुराण, ? तें कोणी गंगाराम नांवाच्या 
कवीने केलें आहे, त्यांत शाहूराजास नंदीचा अवतार केलें आहे. ” 


“८ या ठिकाणीं कोणते घराणें राज्य करीत होतें, हें ठाऊक आहे काय ? ” 

५ येथ हेह्य नांवांच्या राजघराण्यांतील पुरुष राज्य करीत होते, असें 
मी वाचळे आहे. ”? 

“६ याला प्रत्यक्ष प्रमाण कांहीं आपणास ठाऊक आहे काय १ ” 

याला प्रत्यक्ष प्रमाण ठाऊक नाहीं; पण हें मीं एका इंग्रजी पुस्तकांतून 
चाचळे आहे. ” 1-4 

“ इप्रजी पुस्तकांतून वाचणे हें. प्रतीचं प्रमाण, त्यापेक्षां अधिक चांगलें 
मूळ प्रमाण, तें तुम्हाला येथ सांपडेल, ”? 

£ येथे कोठें ! कोणत्या तरी शिलालेखावर १ ” 

“< अर्थात तेथेंच, ” 


गोंड वनांतील प्रियंवदा १३४ 


:: पाठीमागे ज्या गोष्टी झाल्या त्यावर कोणी अर्वाचीन लेखकानें पुस्तक 
लिहिले असले म्हणजे आपण नेहमीं असा प्रयत्न करावा कीं त्यानें हें पुस्तक 
कशाच्या आधारानें लिहिलें आहे तें पहावें आणि त्यानें दुसऱ्या ग्रेंथाच्य़ा आधा- 
राने लिहिलें त॑ समजल्यानंतर आपण पुन्हां असा आणखी प्रश्न विचारावा कीं, 
त्या दूरच्या तरी ग्रंथकाराचे लिहिणें विश्वसनीय आहे काय £ ” 

“ असें करीत कोठपर्यंत जावयाचें ! ” 

“: जितक्या लाबपर्यंत जाता येईल तितके जावयाचे, ' 

“ आणि मग पुढें ” 

“ या पुढली क्रिया म्हटली म्हणजे मूळ माहिती देणाराची सत्यता 
तपासावी. ” 

“ ज्याप्रमाणे कोर्टात पुढें आलेल्या साक्षीदाराच्या साक्षींत सत्य आपण 
कितपत आहे तें काढीत ञसतों त्याप्रमाणे करावयाचें. 

11 तें कसें १)? 

“ साक्षींदाराचें बोलणें कितपत खरें आहे हें पहावयाचे झाल्यास आपण 
मनीशीं दोन प्रश्न करावेत. ” 

“ ते कोणते ? ” 

“ पहिला प्रश्न म्हटला म्हणजे साश्षीदारास सत्य ठाऊक आहे काय १? 

“ आणि दुसरा? ” 

५ साक्षीदार त्याला ठाऊक असेल तितपत तरी सत्य सांगत आहे किंवा 
कांहीं दूषीत दृष्टीमुळे त्याचं झ्ैलणें अविश्वसनीय आहे ! ” 

“ आजकालच्या किंवा शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या गोष्टींवर पुस्तके 
सांपडतील पण हजारों वर्षांपूर्वीचा इतिहास लिहावथाचा तो कसा! लोक 
म्हणतात आर्यभट्ट अमक्या शतकांत झाळा, पाणिनी इसवी शकापूर्वी अमक्या 
दातकांत झाला. इत्यादि गोष्टी कशा सांगतात ? ” 


१३५ शारदा बाईचा पराक्रम 

“ तंहि सांगतां येते, 

ट्ट तं कसें १ 9१9 

“ एखाद्या ग्रंथात काहीं विशेष गोष्टीचा उ्षेव असला आणि त्या 
गोष्टींचा काळ जर आपणांस ठाऊक असला तर ती गोष्ट उलछेखिगारा ग्रंथ त्या 
गोष्टीशी समकालीन किंवा त्या गोष्टीच्या कालानंतर झाला हे उघड आहे. ” 


:“ वा | एकंदरींत इतिहाससंशोधन म्हणजे साथे तकेशास्त्र आहे. ” 


“: अगदीं साधे, आपणास ए.वादा कालाचा इतिहास लिहावयाचा झाला 
म्हणजे एवढेंच पहावयाचे कीं त्या कालातील अवशेष आणि लेख काय 
उरले आहेत, आणि ते| गोळा केल्यानंतर त्याच्यापासून ऐतिहासिक सत्य 
काढावयाचे. ” 


“ र्तिहाससंशोधन म्हणजे जो काहीं. बाऊ म्हणून वाटत होता 
तितर्के तें कठिण नाहीं, ” 


“- मुळींच नाही. अनुभवाने सत्यनिर्णय कसा काढावा या गोष्टी येऊं 
लागसात, या प्रकारच्या कामास मेहेनत मात्र पुकळ पडते. बराच अभ्यास 
करून फार थोडे लिहिता येते. चागळे यूरोपीय संशोधक पुष्कळसा अभ्यास 
केल्याशिवाय विशिष्ट बिघान करण्यास धजत नाहींत. ” 


“८ मी तर ऐकिले कीं आपण यूरोपीय संशोधकाच्या लेखावर विश्वास 
ठेवित नाही. आणि आपण जी अभ्यासासंबंधानें माहिती सागता तीवरून 
इतिहाससंशोधक संदायी का होतो हे कळलें. केवळ: इंप्रज प्रेथकार सांगतो 
एवढ्यावर आपण अवलंबून राहणार नार्ही असें वाटते, का कीं ग्रंथकारांनी 
दिलेली माहिती सर्व दुय्यम प्रतीची आहे, दुय्यम प्रतीच्या माहितीवर आपले- 
सारखे संशोधक विश्वास ठेवीत नाहींत. ” 


:£ माझी मतें काय असतील ती आणि माझी मते काय असतील या 


संबंधाची लोकांची जी कांहीं कल्पना असेल तो, याच्यांत बरीच तफावत असणें 
शक्‍य नाहीं काय १ ” 


ऑंडषनांतील प्रियंवदा ' १३६ 


“८ शक्य आहे, आपलीं मतें कांहीं मी वाचली देस्वील आहेत, तथापि 
आपल्या लेखांत व्यक्त न झालेलीं अशीं आपलीं मते मीं बरींच ऐकिलीं आहेत. 
आतांपर्यंत आपला प्रत्यक्ष परिचय नव्ह्ता, आणि त्यामुळें आपण कसें काय 
ग्रइस्थ आहांत, आपलीं मर्ते काय आहेत इत्यादि गोष्टींविषयी कर्णापकर्णी 
आलेली माहितीच आमच्या कानीं यावयाची. ”? 


“ तुम्ही कधीं असा अनुभव पाहिला आहे काय, कीं पुष्कळ लोकांनां 
काहीं एक निरोप दुसऱ्याला सांगायला सांगितला तर तो देखील यथातथ्य सांगतां 
येत नाहीं. ” 


“ हो, हें तर मी दररोज पहातेंच, ” 


“ यांत जशा चुका होतात, तशाच चुका लेखकांकडून होतात आणि 
स्थामुळे ऐतिहासिक सत्य बिघडते. माझ्याविषयी ज्या गोष्टी आपण ऐकिल्या 
असतील त्याविषयी आपण असा एक विचार करावा कीं ज्याला झालेली सोष्ट 
सरळपणानें जशीच्या तशीच सांगतां येईल, अशाच मनुष्यांच्या कथन-परंपरेंतून 
त्या गोष्टी आल्या आहेत काय ? ” 


“ तशा परंपरेतून आल्या नाहींत हें कबूल केलें पाहिजे. '' 


: बरे, एखादा लेख वाचून दोन निरनिराळ्या मनुष्यांच्या मनांत त्यांच्या- 
कडून वाचण्याच्या दुलेक्षामुळे निरनिराळ्या प्रकारचे अर्थ त्याच्या मनांत शिरले 
असेंहि आपण पाहिलें असेलच, ” 


€् ह्हो पाहिलं आहे. १9 

:: अशाच चुकांमुळेंहि ऐतिहासिक सत्य बिघडते. तुम्हांला इतिहासाची 
गोडी दिसते. तर अभ्यास चालूं ठेवा. 

हृतर्के बोळून वैननाथशास्त्री जाववास 'निघधाला. बायकांनां तत्त्वांपेक्षां 


क्यक्तिविभयक माहिती अधिक हेवी असते आणि आमच्या शारदाबाईना 
वेजनाथशास्त्रयापासून एखादें व्याख्यान अगर धडा शिकण्यापेक्षां त्याच्या 


१३७ शारदाबाईचा पराक्रम 


जीवितक्रमाविषयींच जास्त जिज्ञासा होती, व अनायासे आढेली संधि वायां 
जाऊं द्यावयाची नाहीं, या हेतूने त्या म्हणाल्या, 


“ कां हो, वैजनाथशास्त्री, मी आतां आपणाला कांहीं तुमच्या स्वतः- 
संजंघाचे प्रश्न विचारते आपण त्याचीं उत्तरें द्याल कां? प्रश्न विचारल्याबद्दल 
राग तर नाहींना येणार १ ” 


: प्रश्न विचारल्याबद्दल राग येणार नाहीं एवढें आपणांस मी सांगू 
डकतों, तथापि आपल्या प्रश्नांची उत्तरे देईनच कीं नाहीं हें मात्र आपणांस 
सांगू दाकत नाहीं. ” 

“ माझा एक प्रश्न असा कीं, मनुष्यप्राणी अत्यंत उच्च दर्जाचा असतो, 
ज्याचा तो फारच स्वाथेत्यागी म्हणून लोकांची समजूत असते, आणि जो लोक- 
कल्याणासाठीं झटतो म्हणून इतर लोक म्हणतात तो खरोखर स्वतःच्या सुखासाठीं 
झटत असतो कीं लोकांच्या हितासाठी झटतो? ” 

“ माझी अक्षी कल्पना आहे कीं, मनुष्य स्वतःच्या सुखासाठीं झटत्त 
असतो. १99 

“ आतां तुम्ही देशाच्या इतिहासासाठी सर्व सुखांवर पाणी सोडलं म्हणून 
आपल्याविषयी सर्व लोक म्हणतात. ” 

“ लोक मूख आहेत, त्यांनां काय समजते ? त्याच्या सुखाच्या कल्पनाच 
क्षुद्र आहेत. ' गोड खायला आणि मऊ निजायला ' याच्या पलीकडे त्याना 
कांहीं दिसतच नाहीं. मीं केवळ स्वार्थासाठी आणि सुखासाठी हपापलेला 
मनुष्य आहे. ?? 

५८ तर मग आपण कोणत्या सुखासाठी धडपडत आहां? ” 

“ तुम्हीं प्रश्न करतां त्यावरून जरा चतुर दिसतां, मग तुम्हाला हयाच 
प्रभाच्या ठिकाणीं कां अडचण पडलो £ तुमची काय कल्पना आहे? ” 


८ आपण आतांच मला बोध केला नाहीं काय कीं, आपणांसंबंधाच्या 
सामान्य जनांच्या कल्पनांबर विश्वास ठेवूं नये, आपली जीं कांही मते असतील, 
18 


*-<-:-:::२>-:२>->-----८:--५५४-:--->>> -:३->------.. --- --------- 


गरोॉडवनांतील प्रियंवदा १३८ 


त्यांत आणि आपलीं मतें कशीं असावींत यासंबंधाचीं इतर लोकांचीं मते यांत 
असलेला भेद लक्षांत घ्यावा म्हणून ? 

:: नेहमींच प्रत्यक्ष प्रमाण सांपडत नाहीं; पण निर्दोष अनुंमान देखील 
करतां येतें, ” 

“ ते कसें ! आणि तुमच्या मनात काय आहे हे अम्हीं निर्दाषपणें कसें 
ताडावयाचें ? ” 

“< ट्श्य अणि निकट असें जें सुस्य असतें, ते सोडून जरा दूरचें आणि 
अल्पबुद्धीच्या मनास ज्याची बांछा होत नाहीं, अशीं सुखे कोणतीं आहेत, त्यांचे 
निरीक्षण करावें आणि त्यांपैकीं प्रत्येक मनात आणून तें प्रस्तुत मनुष्यास कायहेतु 
आणि आयुष्यहेतु होत असेल काय, याचा विचार करावा, ” 

: म्हणजे तुम्ही माझ्या बायक्री विचारशक्तीस बरीच तालीम देणार, 
इतका सूक्ष्म विचार पुरुषाच्या मेंदूपेक्षां कमी वजनाच्या बायकांच्या मेंदूस झेपेल 
काय ? ” शारदाबाई हंसून म्हणाल्या, 

“< दुसऱ्याच्या मनात शिरण्याचा कठिण प्रयत्न जर आपण करीत आहांत, 
तर त्याच्याबद्दल पडणारे श्रम नकोत का करायला १” 

“ माझी अशी समजूत आहे कीं हा कष्टमय जौवितक्रम अपण कतेव्य- 
बुद्धीनंंच घेतला आहे. 

५ तुमचे असें म्हणणें आहे काय कीं सवेसामान्य आणि कायम ठशाचीं 
जीं आपणास भोवताली जीवनचरित्रे दिसतात त्याच्यापेक्षा मी कमी सुखी 
आहें. !? ” 

“ नेहमीच्या सुखाजनाच्या पद्धती सोडून इतर आचरण जो करतो त्यानें 
स्वतः पत्करलेल्या आयुष्यक्रमापासून सुख होतें याविषयींची खात्री इतरांस करून 
दिली पाहिजे, ” 

“ आणि ती काय म्हणून १” 

स्व तस लाघलेला सुखाचा मागे इतरांस दाक्य व्हावा म्हणून, ” 


१३९ दाएरदाबाईहचा पराक्रम 


नामात 


४0५0 0” नित ण0ण0णी णी प क्ण" पाटना: ---<५-----<--->->>- 


“ हा उद्योग येथे कुणा लेकाला सागितला आहे? जो तो अपल्या 
मानसिक स्थितीप्रमाणें अणि प्रवरत्तीप्रमाणें सुखाचा मार्ग स्वतः शोधून काढण्यास 
समर्थ आहे आणि काढतो. ” 

“ त्र मग जगांत गुरूंची, मार्गद्शकांचीं अणि उपदेशकांची जरूरच 
नाहीं. ” 

“ जरूर जरी असली तरी उपदेश कोणी कोणाला करावा ? आपल्या 
कल्पनेप्रमाणे वागणें दाक्य ज्यास होईल असा सांपडला तर त्याला. आपणांस 
सांगावयाची कांहीं अवश्यकता नाहीं. कारण हा आयुष्यक्रमाचा माग स््रीयद्रां 
साठीं नव्हे. ” 

शारदाबाई हंसून म्हणाल्या, “ परमार्थसाधनाचीं जीं तत्वें आणि परिभाषा 
आहे, ती आपण ऐहिक गोष्टींसद्दि लावतां काय १ ” 

“ मळा ऐहिक आणि पारमार्थिक गोष्टी भिन्न वाटत नाहींत. राष्ट्राची 
ऐहिक सुधारणा हाच परमार्थ अशी माझी वृत्ति आहे. ” 

“ तर मग आपण कबूल करतां की राष्ट्रांची ऐहिक सुधारणा हेच आपलें 
ध्येय आहे. राष्ट्राच्या ऐहिक सुधारणेमध्यें ह्लीशूद्राचा कर्तब्यात्मक भाग काहींच 
नाहीं ! तथापि, स्त्रीश्ूद्रांस अगम्य अश्या जीवनक्रमाचीं रहस्ये तर मग आपण 
मजसारख्या स्त्रीस सांगता एकंदरीत १” 

“ समजतील तर सांगावयास हरकत नाही, पण पटतील कां नाहीं हाच 
प्रभ, तत्त्वें जरी समजली तरी तत्त्वानुरूस आचरण हें मात्र स्त्रीश्यद्रांकरितां 
खास नाहीं, ? 


““ मी तुम्हाला जे प्रश्न विचारतें ते मी स्वतः तदनुरूष आचरण ठेवण्या- 
साठीं विचारतें अशांतळा भाग मुळींच नाहीं. केवळ बायकी कुतुहलवृत्तीने 
विचारते, आता मी आपणाला आणखी एक प्रश्न विचारते तो तुम्हां स्वतेः- 
संबंधाचा मुळींच नाहीं, केवळ मानसशास्त्रांगत एक शेय मला समजावयास 
पाहिजे म्हणून विचारते. 


गोंडचनांतील प्रियंवदा १४० 


'चाळन्यालजानन्याक -णण्णागीश पण पलली-ाटपपाल अन >> -->_ --:><>-> ::-:-२-:--_-> 


“ म्हणजे मला मानसशास्त्र कितपत येत आहे, हे पहातां वाटते? मी 
आपणांस साफ सांगतों कीं, मला मानसद्ास्त्र येत नाहीं, ” 


“: मी. आपणांस विचारणार तो प्रश्न हा कीं, आजच्या परिस्थितींत 
अशी कोणतीं ऐहिक ध्येये आहेत कीं, त्यांनीं मनुष्य प्रेरित झाला म्हणजे, 


स्नेह दयां तथा सोख्यं यदि वा जानकीमपि । 
आराधनाय लोकस्य मुंचतो नास्ति मे व्यथा | 


असें निभयवृत्तीने म्हणूं शकेल, लोकांचे आराधन आजच्या दिवसात करावयाचें 
ते कोणत्या तर्‍हेनें करावयार्चे ? ” 


“ कां आपण उत्तररामचरित्र वाचले आहे, हें मला दाखवू इच्छितां 
वाटतं ! ” 


“ शर्थ झाली पुरुषांच्या कुत्स्ति कल्पनांची, मला असें वाटतं कीं, 
चिरडीवर आणून आपण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचें टाळूं पहातां. मी हा 
“छोक म्हटला याचें कारण कमयोगाने प्रेरित होऊन संन्यासमय वृत्तीच्या बनलेल्या 
पुरुषाच्या वृत्तीचा निदशक दुसरा शछोकच नाहीं. ज्याला तुम्टी राष्ट्राची ऐहिक 
सुधारणा म्हणतां. त्यालाच आमचा वऱ्हाडी भवभूति ' आराधनाय लोकस्य 
म्हणतो, जानकीत्याग याचा अथे आजकालच्या दिवसांत खी पाणिग्रहणाशिवाय 
रहावयाचे एवढाच करावयाचा, ” 


६ माझ्या मनांत खोल आणि मलाच गूढ असलेल्या भावनांस कुतूहल प्रय 
प्रश्नांचा पंप लावून त्यांचे निरथकत्व तुम्ही बाहेर काढणार कीं काय? ” 


“ तुम्हीं तर मग असें कबूल करतां कीं, लोककल्याणाचैच ध्येय आपणांस 
इतका स्वथेत्याग करण्यास अगर निराळ्या प्रकारचे सुख अनुभविण्यास प्रेरित 
करीत आहें, तथापि तें ध्येये आणि तद्विषयक भावना आपण गूढ ठेवूं 
इच्छिता ! ” शारदा पुन्हां दसून म्हणाली, 

६ तुम्ही तर वक्रीलाप्रमाणें माझौ उलट तपासणीच चालविरी, नकारा- 
मधून कबूलीजबाब शोधून काढण्यार्चे आपलें कौडल्य विलक्षण आहे. तुम्ही 


१४२१ शारदायाहेचा पराक्रम 


--*-<>>>:--पापापाल 


--<:-. --णपापफपापाएकॉॉशिशाणाण नाना 


वाटतील तीं अनुमानें काढा, त्यांच्या सत्यत्वाबद्दल मान्यता मी तुम्हांस देणार नाहीं. 
तीं अनुमानें बरोंबर आहेत अगर चुकली आहेत हें देखील मी सांगणार नाहीं.” 

: लोकांनी आपलें अंतःकरण ओळखू नये, अशी तरी अकांक्षा आपल्या- 
मध्यें कां असावी ? ” 

५ मी साधारणपणें स्वतःविषयी बोलण्याचे टाळतों, या'चें मुख्य कारण 
म्हटलें म्हणजे उपदेश करणारी मंडळी बरीचशी दूर ठेवावी, अशी माझी इच्छा 
आहे. दुसऱ्यानें स्वार्थत्याग करावा, आपल्या बुद्धीचा आणि आयुष्याचा अशा 
रीतीनें सद्दय करावा म्हणून उपदेश करणारी मंडळी बरीच असते. तुम्हांला 
तरी आमच्या आयुष्याच्या तऱ्हेबाईकपणाची उपयुक्तता कतेत्वाच्या मापाने 
मोजावयाची असेल, नाहीं £ ” 


“ मी तुम्हांस जे प्रश्न करतें ते उपदेश करण्याच्या हेतूनं करीत नाहीं, 
मी विद्या्थिबुद्धीनें करीत आहे. ” 


“ माझ्या आयुष्यक्रमाचा हेतू समजून ध्यावा म्हणून आजपर्यंत आज 
आपण केला इतक्या निकराचा प्रयत्नहि कोणी कैला नाहीं. आपण स्त्री आहांत 
म्हणून गोष्ट निराळी झाली. नाहीं तर इतरांस म्री याच्या अगोदर केव्हांच 
हुसकावून लावलें असतें. 

£ एवंच आपल्या मनांत स्त्रियांविषयी दाक्षिण्य थोडेबहुत तरी जाणत 
आहे. शास्त्रीय पद्धतीनें प्रत्यक गोष्टीचा विचार करून आपण अगचींच ' वेदा- 
भ्यासजड ) झाला नाहीं, ” 

“ काय, माझ्या अंगी स्त्रियांविषयी दाक्षिण्य आहे! ? 

: कां, जे गुण धैयेबान्‌ मनुष्याच्या हृदयांत स्वाभाविकपणे वास करावयाचे 
त्याच्याबद्दहहि आपणास लाज वाटते कीं काय १ तुमची अशी समजूत आहे 
कीं काय कीं शाख्रज्ञानें सत्रीपुरुषभेद विसरलाच पाहिजे ? ” 


५ दाक्षिण्य ही गोष्ट वाईट आहे असें मी म्हणत नाहीं. तथापि त्याचे 
श्रेय मला देणें म्हणजे अवस्तवारोप आहे, ” 


गोंड वर्नांतील प्रियंवदा १४२ 

“ दाक्षिण्य खरेखुरे फारच थोड्या लोकांत सांपडतें. सुंदर व तरुण 
स्त्रियानां उठून खुर्ची देणारे व वृद्ध स्त्रियाकडे दुलंक्ष करणारे लोक आपल्या 
समाजांत पुःकळ आहेत. पाश्चात्यांमधून खोटें दाक्षिण्य आपल्या समाजांत 
पुष्कळ येऊं पहात आहे. त्या खोट्या दाक्षिण्याचा आरोप मी आपल्यावर 
करीत नाहीं. ” 


:: आपल्या समाजांत स्त्रियांविषयीं खरें दाक्षिण्यि आहे अशी आपली 
समजूत आहे काय ? ” 


:“: समजूत आहे काय? माझी खात्री आहे, दाक्षिण्याचा खरा पाया 
दुबेलांविषयीं अनुकंपा हा होय, सोदर्याविषयीं रसिकता हा नव्हे. खोटें 
दाल्षिण्य पाश्चात्य लोकांत आहे व खरें दाक्षिण्य आपल्या लोकांत आहे. ” 


: ते कसें काय? ” 
“८ बाहवा ! आपण इतिहास संशोधक आणि आपण मजसारख्या बाईला 
प्रश्न विचारावा ? ” 


५६६८ न विचारायला काय झालें १ मी या सामाजिक प्रश्नावर फारसा विचारच 
केला नाहीं. आपण जं मत देतां तें आमच्या देशांतील अतिनिंदित पुरुष- 
वर्गास संतोषकारक आहे आणि यामुळें आपल्या मताविषयीं कोतुक वाटतें. 
तसेंच जी गोष्ट आपल्यास ठाऊक नसेल ती दुसऱ्याकडून समजून घेतलीच 
पाहिजे, पुरुषाचें स्त्रियांशी वर्तन कसें असतें ही गोष्ट शिष्ट किंवा भतिशिष्ट 

& ७ 
मंडळीस पूगेपणें ओळरुणाऱ्या आपल्यासारख्या बाईस अधिक समजणार कीं 
मजसारख्या वनांत हिंडणाऱ्या जंगली ब्राह्मणात अधिक समजणार ? ” 


“£ आतां हेच पहा, कांहीं गोष्ट आपल्यास ठाऊक नसली व बायकास 
ठाऊक असली तर ती बरायकांपासून ऐकून घ्यावयास आपण किती तत्परता 
दाखवितां. “ गुणा! पूजास्थानं गुणिंपु नच लिंग नच बय! » हे आपल्याच 
परंपरेंतरळे वाक्य आहे. सखितयांचें शिष्यत्व पत्करण्याची देखील आपल्या देशांत 
तयारी, आणि पाश्चात्य देशांत “ सूतिका-विश्ञान व रुग्णपरिचर्या ” यांसारख्या 


१४२३ शारदाबाईचा पराक्रम 
विषयाची प्रोफेसरी तरी बायकांना कोठें मिळूं देतात ? गुणीं स्त्रिय्रांस तात्पुरतें तरी 
महत्व न देण्यासंजेंधाने पाश्चात्यांचा केवढा दुराम्रह ! आणि आपल्याकडे चांद- 
देवासारखे महायोगी देखील मुक्तावाईच्या पाया पडले, ? 

:: आमच्या देशांतील कित्येक लोक यावर असा आक्षेप घेतील कीं, 
एखाद्या व्यक्तीने एखाद्या बाईच्या पायां पडणें निराळें आणि सवे समाजाच्या 
दृष्टीनें अगर सामाजिक संस्थामध्ये स्त्रियास मानाचे स्थान देणें निराळें! ” 
इतिहास संशोधकांनीं प्रश्न केला. 

“ स्त्रियासंबंधीं लोकवृत्ति काय हें पहावयाचे आहे. संस्थामधून ती 
लोकवृत्ति उघड दिसो अगर खासगी दिसो, तथापि संस्थाच्या दृष्टीनें पाहिले 
तरी देखील आमच्याकडे दाक्षिण्य हे पूर्गपणें दिसतें. ” 

“तेकसें?” 

“ आपल्याकडे अनेक धमकर्मे पत्नीशिवाय होत नाहीत; यूरोपात तसें 
कोठें आहे ! आपल्याकडे लझाच्या वेळीं बायका पुढें असतात आणि पुरुषास 
पाठीमागचं स्थान असते. यजमानाला जेवावयास बोलाविले तर सुवासिनीच्याहि 
पायां पडाबें लावते. स्त्रियावर वेधय आलें म्हणजे त्यानीं पवित्राचरणानें रहावे 
या हेतूने त्यांस त्या तऱ्हेने मान देण्याची वहिवाट आहे. इंग्रजांमध्ये बायकांभोवती 
घिरट्या घालणाऱ्या तरुणास त्या केवळ मोजेचा विषय आहेत. तथापि आपल्या- 
कडे अलीकडे थोडासा फरक होत चालला आहे, विधवांस पावित्र्यास्पद समज- 
ण्याची प्रद्त्ति कमी करण्यासाठीं त्याचे गंगाभागीरथी हें पूवेपद काहून घेऊन 
श्रीमती बापरणें हेंच अलीकडे सभ्यपणाचा भाग झालें आहे. ” 

“ बा ! आपण पुरुषवर्गाची तरफदारी बरीच करतां ! ” 

“ निदान या दिवसात केली पाहिजे, तुमचे पुरुष दुष्ट, आमचे युरोपी- 
यन लोक चांगले अशा तऱ्हेच्या गप्पा कित्येक मतलबी इंग्रज मिशनरी पसखून 
देत आहेत. त्यांच्या मनांत आमच्या ब्राह्मणांत आणि शूद्रांत वैमनस्य उत्पन्न 
करावयाचेच आहे. आणि आमच्या पुरुषात आणि बायकांत तेढ उत्पन्न करून 
देऊन आमचे इंग्रज लोक पाठिराखे आहेत ही भावना आमच्या बायकांत उत्पन्न 


ऑडबनांतीळ प्रियंवदा १७४७ 


करावयाची आहे. अलीकडे सुधारक म्हणवून घेणाऱ्याची जी एक अडाणी 
ठोळी उत्पन्न झाली आहे ती देखील त्या त्यांच्या हेतूस मदत्त करीत आहे. ” 


“ आपल्या स्त्रीवर्गाची अनास्था पुरुषांमध्वे नाहीं असं वाटते काय ? ” 


6 आपणांमध्यें पुष्कळशा गोष्टींची अनास्था आहे. तथापि सुदैवाने 
आपल्या लोकांमध्ये बायकांची अनास्था करण्याचा काळ आला नाहीं आणि 
नवीन परिस्थितीने बायकांची स्थिति फारशी सुधारलेली नाहीं. ” 

“ काय म्हणतां १ ” 

“ विधवांच्या पोळपाटलाटण्यावर सुधारक टीका करतात पण पोळपाट- 
लाटण्याच्या ऐवजीं विधवा बायकांच्या वांटणीस आज काय आले आहे £ तर 
आठ दहा रुपयांची मास्तरकी. त्यां मास्तरंणीला म्युनिसिपालिटिच्या शाळांत 
काम करावें लागतं. आणि म्युनिसिपालिटींत मॅमर आणि इन्स्पेक्टर इत्यादि 
लोकांस खूष करावें लागते. तिला घराबाहेर पडार्वे लागतें तेव्हां तिच्यावर 
छत्री, जोडा, शाल आणि जरा अधिक किंमतीचे लुगडें इतका खे तिच्यावर 
पडतो. तर दहाबारा रुपये मिळविणाऱ्या मास्तरणीने करावें तरी काय ? यापेक्षां 
स्वैपाकिणींची स्थिति किती चागली, जेव्हां जेव्हां फारच थोड्या पगाराची 
मास्तरीण मला दृष्टीस पडते तेव्हां पोळपाटलाटण्याकडे पुम्हा वळा असा मी 
त्यांस उपदेश करतें. अहो, एग्वादी मास्तरीण सुंदर परंतु दरिद्री असली म्हणजे 
तिला आपल्याकडे आपल्या मुलामुल्ीस शिकविण्यासाठी बोलावण्याकरितां गांबां- 
तील वकील अगर म्युनिसिपालिटीचे कित्यक मेंबर कसे टपलेले असतात म्हणून 
सांगू १ तिला खासगी शिकवणीचे आणस्री दहा बारा रुपये मिळविण्यासारखे 
असले म्हणजे आणि घरात दहा किंवा बारांत खःचे निघत नसला म्हणजे ती 
शिकवणी घेतलीच पाहिजे असें वाटते. आणि तिनें ती पककरली म्हणजे तिचा 
खे आणि पूर्वीची काटकसर करण्याची संब्रय नाहींशीं होते. आगि होईल 
तितके करून ती शिकवणी कायम ठेवली पाहिजे, असें तिला वाटूं लागते. 
मधून मधून त्या वकिलाच्या घरींच जेवण्यास भरमंत्रण येते आणि पुढें जें 
व्हावयाचे असतं त होतें, ” 


१४५ शारदाबाइचा पराक्रम 


“ आपल्याकडील दाक्षिण्य कमी झाळे आहे काय १” 

“ अजून फारसे नाहीं. सुशिक्षित वर्गामध्ये कमी झालें आहे. 
आपल्याकडे स्वतःचें लम्न लांगणीवर टाकून अगोदर बहिणींचें लय्न करून द्याव- 
याचं ही वृत्ति आहे. तसा प्रकार यूरोपात आहे काय? ” 

“ आमचा पुरूष वर्ग फार चांगला आहे, असें मला पूर्वीपासून जें 
वाटत होतें, तें मत आज अधिक हढ झालें. माझ्या कल्पनेला दुजोरा देणारी 
बाई एक तरी स्त्रीवर्गात निघाली, हें पाहून मला आनंद होतो. ” 


“ हा, थांबा ! इतक्यांत आपली पाठ थोपटून घेऊं नका. ” 

“ आतां काय आपण आमच्या पुरुषवर्गावरच उलटणार वाटतं ! ” 
“ होय, तुम्हाला एक दुसरी बाजू दिसली पाहिजे. ” 

“ ती कोणती ? ” 


“ स्त्रियाच्या बाबतींत पुरुषाचे वर्तन कसें असावें, याचा विचार केला 
असता पुष्कळच सुधारणेस जागा आहे. प्रथमतः नीतिमत्ता ; पुरुषांच्या मनात 
स्त्रियाविषयीं जितका आदर असावयास पाहिजे, तितका नाहीं. प्राचीन उच्च 
ध्येये आमर्चे पुरुष विसरत चालले आहेत. जितके पुरुष अधिक नीतिमान 
होतील, तितके त्याचे ग्रह्सोख्य वाढेल, पुरुषानीं स्वतःच्या सोख्याचा दृष्टीने 
जरी विचार केला, तरी त्याबरोजर स्त्रियाची स्थिति सुधारेळ, पण स्वतःच्या 
सुखासंबंधाने तरी उच्च कल्पना आपल्या पुरुषांमध्ये कोठे आहेत ? स्त्रियांस 
शिक्षण द्या म्हणून पुरुष म्हणतात, पण पुरुषांमध्येच शिक्षण चागले कोठे 
आहे ? आमचे वडील मीमांसक होते, त्याच्याइतकी सूक्ष्म विचारपद्धति 
ज्यांमध्ये आहे, असा आजकालच्या वकीलात एकहि दिसत नाहीं. ' काव्य 
शास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्‌ ' हें वाक्य आजकालच्या सुशिक्षित 
पुरुषांसंबंधानें कोठें खरे आहे ! आपण शिकलेले आहों व भ्रेष्ठ आहो, असा 
बृथा गर्व मात्र चोहोंकडे दिसून येतो. पुरुष स्वतःचे आचरण जेवढे चांगल्या 
तऱ्हेचे ठेवतील आणि स्वतःच्या उन्नतीकरितां जितके झटतील तितकी 

19 


गोंडवनांतील प्रियंवदा १४६ 


०. 2002120201210 2200020020.“ 


बायकांची हि उन्नति करून देतीळ, आजकालच्या दुबेळ आणि दरिद्री मध्यम 
वर्गातील हिदू आपले असे कोणते हक्क जायक्रास देणार ? पुरुषांनी स्वतः 
तेजस्वी व पराक्रमी व्हावें म्हणजे ते आपल्याबरोबर आम्हां बायकाचेहि भवितव्य 
स॒धारतीळ. बरें तें सवे राहूं द्या. तुमच्या आयुष्याला स्फूर्तीदायक किंबा 
कार्यप्रबतैक असे काय आहे या प्रश्नाला आपलें उत्तर यायचे राहिलेच. ” 


“ घृण काय हो, तुम्ही - तुम्ही. आपले नांब तर सांगितलंच नाहीं, 
माझे नाव मात्र विचारून घेतळें आणि आमच्या आयुष्याच ध्येय शोधीत 
बसता १ ” 

“ युःकश्चित्‌ स्त्रीवर्गातील एका व्यक्तीचे नाव विचारून घेण्याची 
आपणाला तरी कोठें पर्वा होती? सध्याच्या बायकांपेकीं एखादीच नांव समजण्या - 
पेक्षां घोंड्यावर शेकडो वर्षांपूर्वी खोदळेळे नाव वार्‍चूनच आपणांस अधिक 
आल्हाद होत असेल नाहीं १” 

वैजनाथशास्त्री हंसून म्हणाळे, “ केवळ बायकांचीच नार्वे समजली 
नाहींत तर चालेल असें नाहीं, आजकालच्या बहुतेक पुरुषांची देखील नांवें 
समजण्यापेक्षां शिलालेखांतील एखार्दे नांव उकलले तर आनंद होईल. शिवाय 
ज्या लोकाचीं नावें समजण्यात फायदा नाहीं, त्या वर्गोत महाराष्ट्रांतील एकूण एक 
बायका येतात, असंहि नाहीं ! ” 

:< महाराष्ट्रांत ज्या बायकांचे नांब समजलें अगर ओळख झाली तर 
आपणांस आनंद होईल, अशा बायका आहेत तर! ” 


“ प्रिचिताचे नांव तरी समजण्याची इच्छा आणि तें समजले असता 
आनंद होणेंहि स्वाभाविकच आहे. संभाषण प्रसंग ज्यांच्याशी आला अश्या 
स्त्रिप्रा वगळल्या असतां उरडेल्या बायकांत अमुक एक बाईंचे नांव समजल्यामुळे 
अगर तिच्याशी ओळ व झाल्यानें आनंद होईल, अश्या बायका आहेतच असें 
मी जरी विचार केल्याशिताय म्हणणार नाहीं, तरी तशी असणें शाक्य आहे, हें 


मीं म्हणतों, ” 


०1 णाय 


१४७ शारदाबाईचा पराक्रम 


£ बघ्रायकांवर मोठी मेहेरबानी झाली म्हणायची ! ” शारदाबाई हंसून 
बीलल्या, 

“ बुरं आपलं नांब काय ! तें कांहीं तर्काने काढणें कठिण नाहीं. म्हणा ! 
आपल्याकडे कालेजात शिक्षण मिळविणाऱ्या स्त्रियांची संख्या बोटांवर मोजण्या- 
इतकी आहे. तीन चार डाक्‍्टरणी, आठ दहा बी. ए. च्या बाजूचे शिक्षण 
घेणाऱ्या इतक्याच आहेत. त्यातील परभू , शेणवी आणि ब्राह्मण कुमारिका 
अगर सुवासिनो वगळल्या तर एकदोधीजणींच रहातील, त्यातल्या त्यात 
शारदाबाई सोमण या एवढ्याच मुंबई इलाख्याच्या बाहेर, तर आपण त्याच 
असाल, किंबा मी चुकतहि असेन, कारण त्या शारदाबाई पुरुषवर्गावर फ़ार 
ताशेरा झाडणाऱ्या, कूर, अरसिक, कठोर आणि चष्मा घालणाऱ्या असाव्यात, 
आणि आपण तशा दिसत नाहीं. ” 

“< बाहवा इतिहासकार ! आपल्यासारखे विद्वान कोठे घसरतात हे 
कळले |! पुरुषवर्गावर घसरणें आणि चष्मा घालर्णे या दोहोंमध्ये संबंध काय १ ” 


“ संबंध बराच « आहे, जननेद्रियशाह्रातगत जे मानसशास्त्र आहे, 
त्यांचा सिद्धांत असा आहे कीं, लेखकाची आणि वक्त्यांची भाषा क्रूर आणि 
कठोर असली तर त्यांची इंद्रियविषयक उपासमार होते असे समजावे. ज्यांची 
इंद्रियविषयक उपासमार शोते, त्यांच्या बाहेरील खुणा म्हटल्या म्हणजे कावरी- 
घावरी अगर क्रूर अशी मुद्रा, बिड्या ओढणे, तपकीर ओढणे इत्यादि तंवयी, 
या होत, ही उपासमार फार झाली म्हणजे निदान अरसिकता उत्पन्न हेते. 
आणि स्वतःची मुद्रा देखील त्यांस आनंदी असण्यापेक्षा गंभीर झालेली बरी 
वाटते पण ते साधत नाहीं. आणि आसतुटेपणा म्हणजे असंतुष्ठता ह्ृदयांत 
असली म्हणजे तिचा चेहऱ्यावर परिणाम होऊन गंभीरपणाच्या ऐबजीं भेसूरपणा 
मात्र उत्पन्न होतो. वेळ घालविण्यास दुसरें उपाय नसले म्हणजे तंबाखू आणि 
तपकीर यांच्या संबयी लागतात, मनांत इद्रियविषयक उपासमारीने आणि अनेक 
प्रकारच्या निराशांनीं उत्पन्न झाहेला संताप मी कोणावर काढूं असें होतें. पुष्कळ 
अविवाहित स्त्रियाचीं पौरुषात्मक जोरदार भाषा याच गुणांमुळे उत्पन्न होते. 


गोडवनांतीळ प्रियंवदा १ ४८ 
अनि बिझांट, सिस्टर निवेदिता, पंडिता रमाबाई इत्यायिकांच्या भाषांमध्ये जो 
जोरदारपणा उत्पन्न होतो त्यास भौतिक कारणें हींच असावीत असे वाटतें.” 


“ वाहवा ! बरीच आहे आपली विचारमालिका ! जननेंद्रिय शास्त्रांत- 
गत मानसशास्त्र बरेंच मौजेचे दिसतें ! मी या शास्त्रावर कांद्दीं पुस्तके वाचावी 
अशी इच्छा एकदा आमच्या परिचय!च्या एका इंग्रज डाक्टरिणीस व्यक्त केली 
तेव्हां तिनें काय भर्यकर मुद्रा केली | ” 


: हो इंग्रज लोकांत आणि त्याच्या संसर्गाने आपल्या पुरुषांत देखील एक 
तऱ्हेचा वेडगळ सोंवळेपणा आहे. शास्त्रीय विषयावरचे पुस्तक वाचायला 
त्यांनां आडकाठी होईल तथापि त्याना विघयबासनासूचक कादंबऱ्या आणि 
नाटकें वाचण्यास आणि पोशाख करण्यास बिलकुल ह्रकत वाटत नाहीं. ” 


“ पण आपण चष्मा कोठून काढलात १” 


“ पुष्कळदां पाश्चात्य देशांत आणि आपल्याहि देशांत कांहीं अविवाहित 
स्त्रिया, अगर लग्नास तयार परंतु अविधाहित, अद्या विधवा यांचा अविवा'हितपणा 
शरीरवेगुण्यामुळें येतो, आणि दुखरे डोळे हें त्यांपैकी वैगुण्य असते. शिवाय 
ज्या बायकांच्या चवी गंभीर बनतात त्यांनां चष्मा घालणें वाईट वाटत नाहीं, 
उलट चांगलेच वाटतें आणि त्यांचे डोळे दुखरे असल्यास त्यांनां चष्मा 
लागतो. ” 


: बुरें इतिहासकार, आपल्या कल्पना बऱ्याच मौजेच्या आहेत. जोपर्यंत 
हृश्य प्रमाणाच्या अनुरोधाने आपण चालला होतां तोंपर्येत सत्याजबळ येत 
होता. पण जेव्हां आपण त्या मानसद्वास्त्रांच्या सिद्धांताच्या साहाय्याने 
निणेय करावयास लागलां तेव्हां मात्र घतरलां. कारण शारदाबाई सोमण ती 
मीच. ” 


£: असं काय? बाकी तुम्ही जशा असाल म्हणून वाटलें त्यापेक्षां बऱ्याच 
निरळ्य़ा दिततां. ” 


१४९ शार दावाइचा पराक्रम 


*-*न------२>---५-ा----:८/--॥ाााा-“-ााा (नानल 


3222. >>> टया“ 


“८ यार्चे कारण मला असें वाटतें कीं तुम्ही माझे लेस वगेरे वाचले 
असतील, त्यावरून माझ्या स्वभावाचे एक लहान अंग काय तें आपणांस कळलें 
असेल, पण आपल्याविषयी काय वाटते ते मात्र मी सांगते. ” 

& आणि तें काय?” 

: ब्रोधरसातें पिउनी मस्तपणानेंच राहतो विजनीं । 
तो हा सद्गुरुराजा स्वच्छंद क्रीडतो सदा स्वजनीं ॥ 

हँ बयाबाई रामदासाविषयीं म्हणत होती तंच मी आपल्याविषयी म्हणत 
होतें आणि म्हणेन, ” 

“ झालें तर मग, आपल्या आयुष्याचा हेतु तरी आपणास आणखी 
काय समजावयाचा आहे १?” 

“ पुष्कळ गोष्टी अजून गूढ आहेत. ”' 

६ त्या कोणत्या ? ” 

“ ज्ञानाची तहान भागवितांना जे सुख आपणांस प्राप्त होते ते. इतकें 
मोठें आहे काय की, त्या सुखापुढें आपणास होणारे हे शारीरिक केश विदेही 
जनकाप्रमाणें आपणांस तुच्छ वाटतात ! केवळ ऐतिहासिक वस्तूंसारख्या 
नाशिवत गोष्टीची ज्ञानप्राप्ति आपणास दारिद्रय व एकांकित्व यांपासून उत्पन्न 
होणाऱ्या अनेक दुःखाशीं झगडण्यास समर्थ करिते काय ? ” 

“८ आपणांस त्या कल्पनेच्या ग्राह्मतेविषयीं संदेह कां पडावा ? ” 

“ सदेह पडण्याचें कारण एवढेंच कीं दुःखाशी झगडण्यास केवळ 
जिज्ञाता उपयोगी पडणार नाही, आणि अत्यंत उच्च ध्येयाशिव्राय जिशासाहि 
प्रज्वलित होणार नाहीं, ” 

: नसेल कदाचित, ” 

“ अहो महाराज, मी मघांपासून जो प्रश्न विचारित आहे, त्या प्रश्नाची 
टाळाटाळी आपण करूं नका. मी आपणांस हा जो प्रश्न विवारीत आहे तो 


गोडवनांतील प्रियंवदा ११० 
सहेतुक आहे, ज्ञानप्रासीनें लोककल्याण होईल ही आपली भावना आहे, असें 
मला उघड दिसतें आणि आपण जें कार्य करूं त्याचें राष्ट्राला आज जरी महत्त्व 
नसलें तरी तें कर्तव्य आहे म्हणून तें केलें पाहिजे ही भावना देखील मनांमध्यें 
जाग्रत असेल, पण महाराज, “ लोककल्याण ? म्हणजे काय हे देखील मला 
समजेनासे झालें आहे ! आणि त्यामुळें माझें मन घोटाळत आहे. महाराज 
या शारदेस आपण केवळ स्त्री म्हणून तुच्छ मानूं नका. ही शारदा देखील 
इतर स्त्रियापेक्षां निराळी आहे. ध्येयाच्या मार्गे लागून त्याच्यासाठी पाहिजे 
तिकडे वाहवत जाणारे आणि जगाकडून त्यामुळे वेडेपीर म्हणवून घेणारे लोक 
आहेत त्यांतली ही आहे आणि त्यामुळें मी मृगजळाच्या पाठीमागे तर धांबत 
नाहीं ना ? असा मलाच संदेह उत्पन्न होत आहे. स्वतःच्या विचारांत संदेह 
उत्पन्न झाला तर कोणाकडे जावें ! जो कोणी सहव्यवसायी असेल त्याच्याकडे 
जावें असें वाटले, आपणास ठाऊक नसेल तथापि आपली अज्ञातवासात 
असलेली मी शिष्या आहे. गुरूस जो शिष्य ठाऊक नाहीं, अगर गुरूने 
ज्याचा स्वीकार केला नाहीं अश्या मनुष्यास घिःक्षार करणाऱ्या गुरूस देखील 
गुरु मानून रहाण्याचा अधिकार महाभारतकारानीं एकलव्याच्या कथेब्र दिला 
आहे. मघाशींच बयाबाईचो जी आर्या आपणास म्हणून दाखविली, ती आर्या 
मी आज बरींच वर्षे आपल्या मनाशीं म्हणत आहे. मला असें वाटतें कीं, 
माझ्या मनातील विकल्प काढून टाकून आपण माझ्या आयुष्यास हेतु उत्पन करून 
द्याल, देशकल्याण म्हणजे काय हेंच मला कळेनासं झालें आहे, आपल्या 
देशांतील अनेक चळबळी घेतल्या तरी त्या सर्व मला फोल दिसूं लागल्या आहेत. 
कॉंग्रेस घ्या, अगर सामाजिक सुधारणा घ्या अगर दुतऱ्या कोणत्याहि प्रागतिक 
चळवळी ध्या. केवळ जुन्या गोष्टींचा संहार करण्यापलीकडे त्यांचा कांहीं 
उपयोग होत नाहीं तर केवळ नाहकारक गोष्टीकडेच आपण आपली इाक्ति 
स्वचे करावयाची काय? उत्क्रांतिवाद उफ विकासवाद घ्या. त्यार्चे तत्त्वज्ञान 
वाचर्ले तरी काय हातीं येत! अवयवबी म्हणून ज्या ज्या वस्तू आहेत त्या 
निरवयव स्थितींतील जीवांपासून अगर वस्तूपासून अल्प संक्रमणाच्या साहाय्यानें 


१५१ शारदाबाईचा पराक्रम 


हळूं हळूं तयार होत जातात, असें हें स्पेत्सरीय मत सागत. तेच सिद्धांत ते 
समाजास लावतात. समाज हा अल्पवयी आहे असें म्हणतात. समाजदास्त्रवेत्ते 
म्हणतात कीं, समाजाची उत्क्राति होत अपतताना त्या उत्क्रातीस जोरानें चालन 
देणें हें समाजशास्त्रयुक्त कार्याचे घ्येय आहे. अर्थात देशाभिमानाने जें कार्य 
व्हावयाचे ते समाजाची ठत्क्राति अधिक इोण्यासाठींच होय, तर मग महाराज, 
आपल्या समाजाची उत्क्राति कोणत्या दिशेनें होणार! अर्थात्‌ ज्या दिशेने तो 
विकास होणार आढे ती दिशा ओळखून त्या विकासांतील कांहीं तरी कार्य 
साधल्यानंच लोककल्याण होणार आह. तर मग महाराज, मी आपणांस असें 
विचारते कीं पुढें समाज कसा होणार आहे, व त्यासाठीं आज काय करावे, 
आपण आपल्या आयुष्याचा सद्दय कसा करावा ! आणखी हेहि सांगा कीं, 
केवळ नाशिवंत आणि ऐहिक सुखे भोगण्यापलीकडे आपणास काहीं कर्तेव्य 
आहे कीं नाहीं ! अगर अत्यंत सामान्य प्रतीचं अगर अत्यंत कनिष्ट प्रकारचें 
जे दान म्हणजे आपल्याजवळ जें असेल ते दुसऱ्यास देणें. या पलीकडे उच्च 
मनोविकारास काहीं कर्तेव्यक्षेत्र आहे कीं नाहीं £ स्पष्टवक्ते म्हणून आपली 
ख्याति चोहोंकडे आहे त्या अर्थी आपण र्जे काहीं ग्वरें ग्वरें असेल तेच सागाल 
अशी माझी षात्री आई. ” 


शारदेचे हे उद्गार वैजनाथशास्त्री शांत चित्ताने आणि काहीं अंशी समाधान- 
वृत्तीनं ऐकत होता. शारदेच्या मुखांतून इं उद्गार निघाळे ते सद्गदित कंठाने 
निघाले. त्यांत पराभवाच्या अनुमवाची छटा दिसत होती. केवळ आपण 
आपल्या चौकसपणार्ने स्वतःच्या हृदयाचा पत्ता वेजनाथश्ारूयास लागू न देतां 
त्याच्या हृदयांत काय आहे हें काढून घेण्यासाठीं जो आपण प्रयत्न केला तो तो 
निष्फळ झाला, आतां आपलें ह्ृदय उघडें करून त्याच्यापाशी गेलें पाहिजे असेंच 
तिडा वाटूं लागळें, डोळ्यांतून आंतर्वे निघण्याचीहि वेळ आली होती. 

शारदेचे बोलणें ऐकून वेजनाथशास्त्री आपलीं गमीरवृत्ति कायम ठेवून 
म्हणाला “ शारदे, आतां मला तुझ्या मनाची ओळख चांगली पटली, आणि 
मला मधांपासून तूं जे प्रश्न विचारीत होतीत त्याचा रोखद्वि समजला. आतांपर्यंत 


गयोंडवनांतील प्रियंवदा १५२ 
जर मला कोणी म्हटलें असतें कीं आपल्या राष्ट्रांचे आणि समाजाचे भवि- 
तव्य काय या विषयींच्या संदेहामुळे ज्या स्त्रीला आयुष्यहेतु उत्पन्न झाला 
नादीं अशी एक तरी स्त्री आजच्या महाराष्ट्रांत आहे तर तं खरें देखील 
बाटले नसते. तुझ्या प्रश्नास उत्तर आहे, आकज्च्या स्थितींत देखील काये 
करण्यास मनुष्यास उत्साह देतील अशी कार्ये आहेत तीं प्रगतीचींच द्योतक 
आहेत. पण ती कोणाहि करारी पुरुषाच्या आयुष्यांत हेतु उत्पन्न करून देतील 
कीं नाहीं हें मला निश्चयपूर्वक सागता येत नाहीं, पण शारदे, अश्शी कल्पना कर 
कीं तीं कार्ये पुरुषांच्याच हातून होण्यासारखीं असलीं तर तूं तरी काय करणर१ ” 

“ कोणतेहि काय असें आहे काय कीं र्जे पुरुषाच्या आयुष्यास हेतु उत्पन्न 
करते पण स्त्रियांच्या आयुष्यास करीत नाहीं १ स्त्रियांस शारीरिक दुर्बलतेमुळे 
अनेक गोष्टी स्वतः करितां येणार नाह्दींत हें ग्बरं. तथापि त्या कार्यीत साहाय्य 
करता येईल ना £ स्त्रियांस लढणें ठाक्य नसले तर शिपायांचे कपडे शिवून 
देण्याचे काम तरी त्यास करतां येहईेल ना? काम कितीहि हलके असो त्याच्या 
योगाने आयुष्यास हेतु उत्पन्न झाला पाहिजे. आतां हें पहा कीं मी शिक्षकि- 
णीर्चे काम करीत आहे, हें काम जर कोणत्या तरी ध्येयाच्या साधनेसाठी 
आहे अशी जर माझी खात्री असती तर हेंच काम मी किती उत्साहाने केलें 
असते £ आता सध्यां केवळ चरितार्थसाधन म्हणून आणि त्याच्या योगानें 
कांहीं तरी देशहित आणि तें कसें तरी होत असेळ अशी कल्पना करून करीत 
आहे. पण माझ्या कार्यापासून होणाऱ्या परिणामाची मला इतकी अंधुक 
कल्पना आहे कीं तिच्या योगाने कार्येपरत्वाचे वारें शिरत नाहीं, ? 

“जे काहीं कार्य कराबयाचे तें शोधण्यासाठी आणि उत्साहाने त्याकडे 
लागण्यासाठीं प्रवृत्त करणारें ज्ञान तुम्हांस पाहिजे ? ” 

ट्ट होय. १2 

6 आणि कार्यध्येय आपणांस समजलें आणि त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी 
अनेक कार्ये कराबयाचीं असलीं, तर त्या कार्योत स्त्रियांनी कोणतीं कामे कराव- 
याचीं हाच तुमचा प्रश्न आहे काय? ” 


१५३ शारदाबाईचा पराक्रम 


"५: दयापपपापापाणपपीपी0एी0"प0ी0 0 


“ होय, हाच माझा आपणांस प्रश्न आहें, मावी कार्यक्रमांत स्त्रियांकडून 
कोणतें कार्य होण्यासारखं आहे हें मला समजावून पाहिजे. ” 


ज्याच्या चित्तांत मार्दव आहे असा संशय त्यास स्वतःलाच आला असतां 
स्वतःवरच रागावणारा, स्त्रियाविषयीं दाश्ष6ण्य आहे असें त्यास कोणीं दाखवून 
दिर्ले तर जणूं काय त्यानें आपला मोठा अपराधच केला आहे अशी मनाची 
समजूत करून घेणारा, आणि पारदकणाप्रमाणें आपण आद्रेतेच्या विकारापासून 
अत्यंत अलिप्त आहों असें समजणारा, तो मनुष्यरूपी जड पदार्थांचा गोळा, 
अगर प्रखरता, तेजस्विता, सरवेग्राहकता, आणि भयदायकता या बाबतींत साक्षात 
बेश्वनराची बरोबरी करणारा असा अरसिक वैजनाथदास्त्री शारदेच्या या प्रकारच्या 
भाषणांनीं अगदीं बिचारग्रस्त झाला. शञारदाबाईंच्या प्रश्ार्चे उत्तर देणें वेजनाथ- 
शास्त्र्यासहि सोपें नव्हते. आणि त्यानें त्या भग्न देवालयाच्या पायठणीवर बसून 
विचार करण्यासाठीं डोळे मिटले. शारदा त्याच्याकडेच पहात होती. बोलतां 
बोलतां संध्याकाळ झाली, 


विचार करण्यासाठीं किंबा कदाचित्‌ विश्रांति घेण्यासाठीं ( या कल्पनेबद्दल 
आम्हीं शास्त्रीबोबांची सपशेल माफी मागतों कारण शास्त्रीबोवा कधी थकतच 
नसत त्या अर्थी त्यास विश्रातीचे काय प्रयोजन १ ) किंवा विक्षिप्तपणामुळें म्हणा 
शास्त्रीबोवानीं आपले मिटलेले डोळे कांहीं काळपर्यंत तसंच राहूं दिले. 


: विक्षिप्तपणा ? हे शब्द वापरलेले शास्त्रीबोबांस दिसळे तर शास्त्रीबोवा 
खास रागवतील. का कीं, त्यांच्या अंगीं विक्षितरपणा मुळींच नसून जो कांहीं 
निराळेप्णा लोकास वाटे तो संशोधकाच्या उद्योगाशी आजच्या “* गचाळ 
महाराष्ट्रा! स परिचय नसल्यामुळे वाटत आहे. संशोधकाचा वग जर बराच 
वाढला तर शास्त्रीबोवांच्या वतैनाशीं असहश अशीच वागणूक विक्चिसपणाची 
होईल असें त्यांचे म्हणणें असे; तर आपण असे समजूं कीं शास्त्रीबोबानीं 
या वेळेस डोळे मिट ते केवळ संशोधकांच्या स्वभावधर्माप्रमाणें होते. शास्त्री- 
बोवांची ती कृश दारीरयष्टि, आणि त्यानां होणारे केश यांची जाणीव शारदा- 
बाईच्या ठायीं जागत होती, त्याना वाटले कीं परिश्रमाने या ग्र्हस्थाला भोंबळ 

20 


गोंडवनांतील भियंबदा १५४ 
तर नाहीं ना आली ? कदाचित्‌ असेल, अशी कल्पना करून शारदाबाईनीं 
आपल्या पोलक्‍्याच्या अस्तनींतून हातरुमाल काढला आणि ती वेजनाथशास्त्र्यास 
वारा घाळूं लागली, वैजनाथशास्त्रयास आपल्याला कोणीं वारा घालील हे किंवा 
कांहीं स्वाभाविक वारा चेहेऱ्यास स्प करीत आहे याची जाणीव मुळीच 
नव्हती. वेजनाथशास्त्री तरी देखील निमीलितलोचनच होऊन राहिले, शास्त्री- 
बोवास भोंवळ आली असें वाटून शारदाबाईनीं “ शास्त्रीबोवा'? असे इाब्द 
उच्चारून त्याच्या कपाळावर हात ठेवला. 

शास्त्रीओवा जणूं काय विजेचा धक्का बसल्याप्रमाणें जागे झाले आणि 
एकदम उठून बखले, अर्थात शारदाबाइंनीं आपला हात काढून घेतला, तथापि 
त्याची स्थिति त्यावेळेस विचित्र झाली होती. त्याच्या अंगाला घाम आला, 
कॅप सुटला आणि शरीरातील रक्तच जोरानें वाहूं लागलें एवढेंच नव्हे तर 
शरीराच्या मृण्मय परिमाणूंमध्येंच जोराची खळबळ चालली, आणि शरीरातील 
सस्तघातू एकमेकापासून वेगळे होत आहेत कीं काय अस वाटलें, तिचें मन 
संभ्रमित झाले. आणि मोठ्या प्रसत्नार्ने तिनें प्रश्न विचारला कीं, “ आपल्याला 
भोंवळ आली होती काय? ” 

“ ळे मी केवळ विचारात गढला होतों. शारदे, ज्याअर्थी मला तूं गुरूच 
समजतेस त्या अर्थी तुला एकेरी नावाने संबोधावयास हरकत नाहींच. या 
सारख्या गहन विषयाची चर्चा आपण जरा अधिक स्वस्थतेने करू, आपल्या 
या रतनपूर येथील उपनिपदाच्या पहिल्याच अध्यायात सव गोष्टींची विशेषतः 
गलितप्राण समाजातील व्यक्तींच्या आयुष्यहेतूंची चर्चा कशी होणार ! तुझ्या 
प्रश्नास उत्तर द्यावयाचे म्हणजे माझ्या मनात गढलेली विचारमाला अव्यक्त 
स्थितींतून व्यक्त स्थितींत आणावी लागणार, ”? 

“८ काय आपले कायेध्येय अव्यक्त स्थितींत आहे आणि तसें असल्यास तें 
इतक्या परिश्रमाच्या कार्यास प्रव्रत्त कसें करतें १ ” 

“<ारदे, जे अव्यक्त आहे तें कार्यास प्रत्रत्त कसें करोल अशी तुला शॉका 
वाटत आहे काय ? त्रह्म हे अव्यक्त आहे तथापि ब्रह्मप्रात्तीसाठीं लोक धडपडतातच 


श्र 


१५५ शारदाबाईचा पराक्रम 
ना! अगदीं अडाण्यरापासून अत्यंत विद्रानापयेत सर्वे लोक ब्रह्मप्राप्सर्थच 
ग्वटपटी करीत आहेत, आणि तो खटाटोप आज हजारों वर्षे अव्याहत चालला 
आहे. अव्यक्त, अक्षर आणि निराकार असें ब्रह्म सामान्यांत गोचर होण्यासाठीं 
मूर्तिरूपानें अगर ब्रह्मबोधक मनुष्यरूपानें अगर ग्रंथरूपार्ने व्यक्त व्हावें लागतें. 
र्जे खरोण्बर अव्यक्त आहे त्याची व्यक्त अशी प्रतिकृति खरोखरच आमभासात्मक 
होय पण त्या आभासात्मक प्रतिकृतीची देखील आवश्‍यकता आहे. जगांतील 
ज्ञेये दोन प्रकारचीं असतात; कांहीं केवळ मनोगोचर अप्ततात. उदाहरणाथ 
विचार, कल्पना इत्यादि, आणि कांहीं इंद्रियगोचर असतात. याला उदाहरण 
म्हणजे आपणास जे पदार्थ दिपततात ते सर्व होत. कमी अधिक प्रमाणाने पहिलें 
अव्यक्त आणि दुसरें व्यक्त असतें. व्यक्त हे समजण्यास अर्थात सोपें आणि 
अव्यक्त हें समजण्यास दुर्बोध असं असतें. आणि याचसाठीं अव्यक्त गोष्टी 
कल्पनेने व्यक्त कराव्या लागतात. मूर्तिपूजा याचा अर्थ जे दूर आहे तें निकट 
आहे असें कल्पिणें, जे केवळ मनोगोचर आहे तें इंद्रियगोचर करणें, आणि जे 
कारणरूप आहे तें क्रियारूपाने जाणणें. जोपर्यंत अव्यक्ताच्या कसें तरी करून व्यक्त 
बनविलेल्या स्वरूपांवर मनुष्यप्राणी संतुष्ट आहे तोंपयंत त्यास अडचण पडत नाहीं.” 


“ तर तुम्ही देखील अव्यक्ताच्या कशा तरी रीतीनें व्यक्त बनलेल्या स्वरूपा- 
मुळेंच कार्येप्रवृत्त होतां ना? मला तरी तेंच पाहिजे, ” 


शास्त्रीबोवानीं तिच्या प्रश्नाची जाणीव न दाखवितां पुढें बोलण्यास सुरवात 
केली, “ अव्यक्त गोष्टींच्या, मग त्या अव्यक्त गोष्टी ब्रह्म असो अगर लोक- 
कल्याणासारख्या कांहीं अंशीं व्यक्त आणि बऱ्याच अंशीं अव्यक्त अद्या असोत, 
त्यांच्या व्यक्त बनविलेल्या स्वरूपाविषयीं भक्ति जडून गेली म्हणजे हृदयांची 
तळमळ सुरू होते. पुष्कळ प्रसंगीं कांहीं लोकांच्या बुद्धिविकासाप्रमाणें अधिक 
उज्ज्वल कल्पना लागते. ज्या गोष्टींपासून जनहित होते अश्या अनेक गोष्टी 
असतात. तथापि जनहित म्हणजे काय असा प्रश्न केला म्हणजे उत्तर देणें 
कठिण असतें. असें जरी आहे तरी आत्मशिक्षण ज्यास घडवावयाचें असेल 
त्यास जनहितास अनुकूल असें चित्त बनवितां येणार नाहीं काय ! ” 


गोंडवर्नांतील प्रियंबदा १५६ 
“८ मला अव्यक्ताची साधना करतां येणार नाहीं. आणि अनंताशीं साधर्म्य 
संपादनहि करतां येणार नाहीं. मला आयुष्यक्रमण करावयास अधिक सोपा धर्म 
पाहिजे. ” 
“ जे केवळ हृद्य असेल त्याचीच तुला साधना करतां येईल, असें आहे 
काय?” 


“ कांहीं अंशीं तसेंच आहे. निदान ज्याची साधना करावयाची तो विषय 
कल्पनेस तरी दाक्य नको काय ? ” 


“ अर्थात हवा, तथापि कल्पनेस राकय अशा अनेक अव्यक्त गोष्टी 
आहेत. तथापि प्रस्तुत व्यक्तीच्या कल्पनेस काय दाक्य आहे आणि काय शक्‍य 
नाहीं हँ प्रकृतिमेदानें ठरत असतें. मनुष्ये बुद्धीच्या दृष्टीने निरनिराळ्या 
पायऱ्यांवर आहेत. ” 


£: मी कोणाच्या पायरीबर आहें हे माझे मला सांगतां येणार नाहीं. ” 


“ आरदे, पुरुषाचे मन आणि स्त्रियांचे मन याविषयीं आपण जसजसा 
अधिकाधिक विचार करावा तसतसा त्यांच्यामध्ये अधिक भेद दिसून येतो, 
सर्वसामान्य विचार करून तस्वनिणेय करणें हें काम जितर्के पुरुषांस सुलभ होतें 
तितके स्त्रियांस होत नाहीं, स्त्रियांचे केवळ बुद्धिगोचर बाबतीपेक्षां इंद्रियगोचर 
बाबतींत लक्ष अधिक दिसतें. इतिहासासारख्या बाबतींत संशोधन करून लेख 
अगर ग्रंथ लिहिणारामध्ये पाश्चात्य देशांत ज्याप्रमाणें पुरुष आहेत त्याप्रमाणें 
स्त्रिया देवील आहेत, तथापि या दोहोंच्या ग्रंथांचे अवलोकन केलें तर असें 
दिसून येईल कीं प्रगतीचे आणि ऐतिहासिक कार्यकारणाचे नियम लक्षांत घेऊन 
ऐतिहासिक वृत्ताचा अर्थ लावण्याच्या बाबतींत पुरुषांस र्जे यश येतें, ते स्त्रियांस 
येत नाहीं, स्त्रियाच्या ग्रेथांत मेहेनतीने माहिती जमविलेली असते आणि 
त्यांचे लक्ष ऐतिहासिक पुरुषांच्या जौवितक्रमाकडे अधिक असतें, भावात्मक 
सृष्टीकडे ब सामान्य नियमांकडे पुरुष अधिक वेधला जातो. आणि ख्रीहि 
द्रव्यात्मक उफ अधिक व्यक्त अशा सृष्टीकडे बेधली जाते. विश्वसगेवेच्या पुरुषांनी 


१५७ शारदाषाईचा पराक्रम 
जगाची उत्पत्ति ही पुरुष आणि प्रकृति याच्या परस्परांवर होणाऱ्या परिणामाने 
होते असें लिहिले आहे. स्त्री व पुरुष हीं खरोखर प्रकृति आणि पुरुष यामधील 
भेदाचींच उदाहरणें होत अक्षा अर्थाचा सिद्धांत आपल्या देशांतील तत्त्ववेच्यांनीं 
व कवींनी गाइला आहे. भगवंतानी गीतेच्या तेराव्या अध्यायांत म्हटल आहे काँ 
प्रकृति पुरुषचैव विद्धथनादी उभावपि ! 
विकारांश्व गुणांश्वेव बिद्दि प्रकृतिसंभवान्‌ || 


म्हणजे प्रकति आणि पुरुष हीं दोन्ही अनादि आहेत असें समज. 
विकार आणि गुण हे सवे प्रकृतीपासून उद्भवतात. 

तथापि अज्ञानी लोक माझे म्हणजे पुरुषाचे उत्तम आणि अव्यय असें 
रूप न जाणतां अव्यक्त अशा मला म्हणजे पुरुषाला श्रष्ठ झाळेला मानितात 


अव्यक्ते व्यक्तिमाप्ने मन्यन्ते मामबुद्धयः । 
तथापि परमेश्वराचे रूप आपणांस व्यक्त होतें ते प्रकृतीमुळे होतें. ” 


“ पुरुष अव्यक्त असतो आणि त्याला प्रकृति ही व्यक्त अशा स्वखूपास 
आणिते, हा जर सिद्धांतच आहे तर मग मी आपणास देशकल्याणाच्या अगर 
दुसऱ्या कशाच्या कल्पना व्यक्त करावयास लावणें स्त्रीस्सभावास अनुसरून 
प्रक्रतीर्चच कार्य करीत आहे. जै केवळ अव्यक्त आणि गूढ असेल तें न समजणारा 
जर आपण प्राकृतजन म्हणाल तर मग मीं देखील आपणांस प्राकूतजन म्हणवि- 
ण्यास तयार आहे. अव्यक्त स्थितींत संतुष्ट राहणारा पुरुष घम मला नको. 
मला व्यक्त ज्ञान पाहिजे. ' ब्रह्म जान नको मुनिवरा येईन कामास ते? हच 
मी तुम्हांस म्हणणार ! ” 

“ ज्ञारदे, प्रकृतीच्या संसर्गाने पुरुषास जर व्मक्त स्वरूप धारण करावें 
लागतें तर तुझ्या संसर्गाने मला माझइप्रा कल्पना व्यक्त करावयास का बरें लागू 
नवे! ” 

६ तर मग आतां स्पष्टपणें बोला, मी प्रकृति धर्मास प्रकृति धर्माने 
आठदां गुणले म्हणजे जे प्राकृतत्व उत्पन्न होईल तितके माझ्या अंगीं आहे अशी 


गोंडवनांतील प्रियंवदा १५८ 
कल्पना करा व आयुष्यध्येय तितक्‍या प्राकूत भाषेत समजावून द्या. मला तत्त्व- 
जानाच्या जाड्या भाषेत बोललेले कळत नाहीं, ' स्पिरिच्युअल ' वगैरे ठाव्द 
भाषणांत आणू नका, मला स्पिरिट म्हणजे काय ते समजत नाहीं आणि त्याला 
युअल मिळाला म्हणजे काय जिन्नस होतो तं त्याहून कळत नाहीं, मला 
स्पिरिच्युअल शब्दाची भीति फार वाटते ”? 

44 त कां १ ११ 

“का म्हणजे त्याचा मला कांहींच अर्थ समजत नाहीं. आणि हा दाब्द 
आपल्याकडील लोक वाटेल त्या गोष्टाचें समर्थन करण्यासाठीं वापरतात. ” 

ट्ट तें कसे १? )) 

“ नागपुरास अत्ता मी एकदां स्त्रीधमोवर व्याख्यान ऐकावयास गेले 
होतें त्यावेळेस तो व्याख्याता कोणी बंगालकडून आला होता आणि त्याचे 
व्याख्यान इंग्रजींत झाले; तें व्याख्यान बायकांनां समजून द्यावयाची आणि अध्यक्ष 
म्हणून भाषण करण्याची पाळी माझ्यावर आली. तेव्हां मोठीच पंचाईत 
झालं 9 ११ 

“ती कशी काय?” 

“ व्याख्याता म्हणाला पूर्वेकडील देश ' स्पिरिच्युअळ' आहेत व 
पश्चिमेकडील देश “ मटीरिअल ' आहेत; त्यामुळें पश्चिमिकडील विवाहाची 
कल्पना दरीरसुख ही आहे आणि आपल्याकडील '* स्पिरिच्युअल? आहे. 
पाश्चात्य स्त्रियांना हारीरभोग हे ध्येय आहे आणि यासाठीं पश्चिमेकडे पुनविंवाह्‌ 
रूढ आहे आणि पूर्वेकडे पुनर्विवाहाचा निषेध आहे. ” | 

“ मग यांत वावर्गे काय सागितले ? 

“£ सगळेच वावगे सांगितलें, ” 

:£: आपल्याकडील लोक दारीरभोगास कमी महत्त्व देत असते, तर विचार 
करणाऱ्या ब्राह्मण मंडळींनी ब्राह्मणास दान करण्याचे महत्त्व कशासाठीं गाईले ! 
ब समाजांत आपले उच्चत्व तरी कशासाठीं स्थापन केलें १ 


१५९ शोारदाबाइचा पराक्रम 


->->--:----:>:८८------:->>---ाशशा 0000000५४० ल. कॉर्शिरिशाशशरशिनशिनििणेण शि. णाणिणे एॉफशरणिणां 0 शणाशणार प्णिणाणींणा णी “णा 


“८ अशासाठीं कीं पैसा आणि अधिकार यापेक्षा विद्दत्तत अधिक मान 
रहावा यासाठीं, ” 


: कांहीं असो, त्या ग्रहस्थास मी स्पिरिच्युअल याला संस्कृत राब्द काय 
म्हणून प्रश्न केला तो कांहीं त्याला सांगता आला नाहीं, ” 

“ मृग तुम्ही तें ञ्य़ाड्यान बायकानां समजावून देताना कसे भाषातर 
केलें१० 

“ मी एवढेंच सांगितळें कीं, पाश्चात्यांच लक्ष संपत्ति व शरीरसुख 
यांकड आहे आणि पूर्वेकडे या गोष्टीविषयीं अनास्था आहे, ” 


५ झालें, मग भाषातर तर वरोबर केलं आहे-- 


एकातविध्वंसिषु मद्विधानां । 

पिंडेष्वनास्था खढ भोतिकेषु ॥ 
या ओळी तुमच्या परिचयाच्या असतीलच. तुम्ही “ अनास्था ? शब्द बरोञजर 
वापरला. ?” 


“ मुळींच नाही ! अनास्था हा सद्गुण आहे काय? त्या व्याख्यात्याच्या 
मते ' मटीरिअल ? पेक्षा ' स्पिरिच्युअल ) ही काढी चागली चीज आहे. 
अनास्था हा अभावात्मक शब्द आहे. व्याख्याता स्पिरिच्युअल म्हणजे कांही 
भावात्मक चीज समजतो. आपल्याकडे भौतिक पिंडाविषयीं अनास्था अदे 
हें खरें पण आस्था कशाविषयीं आहे ते तागा ! आस्था भोतिक गोष्टीविषयींदवि 
नाहीं आणि मानसिक गोष्टींविषयींहि नाही. ” 


५ अगदीं खरे आहे तुझ अवलोकन, आपले लोक म्हणजे अगदी 
नीग्रोच्या पठीकडचे आहेत. पूर्वे स्पिरिच्युअल यामध्यें मुसुलमान येतात 
काय म्हणून प्रश्न विचारला तर उत्तर द्यावयास पंचाईतच पडेल, आपल्या 
लोकांनां आपल्या सवे तर्‍हेनें निकृष्ट स्थितींत आपण कशांत तरी वर आहों म्हणून 
तर कोणी पाश्चात्यांनीं सागितले तर त्याबर आपल्या लोकांचा विश्वास पक्का असतो. 
आपले लोक तत्त्वज्ञानी म्हणून त्याचा मतलबी पाश्चात्य गौरव करतात. आणि 


गोंडवनांतील प्रियंवदा १२-८० 
तें ऐकून आपला बामण खूष होतो. ज्या लोकांना मौतिक शास्त्रे ठाऊक नाहींत 
त्या लोकांना सवे शास्त्रामागे असलेलें तत्त्ज्ञान कसे समजणार ? गाढव ळेकाचे 
फिलासफी श्षिकवताहेत कॉलेजांतून ; हे सव फिलासफी'े प्रोफेसर कोणत्याहि 
भो तिक शास्त्राचा अभ्यास न करता फिळासफी शिकविणार, अगदी जवळच्या 
झाडाला टागून फाशी देऊन टाकावेत. लोकाना क्यांट आणि स्पिनोझा याची 
नावे घेऊन गप्पा मारायला पाहिजेत. ” 

“ मग तुम्ही फारशा गूढ वाक्यात न शिरतां आयुञ्यहेतूंविषयीं ज काय 
सागावयाचें असेल ते सागा. ” 

“ तुझा मुक्काम येथे किती दिवस आहे! ? 

“« उद्या तरी मीं येथे आहे, रायपुरास सध्यां असतें. आपले येथील 
काम झालें म्हुणजे आपण रायपुरास यावें. येथे जर आपले बोलणें संपले नाहीं 
तर आपण तेथे संपवू, ” 

“ उद्या आपण काहींतरी येथ बोलूंच, 

“ ठीक आहे. आपणांस आणखी एक विनंति आहे. ” 

“ ती कोणती ? ” 

“ आपण आज संध्याकाळीं आणि उद्यां सकाळीं आमच्याकडेच जेवाव- 
यास यावे. आमच्याकडे स्वेपाकाला ब्राह्मण आणि इतर कामाला कारकून 
आहेच. ” 

“ ठीक आहे, ” 


प्रकरण १५व 
गाडवनांतील दुसर आरण्यक 


संध्याकाळीं वेजनाथशास््री जेवावयाला आला होता. दोषा गॉड 
राजकन्यांची व्यवस्था व परिवार निराळा होता. बिंत्राबाईकडे वेजनाथक्कास्त्री 


१ गोंडवनांतील दुसरं आरण्यक 


जेवावयास गेले, आणि भोजनोत्तर आपर्ले सामान त्यानीं ज्या इमारतींत ठेविलें 
होतें तेथे निजावयास गोळे. ह्यारदाबाईनीं आपल्याबरोबर आणलेल्या नोकराच्या 
हातीं केदील देऊन आणि बरोबर एक मेणत्रत्ती देखील देऊन पाठविले. रात्रीं 
बिंभाजाई आणि शारदाम्नाई या एका खोलींत निजावयास गेल्या. वेजनाथशास्त्री 
यानीं. निजावयाच्या अगोदर शारदावाईंस, उद्यां सकाळीं मीं येईन म्हणून सागून 
ठेविलें होते, 


शारदाबाई आणि जिंजाबाई यांच्यामध्यें गुरुशिष्येचें नातें दिवसानुदिवस 
कमी' होत जाऊन सख्याचे नातें उत्पन होऊं लागले. बिंबाबाई शारदाबाईपाशीं 
विनोदाने “' आपण आता पुनर्विवाह केव्हां करणार, तो करणार तरी कोणाच्या- 
बरोबर, आपणांस कोण डाक्टर, प्रोफेसर की वकील पाहिजे तरी कोण, आपण 
पुन्हां लम करणार तें कोकणस्थाक्षींच करणार कीं देशस्थ चालेल, कोणी बंगाली 
चौलेल की नाहीं ” इत्यादि अनेक प्रश्न विचारून शारदाबाईस कधीं कधीं 
चिडविण्यासहि कमी करीत नसे. वर्तमानपत्रांतून कोणा कांग्रेसवाल्या बड्या 
पुढाऱ्याची बायको मेल्याचे बाचलें म्हणजे ' आतां तुम्हीं आपलें जाळें त्याच्या- 
वर टाका ' असेंहि म्हणावयास कमी करीत नसे. दोघी बायका आपसांत 
बोलतं बर्सेल्या म्हणजे काय जोळतील आणि काय नाहीं !! पुरुषांसमक्ष बोलतांना 
हृतक्या लाजतील, आपल्याला कांहीं एक समजत नाहीं. अश्या प्रतारणा करतील 
पण आपापसांत बोलावयाला लागल्या म्हणजे त्या काय बोलतील त्याला सुमार 
ना त!  बायकाबायकांतच असल्या म्हणजे किती चहाटळ आणि घाणेरडे 
ब्रोलत बसतात हें ज्यांस चोरून ऐकण्याची संघि आली असेल त्यास सहज कळून 
यईल कीं, त्यांच्या घाणेरड्या बोलण्यापुढें बकीलांच्या खोलीतलें घाणेरडे बोलणें 
म्हणजे कांडरींच नाहीं!  शारदाबाईची स्वाभाविकपणे वृत्ति गभीर होती आणि 
त्या बायकांबरोबर गप्पा मारीत न बसतां बहुधा पुरुषमंडळीबरोभरच ती गप्पा 
मारीत बसं. कारण तिला, बायकांतल्या स्पर्धा, त्यांच एकमेकीसंबंधाचे उणें 
बोलणे, याविषयीं कंटाळा येई. तिच्या वृत्तीचा पुरुध असला तर त्यास 
भोंवतालच्या पुरुषांच्या गटारग'पांचा कंटाळाच आला असता, तथापि डाणडेस 

21 


गोॉडवनांतील प्रियंवदा १६२ 


पुरुषाचा गटारगग्पांचा कंटाळा येत नसे आणि त्यांच मुख्य कारण तिच्यासमक्ष 
पुरुष गटारगप्पा न काढतां महत्त्वाच्या वाड्ययविषयक आणि सावेजनिक गोष्टीच 
बोलत असत. ज्या पुरुषांशी ती बोले ते ब्रायकापेक्षांहि अधिक उच्च अभमि- 
रुचीचे होते अशातला भाग नाहीं. 

आज बरित्राबाईस शारदाजाईशीं खूप बोलावयाचे होते. मोलकरणीनीं 
टाकलेल्या अंथरुणावर शारदाबाईनीं पाठ टेकल्यानंतर निजलेल्या प्रभाकराचें 
चुंबन घेऊन निबानाई शारदाबाईच्याच अंथरुणावर पडल्या, 

:: काय बाई, भापण त्या ग्रहस्थाशीं बोलत होतां ! बराच वेळ बोलत होता. 
मध्ये मळा वाटलें कीं, आपणास मध्यें येऊन भेटावे, पण म्हटलें दोघामध्यें 
आम्हीं कशाला ? त्या दोघी राजकन्यास तर आपणांस अत्यंत दिउतेच्या गोष्टी 
सांगणाऱ्या मास्तरीणब्राई कोणी नबख्या ग्रहस्थापाशीं बोलत आहेत हें पाहून 
बरीच मौज वाटली. कोण हे ग्रह्स्थ आहेत कोण जाणे! का कोणी सावज 
पकडण्याचा विचार चाळजला आहे वाटतं १” जिंत्रामाई ब्रिञान्यावर पडतां पडतां 
शारदाबाईस म्हणाल्या. 

शारदा थोड्याबहुत अंशी काहीं विचारांत गढली असल्यामुळें तिने ताबड- 
तोञ जिज्ाबाईच्या बोलण्याकडे लक्ष दिलें नाहीं तेव्हां बिंबाबाई अधिक जोर येऊन 
म्हणाल्या “ का आमच्या बोलण्याकडे लक्ष देखील नाही. तर आपण आज 
कोणत्या विचारांत आणि आनंदांत गक झाला आहां? ” 

£ काय, मला बोलतेस तूं ! होय, या ग्रहस्थाविषयीं विचारतेत तो मोठा 
प्रसिद्ध विद्वान मनुष्य आहे. ” 

“ मग आपला काय विचार आहे? ” 

“ आज आमचें बरेंच संभाषण झालें आणि पुढें उद्या होणार आहे. / 

“ हे कशाबद्दल ? ” 

“ या ग्रहस्थाचे मन जरा विचित्र आहे, तें फारच गूढ आहे असें दिसतें. 
तें गूढ डकलण्याचा माझा विचार आहे, ” 


१६३ गोडधषनांतील दुसरं आरण्यक 


:: पण इतका खटाटोप कां? जगात पुष्कळ लोक आपलीं मरन गूढ ठेवू 
इच्छितील, आपण प्रत्येकाची तपासणी करीत बसणार काय! हा ग्रहस्थ 
आपल्या फारसा परिचयाचा नाहीं किंबा याच्याशीं आपण स दररोज प्रसंग पडेल 
अद्शांतला भाग नाहीं, तर याच्याबिषयीं आपणास जिज्ञासा का ? ” 

“ तुला काय सांगू १ बिंबा, हा गृहस्थ फार मोठा आणि थोर आहे; 
तसाच तो परोपकारी, जातीचा आणि देशाचा अभिमानी आहे. सरकारच्या 
अगर लोकांच्या आश्रयाची पर्वा न करतां यानें आपले ग्रेथलेखनाचे काय चालविले 
आहे. हा ग्रहस्थ मोठा त्र्रषितुल्य आणि खरा संन्यासी आहे असा याचा लोकांत 
बोलवा आहे. जन्मभर मेहेनत करण्यास याला उत्तेजन तरी कशाने येते हें 
मला गूढ आहे. सतत काम करीत रहाणें हेंच संन्यासधर्माचे बीज मी समजतें. 
कारण सततोद्योगी मनुष्याखेरीज करून दुतर्‍्या कोणी मनुष्यास या प्रकारची 
विदेही स्थिति यावयाची नाहीं. ” 

“ घरं मग, एका विलक्षण मनुष्याचे मन समजून ध्यावे एवढाच आपला 
आपला हेतु आहे काय?” 

“ का बरं, दुसरा कोणता हेतु भसणार ? ” 

“ या ग्रह्स्थावर आपले विशेष मन वेधले असावें असं दिसते, ” 

“ विशेष म्हणजे काय ? ” 

: काय बाई, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या; तुम्हांला मी काय सांगणार ! ” 

“६ तुझ्या मनांत काय आहे?” 

“ मला असें वाटतें कीं, बायकांचे पुरुषांवर जसें मन वेधतें तसें या 
ग्रहूस्थावर आपलें मन वेधले आहे. ” 

“ हे, तसें मुळींच नाहीं, ” | 

“ तर मग काय़ या गृहस्थाविषयी आपण फार उदासीन आहांत ! केवळ 
एक विचित्र पुतळा आहे तर त्याचा बिचित्रपणा चांगला समजून घ्यावा एवढाच 
हेतु आहे? ” 


गोंडवनांतील प्रियंवदा १६४ 


कमतमक. >> रड. गाद, आगमन) मकर: ...: जाचाळवाचकनजक-भमअळेळ,..! ओळवळेळेन, ?हमन्मक मळमळ ककल नळ 


६ हे जवळ जवळ एवढाच, 


“ पहा हो, तुम्हीं कांहीं तरी बोलतां हो! त्या गृहस्थापार्शी जितका 
भाषणप्रसंग अधिक होईल तितका चांगला, त्या गृहस्थाच्या आपण कांहीं थोडे 
बहुत उपयोगी पडावे, त्याच्या सुखदुःखाकडे लक्ष द्यावे, इत्यादि गोष्टींकडे 
आपलें लक्ष आहे कीं नाहीं! कां कोणी बुद्धीच्या पर्वताचा सर्व भाग बारकाईने 
पाहून घ्यावा एवढाच हेतु आहे ' त्याच्याविषयी मनात दुसरा भाव नाहीं 
काय?” 

“ मोठा विद्वान आहे तेव्हां त्याच्याविषयी आदर असणें स्वाभाविक 
आहे, १9 


£ त्र मग आपण जेव्हां त्यानां वारा घातला आणि त्यांच्या कपाळावर 
हात ठेवला तेवहां आपणांस कांही एक वाटले नाहीं ? एखाद्या हॉल्पिटलमधल्या 
रोग्याच्या कपाळाला आपण जेव्हां हात लावतां तेव्हां जसें आपणांस वाटते तसेंच 
बा वेळेस वाटलें? ?” 


शारदाबाईस या प्रश्नाने थोडीबहुत जागृति झाल्यासारखे वाटलें, आणि 
आपल्य़ा अंतःकरणांत कोणऱ्या भावना असतील याविषयींचा विचार उत्पन्न होऊं 
लागला, तथापि आपल्या मनांत प्रस्तुत ग॒हस्थाविषयीं आदराशिवाय अन्य 
विचार असेल असें त्याचे मन म्हणण्यास तयार होईना, उलट मन सांगू 
लागलें कीं, आदराशिवाय वुसरा कोणता तरी विचार होता हें कबूल देखील 
करूं नये. 


“ काय ग निंबा, मी त्यांच्या कपाळावर हात ठेवला तें तूं पाहिलंस? ” 

“ उघडच आहे, आणि मला असें वाटलें की त्या अडाणी गोंड राज- 
कन्यांनां हे दिसू नये, आणि ब्राह्मण बाईविरुद्ध त्यांनीं कांहीं बोळूं नये म्हणून 
मी दुसऱ्याच बाजूने फिरावयास गेलं. ” 

“ त्या गृहस्थाच्या कपाळावर मी हात ठेवला होता, मला वाटलें कीं 
मीं चपापळे एवढेंच, ? 


१५ गोॉडवनांतील दुसर आरण्यक 


५ प्रारंभ असाच होतो. ? 

“* कुतचा प्रारंभ? ” 

“ छुखाद्या पुरुषाविषर्यी प्रेम उत्पन्न होणाचा. प्रथमतः आदर अगर 
आवड, थोड्याऱ्या प्रसंगीं भय पण शेवटीं प्रेम. 

11 बिना | ?? 

“६ काय बाई!” 

: मुलाच तू शिकावयास लागळीस. तूं कालची मिऱ्याएवढाली पोर! ” 

:£: असेन कदाचित, पण प्रेमाच्या बाबतींत मी आपणाइतकी नवखी नाहीं.” 

६ मला त्या ग्रह्स्थाविषयीं जिशासा आणि आदर आहे, प्रेम नाही. ” 

५: घण प्रेम पुढें उत्पन्न होण्याची आगाऊ चिन्हे दिसत आहेत, ” 


येणेंप्रमाणें शारदाबाईंचा बिंबाबाईशीं संवाद चालला होता. पुढें मला 
आतां झोंप येते असें म्हणून शारदाबाईनीं बोलणें बंद केलें, तथापि वेजनाथ- 
शास्त्र्यांची मूर्ति त्यांच्या डोळ्यापुढे मात्र स्थिर झाली आणि स्वप्नांत वेजनाथ- 
शास्त्री पुन्हां दिसले. निरनिराळे देखावे निरनिराळ्या स्वप्नात आले, एका 
स्व्पतांत दिसळें की वैजनाथशासत्री आणि आपण स्वच्छंदानें फिरावयास जात 
आहोंत; दुसर्‍या स्वप्नांत दिसले कीं, वैजनाथशास्त्री ग्रंथ सागत बसले आहेत आणि 
आपण त्यांचे ' विश्वभरबोबाप्रमाणें लेखकू ' जाहलो आहोंत. ही सर्वे कार्य 
करतांना आपणांस मोठा आनंद झाला आहे असें वाटळें आणि जन्मभर आपण 
हेंच काम करीत बसलों तर आपल्या आयुष्यास दिशा लागेल कीं नाहीं. आणि 
आपण जन्मभर आनंदांत राहूं कीं नाहीं अस प्रश्न मधून मधून निद्रेत येऊं 
लागले, येणेंप्रमाणें अनेक कल्पनाचित्रं आमच्या शारदाबाईच्या डोळ्यासमोरून 
जाऊं लागली. शारदाबाईची झोंप स्वभानीं थोडीशी बिघडविली होती ; तथापि 
स्वर्धे चांगळीं पडलीं असलीं म्हणर्जे लहान मुलांचा चेहरा सकाळीं जसा प्रफुल्लित 
झाळेडा दिसतो तता तिचाहि दुसऱ्या दिवशीं सकाळीं दिसत होता. तिंम सकाळीं 
फराळाचें सामान काढून ठेवळें आणि गड्यामाफत आपण फराळाला या असा 


गोंडवनांतील प्रियंवदा १६६ 


निरोप पाठविला, वैजनाथशास्त्री आले तेव्हां लाडू तिनें पुढें केळे आणि 
स्टोव्हबर सकाळची एक ताजी दरमी करून घातली आणि तूप वाढले, अर्थात 
या प्रकारचें स्वागत वेजनाथशास्त्री जरी संन्यस्ताचरणी होते तरी त्यांस आवडलें 
नाहीं असें नाहीं. इंग्लंडमध्ये म्हातारीकडून तरुगीस अक्शा परंपरेने हजारों 
आयुष्याच्या वर्षांचा एक फारच मोल्यवान उपदेश आहे, तो आजकालचे 
पाश्चाच्य तत्त्ववेत्ते ज्या स्त्रियांची ल्न होण्याची संधी शिक्षणामुळे कमी होत आहे 
अद्या तरुणींपुढें ठेवतात, आणि तो उपदेश अर्वाचीन व स्वतः सुशिक्षित आपण 
आहोत म्हणून ज्यांत भास होतो अश्या सर्व तरुणींनीं लक्षात ठेवण्यासारखा आहे 
अशी आम्ही शिफारस करतों. तो उपदेश म्हटला म्हणजे, “ पुरुषाच्या 
अंतःकरणाच्या अगदी जवळची जागा म्हणजे त्याचे पोट होय. तें संतुष्ट करा 
म्हणजे अंतःकरण काबीज कराल, ” सकाळच्या प्रहरी ताजी ताजी दरामी, 
लोणच्याच्या फोडी, तूप आणि लाडू पोटांत गेल्याने वैजनाथशास्त्रयास देखील 
बरें वाटले, आणि सकाळीं आणखी काहीं काम करण्यास त्यास हुरूप आला, 
आपण मेहनत करीत असता आपल्या जेवणाची अशी जर सोय होईल तर 
किती बरें होईल, असा विचार क्षणभर त्यांच्या मनांत आला, पण छे! असला 
सुस्वामिलाषेच्या अपवित्र विचार कडकडीत आचरणाचे वैजनाथशास्त्री आपल्या 
डोक्यांत कसा राहूं देणार ? बरें झालें शारदाबाई आणि इतर मंडळी जवळ होती 
म्हणून, नाहीं तर वेजनाथशास्त्री यानीं असल्या अधम सुखेच्छेबद्दल स्वतःच्या 
पन्नास थोबाडींत मारून घेतल्या असल्या, 


फराळ आटोपला तेव्हां नुकताच सूर्योदय झाला होता. आणि या वेळेस 
ही वेळ फिरावयास जञाण्यास चागली आहे असे वैजनाथशास्त्र्यास वाटून त्यानीं 
: चला, आपण आणखी कांहीं अवशेष पाहूं आणि कालच्या उरलेल्या गप्पा मारू? 
असें शारदाबाईस सुचविले, शारदाबाई तर अशाच सूचनेची बाट पहात होती, 
शारदाबाई अंगावर शाल घेत आहेत असं पाहून बिंत्राबाईने 'मीयेऊंका 
तुमच्याबरोबर फिरायला १ ? असा प्रश्न केला. आणि शारदाबाईची संभ्रमित 
मुखचर्या पाहून म्हणाल्या, 


१९७ गोंडवनांतील दुसरं आरण्यक 


-न-०- ाणपापापापप? प पणा”? टपटप? प?९पि?”0?प?१?णीथपकीणी 


“ बरं आहे; मी तुमच्याबरोबर येत नाहीं, मी कशाला तिथें गर्दी 
करायला ? ” 

“६ तुला येऊं नको असें कोण म्हणते आहे ? मी पाहिजे तर वैजनाथ- 
शास्त्यास विचारून येते. तथापि मला अशी शंका वाटतें कीं त्यांच्या सर्व 
संशोधनाने आणि विद्वरत्तने भरळेळें बोलणें तुला कंटाळवाणे वाटेल. माझी काहीं 
ना नाहीं, ” 


“ येऊं नको असं म्हणण्याचा हा दुसरा प्रकार आहे झालं, ”? 

“ का जरं, मी कोठें असं म्हटलं? ” 

“ म्हटलं नाहीं पण मी ओळखते. आपण खरं सांगा कीं त्या शास्त्री- 
बोबापाशीं आपण एकट्या बोलत असता तर आपणास बर वाटेल कीं, मी 
बरोबर असले तर बरं वाटेल ? खरं बोला. » 


“ खरं बोलायचं म्हटलं म्हणजे मी एकटी त्यांच्याबरोबर असले तर 
मला बरं वाटेल, कां कीं मी एकटीच बरोबर असले म्हणजे त्याना जें काय 
बोलावबयाच ते ते स्पष्टयणानें बोलतील. 


: तुम्हीं त्याच्याबरोबर एकट्या असलां म्हणजे बरें वाटेळ, एवढंच मला 
पाहिजे होत. मीं कारण कोठे विचारले होतं ? पण कारण आपण होऊनच 
सांगतां. त्यानां ज काय आपणांशीं बोलावयाचे ते आपण एकट्या असलां 
म्हणजें ते मन मोकळें करून बोलतील, एका भेटींत इतक्या थरापर्यंत गोष्ट 
जाईल असं मला वाटलं नव्हते. 

“ काय चहाटळ झाली आहेस ! ” असे म्हणून आमच्या शारदाबाई 
बाहेर पडल्या. 

शारदाबाई आणि बेजनाथशास्त्री ही दोघेजण जरा बाहेर गेल्यानंतर 
वैजनाथदास्त्री म्हणाले, “ काय शारदे, तुझ्या आयुष्याला इेतु पाहिजे आहे 
नाहीं आणि सध्यां ज्या अथी कोणतेहि कार्य फलप्रद होत नाहीं त्या अथी दुसऱ्या 
कोणाच्या आयुष्याला हेतु उत्पन्न कसा होतो, आणि तो कार्यास प्रवृत्त कसा होतो 


गोंडवनांतील प्रियॅवदा १ ष्र्ट 


हें समजावयास पाहिजे ? आणि ज्या गोष्टी दुसऱ्यास आयुष्यहेतु ठत्पन्न करतात 
त्याअथी त्या आपल्याहि आयुष्यास हेतु उत्पन्न क्रा करणार नार्डीत? त्या 
आपल्याहि आयुष्यास हेतु उत्पन्न करून देऊं शकतील. अशीच तुझी विचार- 
मालिका नाहीं? ” 


“५ होय अगदी अशींच. ” 


“ शारदाबाई, तुला थोडक्यात सागतो ऐक, आपण आजचा काल सोडून 
जरा पन्नास अगर शंभर वर्षाच्या पूवीचा काल घेऊं. समाजातील चातुर्वेण्ये हे 
लोकनिःश्रयसा्थ आहे ही कल्पना मनीं हृढ धरून पूर्वी तिच्यावर विश्वास ठेवून 
ब्राह्मण आपल्या वर्णाचें ब्रह्मकम॑ आनंदानें आणि कर्तेव्य समजून भक्तौने करीत 
होते ना १ ते तसें करीत होते याचें कारण त्याची धमेवाक्यावर भक्ति होतीं 
आणि भक्तीमुळे ते कार्याला प्रवृत्त होत होते नाहीं. काय ! प्रत्येक त्रा होणासे 
लोकनि श्रेयस उफ लोककल्याण म्हणजे काय याची खात्री मसे तथापि त्यांच्या 
मनात संदेह उत्पन्न झाला असता म्हणजे त्याची स्ववर्णाच्या कतेब्याविषयीं श्रद्धा 
नष्ट झाली असती. आतां तुमची थोडीबहुत आपल्या अमुक करण्याचा उपयोश 
काय अशी कल्पना मनात येऊन कतेव्याविष्रयी संदेह उत्पन्न होत आहे काय!” 


4 होय. १2 
“ तर आता आपण असें पाहूं कीं, कोणते भावी कल्याण आपणांस 


कतेव्यमय करील, आणि तें पाहण्यासाठी आतां आपण असा विचार कह कीं, 
आपणांस आधघिभोतिक कतेव्यध्येय पाहिजे कीं पारलौ किक क्तेव्यध्येय पाहिजे? ” 


“ मला ऐहिक कर्तेव्यासंबंधाचे ध्येय असे पाहिजे कीं, जे कार्ये मी करीन 
त्यापासून ऐहिक कोणतें तरी कल्याण होईल. ” 
: तुम्ही सध्यां काय शिक्षकाचे काम करीत आहां नाहीं १ ” 


“ होय हा लोकापवाद आहे खरा. मी काय शिकविते, त्याचा हेतु कार्ये, 
त्यापासून मझ्या शिष्यिणींचें काय' कल्याण मी करतें तें मला समजत नाहीं, ” 


१९९ गोंडवनांतील दुसरं आरण्यंकं 


नना 


: चर्मासंबंधाचं अनेक विभाग करतां येतील. मनुष्य चातुवेर्ण्यातील 
कोणत्यातरी वर्णाचे काय करीत राहणारच. बायकांची गोष्ट पाहता चातुवे्ण्योतील 
ज्या वर्णात ती समाविष्ट झाली असेल त्या वर्णाचे आणि त्याबरोबर त्या वर्गाच्या 
स्रीचे कतेव्यकम तिला करावें लागते: उदाहरणार्थ, ब्राह्मण वर्णाची स्त्री असली 
तर ब्राह्मण वर्णाचे कार्य करण्यास पुरुष्रास समर्थ करणें हें बायकांचे काम. क्षत्रिय 
वणीची स्त्री असेल तर तिला राज्यरक्षणादि कार्म करून क्षत्रियाचेच काम करावें 
लागतें. येणेंप्रमाणें धमेशास्त्रसंमत स्त्रियांच्या कर्तव्याची दिशा आणि मर्यादा 
आहे. ” 


९ घमेशास्त्रांतगत ल्रीधमे मी बाचला पण त्यानें माझें चांगले समाधान 
झाले नाही. कारण धमेशास्त्रांत पत्नींची कतेब्ये विशष विस्ताराने दिली 
असतात. त्यांत स्त्रियांनी पतीची सेवा करीत जावी, आणि ग्रहकृत्यें क्षी 
करावीं इत्यादिकांचेच बिवेचन केळें असते. कुमारीस अगर विधवांस जो धमे 
धमशास्त्रकारांनीं सागितला आहे तो वाचून मला ते ज्ञान फारच कोतें असें 
वाटलें. मला अर्से वाटतें कीं धमेशास्त्रकारांनीं स्त्रियांच्या मनाचा अधिक 
सुक्ष्म रीतीनें अम्यास करावयास पाहिजे होता. स्त्रियांच्या मनाविषयीं धर्म- 
शास्त्रकारांनी जीं अनेक मते दिलीं आहेत त्यांतील कांहीं फार मार्मिक आद्देत पण 
ती बरीच अपुरी आहेत असें मला वाटतें. कुमारी आणि गतभतुका यांच्या 
धर्मातबंधाने फारसे विवेचन नाहीं. कुमारी फारशा त्या काळीं नसतील पण 
मजसारख्या विधवा तर असतील ना ! त्यांच्यासंबंधानें धमेशास्त्रकारांचा उपदेश 
काय ! तर नवऱ्याचें नामस्मरण करून काल कंठावा ; आणि सवे प्रकारें देह- 
दंडन करण्यासाठीं त्रते उपवास इत्यादी गोष्टीहि त्यांस सांगितल्या आहेत. 
पुनर्विवाहासाठीं सतृष्ण रहाण्यापेक्षां आणि पुरुष संपादन करण्यासाठीं पुन्हां पुन्हां 
झटके खाऊन स्वतःच्या आयुष्याचा अंधःकार करून घेण्यापेक्षा संन्यस्त वृत्तीचे 
ध्येय वाईट आहे असं मीं कधीं म्हणणार नाहीं. पाश्चात्य देशांत मुलगी विधवा 
झाली म्हणून लमास उमेदवार म्हणून तयारच, त्यामुळें मनास शांति मिळेल 
अशातल्महि भाग नाहीं. धमंशास्त्रकारांशीं येथपर्यंत येण्यास मी तयार आहे, 

22 


गॉडघनांतील प्रिवेषदा "१७० 


तथापि मजसारख्या बुद्धिमेद झालेल्या मंदभगिनीस अमर्याद व निहेतुक 
शरोरदंडनाचें ध्येय बजावणें शक्‍य नाहीं. नवरा देव आहे हे कबूल करूं, 
तथापि मनाच्या कल्पनाशक्तीस देखील मर्यादा आहे, पुष्कळ आज अशा 
विधवा आहेत कीं, ज्यांस नवऱ्याचा कोणत्याहि दृष्टीने पस्चिय नाहीं. ' कुर्यात्‌ 
सदा मंगलम्‌ ! म्हणून अंतःपट काढून घेतल्यानंतर नबऱ्याचें तोंड दिसलें तेच 
शेवटचे अशी देस्ील कांहींची स्थिति आहे. अहो, दगडावर देखील भक्ति 
जडेल, आणि दगडावर शेंदूर फासला म्हणजे त्याला मारुती अगर म्हसोबा 
समजून देखील काहीं लोकाना तो साधनरूप होईल, पण जो मुलगा केबळ 
पंधरा सोळा वर्षाचा असतांना एकदां पाहिला, आणि आज अझ्याची आठवण 
केली असतां तो पुरुष न दिसता पुन्हां पंधरा सोळा वर्षाचाच असेल अशी 
कल्पना येते, आणि ज्याच्या गुगदोषाविषयीं कांहींच माहीत नाहीं त्यास देवत 
समजून त्याच्या नामस्मरणात काळ कसा घालवावा ? भक्ति ही गुणाधिक्या- 
दिवाय उत्पन्न होत नाहीं. जेव्हां नवऱ्याचे स्वरूपच कल्पावयाचे असतें तेव्हां 
मृतपतींच्या ठायीं देवाला साचतील असेहि गुण कल्पावयाचेच असतात, इतकी 
अचाट कल्पनाशक्ति कोणत्या बरें स्त्रीच्या वाट्यास आली आहे ! विधवांस 
साजेल असा धमम कोणता याला अर्वाचीन सुधारक देखील उत्तर देत नाहींत, ते 
म्हणणार पुनर्विवाह करा. पण पुनर्विबाह ही गोष्ट सोपी नाहीं, आणि पुनर्विबाह हे, 
विधवांस घम कोणता या प्रश्नास उत्तर नाहीं. विवाह पुनर्विवाहांची वाढ 
होण्याची शक्‍यता नसतां केवळ पुनर्बिवाहाची लालसा आज उत्पन्न करून सुधा- 
रकांनीं स्त्रियांचे मोठें नुकसान केलें आहे असें मला वाटतें. ?' 

“ तें कसें १” वेजनाथशास्त्री खिशांतील बिडी क्राढीत क्राढीत म्हणाले. 

: कांहीं विशिष्ट सामाजिक कारणांमुळें पुनर्विवाह फारसे होगारच नाहींत 
आणि फारसें पुनर्विवाह होणें शक्‍य नसता समाजांतील विंधबांच्या मनांत पुन- 
विवाहाची तृषा जागत करून देणें हा अधमे होय! ” 

“ पुनर्विवाह करावा असा उपदेदा स्त्रियांस कोणी केत नादीं, पुरुषांस 
करतात, ” 


१७१ गोंडवर्नांतील दुसरं आरण्यक 


“ पण त्याबरोबर बायकांना दुसरें लम्न करण्याचा अधिकार आहे असें 
प्रतिपादन करतात. ” 

“: असो. सुधारकांच्या बिन अकळी बडबडी टक्षांत घेण्याचे फारसें 
प्रयोजन नाहीं. कारण हिंदुस्थानांत गाजळेले आणि गाजत असलेले सुधारक 
सर्व वस्तुस्थितीसंजंधानें अगदीं शानशून्य आहेत, त्याच्या वेड्या बडअडीकडे 
सुशिक्षितांनीं लक्ष तरी कां द्यार्बे! आपला विषय विधवांचे आयुष्यध्येय हा होता.” 

५ होय, मला एवढेंच विचारावयाचे कीं, विधवांस कार्यक्षेत्र काय १ ” 


“ ज्याप्रमाणें पाश्चात्य देशातील विधवास अगर मठवासिनींत रुग्णशु श्र्षा 
इत्यादि कार्यक्षेत्रे आहेत त्याप्रमाणें इकडे नाहीत काय ? ” 


“: ज्या लोकांविषयी आपली सहानुभूति असते त्याविषयीं आपण अधिक 
खटपटतों; संस्थामध्ये जाऊन डॉक्टरच्या हाताखालीं काम करण्यापेक्षां प्रत्येकीने 
आपले मित्र, आप्त आणि नातेवाईक याच्या अडचगींत त्यांस उपयोगीं पडलें 
तर अधिक नाहीं कां चांगलें ? आणि त्या गोष्टींकडे लक्ष दिलें तर विधवा 
समाजसेवा उत्तम तऱ्हेने करीत आहेत मग त्या सेविकेचा सर्वसामान्य पोषाख 
घालोत अगर न घालोत. शुश्षपा आणि परिचर्या हीं कार्म विधवा आज 
पूर्वापार प्रत्येक झोंपडींत वतमानपत्रांत नांव येण्याची इच्छा न करतां करीत 
आहित. तेव्हा अर्थात हें पाश्चात्यांपासून येणारे ध्येय आमच्या बायकांना 
काहीं नवीन नाहीं, पैसे घेऊन सेवा करावयाची म्हणजे हा एक धंदा झाला 
आणि बिनपैशानें सेवा करावयाची हँ क्षूद्र प्रकारचे दान झालें, ” 

५ बरं मग, दान हें कतेव्य क्षूद्र आहे काय!” 

“ आपल्याजवळ असेल तें दुसऱ्यांच्या खिश्ांत टाकावयाचे याला 
म्हणतात दान, मला यापेक्षां कांही निराळे आयुष्यध्येय पाहिजे, हें मी 
आपणांस अगोदरच सांगितलें नाहीं काय? ” 

“ सांगितळें असेल, पण या दानाखेरीज निराळें -मी उच्च म्हणत नाहीं, 
केवळ निराळें म्हणतों - असें ध्येय आपणांस कां पाहिजे ! ” 


गोडवनांतील प्रियंवदा १७२ 


“ वेजनाथशास्त्री, आपण विद्वान आहांत तर मग आपण कोठें चार- 
पांचर्शेची नोकरी करून उरलेले पैसे गरीबांना कां वांटीत सुटत नाहो १ ” 

“ जुगारी मनुष्य चांगल्या तऱ्हेने पैसे मिळविण्याचे काम सोडून जुगार 
कां खेळतो ? दारूबाज दारू कां पितो?” 

“ त्याला तें व्यसन असतें म्हणून, आपण आपल्या कार्याला केवळ 
दारूबाजी किंवा जुगार यांचीच उपमा देतां काय? ” 

“८ काय हरकत आहे? ” 

“ तुम्हांला हें व्यसन लागलें तरी कसें! ” 

“६ त्या कार्यामागे लागलें म्हणजे व्यसन लागतें. 

५: पण त्या कार्याकडे प्रथम तरी मन कसें वळले?! त्याला कांहीं देश- 
कल्याणाचा हेतु मुळाशीं नाहीं काय ! ” 

६ मी या फंदांत पडलों त्याला पुष्कळ वर्षे झालीं, कोणत्या भावनांनी 
या फंदांत पडलों हे मळा आज पक्के आठवत नाहीं पण देशकल्याणाच्या कांहीं 


वेड्या कल्पना त्यावेळेस माझ्या डोक्यांत शिरल्या असतील असें वाटतें. ” 
वैजनाथशारूयांनीं डोक्यावरील रुमाल हातांत घेऊन डोके खाजबीत उत्तर दिलें. 


५: आपण या फदांत पडला ते जर वेड्या कल्पनामुळें पडला असतां तरी 
आपला व्यासंग आतांपर्यंत कसा राहिला ? आपण हा जीवितक्रम केव्हांच 
सोडून दिला असता. ” 


“ आमची पुढची कथा काय करायची? हम्‌ अन बन चुके; आयुष्याला 
एकदा वेडेबांकडं स्वरूप आलें म्हणजे तें तसेंच कायम ठेवावें लागते, नाहींतर 
लोक वेडे म्हणतात, तुम्हांला ' बन चुके * ची गोष्ट ठाऊक आहे ना?” 

“ काय आहे ती गोष्ट! ” 


“ ब्रह्मदेवानें सृष्टि मिमाण केली तेव्हां एक मातीचा गोळा घेऊन त्याचा 
उंट बनविला, आणि त्यास सजीव केलें, उंटात निर्माण केल्याबरोभर तो 


१७२९ गोडवनांतील दुसर आरण्यक 


न पल 


इकडे तिकडे उड्या मारूं लागला. त्याचें तें वेडेविद्रे रूप पाहून ब्रह्मदेवाला 
वाटलें कीं छे! आपला प्रयत्न फसला, आतां आपण त्याला पकडून त्याचे 
रूप सुधारले पांहिजे. आणि हा हेतु मनांत धरून तो उंटास बोलावू लागला, 
पण उंट कांहीं येईना, उंट म्हणाला “' हम्‌ अब बन चुके. ” त्याच्या वाट्यास जे 
रूप आलें ते एकदां तो बनल्यानंतर त्यानें सोडळें नाहीं. त्यांतलीच गोष्ट 
आमची !! ” 

:: काय शास्त्रीबोवा आतां आपण सांगा, कीं ज्या मार्गात आपण एकदां 
पडलों तोच मागे कायम ठेवला पाहिजे, कां कीं लोक चेचल म्हणतील म्हणून. 
एवढीच वृत्ति आपणांस कार्यास चिकटून रहाण्यास पुरेशी आहे काय? आपण 
करतों त्यांत देशाकल्याण बंद तरी पडणार नाहीं असें आपणांस वाटतें कीं 
नाहीं ! ” 

: माझ्या कार्याने लोककल्याण कितपत होईल हे आज सांगतां येत नाहीं, 
तथापि मला एवढेंच वाटतें कीं, दादाभाई नोरोजीसारख्या अल्पबुद्धीच्या एत- 
देशीय लोकांनीं आणि मतलबी परकीय लोकानी उत्पन्न केलेल्या काँग्रेसच्या 
खुळापेक्षां माझा मागे अधिक खुळेवणाचा नाहीं. ” 

: आतां माझ्या प्रश्नाजबळ आपण पुन्हां आलांतच. काग्रेससारख्या 
चळवळीपेक्षां आपले कार्ये आपणांस अधिक कां वाटतें? ” 


५ कांग्रेसवाली मंडळी म्हटली म्हणज्ञे कायस्थ धर्माची अपेक्षा करीत 
आहेत. मीं ब्राहमण धमे आचरीत आहे. ” 


६ याचा अथे काय १” 


६ य़ा कांग्रेतवाल्याचे म्हणणें काय कीं, तुम्ही आम्हाला मोठमोठ्या 
नोकऱ्या द्या ब यांची ओरड तेवढ्यापुरतीच. यानां ब्राझणघम आचरावयास 
नको, आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षाहि त्या प्रकारच्या नाहींत. हें इंग्रजांना राजा 
मानसिंगास अकतरानें कसें उच्चपदास नेलें त्याच उदाहरण देतात. ते 
म्हणतात कीं मोंगल बादडाहांनीं कसें राजा मानर्सिंगास नोकरीला ठेवलें आणि 


गोंडवनांतील प्रियंवदा २८४ 


( पंचतुंड नर रुंडमालघर-या चालीवर ) 


कामबाण जरि ममंच्छेदी त्रस्त करी तरुणांतें । 
स्मित युवति तव अमृत, त्याच्या सेकानें ये त्यातें । 
नवजीवन, परि चेचलता तव आक्रुल ह्ृदया करि ती । 
आश्वासनपर वाक्ये स्फुट तब देतिल मजला शांति । 
हृदय कठिण तव असें बोघिण्या घेउनि तद्भाबातें । 
स्तनयुगलें हीं पुढें येति तव, गर्बोन्नत चित्तातें । 
योग्य प्रतिनिचि असति लाभले; वज़ताडना मुकले । 
जणो महीधर, अथवा दिसती अरघटद्टाच्या माले । 
कुंभ जणो; हे लावण्याच्या जलसेकारने तुजला | 
मोहक करुनि कुसुमशराच्या बाढबिती सेन्यबला । 
मोन तुझें तें सोडुनि देई भूमिकडे नच पाही । 
कालविलंब न करी बालिके ह्ृदय वदे शाब्दांहीं । 


“हां, हें पद कुठलं £ हें देखील आपल्या एखाद्या काल्पनिक नित्राश्वेंच 
असेल!” 

“ नाहीं हें मीं स्वतःच लिहिलें आहे. ” 

: हं पद ' युवती ' स उद्देशून लिहिलें आहे. कोण ही युवती ? कोणी 
खुरीखुरी आहे कां केवळ कवि कल्पनेची आहे? ” 

“ आपणांस काय वाटतें १ 


6 मला असें वाटते कीं आपण हें कोणा विशोष स्त्रीला उद्देशून लिहिलें 
आहे. ? 


6 कशावरून १ ” 


“ “मोन तुझें तें सोडुनि देई ' हें वाक्य कोणा विशोभ्र छीला उद्देशून 
नव्हे काय १” 


१८५ भभ्न देवालयाच्या परिकरांत 


“ असलेंच पाहिर्जे असें नाहो. काव्य तयार करतांना नायिका विदोष 
प्रकारची अगर विदोष कार्यात गढली आहे, अशी कल्पना करून काव्य करणें 
हा कविसंप्रदाय आहे. संस्कृतमर्ध्ये असे 'छोक पुष्कळ आहेत. हें पद्‌ 
देखील काही संस्कृत 'छोकार्चे रूपातर आहे. ” 


५ कोणचे संस्कृत छोक ते ? ”" 
८८ ते, हे ११ 


कामबाणप्रहारेण मूच्छितोस्मि पदे पदे । 
जीबंति युबचेतांसि युबतींना स्मितामृतेः । 
मोन कालविलंबश्व प्रयाणं भूमिदशोनम्‌ । 
भकुट्यन्यमुखी वार्ता नकारो षड्‌ विध.स्मृतः । 

“ हे वरोषर मूळ छोक आहेत, कीं मी बायकोमाणूस, मला संस्कृत 
'छोक म्हणून गप्प करावयाचे अशांतला प्रकार तर नाहीं ना? ” 

“काबरे!” 

“ का म्हणजे ! संस्कृत छोक आणून दुसऱ्याला भेवडावून सोडण्याचे 
प्रकार पुष्कळ पाहिले आहेत. रुद्र अगर पवमान म्हणून अभिषेक करतो 
म्हणून बायकास सागणारें पुष्कळ ब्राम्हण वाटतील ते दुसरेच संस्कृत “छोक 
म्हणतात, ” 

“ नाहीं, असा प्रकार येथे नाही. ”" 

“ मला बरीच इंका येते. ” 

“का बरें! ” हरिभयय्यानें जरा भीतचित्तानें विचारलें. त्याला असें 
वाटलें कीं, आपण बिंबाबाईशीं जी लगट केली आणि तिला जी गीते गाऊन 
दाखविली त्याबद्दल तिला राग तर नाहीं ना आला ! 

:: कारण एवढेंच कीं, त्या पदांत स्त्रियांच्या मनाविषयी थोडेसे अज्ञान 
दिसतें. संस्कृत कवींमध्यें तसें अज्ञान होतें काय १ ” 

24 


गोंडवनांतील प्रियंवदा १८६ 


:: अजान कोठें दिसतें १ ” 

“ कबि त्या तरुणीस आपलें हृदय शब्दानी बोलून दाखविण्यात प्रार्थना 
करीत आहे. एक तर स्त्रिया कर्धी आपलें हृदय शाब्दांनीं व्यक्त करून दाख- 
वितील काय ! आणि दुसरी गोष्ट म्हटली म्हणजे पुरुषांनी आपलें हृदय व्यक्त 
करून दाखविलें तरच स्त्रियांना आपले हृदय व्यक्त करण्याचें उत्तेजन येतें. ” 

:: त्र मग आपले म्हणणें काय ? ” 

५ पुरुषानीं आपलें हृद्य व्यक्त करावें आणि स्त्रियांची संमति अगर 
विरुद्धता स्त्रिपाच्या वतैनावरून ओळखावी. पुरुषानीं आपलें हृदय अगोदर 
उघड करून दाववावयाचे कीं स्त्रियानीं ? ” 

“ बरं तर मग मी कबूळ करतों कौ मी ती कविता स्वतःचेच अंतःकरण 
व्यक्त करण्याकरिता केली होती, ” 

“ आपण ती कविता कोणा तरुणीस उद्देशून लिहिली! ” 


हरिभय्यानें उत्तर केळे नाही. तो तिच्या जरासा जवळ सरकला आणि 
तिला त्याने टढालिंगन दिल. जिंबाबाईनें कांहीं हरकत केली नाहीं. उलट 
त्याचे हात जरासे ढिले झाले तेव्हां तिने उलट त्यास स्वतः आपले बाहुपादा 
विस्तृत करून आलिंगिलें. तेव्हां ती संधी साधून हरिभय्यानें बिंब्राजाईच्या 
अधरामृताच प्राशन केलें, 

तीं दोघेहि तेथे काहीं वेळ बसली. दोघेहि स्तःधच होतीं. तथापि 
मधून मधून आलिंगनचुब्रना दि विधी उरकून घेत होती. तथापि स्तब्धतेवरून 
तीं केवळ प्रेमसागरांत बुड्या मारीत होती अश्ांतलहा भाग नाहो, हरिभय्या 
आणि बिंत्राबराई यास एकमेकांची हृदये समजलीं होती. कांहीं वेळाने चिंज्राबाई 
म्हणाली, “ आपले हे करणें पाप तर नाहीं ना?” 

6 हें पाप आहे अगर नाहीं हें पुढील विचारावर अवलंबून आहे. ” 

“ तें कसें काय ? ” 


१८७ भस देवालयाच्या परिकरांत 


न्न 


“< आपणांस पुढें लभ करावयाचे असेल तर आपलें आजचे करणें गैर 
नाहीं आणि जर आपणास पुढें लम करावयाचें नसेल तर गेर आहे. ” 

“ आपला काय विचार आहे? ” 

“ आपला काय आहे?” 

“ मुला जी गोष्ट गैर आहे ती करावयाची नाहीं. आजचे आपलें करणें 
गैर न होईल असे झालें पाहिजे. ” 

“ माझी तयारी आहे, ” 

:£: आपण मला अंतर देणार नाहीं ना? ” 

६ मुळींच नाहीं ! ” 

:“: आपण माझा स्वीकार देवाल्यांत केला आहे हें लक्षांत ठेवा 

: माझ्याकडून लग्न करावयास बिलकूल हरकत नाहीं, प्रश्न तुमच्याच- 
पुढें आहे. ” 

“८ आपण माझ्या प्रभाकराला अगदीं आपल्या मुलाप्रमाणे वागवाल 
ना?” 

:< मला प्रभाकराचा लोभ पूर्वीपासूनच जडला आहे. ” 

बिंत्राबाईने हें गाब्द ऐकतांच थोडेसें अस्वस्थतेचें सोंग करून ह्रिभय्याच्या 
अंगावरच स्वतःस लोटून घेतले, हरिभय्यानें तिला पुन्हां घट्ट घरले, 

थोडक्याच वेळानें पुन्हां बिजाबाईनें स्वत स सोडवून घेतलें, आणि पुन्हां 
म्हणाली “ छे ! आपण करीत आहों तें वाईटच आहे, आपणांस एकमेकांवर 
प्रेम करावयाचा आज अधिकार नाहीं ; आपलें लयन झाल्यानंतरच आहे. ” 


हरिभय्यानें उलट तिला पुन्हां आपल्या हृदयाशीं आवळून भरलें आणि 
म्हणाला “ आपण जर लहान मुले असतों आणि जुन्या चालीप्रमाणेंच आपलें 
लम व्हावयार्चे असतें, आणि त्यांत स्त्रीचे पहिल्या प्रथमच व्हावयाचे असतें तर 
तो नियम लागू पडतां. मोठ्या झालेल्या स्त्रीपुर्षांनीं जर ल्म कराबयाचीं तर 


| 0. 


गोंडवनांतील प्रियंवदा १८८ 


डा डालडा न-०> ->>-_:- -->->“- -न---->-> ८-५ 


त्यांचे एकमेकाचे प्रेम तरी एकमेकांवर असलें पाहिजे. प्रेमनिवेदन हावभावानीं 
आणि क्रियांनीं जितक्या स्पष्ट रीतीने करता येतें तितके स्पष्ट दुसऱ्या रीतीनें 
म्हणजे बोळून करतां येत नाहीं. यासाठीं अयोग्य आणि पापात्मक प्रेमाच्या 
जुळवाजुळतीसाठीं जो प्रकार कराबा लागतो तोच खऱ्या ब सदह्देतुयुक्त प्रेमाच्या 
जुळवणीस लागतो. एकाचे प्रेम दुसऱ्यावर आहे हें तरी ठरावें कसें ? '? 


एवढें बोलल्यानंतर अधिक स्पष्टपणानें बोलण्यासाठी अगर बिबाबाईच्या 
आलिंगनापासून होणारें सुख बोलण्यांत गंतल्यामुळें कमी कमी होऊं लागलें होतें 
म्हणून म्हणा, हरिभय्यानें बित्राबाईच्या बाहुपाशांतून--एक दोन वेळां चुंबन 
घेऊन -- आपली मुक्तता केली आणि म्हणाला, “ पुनर्विवाह हें जुन्या निष्टाचारा- 
विरुद्ध आचरण, तेव्हा आपल्या लय्माचा चिवडा लोकचर्चारूपी वर्तमानपत्रातून 
विकला जाऊं नये म्हणून तरी खात्री असली पाहिजे, ज्या स्त्रीबरोबर आपण लयन 
करणार ती स्त्री आपल्याशीं केवळ आपल्या पोटापाण्याची सोय करण्यासाठीं लम 
लावीत नाहीं, अगर कोणीही पुरुष केवळ रात्रीच्या सोईकरता हवा एवढ्या- 
साठींच लग्नास प्रव्रत्त होत नाहीं किंवा आपण हवे तसे व्यवहार केल्यामुळे मूल 
झालें असता मुलाचा जाप म्हणून दाखविण्यासाठीं कोणी तरी हवा म्हणून 
पुनरविवाहाकरितां तयार होत नाहीं याबद्दल तरी मनाची खात्री पाहिज. व 
यासाठीं विवाहपूबे प्रेमसाधनाहि केलीच पाहिजे. आजकालच्या सुधारकानां 
पुनर्विबाह पाहिजे; पण विवाहापूर्वी स्त्री पुरुषांनी एकमेकास भेटावे व एकमेकांवर 
प्रेम करण्याची संधि स्त्री पुरुषांस मिळावी हे नको आहे. ” 

“ सध्यांचे पुनर्विवाह होतात ते प्रेमामुळे नाहीं कां होत ? ” 


£: फारच क्वचित , पुष्कळदां पुनर्विवाह करणाऱ्या स्त्रीपुरुषांची ओळख 
देखील नसते. आणि पुनर्विवाह पद्धत म्हटली म्हणजे एखाद्या पुनर्विबाह- 
संयोजक कंपनीच्या सेक्रेटरीमार्फत लग्न जुळवावयाचें. स्त्रीपुरुषांची ल्ग्नापूवी 
थोडी ओळ'व होती व दोघांचे एकमेकांवर प्रेम होते हें कळलें तर ती गोष्ट जणू 
काय मोठी लज्जास्पद गोष्ट झाली, चांगल्या घराण्यांतीच विधवांपर्यंत हे सेकेटरी 
पोंचतच नाहींत. यांचीं कुळें म्हटलीं म्हणजे कांहीं मात्तरणी, कांहीं नर्सा 


१८९. भस्न देवालयाच्या परिकरांत 
आणि कांहीं मिडव्राईफा -ज्या बहुतकरून एक किंबा अनेक डाक्टरांनीं पूवी प्रेम- 
पात्र केलेल्या--असावयाच्या, ज्या बायका पुनर्विवाहास तयार होतात त्या नर्सरच 
अगर मास्तरणीचे काम करून कंटाळून गेलेल्या असतात, आणि दुसरा कोणी 
तरी पैसे मिळवून आणणारा हवा असें त्याना वाटूं लागतें. कधीं कित्येक श्रीमंत 
मतलबी सुधारक आपण खराब केलेल्या स्त्रियांचा मागाहून त्या अक्षतयोनी असें 
सांगून भोळसर मनुष्य पाहून पुनर्विवाह लावून देतात, असल्या कारणामुळें कांहीं 
ठेवलेल्या आगि पुनरवित्राहाच्या बायका याच्यामध्ये फरकच नाहीं असेंहि 
पुष्कळदां होतें, ” 


“६ बाईट बायकाच पुष्कळदां पुनर्विबाहास का फार प्रत्रत्त होतात ? ” 


“ याचें कारण एवढेंच कीं, पुनर्विवाहाची चाल अगर त्याची इच्छा लोका- 
मधूनहि निघाली नाहीं; आणि विधवांमधून तर त्याहूनहि नाहीं. तर आपल्या 
धर्माचा आणि समाजाचा नाश करूं पहाणारे खिस्ती मिगनरी. त्याना आमच्या 
बायकांची फार कींव आली. त्यांचे चेळे आमचे सुधारक ! पुनर्विवाह आमच्या 
समाजांत पाहिजे असें त्यास वाटलें आणि काहीं तरी पुनर्विवाह घडवून आणण्या- 
साठीं तुम्ही स्वाथत्याग करून पुनर्विवाह करा असा उपदेश करूं लागले | ” 


“६ कां बरें £ तुम्हीं पुनर्थिबाह करण्यात स्वाथेत्याय करीत नाहीं. काय १ 
तुम्हीं पुनर्विवाह केल्यानें तुमच्या ह्रिदासपणावर गदा माहीं का येणार १ तुमचे 
आज उत्पन्न आहे तें नाहीं का कमी होणार ? ” 


“ होईल, नाहीं असें नादीं, तथापि त्याला मी स्वार्थत्याग म्हणत नाहीं. 
त्या उत्पन्नापेक्षा मला ए.वाद्या स्त्रीच्या प्रेमाची किमत अधिक आहे. प्रेम 
करणारी स्त्री मला मिळाली तर मी एका झोंपडींत सुद्धां राहून दिवस घालबीन, 
तथापि ज्या स्त्रीसंबंधानें मला कांहीं माहिती नाहीं, ज्या स्त्रीस मी ठाऊक नाहीं, 
तथापि आपणास एक पुरुष हवा एवढें मात्र जिला ठाऊक आहे तिच्याशीं लग्न 
लावण्याचा स्वार्थत्याग करण्यास मी तयार होणार नाहीं. ” 


६ माझे तरी तुमच्यावर प्रेम आहे हे तुम्हीं कसें म्हणशां ? 


र 


गोड बनांतील प्रियंवदा १९० 


7 ए*न->:३::-:>>>:>>>>->३३>><><>>२२२>----------५-- बाटा 


“ तुझे माझ्यावर प्रेम थोडे बहुत तरी असलेच पाहिजे हें तुझ्या आतां- 
पर्यंतच्या वर्तनावरून वाटते. आणि याशिवाय दुसरें एक कारण म्हटलें म्हणजे 
तूं श्रीमतीण आहेस आणि मी दरिद्री आहे. 


“ बरं, लोकांमध्ये पुनर्विबाह फारसे कां होत नाहींत हे आपलें सांगायचे 
राहिल, ” 

“ याचं कारण मतुष्यस्वभाबाकडे दुलंक्ष झालं आहे, सुधारणा करावयाची 
ती मनुष्यस्वभावाला अनुसरून पाहिजे, ” 


“ सुधारकानीं काय करायला हबं होतं ? 


“ सुघारकांनीं कांहींच करावयाला नको होते; त्यांनीं मरून जावयाला पाहिजे 
होतें आणि पाहिजे आहे. जें काय करावयाला पाहिजे होतें ते देशाभिमानी 
लोकांनीं करावयाला पाहिजे होतें. ” 


£ तु काय करायला पाहिजे होत ? ” 


“ ते मग सागेन, प्रथमतः मानवी स्वभावाकडे दुलक्ष कसें झालें तें सांगतो. 
पुरुषांच्या स्वभावाचेंच उदाहरण आपण घेऊं, अठरा वीस वर्षाचा मुलगा झाला 
आणि त्याला आपलें लम व्हावेसे वाटले तरी, ' बाबा मार्झे लग्न करून द्या ! असें 
ग्हणावयाला तो लाजेलच, व दुसरे कांहीं घोंटाळे करण्याची त्याची प्रवत्ति 
होईल, ” 


“ मुलींची तीच गोष्ट आहे, बाबा मार्झे लम्न करून द्या असें म्हणणें 
तिच्या जिवावर येईल, तथापि दुसरे कांहीं घोंटाळे करण्यास मुली कांहीं. कचरत 
नाहींत. आपल्या लोकात अविवाहित मुली फारशा नाहींत, तथापि हें कांहीं 
बंगाली ब्रम्हो मुलींच्या वर्तनावरून मला कळलें. आमच्या दादाशीं एका बंगाली 
मुलींचा पत्रव्यत्रहार चालला होता, ती मुलगी जवळ जवळ आमच्या दादाच्याच 
वयाची होती, तो पत्र्यवहार पुढें बडलांच्या हातीं पडला. ते दादावर खूप 
रागावले, पण त्यानीं लगेच पुढच्या वैश्याखांत्‌_ दादाचं लम्न करून दिल, ” 


१९१ भम्न देवालयाच्या परिकरांत 


“ तरुण कुमारिकांचे देखील असंच आहे ना? आता विधवांची गोष्ट 
देखील अशीच. तूंच तांग बरं कीं माझे दुसरें लग्न करून द्या असें आपल्या 
बंडलानां सांगण्याची तुझी छाती झाली अप्तती का? ” 


“ नाहीं. प्राण गेला असता तरी देखील मी असं म्हटलं नसतं. ” 


“ आणि तीच तूं आता एका माझ्यासारख्या सामान्य मनुष्याबरोबर लय 
करावयास तयार झाली आहेस ?' असें म्हणून हरिभय्यानें तिचे चुंबन घेतलें. 


“ मी यासाठीं एवढेंच म्हणतों को, प नर्बिबाह व्हावयाचे ते लहान मुला- 
मुर्लीच्या पद्धतीने जुळणार नाहींत. कुमारीच्या लग्नासाठी बाप हजारो रुपये 
हुंडा खच करण्यास तयार होतो तसा विधवेसाठीं तयार होईल काय ! आणि 
तसा होत नसतां विधवेचे लग्न कसे होईल ? लग्न विधवेबरोबर करावयाचे ते 
केवळ स्वार्थत्याग करून करावें ! तिचे आपल्यावर प्रेम आहे किंबा नाहीं हँ 
पहाण्याची संधि देखील नसावी. केवळ पुनर्विवाह कंपनीच्या सेक्रेटरीचे शिक्के 
सर्टिफिकिट असले म्हणजे झाले, तेवढ्यावर तरुणांनीं खूष रहावे, आणि ते 
दाखवून देतील त्यापेकीं एखाद्या विधवेबरोबर लम्न करावे ही आजकालची 
विधवाविवाहाची रीत. तशाप्रकारें पुनर्विवाह झाला म्हणजे बिनअकली लेख- 
कानीं चालविलेली पत्रे व मासिके त्या लाचे नगारे पिटावयास तयारच, ” 


“ त्र मग पुनर्विवाह व्हावा कसा £ ” 


:£: आपण जुळविला तसा, तरुणांनीं तरुणींशीं आपले भापण लग्न जळ- 
बार्बे. आईबापांच्या चोरून पाहिजे तर पत्रव्यवहार करावा. आणि स्पष्ट भाषेत 
सांगायचे म्हटल्यास तरुणींस तरुणांनी फूस लावून पळवून न्यावें. ” 


५ हु काय बाई आपलं बोलणं | ” 


९: स्पष्ट बोलावयाचे म्हटलें म्हणजे कानाला जरा कठोर लागतें, पण प्रीति- 
विवाह आणि पुनर्विवाह हे जुळबिण्याचा सन्मान्य मार्ग दुसरा नाहीं. 


“ आणि पुढें पुरुषांनी बायकांना टाकून दिले म्हणजे मग? ” 


गोंडवनांतील प्रियंवदा १९२ 

:< तें बंद करण्यासाठीं विधबांनां हें शिकवलें पाहिजे कीं तुम्ही अगोदर 
पुरुषांशीं फारसा संबंध ठेऊं नका, ठेवला तरी अशांशीं ठेवा कीं त्यांच्याशीं 
पुढे मागे लयन होण्याचा संभव असेल. म्हणजे त्यांनी ओळस्य किबा स्नेह 
वाढबावयाचा तो आपल्याच जातीच्या लोकाबरोबर वाढवावा आणि ते ग्रहस्थ 
अविवाहित अगर विधुर आहेत असें पाहून वाढवावा. ब्राह्मण तरुणाशीं परभु 
मुलीने अगर परभाशीं ब्राह्मण मुलीने फार संघठण होऊं देऊं नये. आणि तो 
मनुष्य आपल्याच वर्गातला अगर ज्याच्यांशी लयन केळ असतां आपले लग्न फार 
हलक्या पुरुषाबरोबर झाळें असं वाटणार नाहीं अशाभरोबर ठेवावा, आणि पुढें 
त्या पुरुषाला जाळ्यात पकडण्यासाठी बेधडक खटपट करावी, ”? 


“६ ती काय करावयाची ? ” 


“५ आपण काय केली तीच करायाची, आपण दोघांनीं ज प्रकार केले ते 
सवे आजच्या सोंवळ्य़ा सभ्यतेचे स्वोटे नखरे करणाऱ्या समाजांत असभ्य आणि 
फाजील असेच समजले जातील, असले प्रकार चोहोंकडे होतातच. पग 
त्यानंतर लम मात्र नाहींत. लये व्हावयाचीं झाली म्हणजे तीं पुनर्विवाहाच्या 
सेक्रेटरींमा्फतच होतात. आणि ते पुनर्विबाह पुढें सुखमय होत नाहींत, ? 


६: समजा, पुरुष अविवाहित अगर विधुर असला आणि त्याच्याशी 
एखाद्या बाईचं जुळलं आणि पुढें त्याने तिला टाकून दिलं म्हणजे मग १ ” 


££ त्यासाठीं पाहिजे तर कायदा करावा. ” 
:: तो कसला ? ” 


:: कायदा जो करावयाचा भसतो, तो लोकमान्य होण्यास एक गोष्ट 
आवडयक आहे आगि ती म्हटली म्हणजे कायद्याचा हेतु लोकांस नीतीचा 
बाटला पाहिजे. विधवानी पुनर्विबाह केला तर ! त्यांस सव हक्क असावे 
असा कायदा करण्यापूर्वी जो विधबास पळवून नेऊन टाकून देईल त्यास कडक 
शासन व्हावें यासाठीं कायदा करावा, अगर 'विधयांस त्यानें पळवून नेऊन पुढें 
सोडून दिलें तर त्या! बाईस त्या पुरुषाप्रासूत . पोटापाण्यासाठी फैसा घेण्याचा 


१९३ भग्न देवालयाच्या परिकरांत 


ननननप्ड्सन्ल््् ४४००0 “पापा >>> 


हक शाबीत करण्याचा कायदा करावा, तसा कायदा झाला म्हृणजे बायकांस 
फसविणाऱ्या मनुष्यावर कांहीं तरी जबाबदारी उत्पन्न होईल. दोन दिवस मजा 
मारण्यासाठी स्त्रियांचे जन्माचे नुकसान करणारे जे सभ्य ग्रहस्थ समाजांत 
वावरतांना दृष्टीस पडतात त्यांनां थोडा विचार पडेळ, आणि यासाठीं बायकांनां 
पळवून नेण्यापूवी ही पळवून नेण्यालायक विधवा आहे कीं नाहीं, हाहि त्यांनां 
बिचार पडेल. व पुरुषाकडून होणारी लगट अधिक विचारयुक्त होईल आणि 
ती तशी झाली म्हणजे उभयतांचे प्रेमहि अधिक टिकण्याचा संभव आहे.” 

“ बरं आतां आपण लग्न करावयाच तर तें बाबांनांकळावयास नको काय? ” 

:< कायदा अत्ता आहे कीं बाईस दुसरें लम करणेंचे झालें म्हणजे बापाची 
संमति लागत नाही, तथापि त्यांस कळविलेल बरे. ? 

“ ते कसें कळवावयाचें ? * 

“ तुम्हांला वाटलं तर तुम्ही कळवा ! ” 

“ मी नाहीं बाई कळबीत, माझ्याच्यानं नाहीं धीर होणार ! ” 

“ पाहिजे तर मी कळवितों, मी त्यानां पत्र लिहीन म्हणजे झालें. 
पाहिजे तर तूं शारदाबाईंना मध्यस्थी घाल. ” 

“ शारदाबाई तर मला वाटतं कीं आपलंच लग्न जुळबीत आहेत, ” 

“< कुणापाशीं ! ” 

: आज ते वैजनाथदशास्त्री आले आहेत, त्यांच्यापाशी. ” 

“ वेडी आहे शारदाबाई. वैजनाथशास्त्री म्हणजे काय अरसिकतेचा 
मूर्तिमंत पुतळा ! शारदानाहैनी कोणी तरी ब्यारिस्टर अगर कोणींतरी संपन्न 
नवरा पहावा ! ” 

:< ब्बुरें आहे, शारदाबाईसारख्या राचा. त्या दरिद्यास काय उपयोग? “ 

५: म्हणजे बायकांनीं लम करतांना केवळ पुरुषाच्या द्रव्याकडे पहावे 
निदान आपण तरी असें म्हणू नये. मजजवळ काय आहे १” 


र... 


गोंडवनांतोल भ्रियंवदा १९४ 


“६ मग आपलें म्हणणें हा विवाह व्हावा असें आहे काय? ” 

“ अर्थात नाहीं. माझ्या मतें द्रव्यास महत्त्व नाही, आयुष्य क्रमणा- 
ऱयांच्यां अभिरुचीस महत्तव आहे. तर संसारसुखाचा भोक्ता तरी पुरुष हवा 
ना, तो वेजनाथशास्त्री म्हणजे शारदाबाईला एकटीच बिछान्यावर सोडून देऊन 
जुन्या पोथ्या चाळीत बसेल आणि त्या पोथ्य़ांत दिसणाऱ्या भाषवरून हा ग्रॅथ 
किती जुना असावा असल सिद्धांत काढीत बसेल. आपल्या बायकोच्या 
तारुण्याचे दिवस कमी होताहेत याचा त्याला विसर पडेल. ” 

५: म्हणजे तेवढ्यावरून तो लग्नाला अयोग्य झाला काय? मला 
त्याची आठवण होते; ते देग्वील रात्रीं दोन दोन वाजेपर्यंत हिशोबाच्या 
बह्या पहात बसत असत. आणि निजायच्या अगोदर बायकोचे चुंबन 
घेतल्याशिवाय निजत नसत, अहो, कामाचा मनुष्य असला म्हणजे त्याला 
बायकोकडे थोडा वेळ तरी दुलेक्ष केलेंच पाहिजे. ” 

“: यासाठीं मी असें म्हणतो कीं सुंदर स्त्रियांशी लम करण्याचा अधिकार 
कवि, गायक व चित्रकार इत्यादि ललितकलांच्या सेवकांसच आहे. ” असें 
म्हणून हरिभय्यानें तिचे पुनः एकदां चुंबन घेतले. 

>< > >< >< 

कांहीं वेळानें बिंबाबाई व हरिभय्या मूळ ठिकाणावर परत आलीं. त्यावेळेस 

बिंबाबाई अगदीं स्तब्ध पण आनंदमय दिसत होती. 


प्रकरण १७ ब 
एका रात्रींत विद्वान 
“ तुमची काय एकदम विद्वान्‌ होण्याची इच्छा आहे ?' आणि मला 


एका रात्रींत बिद्वान्‌ करा म्हणून सांगतां ! तुम्हालाहि उद्यां रनपूर सोडून 
जावयाचे आहे आणि एवढ्यांत मी काय तुम्हांला विद्वान करावयाच ! 


१९५ पका रात्रींत विद्वान 


आणि कसें करणार ! जाबा रे, तुला मी सांगतो कॉ हे. मला अगदीं अशक्‍य 
आहे. १9 

५ गुरुकृपा असली म्हणजे सर्वे कांहीं होईल. ” 

“ बाबा रे, गुरुकृपेने कोणीहि कधींच विद्वान होत नसतो. गुरूच्या 
इच्छेपेक्षां शिष्य स्वतःच्याच प्रयत्नाने विद्या संपादतो. गुरु थोडेसें सांगेल 
पण शिष्याने परिश्रम मात्र पुष्कळ केला पाहिजे. ” 

“ गुरूची शिकवणी आणि शिष्याची मेहनत यांत प्रमाण काय असतें ? ” 

“ जितका शिष्य मूख व निनमेहनती तितके गुरूला श्रम जास्त पडत 
जाणार, परंतु जर दिष्य फार मेहनती असेल तर गुरूला फारच थोडे काम 
पडतें, ” 

“ पण जर शिष्यच पुष्कळ मेहनत घेणारा असेल तर“-- ” 

“८ तर गुरूला फारच थोडे काम पडणार.” 


“ त्र मग समजा कीं, शिष्य पुष्कळ मेहनत घ्यावयास तयार आहे 
आणि गुरुदशन मात्र बारा बारा वर्षानी होणार आहे तर गुरु शिष्यास कांहीं 
शिकवूं शकेल कीं नाहीं १ ” 

“६ शिकवू शकेल, पण नियमितपणानें वाचन करणें, मेहनत करण्यास 
प्रत्रत्त करणे, इत्यादि गोष्टी करतां येणार नाहींत, ” 

“ तर मग नियमितपणा व मेहनत यांची जबाबदारी शिष्यावरच ठेवावी, 
मग काय अडचण आहे? ” 

“: पग अडचण एवढीच कीं शिष्याची पूर्वे तयारी कांहीं तरी पाहिज. 
उदाहरणार्थ, एर दी भाषा शिकवाबयाची झाली तर बारा बारा वर्षानी पाठ 
देऊन भागणार नाहीं. पण ज्या विषयाची बरीचशी प्राथमिक माहिती विद्या- 
थ्यास आहे, त्या विद्यार्थ्यास आपेल्या पुढील अभ्यासक्रम कसा ठेवावा हें 
सांगून तीर्थाटनास जातां येईल. ” 

“ तर मग तुम्ही माझं काम खात्रीनें करणार |! ” 


गोडवनांतील प्रिथंचदा १९६ 
: क्स बरें ! तुमची कोणत्या शास्त्रांत सामान्य उपस्थिति आहे व 
माझ्याकडून त्या शास्त्राची पारंगतता मिळवू पहाता ! ” 


6“ मुला एकच शास्त्र परिचित आहे आणि तें म्हटलें म्हणजे संगीत, ” 


“ आणि संगीत मला बिलकुलच येत नाहीं. हिंदुस्थानच्या अवनतीचे 
कारण संगीतच होय. आणा तुमर्‍या तो तंब्रोरा, फोडून टाकतों. ” 


“ मी संगीतात प्रवीणता मिळविण्याकरिता तुमच्याकडे मुळींच येणार 
नाहीं, १9 


“: तर मग कशाकरिता? कोणत्या शास्त्रांत तुम्ही विद्वान होऊं पाहता? ” 
“ माझी खरोखर विद्वान व्हावें अशी मुळींच इच्छा नाहीं. ” 

“ तर मग! ” न 

“ विद्वान्‌ समजलें जावें एवढीच माझी इच्छा आहे. ” 


५ घण ती साध्य होण्यास काहीं विद्दत्ता नको कां? ” 
: ती फार थोडी पाहिजे अशी माझी समजुत आहे, ” 


“६ आणि अशी तुमची समजूत कशी झाली ? ” 


£ मी एकदां उमराबतीला गेलों होतों त्या वेळेस एका बकीलाकडे उतरलो 
होतों. तेव्हां पाहिलें कीं गांबांत त्याची मोठा विद्वान म्हणून ख्याति. तीन चार 
दिवस तेथेंच होतों तेव्हां त्या वकीलाच्या विद्वत्तेच्या मर्यादा कळल्या, त्याला 
सुभाषिताचे रोसवारा 'छोक येत असावेत, संगीतरत्नाकरांतले एक दोन शछोक 
त्यानें म्हणून दाखवि, त्याला संगीत काहीं फारसें समजत नव्हतें पण रसिक 
आणि विद्वान म्हणून त्याची ख्याती होती खरी, मला सहज विचार उत्पन्न 
होतो तो हा कीं, दोनतीनर्शे शछोक पाठ करून आपण विद्वान म्हणून सहज 
मोडले जाऊं, तर आपण तरी तसें कां करुं नये? या गांवढ्या गांवांत कांहीं 
संस्कृत छोक म्हणून दाखविले म्हणजे लोक पंडित समजतात. पण अलीकडे 
इंग्रजी शिकून बी. ए. वगैरे झाललीं पुण्याकडची माणसं येतात तीं त्रासदायक 


 ळटोनयाणणयावाशावका कजाच्या 


१९७ पका रात्रींत विद्वान 


“--->:२२२_-._.>-.:------_ _ ---< 


होतात, म्हणून म्हणतों कीं त्यांनांसुद्धां मेवडावतां येईल इतकें आपलें वाचन 
आपणग दाखविले पाहिजे, म्हणून म्हणतो कीं ब्री,ए. झालेल्याना भेवडावण्याची 
युक्ति सांगा. ” 


वैजनाथशारूयांनीं यावर उत्तर काय दिले ते पढें येईलच. पण आमच्या 
हरिभय्यास एकदम विद्वान्‌ होण्याची इच्छा का झाली आणि त्री.ए, वाल्याना 
भेवडावण्याची आवश्‍यकता कां भासली ह्या रहस्याचा डलगडा होण्यासाठीं 
त्या काळच्या सामाजिक वातावरणांत वाचकानां गेळें पाहिजे. नागपुरास त्या 
वेळच्या सुशिक्षित वर्गामध्ये ज्या प्रकारच्या भावना वागत होत्या, त्या आमच्या 
सुशिक्षित वर्गात कांहीं अंशी टप्त झाल्यामुळे निम्याशिम्या वाचकांस परिचित 
पण निम्याशिमग्यास अपरिचित असा सामाजिक इतिहास दिला पाहिजे. 


हरिभय्या मोघे याच्या मनावर प्रेमामुळे जो संस्कार झाला त्यात महत्वा- 
कांक्षा मुख्य होती. बिंब्राबाईने आपल्यापेक्षा कमी योग्यतेच्या पुरुषाघरोबर 
लग्न केलें असा प्रवाद लोकांकडून होऊं नये आणि विशोष्रतः सुधारक वर्गाकडून 
होऊं नये अशी त्याची इच्छा होती. सुधारक वर्गातल्या बऱ्याचश्या मंडळीचे 
अंत करण तो जाणत होता. त्या वेळेस सुधारक वर्गाच्या संप्रदायाची अशी 
समजूत होती कीं, पुनर्विवाह वगरे करावयाचा झाला तर कांहीं लोकांनां तो 
सोईस्कर पडला म्हणून तो त्यानीं लावला असें जर कोणी म्हटले तर पुनर्विवा” 
हाच्या संस्थेसच कोणी भोसकले अर्से त्यास वाटे. तसेंच एखाद्या शाळामास्तराने 
स्वयंपाकाला बाई मिळत नाहीं किंवा तिळा पगार देणें परवडत नाहीं म्हणून 
हा पुनर्विबाह लावला तर पुनर्विवाहासारख्या उच्च दर्जाच्या संस्थेची थट्टा 
केल्यासारखे त्यांनां वाटे -- खरोखर वाटे किंबा नाहीं. कोण जाणे, पुन- 
विवाहाच्या पावित्र्याचा गाजावाजा करण्यासाठीं, ते असलीं तत्त्वें बोलत मात्र 
असत, स्त्रियांच्या हकांचे व पुनर्विवाहाचे अमिमानी म्हणवून घेऊन तरुण 
तरुण पोरींबरोषर व्यभिचार करण्याकरितां क्षेत्र वाढविणारे जाडे सुधारक 
पहावयाचे झाल्यास राजमहेंद्रीच्या प्राथेना समाजाकडे जाण्याचें मुळींच कारण 
नाहीं. वीरेशलिंगम्‌ पंतलू हा मुद्देमालासह पुरावा पुढें आल्यामुळें कोर्टोत 


गोड वनांतील प्रियंवदा १९८ 
फजञित झाला, परंतु विधवाविषयीं कळकळ दाखविणारे आणि त्यांस फशी 
पाडणारे पाजी गुहस्थ त्या वेळच्या सुधारक म्हणविणाऱ्या चमूमध्यें थोडेथोडके 
नव्हते. जेव्हा काहीं सुशिक्षित वर्गातल्या बायका नसचे काम शिकण्यासाठी 
इस्पितळांत जात असत, तेव्हां शेंकडा ५० सेविकाचे जीवनवृत्त असें होतें कीं, 
एक कोणी तरी विधवा देखणी, तिला “क्ष ग्रहस्थ दुर्मार्गास लावितो आणि 
नेतर तिला ' स्कालरशिप ) देऊन मिडवाईफचा कोस शिकविण्याकरितां पाठवितो. 
हेतु एवढाच कीं, ती आणि तिच्या पोषणाचा खचे कायमचा गळ्यांत पडूं नये. 
भोळसर तरुण पाहून त्यास समाजकल्याणाच्या गोष्टी सांगून आपण डाग लावलेली 
विधवा त्याची बायको करून द्यावयाची हा प्रकारहि चाले, या सर्व गोष्टी जरी 
लोकांनां दिसत असत, तरी त्या गोष्टींचे सत्यत्व नाकारले जाई. परंतु सामान्य 
वर्ग त्यातून काय समजून ध्याबयाचे ते समजून घेई, सुधारक पत्रें प्रत्येक सुधा- 
रकाची तळी उचलून धरीत व आक्षेपकांस लबाड ठरवीत, तरी जऱ्याच सुधा- 
रकांस खरोखर समाजसुधारणा पाहिजे होती गांत शंका नाहीं. विचारप्रवाह 
एका दिदोनें नेण्याची खटपट करीत असतां त्यास वेडेवांकडे फाटे, त्या वर्गात 
कांहीं कार्यसाधु माणसें शिर्ल्यामुळें फुटत, व त्यांच्या वागणुकीमुळें विदोष 
तत्वाच्या चालनासाठीं जो वग निर्माण झाला त्यावरहि शिंतोडे उडत माबद्दल 
त्यांस वाईट वाटे, काहीं सुधारकांस असेंहि वाटे कीं, एकाद्यानें पुनर्विवाह 
केला, तर तो मनुष्य आपल्या वर्गात मोडणार, सार्वजनिक सभांमध्ये आपल्या 
मांडीशीं माडी लावून बसणार आणि तो मनुष्य कर्ता सुधारक म्हणून उलट 
आपल्या वर्गातील बरच्या दर्जाचा होणार, तर जो मनुष्य आपल्या वर्गात मोड- 
ण्यासारवा असेल म्हणजे मुनसिफ, सबजज्ज किंवा ई. ए. सी ची असेल त्यानेच 
.काय तो पुनर्विवाह करावा, नाहींतर एखादा पोळपाट-लाटण्या येईल, तो 
आपल्याच धंद्यांतल्या एका बाईबरोबर पुनर्विवाह करील, आणि कर्ता सुधारक 
म्हणून पहिली खुर्ची अडवील, म्हणून एखादा पुनर्विवाह झाला म्हणजे ते 
पुनर्विवाही पुरुषाचा पुनर्विवाह करण्यांत स्वार्थत्याग काय झाला हें मोजू 
लागले आणि पुनर्विवाह करावयाचा तो सोईसाठी किंवा ख््रीप्रेमासाठीं नसून 


१९९ एका रात्रींत विद्ठान 
स्वार्थेत्यागासाठीं करावा, असें प्रतिपादूं लागले. कित्येकांचा असें म्हणण्यांत 
आपणांस चांगला शिकलेला जांबई फुकटांत मिळावा असाहि हेतु असे. खरोखर 
पहातां ह्या स्वार्थत्यागाच्या दृष्टीनें देखील एखाद्या बहवाचार्याचा पुनर्विवाह 
अधिक भरयस्कर ठरला असता, का कीं, एस्त्राद्या इ, ए. सी. नें जर पुनर्विवाह 
केला तर त्याच्या नोकरीवर गदा खास यावयाची नाहीं. परंतु बळवाचा्य उत्तम 
स्वयंपाकी जरी असला तरी त्यानें जर पुनर्विबाह केला तर त्यास कोणीहि 
स्वयंपाकी म्हणून स्वयंपाकघरात प्रवेश करूं देणार नाहीं. हरिभय्या मोघे ह्यास 
एखाद्या ई. ए. सी. पेक्षा आपणास अधिक स्वार्थत्याग करावा लागेल कां कीं, 
त्यामुळें आपला पंडितजीपणा कमी होईल ही गोष्ट अगदीं स्पष्ट दिसत होती. 
पुनर्विवाहामुळें सुधारकपक्षांत जरी मान्यतेची खात्री नव्हती तरी जुन्या वर्गोतून 
किंवा शास्त्रीपंडितास मान देणाऱ्या वर्गातून गचांडी मिळण्याची त्यांनां पूर्ण 
स्वात्री होतीच. ज्या सुधारक वर्गात आता आपणांस जाऊन पडावें लागणार 
त्या वर्गोत मोठ्या मालगुजारणींशशी आपला पुनर्विवाह झाला म्हणून खरोखर 
मत्सरच होणार, व थोरामोठ्याची मुलगी लच्वाने लगट करून भाळवून नेली 
अशी भावना लोकांच्या मनांत असणार, तर या वर्गावर छाप पाडण्यासारखी 
कांहीं तरी विद्या आपणापाशीं पाहिजे, निदान सुशिक्षितेची कांहीं सुधारक 
आढ्यता करूं लागळे म्हणजे त्यांची फजिती करतां आली पाहिजे आणि 
आपल्या सुशिक्षितेमुळे त्यांस उलट दिपवितां आलें पाहिजे, आणि मनांत आणले 
तर तेंहि कठिण नाहीं असें त्यास भासू लागलें व म्हणूनच बंडे जाडे विद्वान 
वेजनाथशास्त्री ह्यांस जाऊन भेटावे ब आपण विद्वान्‌ आहों असें लोकांस 
भासबावें अशी कांहीं युक्ति करतां आली तर पहावी. अशा इच्छेने तो त्यांस 
मेटण्याकरितां गेला होता. 


हरिभय्याच्या जुन्या पद्धतीच्या गौरवाच्या भाषेने आणि गुरुकृपा वगैरे 
शब्द त्यांत आल्याने वेजनाथशास्त्री तर अगदीं खूष होऊन गेळे आणि त्याच्या- 
साठीं आपण कांहींतरी कराबें म्हणून त्यांस वाटूं लागलें. त्यांनीं यासाठीं एक 
कागद घेऊन अनेक पुस्तकांची यादी तयार केली आणि ' हीं पुस्तकें वाचा म्हणजे 


गोंडबनांतौल प्रियंबदा २९०० 


तुम्हीं सुशिक्षित वर्गाबरोबर बरोबरीच्या नात्यानें गप्पा मारूं शकाल ! असें सागितले, 
त्या पुस्तकात बरींच इतिहासाची प्रुस्तके होती. ही यादी घेऊन शास्त्रीबोबा 
म्हणाले, ' सामान्य सुशिक्षित म्हणविणारा वर्ग इंग्रजी जाणतो पण त्यास कोणत्याहि 
विशिष्ट विषयाची माहिती असते असें नाहीं. तुम्हीं जर इम्रजी शिकलां आणि 
रोज नियमाने एक तास वाचूं लागला तर तुम्हांला असें आढळून येईल कीं, 
येथील सुशिक्षित आणि आग्लविद्याविभूषित म्हणबिणारांचे वाचन फारच थोडकें 
आहे. ही मंडळी काळेज सुटलं म्हणजे पुस्तकास रामराम ठोकतात आणि 
कालेजमध्यें अपतांना देखील याचे परीक्षेस लागेल त्या व्यतिरिक्त वाचन फार 
थोडके असतें. तुम्हीं नियमाने वाचन चाळू ठेवा आणि सहा महिन्यांनी मला 
पुनः पत्र लिहा. माझा पत्ता त्या यादीखालीं दिलाच आहे.' असं सांगून 
हरिभय्यास त्यानीं निरोप दिला. 


प्रकरण १८वं 
उमरावतीची काँग्रेस 


उमरावतीच्या १८९७ सालच्या काँग्रेसबरोबर सोशल कान्फरन्स भरणार 
होती आणि त्या परिषदेचे अध्यक्षस्थान रानड्यांसत, महाजनीस, कीं वामनराव 
कोल्हटकरास द्यावयाचे हा प्रश्न होता. वामनराव कोल्हटकर यानां अध्यक्षस्थान 
द्यावें यासाठीं लोकमत अधिक अनुकूल होतें. कां कीं उमरावतीच्या एका 
वकीलास नागपूरच्या सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान चार वर्षोपूवी दिलें गेले 
तर नागपुरच्या मनुष्याचा उमरावतीच्या सामाजिक परिषदेच्या अध्यक्षस्थानावर 
स्वाभाविकपणें नेतिक हक्क होता. त्या वेळेस कांहीं शिष्ट मंडळींनां आपल्या 
ब्रायकोकडून व्याख्यान देववून आपला प्रगमनक्तीलपणा लोकांच्या नजरेस आणा- 
न्नयाचा होता. त्यावेळेस शारदाबाईसारख्या ह्िवांनां पुढें येण्यास क्षेत्र चांगळें 
होतंच, पण त्यावेळेस शारदाबाईपेक्षां अनेक बकीलांच्या बायकांस पर्ढे येण्याची 
होस:अधिक होती. १७.सालच्या डायमंड ज्युबिळीच्या खेळाच्या निमित्ताने 


क 
२७१ उंमरावतोची कांग्रेस 


बऱ्याच ठिकाणचे शिक्षक व शिक्षकिणी नागपुरास जमल्या होत्या, व 
नागपुरास कांही खेळहि झाले. त्या वेळेस नागपुरास छेगाचा प्रादुर्भाव 
फारसा झाला नव्हता. आणि वऱ्हाड तर ऐ्रेंगापासून पूर्णपणें अस्पृष्ट होतें. 
डायमंड ज्युबिलीच्या सुमारास शारदाबाई नागपुरास आल्या होत्या, आणि 
त्या प्रियंवदाञाईकडे पाहुण्या म्हणून उतरल्या होत्या. बिंबाबाईच्या मास्तरीण- 
बाई म्हणून त्या खरोखर घरकुट्र्थाच्याकडे उतरावयाच्या, पण घरकुट्टयांकडील 
अस्सल नागपुरी राहणी, विरोषेंकरून त्यांच्या घरात प्रिय असलेली जवसाच्या 
तेलाची फोडणी शारदाबाईस आवडत नव्हती. शिवाय घरकुट्टयाच्याकडे 
बिंजाबाईसंत्रंधाने आपणांस बरेच प्रश्न विचारण्यांत येतील अशी भीति होती. 
कदाचित शारदाबाईस तिकडे न उतरण्यास तेच कारण अधिक प्रबल 
असावें असे वाटतें. तथापि आमच्याकडे का उतरला नाहीं, म्हणून घर- 
कुट्ट्यानीं प्रश्न केला तर त्यांच्या दुसरीकडे उतरण्याचे समर्थन करण्यास उपयोगी 
पडेल इतपत प्रियंवदेच्या नवऱ्याचे आणि शारदाबाईंचें थोडेसें नातेंहि होतें. 
याशिवाय आणखीहि एक गोष्ट सांगतां येण्याजोगी होती, रामभाऊंचे वडील 
आणि शारदाबाईचे वडील हे दोघेहि काहीं दिवस पुण्यास मेरुशास्त्री गोड बोल्यां- 
पाशीं संस्कुत शिकत असत. ही गोष्टहि त्याच्यामधील दुव्यासारखी होती. 
तथापि ज्या गोष्टीला शारदाबाई भीत होत्या त्या गोष्टीला त्यांनां टाळता आलें 
नाहीं. अनेतराव घरकुट्टे हे त्यानांच भेटण्यासाठी आले. 
: मग ती कारटी पुनर्विवाह लावणार आहे वाटतें १ ? 


£: कोण बिंबाबाई ? मला पक्क ठाऊक नाहीं, तथापि ती पुनविबाह लावील 
अशी माझी कल्पना आहे. ” 

“ तुम्हांस रायपुरास जाऊन रहाण्यास उत्तेजन देण्याचा माझा मुख्य हेतु 
एवढाच होता कीं तुम्हीं तिला त्या मिकारड्या गवय्याच्या नादांतून सोडबार्वे. ? 

“ आपण मला तसें स्पष्ट कांहींच सांगितलें नव्हते, ” 

५ ते सांगायला कशाला पाहिजे ! जीं माणसें आपल्या दर्जाची नाहींत 
त्यांच्याशीं फ़ार स्नेहसंबंध ठेवणें मोठ्या घराण्यांतील स्त्रियांनां योग्य नाहीं 

2० 


गोंडवनातीळ प्रियंवरा ३०२ 


हें तुम्हांला स्वतःला समजलें पाहिजे आणि तुम्ही स्वतः सांगायला 
पाहिजे. ” 

:: मला तुमचा दर्जा ठाऊक नाहीं आणि त्या गायनमास्तरचाहि ठाऊक 
नाहीं. हरिभय्या तुमच्यापेक्षा कुळाने कमी नाहीं, हें मात्र मला ठाऊक आहे. 
त्याच्या पूबजानीं पेशवाईसाठीं देह खर्ची घातळे आहेत. ” 

:: त्यावरून दर्जा ठरत असतो काय ! त्याचं उतपन्न काय आहे? ” 

:: मी कोणाच्या उत्पन्नाची चौकशी केली आहे ? बरें पण हरिभय्याला 
तिकडे पाठविलें कुणी ! ? 

: मीच घेऊन गेलो होतो. ” 

ट्ट मग १ ११ 

“: पण मला असे बाटले नाहीं कीं हा श्रीमंत मुलगी पाहून तिला भुरळ 
घाळीळ आणि लग्न लावण्याची ख्वटपट करील, त्याच्या मनात काय आहे तें 
मला ठाऊक आहे. एवढ्या इस्टेटीचा कारभार जो माझ्या हातीं आहे तो 
हळूंहळूं आपल्य़ा हातात ध्य़ावयाचा आहे, तो कऱ्हाडा लुच्छ्या आहे म्हणून 
मला पुष्कळांनीं सांगितले होते. पण मीच मूर्ख, मी चोराच्याच हातीं किल्या 
दिल्या. / 

: त्याला इस्टेटीचा लोम आहे हँ कशावरून ? ? 

काय तुम्हींच त्या गाढबाचा पक्ष घेऊन माझी फेरतपासणी करायला 
लागलां! ” 

६ मला फेरतपासणी नको आहे. पण तुम्ही ज्याअ्थो आपल्या मुलीच्या 
संजंधानें आणि हरिभय्यासंबंधाने बोलणं काढलें आणि मी आपलें कतेव्य केलें 
नाहीं, मी तुमच्या मुलीला वाईट मार्गाला लाबले, असा ज्या अथी तुम्ही 
माझ्यावर आरोप करतां त्याअर्थी मला अगोदर हरिभय्यानें किवा तुमच्या मुलीनें 
बाईट काय केलें तें समजले पाहिजे. ” 


२०३ उमरगावतीची कगत्रेस 


“ तुम्हांला पुनर्विवाह वाईट वाटावयाचाच नाहीं. तुम्हाला पुनर्विवाह 
करावयाचाच असेल म्हणून तुम्ही पुनविंवाहाची तरफदारी करतां. ” 

शारदाबाईनां थोडेसें आपणांस कोणी पकडल्यासारखे वाटलें. त्यांनां 
क्षणभर चमकल्यासारख होऊन त्या म्हणाल्या, 


:< मी कषिक्षकाचें काम करण्यास गेले कीं, तुमच्यातर्फे तिच्या पुनर्विबाह- 
निषेधासाठीं गेळे ? त्या कार्यासाठी मी जावें अशी आपण स्पष्ट इच्छा कोठें 
कळविली होती ! तुम्ही मजकडे आतां आलांत ते माझी कानउघडणी करण्या- 
साठीं आला काय ? आपला हाच हेतु असेल तर मी तुम्हास रजा देते; 
नमस्कार, ” 


सकाळी अनंतराव येऊन गेले, व संध्याकाळीं बंडुनाना शारदाबाईंस 
भेटण्यास आले, बंडुनानांची वृत्ति यासंबंधाने अगदी निराळी होती. 
अनंतरावाचा स्वरा आक्षेप कोणत्या गोष्टीबद्दल होता, त्यांस काय हवें होतें 
यासंबंधाने पूणे खुलासा बंडुनानानीं अधिक स्पष्ट शब्दांनी केला आणि आपली 
सहानुभूति बापाच्या हेतूशी नसुन बहिणीच्या वतेनाशीं आहे, आणि जेव्हां 
पुन्हा तिची भेट होईल तेव्हा तसें तिला सरळपणें सागा असें त्यानें सांगितले, 
त्यानें आपल्या बापाच्या पुनविवाहनिषेधाची मीमांसा केली ती येणेंप्रमाणें ! 


“ बाबाना पुनर्विवाह ही गोष्ट धर्मशास्त्रविरुद्ध आहे म्हणून नको आहे 
अशातला भाग मुळींच नाहीं. पुनविबाह झाला म्हणजे बिंबा ही बाबांच्या 
तंत्राने न वागतां हरिभय्याच्या तंत्राने बागू लागेल म्हणून नको आहे. आमचे 
बाबरा नागपुरातील एका विद्वान वकीलाचे अनुयायी आहेत. तो वकील अगदी 
वृद्ध आहे, तथापि त्याच्या हाती चार पाच विधवांच्या इस्टेटी आहेत. त्या 
वकीलास त्या विधवानीं नीटपणानें वागावें असें मुळींच वाटत नाहीं. तरुण 
विधवा त्या उनाडकी करणारच, तयानां जर सच्छीलाचा उपदेश केला तरत्या 
आपल्या तंत्राने मुळींच वागणार नाहींत त्यांस जे हवे आहे तेंच आपण सुलभ 
करून दिलें, तरच आपल्या तंत्राने रहातील, यासाठीं त्यांनां देखणे असे 


गोडवनांतील प्रियंवदा २०४ 
कारकून हे वकील पाहून देतात. त्यांचें धोरण असें असते कीं, लम झालेला 
कारकून पाहून द्यावा, तो देखणा असावा, त्याला काहीं दिवस विधवेसह 
इस्टेटीच्या गांवीं पाठवावे, कांहीं दिवस नागपुरास ठेवावे, पुनर्विबाहाची कल्पना 
त्या विधवांच्या आणि कारकुनाच्या मनांत शिरतां कामा नये, दुसरे कांडी 
घोटाळे झाले तरी हरकत नाहीं. बाबा त्यांचेच चेले, पण बाबानीं चूक केली 
ती ही कीं, हरिभय्या लग्न झालेला नव्हता, हरिभय्या लम झालेला असून यानें 
दुसरे कांहीं घोटाळे केळे असते तर बाबाची हरकत त्रिलकुल नव्हती. जे घोंटाळे 
होतील ते सर्व ' निंदक लोकांच्या खोट्या अफबा ' असें म्हणावें म्हणजे झाले अशी 
एकंदर आमच्या बाबाची वृत्ति आहे. अर्थात या सवे गोष्टी होण्यापेक्षा माझ्या 
मतार्ने पुनर्विवाह झालेला बरा असेंच आहे. ” 


अनंतराव घरकुट्टे पुढें कायदा पहात बसले. त्यानां कायद्यांत पहावयाचे 
होते हॅ कीं, पुनर्विवाह झाल्यामुळे विधवा आपल्या मुलाची पालक होण्यास 
नालायक ठरते किंवा ठरत नाहीं असा पूर्वीचा निकाल नसल्यास कोणती विचार- 
पद्धति तिला नाळायक ठरविण्यास, आणि आपणांस स्वतःला लायक ठरविण्यास 
उपयोगी पडेल, त्यानीं आपल्या एका वकील मित्राच्या साहाय्यानें ' रीझनिंगची 
पद्धति ठरविली आणि पुनर्विवाह झाल्यास कोर्टास अजे कसा द्यावयाचा याचाहि 
विचार करून ठेवला, ती ' रीझनिंगची ' पद्धति येणेंप्रमाणें होती :-- 


जो अ्जे कराबयाचा त्याचा हेतु विधवेच्या हातून अधिकार काढून तो 
तिच्या बापाच्या हातीं द्यावा अशी मागणी करण्यासाठीं अज करावयाचा. या 
प्रकारच्या अर्जास हरिह्रराव तांबडे यांच्या कांहीं आप्तांची संमति मिळेल अज्ञी 
घरकुट््यास खात्री होती. कां कीं, बिंजराबाई आपल्या नबऱ्याच्या आस्तांस 
आश्रितातारखे वागवी म्हणून ओरड अनंतरावाच्या कानीं आलींच होती. त्या 
आस्तांस हरिभय्याचा उत्क्षे तर विदोष दुःसह होईल, आणि याचसाठो 
इस्टेटींचा कारभार मुलीच्या हातचा काढून बापाच्या हातीं द्यावयाच्या योजनेस ते 
पाठिंबा देतीस यांत शका नाहीं. हरिभय्या हरिहरराबांची इस्टेट चाळवावयास 
धमेदृष्ट्या तसेच व्यवहारदृष्टया अत्यंत नालायक मनुप्य आहे. हरिहरराव 


२०५ उमराधतीची काँग्रेस 


स्वर्गोतून हरिभय्याविषर्यी काय बरें म्हणत असतील ! याप्रमाणें धार्मिक बुद्धि 
देखील हरिभय्याच्या इस्टेटीच्या व्यवस्थापकपणाविरुद्ध मांडता येण्याजोगी आहे, 
याशिवाय हरिभय्याचं हित हरिहररावांचा मुलगा मेला असतां वृद्धिंगत होणार 
आहे व यासाठीं हरिभय्याची वृत्ति इस्टेटीचा जो वारस त्याचे प्राण घेण्याकडेच 
होणार, मुलगा मरून मुलाची आई वारस झाल्यास ही सवे इस्टेट तांबड्यांच्या 
घराण्यांतून जाऊन मोध्याच्या घराण्यांत जाणार म्हणजे देशस्थाच्या घराण्यांतून 
जाऊन कऱ्हाड्याच्या घराण्यात जाणार, तर यासाठीं हरिहररावाच्या वारसाला 
ह्रिभय्याच्या तावडीतून सोडविणे आणि आपल्याचें रक्षण करणें आणि 
जावयाच्या वंशाची नीट काळजी घेणें हें आपलें कतेव्य आहे असें देगखील 
अनंतरावांस वाटूं लागले, 

आपण मुलीच्या हातांतून नातवास काहून घेतलें आणि इस्टेटीर्चे व्यव- 
स्थापकत्व आपणच घेतलें म्हणजे मग हरिभय्याला उपजीविकेचें साधन तें काय 
राहील? मग पुनर्विबाह केल्यानें त्याची हरदाशीहि चालणार नाहीं, आणि 
मग तो आपणांस इस्टेटींतून दरमहा बायकोसाठीं काहीं तरी मिळावें म्हणून 
आपल्याकडे येईल आणि त्याला आपण कसें चापून बोलूं इत्यादि गोष्टी त्यांच्या 
मनांत येऊन मधून मधून त्यांस शेखमहंमदी गुदगुल्या होत, 

अनंतरावानीं मी पढें काय करणार आहे यासंजंधानें मुलीस स्पष्ट कळवून 
पुनर्विवाह बंद पाडण्याचा प्रयत्न केला; तथापि मुलीनें पुनर्विवाह करायचा तो 
केलाच. 

उमरावतीच्या काग्नरेसच्या वेळेस उमेशचंद्र बानजींचं व्याख्यान संपल्या- 
नंतर न्या. रानडे झुञाच्या दाराशीं गाडींत बसावयास आले तेव्हां एका वृद्ध 
ग्रहस्थानें “ तुम्ही पुनर्विवाहाची चळवळ सुरू करून अलीकडच्या बायकांना 
अगदीं बिघडवून टाकलें आहे ” म्हणून मोठ्या संतापयुक्त शाब्दांनीं न्यायमूर्ती 
रानड्यांची संभावना केली ती गोष्ट पुष्कळांस आठवत असेलच. ते ग्रहस्थ 
दुसरी तिसरी व्यक्ति नसून आपले परिचित ग्रहस्थ अनंतराव घरकुट्रे, स्टियडे 
ई. ए. सी. हेच होत. 


गॉडबनांतील प्रियंवदा २०८ 


नड मचड डकल बण लशटीणापिशि?0?0?0?0णण000 "पन: -----.--->  --- 


प्रकरण १९ 
र हु ९ 

प्रोषित भतका. 

डायमंड ज्युबिलीच्या दिवशीं प्रियंवदेकडे शारदाबाई ही पाहुणी म्हणून 
उतरली होती. त्यावेळेस प्रियेवदेस बोलावयास एक सुशिक्षित बाई मिळाली 
म्हणून मोठा आनंद झाला होता. प्रियंवदेला आपले आयुष्य थोडेबहुत 
कंटाळवाणें झालें होतें ; प्रियजनविरहामळें जें कांहीं मनास वाटत असे तें 
वाटतच होतें, पण तें मोकळेपणें बोलावें तरी कोणापाशी ! सासूपाशीं प्रियंवदा 
जरी बऱ्याच मोकळ्या मनाने वागे आणि तें वागणें इतर सास्वासुनाचा संबंध 
पाहिला म्हणजे अत्यंत सलोख्याचे आणि सलगीचे दिसे, तरी त्या बोलण्यांत 
वयाच्या अंतरामुळे संयम होताच ; सासूबाईशी मैत्रिणीचें नातें उत्पन्न होण्याचा 
संभव नव्हता. सासूबाई वडील, त्यांच्यापाशी बोलावयाचे तें त्याचा मान 
राखून बोलावयाचे, आणि आपल्या मनोभावना फार व्यक्त होऊं द्यावयाच्या 
नाहींत, वगैरे भावना जाण्यासारख्या नव्हत्या. आपल्या नवऱ्याची पत्रे घाचून 
दाखविण्यास, नवरा किती चांगला आहे, तो दुसऱ्या ब्रायकांच्या नवऱ्यासारखा 
मुळींच नाहीं इत्यादि गोष्टी बोलण्यास प्रियंवदेत कोणी मैत्रीण नव्हती. बडडी- 
वरील मोदी आळींतील साठ्यांची थोरली सून थोडी शिकलेली होती, पण 
शिकलेली म्हणजे किती, तर इंग्रजी दोन पुस्तके. त्या वेळची स्त्रीशिक्षणाची 
कल्पना इतकी अल्प होती कीं, वऱ्हाड हें सुधारणेचे व स्त्रीशिक्षणाच ग्रह 
समजले जाई, आणि त्या बऱ्हाडांत अल्प शिक्षित मलींच्या बडेजाबाच्या मौजा 
दिसत. एका वकीलांची मुलगी जेमतेम थोडेसें लिहितावाचतां येणारी, पण 
तिला जें शिक्षण मिळालें त्याबद्दल तिच्या बापाची स्वृति सुधारक पत्रांत भरलेली 
असे. त्या मुलीने काय केलें तर एक जुनें मोरोपंताचें काव्य प्रसिद्ध केले. 
काव्य केलें मोरोपंताने, त्यावर टीपा लिहिल्या नबऱ्यानें, पुस्तक छापाबयास 
पैसे दिलें बापाने आणि छापले मुंबईच्या एका प्रसिद्ध छापखानदारानें, मात्र तें 
प्रसिद्ध केलें मुलीने ! इतकी ती मुलगी सुक्चिक्षित होती, पण तेवढ्याबद्दलच 


२०७ प्रोषितभतुका 


पुण्याच्या सुधारक पत्रांनी तिजवर स्तुतीचा वर्षांव करावा असें ते मोजेचे 
दिवस होते. 


त्या दिवसात व पुढें अनेक वर्षेषयेत शिककेल्या बायकांसंबंधानें लोकांस 
फारच कोतुक वाटे. एवढेंच नव्हे तर आपल्या बायका शिकलेल्या आहेत असें 
खोटें भासविण्याची लोकात हौस होती. बायका'चें व्याख्यान म्हणजे पुष्कळ गर्दी 
होई, त्या व्याख्यानात बहुधा काहीं नसावयाचें पण तें व्याख्यान एका बायकोने 
दिलें हेंच त्यात विशेष असाबयाचें व हीं व्याख्याने बहुधा स्त्रीरिक्षणावर 
असावयाची. या तऱ्हेचे व्याख्यान देवविण्यासाठी स्वतःस सुधारक समजणाऱ्या 
आणि आपलें घरहि सुधारळें आहे, असें दाखवू इच्छिणाऱ्या लोकाना आपली 
बायको सुरिक्षित आहे, असें दाखविण्यासाठी मोठी खटपट करावी लागे. 
एकदां एक ग्रहस्थ एका परिषदेचे अध्यक्ष झाले. त्या परिषदेच्या आठवड्यात 
त्याच गावीं महिला परिषदहि भरली होती; तेव्हा त्या परिषदेच्या अध्यक्षाच्या 
जागीं त्या पुरूष परिषदेच्या अध्यक्षाच्या बायकोनें अध्यक्ष व्हावें हें अस्वाभाविक 
नव्हतें. दहिबाय ती परिषद महाराष्ट्राबाहेर असल्यामुळें आणि या ग्रह॒स्थाच्या 
कुटुंबाच्या सुशिक्षिततेच्या मर्यादा लोकास ठाऊक नव्हत्या यामुळे त्या ग्रहस्थाच्या 
पत्नीस आव्हान करण्यात आलें. तिला इंग्रजी येत नव्हतें, व मराठी वाचताहि 
बेताबातार्चेच येत होतें. पण तिच्यासाठी एक इंग्रजींत व्याख्यान तयार 
करण्यांत आलें आणि परिषदेच्या दिवशीं त्या बाईसाहेबाचा घसा बसला असल्या- 
कारणार्ने तें व्याख्यान एका जंगाली स्त्रीकडून बाचविण्यात आलें. तें व्याख्यान 
नवऱ्याने तयार केले होतें हा आरोप सर्वस्वी खोटा आहे. नवस ज्या एका 
देशसेबक ससाजास वगणी भरीत होता, त्या समाजांतल्या एका देशसेवकास 
हे. भाषण तयार करण्यास सागितले होतें. तें व्याख्यान झाल्यानंतर 
: अमूक बाईंची मतें ' म्हणून त्या व्याख्यानाची इंग्रजी पत्रात चर्चा होऊं 
लागली ! ! अशा प्रकारची ठकवाठकवी इतकी सर्वसामान्य आणि राजरोस 
झाली होतीं कीं, एखाद्या स्त्रीचे व्याख्यान तिनें स्थत. छिडून आणून वाचले तर 
तिला खोटें बोलणारी समजत. 


गोडवनांतील प्रियंवदा २०८ 


--:>>->-:-----५ पापा" पप? पा प 


या प्रकारच्या लबाड मसलतींत वतेमानपत्रें व मासिकेंहि असत. स्त्रियां- 
कडून एखादा लेख मागवावयाचा व तो लेख आल्यावर त्यांतले वरचे नांव 
आणि एरग्वाद दुसरी ओळ ठेवून सर्व मजकूर अजिब्रात बदलाबयाला, आणि 
आमच्या मासिकास सुशिक्षित कुलस्त्रियाची मदत आहे, स्त्रीलेखिका आमच्या- 
कडे फार आहेत अता पोकळ बोभाटा बरींच वर्तमानपत्रे व मासिकें करीत 
असत, त्याचा परिणामहि एक तऱ्हेनं डलळट झाला होता, ज्या लोकांना 
आपले लेख स्वतःच्या नांवावर मासिकाकडे आणि वतेमानपत्राकडे गेळे तर 
छापले जाणार नाहींत असे वाटे अशी मंडळी आपले लेख आपल्या बायकोच्या 
नावाने पाठवीत. या तऱ्हेच्या गोष्टी करण्यात त्या वेळच्या समाजाचे हेतु 
स्त्रियाचा गौरव करावा या प्रकारचे होते काय ? मुळींच नाहीं; तर आपल्या 
घरात शिकलेली आहे म्हणून ज्याप्रमाणें डोळी नत्रऱ्यास सपादणी करावीशी 
वाटे, त्याचप्रमाणें डोळी संपादकास आमच्या वाचकमंडळात ब लेखकांत बराच 
गोडस वर्ग आह असे दाखवावेसें वाटे. शेक्सपिअर म्हणे ' फ्रेळटी दाय नेम 
हज वूमन ' पण आम्ही तर असें म्हणतो कीं ' व्हेनिटी दाय नेम इज मॅन .! 
* व्हूनिटी? च ती; कारण ते ' बायकाचे लेख ? छापून गिऱ्हाइकें बाढत होती 
अशातला भाग नेहमी नसे. कांहीं सुधारकपत्रे असलीं ढोंगे चालविता चाल- 
विताच कजेबाजारी होऊन मरून गेलीं. 


अशा प्रकारच्या दिवसात आमच्या प्रियवदेस मेत्रिणींचा अभाव वाटत 
असे आणि आपण अधिक शिकल्याने थोड्याबहुत स्त्रीवर्गाच्या बाहेर पडलों 
असें वाटे यांत नवल तें काय १ पुष्कळदा याच्यामुळे आपल्या नवऱ्याविषयी 
गोष्टी मोकळेपणाने जोलावयाच्या झाल्या म्हणजे प्रियंवदा स्त्रियांपाशीं न बोलता 
आपल्या दिनकर भाबोजीपाक्षीं बोले, 


दिनकर भावोजी आणि प्रियंवदाबाई यांचे संजरंध अत्यंत स्नेहभावाचे 
होते, आणि विवाहोत्तर काहीं दिवसपर्यंत तिच्या लाडक्या रामभाऊबरोबर तिचें 
वर्तन ल्ज्जाभयमिश्रित होतें. दोघांची ओळख होती पण दोघांचे जें लग 
झालें तें दोघाच्या वडलाच्या इच्छेने. या दोघांचा विवाह झाला तो प्रौढविवाह 


२०९ प्रोषितभतेका 


होता, प्रीतिविवाह नव्हता, दोघांमध्ये अनुनय, प्रेमाची भाषा हीं होऊन 
लग्न ठरल नव्हर्ते. प्रियंबदेस लय्न व्हावें असें वाटत होतें. पाहिलेला वर 
तिन डोळ्यांनी पाहिला होता, तो पसंत पडला होता. त्याच्याविषयी विचार 
सुरूं झालें होते, हुंड्याच्या बोलण्यामुळे लम़ बिघडते काय अशी भीति वाटू 
लागली होती, आणि ती सर्व प्रकारचे सद्गुण रामभाऊच्या ठिकाणी कल्पूं 
लागली होती. आणि रामभाऊरचे स्मित हें फार मोठ्या किमतीचे आहे असें 
तिल वाढूं लागलें होते. तथापि विवाहपूर्व संघटण नव्हते. एकमेकांच्या अंतः 
करणाची एकमेकांस ओळख नव्हती, एबढेंच नव्हे तर विवाहापूर्वी आपल्या 
मनांत एखाद्या तरुणाविषयी प्रेम उत्पन्न होणें ही गोष्ट पाप तर नसेल ना? 
आपले लम्न जर रामभाऊशीं लागलें नाहीं ब दुसऱ्या कोणाबरोबर लागलें तर 
आपण रामभाऊंवर जं प्रेम करतों तें परपुरुषावर तर होणार नाहीं ना? आपलें 
मनच कसें विचित्र आहे ! पुस्तकांत वणन केलेल्या बायकांप्रमाणें ते॑ नाहीं. 
पुराणांतल्या साध्वीनें, तिच्या लम झालल्या पतीखेरी ज दुसरा पुरुष मनात देखील 
चिंतिला नसतो, आणि माझें जर रामचंद्राबरोबर लम्न झालें नाहीं. आणि 
दुसऱ्याच कोणाबरोबर झालें तर त्या मनुष्याखेरीज आपण दुसऱ्या कोणासहि 
मनानें चिंतिठें नाहीं असें पुराणांतल्या बायकांप्रमाणें मला म्हणतां येईल काय ! 
अशा तऱ्हेच्या भावना तिच्या मनांत जाणत होत होत्य! तिला विबाहसंस्थेचं 
मोठें बोंडे पडावयास लागलें होतें. दोन्ही पक्षांच्या आईबापांचा देण्याघेण्याचा 
आंकडा जुळला म्हणजेच प्रेम करावयास मोकळीक आहे काय! नाहीं तर 
नाहीं काय १? विशिष्ट प्रेमाचे पवित्रत्व किंबा अपवित्रत्व आईबापांच्या 
आंकडेनुसार अवलंबून ठेवाबयाचें काय ! प्रेमोदधीला भरते छत्तीस गुणांचे 
किंबा पैशाचे आंकडे जुळतील तेव्हांच नेमके कसें येईल ? इत्यादि कल्पना 
तिच्या मनांत येऊन प्रेमविकार मनाला हेलकावे देत होता, प्रेमविषयक कर्तेव्या- 
विषयीं अनेक संशय मनाला येत होतेः विवाहाची घटना आणि स्थिति हीं 
प्रेमावर अवलंबून ठेवाबीं हें योग्य आहे कीं प्रेमाच्या प्रवाहाची दिशा विवाहावर 
अवलंबून ठेवावी यांत आपलें कतेव्य तरी काय आहे याविषयीं तिला अनेक प्रश्न 
27 


गोडवनांतील प्रियंवदा २१० 


कक पाण "पणा एपा८५॥पयणापपापा पीत (कॉ२र”0”0)ी”? 0? ---->>----४ाााा-ल 


उत्पन्न होत प्रेमविकारांच्या बाबतींत सछागार तरी त्या दिवसांत तिला कोण 
मिळणार ! मनांत ज्या ग्रेममावना उत्पन्न होत त्यांस व्यक्त करण्याचीच चोरी 
होती एवढेंच नाहो, तर त्या तशा उत्पन्न झाल्या हें रख्तः आपल्यापाशींच कबूल 
करण्याची चोरी होती. 


प्रियेबदाभाई लम होऊन सासरीं आल्या तरी त्यांची ब नवऱ्याची ओळख 
एकदम झाली नाहीं. दहा पंधरा दिवस त्या दोघांनां दूर ठेवण्यांत आलें होतें, 
ब त्यांची एकमेकाविषयीं उत्कंठा बाढविण्यांत आली होती. नबऱ्याशीं 
बोलावयाची चोरीच कांहीं दिवस होती. आणि दोघांची शास्त्रोक्त ओळख 
झाल्यानंतर देखील कांहीं दिवस दोघांनीं उघडपणे एकमेकांबरोबर गप्पा मारीत 
बसावें हें बरे दिसत नसल्यामुळें बंदच होते. नवराबायकोर्च एकमेकांशीं वर्तन 
कसें असार्वे यासंजंधार्ने नेहमी परिचित जो रिवाज होता त्यापासून निराळा 
आयुष्यक्रम कांहीं महिने तरी दोघास आचरता आला नाहीं. प्रौढ विवाह 
झाला तरी नवराबायकोनीं एकमेकाशीं कसें वागार्वे याच्या मर्यादा कोठें नाहीशा 
झाल्या ? रामभाऊंच्या वडिलाच्या मनांत दोघांनां उघडपणे एकत्र बसण्याचे, 
गप्पा मारण्याचे, दिवसा ढवळ्या सुनेने नवऱ्याच्या खोलींत जाण्याचे स्वातंत्र्य 
देण्याची इच्छा होती पण त्स एकाएकीं करतां आले नाहीं. आसपासच्या 
बायकांच्या ' योग्य रिवाज काय ' म्हणून ज्या कल्पना होत्या त्यांचं दडपण 
प्रियेवदेच्याच मनांबवरून एकाएकीं निथाळें नव्हते तथापि प्रियंवदेचीं जी 
: घीटपणा ' ची वागणूक पुढें दिसून येऊं लागली ती बरीच लबकर पण 
क्रमाक्रमार्नेंच दिसून येऊं लागली, 


रामभाऊंचा आणि म्रियंबदेच्या शिक्षणात परिक्षामोजच्या दृष्टीनं जरी 
फारसा फरक नव्हता तरी दोघाच्या विचारक्षेत्रांत पुष्कळच फरक होता. राम- 
भाऊ लहानपणीं पुष्कळ ठनाडकी केळेला, लाठी आणि कुस्त्या यांत प्रावीण्य 
मिळबिलिला असा होता, त्याच्या अंगीं पुष्कळ गुण आडदांडपणाचे होते. 
आखाड्यांत बरीच ब्राह्मणांची मंडळीहि होती. त्यांत एक जुन्या प्रसिदध 
शास्त््याचा मुलगा होता. त्यास रामभाऊनं शारीरसंपत्ति वाढविण्यासाठी 


रर प्रोषितभर्तक्रा 


हि खगबब॒ज्न्लआजाजवाबायु॒॒ुज॒ड॒जाअखबबब् डावया कफ अंलऑऑशशम॒षया -स््न्ल 


मांसाहार करणें अवश्य आहे हें तत्त्व इतकें पटवून दिले कीं, मुलगा पुढे घरीं 
चोरून मांस शिजवीत असे. या मुलासंबंधाने एक मोजेची कथा प्रचलित 
आहे, एके दिवशीं मुलानें बाप रात्रो निजावयाला गेल्यानंतर आपल्या 
धघापाच्या ' गाहैपत्या ' वरच मटनचं भांडे रता तयार करण्यासाठीं, उद्यां बाप 
उठण्याच्या भगोदर ते काहून घेऊं या अपेक्षेने शिजवावयास ठेवलें. पण बाप 
मुलाच्या अगोदरच उठला, आणि आपल्या होमशाळेंतील कुंडावर काय आहे 
तें पाहूं लागला; आणि भांड्यांत काय आहे हे त्याला समजल्यानंतर बापाने 
सक्षोर प्रायश्चित्त घेतलें. या शास्त्रीबोबांचे चिरंजीव पुढें स्वतःहि व्याकरण, 
ज्योतिष, वेदांत इत्यादि विषयांत चांगले शास्त्रीबोबा झाले आणि त्यानीं कुस्तीवर 
पुस्तर्के लिहिली आणि रामभाऊसंबंधार्ने त्यानीं कायशी ' महलेषु मछो$भवत्‌ *, 
“ वीरेषु वीराकृतिः ' इत्यादि शब्द असलेली कविता केली होती. हिंदु- 
मुसुलमानांचा देगा झाला तर आपल्याला आपली लाठी चांगली मोकळेपणाने फिर- 
वितां येईल अशी आशा हायस्कूलांत असलेल्या रामभाऊस व त्याच्या आखाडे 
मित्रांस वाटत होतीं. दंगा सुरूं झाला म्हणजे पोलीस तेथून कसे नाहींसे होतात, 
आणि थांबल्यानंतर पकडापकडी करावयास कसें येतात याचे रामभाऊ रसभरित 
वणन करी, रामभाऊ या सव निरनिराळ्या समाजांगांची माहिती असलेला 
होता, आणि प्रियेबदा बऱ्याच अंशीं पडद्यांत असलेली म्हणजे जिचे परिचयक्षेत्र, 
अवलोकनक्षेत्र अणि वाचनक्षेत्र यावर करडी नजर ठेऊन परीक्षांचे शिक्षण 
तिच्या आहेबापांनीं मॅट्रिकपर्यंत करविले, अशी होती. या दोघांची बरोबरी 
कशी असेल ! प्रियंवदेस रामभाऊ जरी रूपानें आवडला तरी तो *' गोंडस- 
पणाचा ठेवा - आणि कुसकरून खावा, ” एवढ्याच भावनेने आवडला होता. 
आपलें शिक्षण मडमेच्या हाताखालीं झालें असल्यामुळे आपण रामभाऊंपेक्षां 
अधिक चांगलें इंग्रजी बोलतो असाहि तिला थोडा गवे वाटे, पण तिची 
आपल्या उच्चत्वाची भावना पुढें कमी झाली. 


प्रियंवदेची आपल्या नवऱ्याशी जसजशी अधिकाधिक ओळख होऊ 
लागली तेव्हां आपला नवरा आपल्यापेक्षा निराळ्या अनुभवाने युक्त आहे आणि 


गोंडवनांतील प्रियंवदा २१२ 
आपलें दिक्षण जरी त्याच्याशीं कांहीं पुस्तकांवर पुस्तकी वादविवादास पुरेसे 
असलें तरी घराबाहेरच्या जगाशीं नवऱ्याची अधिक ओळख आहे, आणि आपली 
नाहीं; आपण केवळ स्त्री म्हणून बांधल्या गेलेल्या गाईसारख्या आहोंत असें 
तिला भासून आले, आणि आपलें लग्न झाले हे बरें झालें; नवऱ्यामा्फत तरी 
आपणांस बाहेरच्या जगाची ओळख होत आहे एवढेंच नव्हे तर आपल्यास 
बाहेरच्या जगाची ओळख होण्याचे द्वार तेच आहे असें तिला भासले, वाईट 
गोष्टी मुलींच्या कानीं जाऊं नयेत या भावनेनें ज्या कांहीं गोष्टी प्रियंवदेला आई- 
बापांनीं अगदीं कळूं दिल्या नाहींत, त्या पुढें तिच्या रामचंद्रामाफेत कळूं लागल्या 
आणि ल्ग्नापूर्वी जी मंडळी मोठी सभ्य म्हणून वाटत होती त्याच्या अनेक लीला 
तिच्या कामीं आल्यामुळें खऱ्या खुऱ्या जगाविषयी आपणांप्त बापाने मुद्दाम अज्ञा- 
नांत ठेवलें होतें पण, आपला नवरा आपणांस खरें जग कसें आहे याची कल्पना 
देतो हें कळलें; आणि जगाच्या दोन वाईट गोष्टी आपणांस कळल्या तर तेवळ्यानें 
आपण वाईट मार्गाने जाणार नाहीं इतका आपल्या नवऱ्याचा आपल्यावर विश्वास 
आहे याबद्दल तिळा आनंद झाला. बाहेरच्या जगाची वस्तुस्थिति आणि तीवर 
मतें याचे ज्ञान तिला नवऱ्यामा्फतच झाल्यामुळें ती बहुतांशी केवळ नवऱ्याच्याच 
मतांचा पुनरुच्चार नकळतच करू लागली, तिच्या आवडीहि नवऱ्यासारख्याच 
होऊं लागल्या आणि नवऱ्याविषयीं तिळा फार अभिमान वाटूं लागला. ब 
नवऱ्याच्या विद्याविषयक हुषारीपेक्षां नवऱ्याची गांवातठी चळवळी व्यक्ति या 
नात्याने जी कामगिरी होई तिनेंच तिला आनंद होई. शाळेतले विद्यार्थी 
मास्तर वर्गाजाहेर गेला म्हणजे दंगा कसा करीत याविषयींच्या गोष्टी ऐकग्यांत 
तिला आनंद वाटे आणि असा दंगा मुली करीत नाहींत याबद्दल तिला खेद 
वाटे, आणि मुलीनां असा दंगा कोणी करूं देणार नाहीं या प्रकारची जाणीव 
असल्यामुळें मुलींच्या आयुष्यक्रपाबद्दल तिला फार राग येई. आपण नवऱ्या- 
बरोबर हिंडावें एवढेंच नव्हे तर भाजी, दम्या बांधून घेऊन दूर दूर वीस- 
पंचवीस मैल फिरायला जावें असें वाटे. प्रुषांस ज्या गोष्टी करतां येतात त्या 
गोष्टी तर आपणास करतां येणार नाटींतच, पण स्त्री या नात्याने ज्या गोष्टी 
करण्याचा आपला हक आहे त्या गोष्टी देखील आपणांस कुलीनत्वाच्या खोट्या 


५१४ प्रोषितमतेका 


कल्पनांमुळे करतां येणार नाहींत. एकदा तीं दोघें अशी दूर फिरायळा जाऊन 
चांदण्यांत परत येत असतां तिनें कांहीं संवाद ऐकला. 


“ हा ब्राह्मण मुलगा कोण पोरीला घेऊन फिरायला आला आहे ? ” 
£ ही नाशिककरीण असावी. ” 


“ काय, अलीकडे इतकी लहान मुळे अंगवस्त्र ठेवायला लागलीं ! पण 
ती नारिककरीण कशावरून ?” 


:£ आप्त बाई इतकी फिरायला कशी येईल! ” 
& ब्रायको नाहीं कशावरून? '' 


“६ बायको कशी असेल ! ती पहा कशी त्याच्या खांद्याला खांदा लावून 
चालली आहे ! लग्नाची बायको इतकी निलञ्ज थोडीच बनणार आहे ! ” 


वरील संवाद ऐकून प्रियेवदा नवऱ्यास म्हणाली, “ स्त्रीने पुरुषाची 
सहचरी होणें आणि त्याला आपण मोहक होऊं असें बनणें हा पत्नीचा, हक 
आहे कीं वेव्येचा हक्क आहे? ” 


८ अर्थात पत्नीचा आहे, पण पत्नीस तो हक्क बजावण्याचे कारण नाहीं 
असें लोकांनां वाटते. नवरा लग्नाने बायकोच्या हातात अडकून पडलाच 
आहे -- जाईल कोणीकडे तो ! बायकोने अर्थात नट्टापट्टा करून त्यावर आपला 
मोहनास्त्राचा प्रयोग करण्याची आवदयकता नाहीं - आणि एखादी बाई जर नव- 
ऱ्याला असा ताब्यांत ठेवण्याचा प्रयत्न करील तर नवरा बायकोच्या तंत्राने 
वागेल, मग तो आईच्या तंत्राने कसा वागेल ? यासाठीं समाजांत ' मातृभक्ति ? 
रहाण्यासाठी स्रीनें नवऱ्याला फार प्रिब होण्याचा प्रयत्न केला तर त्यालाहि 
आळा घातला पाहिजे, असें बर्‍याच प्रौढ स्त्रियांचे मत आहे. कांहीं मोठमोठ्या 
मालगुजार व देदामूख घराण्यांत आईनें मुलाला त्याची व सुनेची ओळख 
होण्यासाठीं अंगवस्र पाहून दिलेलें आहे. म्हणजे आपला मुलगा सुनेच्या 
तावडींत मुळींच नायला नको. ” 


शोंडवनांतील प्रियंवदा ११४ 
:< स्त्रियांचे नवऱ्यावर प्रेम वाहूं नये' याला बायकाच आडव्या जातात असें 
दाखवून पुरुषांचा दोष कोठें नसतोच असें दाखवितां काय ? ” 


“ पुरुषांचा दोष नसतो कोणी म्हटलें £ या परिस्थितीच्या कारणासाठीं 
एक सांगितलें, पुष्कळ पुरुषांनांहि गबाळी बायको आवडते, त्यांना वाटतें गबाळी 
बायको म्हणजे भोळी. तिच्यात रंगेलपणा नसणार, खुशीने अगर नाखुशीनें 
अधिक पवित्राचरण ठेवील अशी हि लोकांची समजूत आहे. आणि या प्रकारच्या 
परिस्थितीमुळे केवळ बायकांवरच अनिष्ट परिणाम होतो, पुरुषांवर होत नाहीं 
असें कोठें आहे ! उदाहरणार्थ एखाद्या पुरुषानें किंवा तरुण मुलाने स्त्रीकडे 
केवळ पाहिले म्हणजे जणू काय मोठा दोष झाला अशी वृत्ति पुष्कळ लोक 
दाखवितात. आणि पोषाखी मनुष्य अनीतिमान असणार अशी कल्पना करतात, 
ऐटदार फेट्यालाहि ' रंडीबाज ' फेटा म्हणण्याची पद्धत आहे. ” 

५ ह्ररियावर पातित्रत्याच्या कल्पनांचा अतिरेक करून त्या लादाव्या ही गोष्ट 
घातुक नाहीं काय ? नवरा दुष्ट असला, तरी त्यास देवाप्रमाणें मानलें पाहिजे 
असले उपदेश समाजांत ढोंगीपणा शिकवावयास कारण होत नाहींत काय! नवरा 
कसलाहि असला तरी त्यास देवाप्रमाणें मानलें पाहिजे हें तत्त्व कशासाठी १ ” 


“ य़ा प्रकारच्या तत्त्वाचा उपदेश मला फार योग्य वाटतो. उदाहरणाथ 
मला जर कांहीं रेल्वेतील अपघात होऊन मी कुरूप झालों तर माझी प्रियंबद्दा 
माझ्या हातांतून जावयास नको, यासाठी नवरा कसलाहि असला तरी तो 
बायकोस आवडला पाहिजे हें तत्व मला फारच गोड लागतें, ” " 

:: माझ्या रामचंद्राला रेल्वेत अपघात झाला तर माझें रामचंद्रावर प्रेम 
कमी न होतां वृद्धिंगत होईल. माझ्या रामचंद्राला कोणी दुखावले तर मला तें 
खपणार नाहीं, ” 

“: तर मग सोदर्यावर प्रेम अवलंबून नाहीं काय ? ” 


“ नाहीं असें मी कसे म्हणूं ! प्रथम पुरुषांचा देखणेपणा, कपड्याची 
छानछोकी हीच डोळ्यांत भरते पण पुरुषाविषयीं आपलेपणा उत्पन्न झाला 


२९५ प्रोषितभतेका 


म्हणजे मग सौंदर्यावर प्रेम अवलंबून राहणार नाहीं. पण प्रेम कायम रहावयास 
परस्परांचा सहवास आणि सहचारित्व हीं नकोत काय ? नवऱ्याने इकडे 
बायकोस प्रिप्र होण्यासाठी कांहीं गोष्टी करूं नयेत आणि बायकोने मात्र नवऱ्या- 
वर प्रेम करीत रहावें. किंवा उलटपक्षीं स्त्रिपांनीं आपलं अस्तित्व नवऱ्यास अधिक 
रूचकर करण्यासाठीं कांहीं करूं नये आणि तरी देखील नबऱ्यानें तीवर प्रेम 
करावें ही गोष्ट नवज्यास तरी शकय आहे काय ? माझी अशी समजूत आहे 
कीं, स्त्रियांनी आपल आकर्षकत्व वाढविण्यासाठीं कांहींच प्रयत्न केला नाहीं तर 
नबरे आहेर हिंडायला लागतात. 7 


“ या बोलण्यावरून एक कल्पना सुचते ती ही कीं आजच्या समाजांतील 
स्त्री पुरुषांसंबंधाची कल्पना पुरुषांनी अंगवस्त्र बाळगावे या तत्त्वाला घरून आहे. 
धर्मपत्नी ही म्हणजे धार्मिक कृत्यें करण्यासाठींच आहे. पुरुषांनी ' कामा *- 
करतां दुसऱ्या कांहीं बायकां ठेवाव्यात, त्याला कांहीं हरकत नाहीं, मोठेपणाचैच 
ते केवळ लक्षण आहे असें लोकास वाटतें. पुषकळ लोकांस असें वाटते कीं, 
स्रीनें नवऱ्यास आकर्षक होण्यासाठी खटपट करावी हें तत्त्व लोकांत एकदां कबूल 
झालें म्हणजे बायका रंगेल होतील आणि त्या रंगेल बनल्या म्हणजे वाटेल त्या 
पुरुषावर आपल्या आकर्षेणशक्तीचे प्रयोग करतील, ” 


या प्रकारच्या संभाषणाचा परिणाम प्रियेवदेवर झाल्यावांचून राहिला 
नाहीं. भोंबतालच्या परिस्थितीला फाडून काढावें असेंहि तिला वाटे. ती 
असें म्हणे कीं जर एखादी बाई पोषाखांत ठाकठिकी करूं लागली, नवऱ्याला 
प्रिय होतील अश्या गोष्टी करण्यांतच पुढाकार घेऊं लागली, नवऱ्याची सहचरी 
होण्यांत आनंद मानू लागली तर ती नायकिणीसारखी असें लोकांनी कां म्हणावें १ 
पुरुषांचं मनोरंजन करणें, सुंदरवसत्र विभूषित होणें या सर्व गोष्टींचा वेश्यानांच 
मक्ता आहे काय ? आज असें आहे. हे खरे, आणि लोकांत्री समजूत अशी 
झाळी आहे कीं प्रजोत्पादनार्थ विवाहित स्त्रिया. आणि मनोविनोदनाठीं, वेश्या, 
अक्षी वृत्ति जोपर्यत समाज पेरीत किंशा पिकवित आहे. तोपयेत समाजामध्ये : 
वेबय़ा ही संस्था कायम राहील, 


गोंडवनांतील प्रियंवदा २श्टै 


प्रियंवदेला आपल्या नवर्‍्यापासून वियोगाचे दिवस फ'रच कठिण वाटत 
होते; त्यास जीं अनेक कारणें होती त्यांत आपला रामचंद्र हातचा जाणार नाहीं ना 
अशा तऱ्हेच्या कल्पना तिच्या मनांत येत होत्या हें कारण प्रमुख होतें, स्त्रियांचे 
किंवा पुरुषांचे कोणाचेडि मन किती हि खंबीर असले तरी त्यास अनेक हेलकावे 
मिळाले तर तें अभंग रहाणार नाहीं, प्रेम जरी दृढ असलें तरी आपण दूर 
आहों, तेथल्या स्त्रियांना जाळे टाकायला रामभाऊ जवळ आहे ही गोष्ट तिच्या 
मनाला वारंवार भासे. आणि आतां आपणास आपले प्रेमताधनाचें कौडल्य 
दाखविले पाहिजे, आपण केवळ नवऱ्याच्या खंबीर मनावर आपल्या आयुष्याचे 
भवितव्य विलवून ठेवणें योग्य नाहीं इत्यादि गोष्टी तिच्या मनांत यैत. पणय 
गोष्टी मोकळेपणाने बोलायच्या तरी कोणाबरोबर? इतर बायकांची कल्पनाच अशी 
झालेली कीं पुरूष “ या गोष्टी ) करायचेच--ऱत्या त्यांनीं करू नयेत म्हणून बायकांनी 
प्रयत्न करण्यांत अर्थ नाहीं, कित्येक बायका उलट रामभाऊ दुसरी बायको तिकडून 
करून आणणार आहे असें म्हणत. प्रियवदेनें आपल्या रामचंद्राला अत्यंत 
मधुर पर्त्रे लिहावीं, त्यांत आपली वियोगामुळे झालेली मनाची स्थिति व्यक्त 
करावी, इकडची अनेक प्रकारची खुराखुशीत बातमी लिहावी, आणि अनेक 
तऱ्हेने आपल्या पत्राची मागेप्रतीक्षा नवरा करील असें करावें. पत्राची उत्कंठा 
लागो आणि त्यामुळे तरी आपल्या अस्तित्वाची वारंवार आठवण राहो असें 
तिच्या मनांत येई. तिने आपले दोन तीन पोषाखांतले निरनिराळ्या वेळीं काढलेले 
फोटोहि रामभाऊंकडे पाठविले होते. तिर्न पत्रांत बॅरिस्टर झाल्यानंतर सरकारी 
नोकरींत शिरणार कीं वकिली करणार, कोणत्या मार्गाने अधिक लोककल्याण 
करतां येईल इत्यादि गोष्टींची चर्चा करावी, 


आजचा लंडनस्थ भारतीय व १८९६-९७ च्या सुमारचा लंडनस्थ 
भारतीय यांच्या आयुष्यक्रमामध्ये बरच अंतर होतें. त्यावेळेस तिकडे जाणारांची 
संख्या कमी होती, राजे महाराजे देखील थोडेच जात, आणि जे जात य्यांचे 
कौतुक करण्यांत येई, हिंदुस्थानांतील गरीब लोक तिकडे क्वचित्‌ जात त्यामुळें 
हिंदुस्थानांतील लोक श्रीमंत आहेत अशी कल्पना तिकडील सामान्य मंडळीच्या 


२१७ प्रोषितभर्तका 


-....ा--------- --नप-पपपपपप--प--- -प------ २-2: 


मनांत असे. त्यावेळस आजची सुधारणा देखील फारशी दिसत नव्हती. मोटार 
बसेसच्या ऐवजीं घोड्यांच्याच बसेस रस्त्यातून दिसत असत, सिनेमा तर 
ऐकूहि येत नव्हता. टेलिफोन घरोघर झाला नव्हता, तर विजेवर स्वयंपाक 
कोठून येणार? खोली उष्ण ठेवण्यासाठीं अमेरिकन रेडिएटर घरोघर झाले 
नव्हते व घरांतील चिमण्या ह्याच उष्णतेच्या अधिकारी होत्या, आणि त्यावेळेस 
लंडनमध्ये देखील खेडेपणाच दृष्टीस पडत असे. तथापि जगातील इतर 
शहरांच्या मानाने लंडनमध्ये अर्वाचीन सुखांची स्वस्ताईहि होतीच, आज 
ज्याप्रमाणें लंडनमधल्या मुली जेथें फ़ृदिंगचे पायखाने नसतील, जेथ गॅसने 
स्वयंपाक करण्याची सोय नसेल, जेथे सवंग थिएटरें व सिनेमा नसतील अशा 
प्रदेशांत रहाण्यास नाखुष होतात, तशा त्यावेळेस होण्याचे कारण नव्हते. त्या 
वेळेस पहिल्या व्हिक्टोरियन काळांतील फाजील सभ्यतेची पद्धति बितळूं लागली 
होती, आणि स्त्रीस्वातंत्र्य बरेंच वाढूं लागळें होतें, त्यावेळेस काळ्या रंगाच्या 
हलकेपणाविषयीं कल्पना इंग्लंडांत फारशी पसरली नव्हती. इंग्लंडांतील हिंदु- 
स्थानी मंडळी कठोर टीकेचा विषय झाली नसून अजून कौतुकाचाच विषय होती. 


उलटपक्षीं इंग्लंडांतील रीतिरिवाज वगेरे गोष्टींचं लोकांस नबीनत्ब वाटत 
होतं. रामभाऊंच्या पत्रांत प्रारंभीं आत्मकथनविघयक गोष्टी येत, पण त्या 
लवकरच बंद झाल्या. पुढें बऱ्याच समाजवणनपर गोष्टी असत, हिंदुस्थान- 
विषयक गोष्टी कचित्‌ असत. बरींच पत्रे काढलीं असतां फारच थोडक्या हिवु- 
स्थामविषयक गोष्टी सांपडतील, कोठें क्रिस्टल पॅलेसरचे, कोठें ब्रिटिश 
म्यूझियमच, कोटें सेंट पोलचे, कोठे हेटिलाचे अशीं वणेने असत, पत्रें मोठीं 
असत, पण त्या पत्रसमुच्चयास इंग्लंडच्या वणेनारचे पुस्तक म्हणतां येईल, 
रामभाऊंच्या पत्रास देशवणनाचे स्वरूप केघळ साहजिकरीत्या आलें पण पुढें 
रामभाऊंनी ते स्वरूप जास्त वाढविले आणि ' माझीं पत्रें जपून ठेव, ती एकत्र 
करून इंग्लंडवर एक पुस्तक प्रसिद्ध करावें असें मी योजिले आहे ' असें त्यानीं 
प्रियंबदेस लिहिले. होतें. त्यांच्या पत्रांतील देशवणेनपर नसलेले तुकडे फारच 
थोडे होते. १८९७ सालचे थोडके तुकडे वाचकांचे मनोरंजन करतील, 

28 


गोडवनांतील प्रियंवदा २१८ 


अणण ापापपपाा - नापपना--:-:-२२०० --- “- व्ल्न्य् 


“> पयापाणापापा पणी पी? णी कटोफॉक0णापणा पटणीप२प?पा”?प0१पा?0१?णी?ण?णीणीणी णी 


: हाडके, तुझ्या पत्राची मी नेहेमी ओत्सुक्यानें वाट पहात असतों आणि 
तुला पत्र लिहिण्यासाठी मीं गुरवारची दुपार मोकळी ठेवीत असतों, तथापि 
येथल्या लोकांस येथल्या गोष्टींतहि मन घालावे लागतें. ” 


>< >< >< 


6 प्रोफेसर गोखले इकडे वेल्बी कमिरानपुढें साक्ष देण्यासाठीं आले 
आहेत; त्याचे वक्तृत्व आणि विषय मांडण्याची होली यावरून येथील इतर हिंदी 
लोकांत या तरुण महाराष्ट्रीयाविषयीं आदर उत्पन्न होत आहे. पण पुढारीवर्गा- 
मध्यें बराच मत्सर होत असे. इतकी तयारी करून मद्रास ब बंगाल येथील 
पुढारी आले नाहींत त्यामुळें त्यांनां असं वाटूं लागलें आहे कीं या महाराष्ट्रीयाच्या 
आंकड्यांत चूक निघावी. सर्वे पुढारी मंडळीवर देशाचे हित कसें जास्त साघेल 
या विचाराचा पगडा जास्त नसून जास्त मार्क कोण मिळवितो याच विचाराचा 
पगडा प्राधान्याने आहे, ” 


>< >< >< 


“ येर्ये एक खानबहादुर आले होते. हिंदुस्थानी विद्यार्थ्योनां धार्मिक 
उपदेश करण्याची “ परवानगी ? इंडिया ऑफिसकडून मिळविली. हेतु असा 
काँ, आपली धार्मिक बुद्धि आणि विद्यार्थ्यानी नीतियुक्त आचरण करावे याबद्दल 
त्यांच्या मनांत असलेली कळकळ इंडिया ऑफिसच्या नजरेस याबी, आणि 
केवळ लोकोपकाराचें आणि विद्यार्थ्यास दारू आणि स्त्री यांपासून अलिप्त राह- 
ण्यास उपदेश करण्याइतके सोंवळें काम देखील करण्यास तो सरकारची परवानगी 
मागतो, असें सरकारास भासून त्यांची “ लायलूटी ' व आज्ञाधारकता किती 
तीव्र आहे हे दिसार्वे. त्या खानबहादुरांचें व्याख्यान झालें त्या वेळेत एक 
मोठी मौजेची गोष्ट घडून आली, खानबहादुर आमच्या बोडिंग हाऊसमध्येंच 
उतरले होते. आणि लड लेडीच्या पोरीजरोजर फार पाजीपणाचा चावटपणा 
केल्यामुळे त्यांस ' लॅंड लेडीनें ' ह्ांकडून दिलें होतें. हे येथे असतां त्यानीं 


२१९ शारदा आणि प्रियंवदा 


->  -_->----ााटा 


पुष्कळ गुण उधळले, त्यांचें व्याख्यान हिंदुस्थानी विद्यार्थी मंडळीपुढें चाळू 
असतां मी त्या हॉलमध्ये गेलों तेव्हां मला पाहून त्यानीं एक दोन वाक्यें बोठून 
भाषण संपविले, ” 


प्रकरण २०व 
शारदा आणि प्रियंवदा 


“ मला येथल्या मंडळीचा फार आग्रह आहे कीं, मी स्त्रियांस सुशिक्षित 
करण्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि स्त्रियांच्या उन्नतीस मीं लागावे. ” 

“ योग्य आहे आग्रह. ” 

: पण मी यासाठीं काय करावें हें मला मुळीच समजत नाहीं, स्त्रियांचे 
शि(भण वाढबावें असें म्हणावें तर लहान मुलींनां किंवा ज्या माझ्या खासगी 
विद्यार्थिनी होतील अशा स्त्रियांना शिकविण्याचें काम मी करीतच आहे, आणि 
यापेक्षां जास्त तें काय करावयाचें ? ? 

“ हु तर धंद्याचे काम झाले, हें सामाजिक काम झालें नाहीं, ” 

“ मग सामाजिक काम तें काय कराबयाचं ? / 

:< त्यांचे म्हणणें असेल कीं, विवाहित स्त्रियांना वाचनाची वगरे अभिरुचि 
लावावी, त्याचे विचार प्रगल्भ व्हावे म्हणून खटपट करावी. ? 

“ विवाहित स्त्रियाना वाचनाची गोडी लावावयाची ती आम्हीं कशी 
लावावयाची ! हीं कार्म त्याच्याशीं निकट संबंध असलेल्या त्यांच्या नवऱ्यांचीं 
नव्हेत काय? ” 

“ स्वतःचे घर सुधारण्याची दगदग स्वतः घ्यावयाची नाहीं, आणि कोणी 
सार्वजनिक कामे करणारा मनुष्य भेटला म्हणजे त्याला समाजांतील अमुक गोष्ट 
सुधारा म्हणून म्हणावयाचे ही वृत्ति थोडीबहुत लोकांत असेल, मी नाहीं असें 
म्हणत नाहीं. माझें लग्न होण्यापूर्वा मी देखील महिना दीड महिना मास्तरणीचे 


गोंडवनांतील प्रियेवदा २२९० 


-- ---->-->- ->->>>_:-----:>--०-- १०८०. ७०.22... 


काम केलें आहे, त्यावेळेस आया येऊन आपल्या मुलीसंत्रंधानें कागाळ्या 
मास्तरणीला सांगत, त्या काय, तर मुलगी चोरून साते, घरांत काम करीत 
नाहीं, मुलगा संभाळीत नाहीं, वगैरे. जणूं काय या गोष्टीबद्दल आई जबाबदार 
नसून मास्तरोण जजाजदार !! पण सुशिक्षित स्त्रियांनां दुसरा कांहीं कार्यक्रम नाहीं 
असें मला वाटत नाहीं,” 


“ कोणता कार्यक्रम आहे? ” 


: मुला बाई आठवत नाहीं, पण आपल्या बायका ज्या अडाणी आहेत 
त्यांची कांहीं सुधारणा होण्यासाठीं तुमच्यासारख्या शिकलेल्यांनीं काहीं तरी 
करावें असें मला वाटतें. 


: तर मग हें काम तूं कां अंगावर घेत नाहींस? ” 


“मी आपल्यासारखी विदुषी नाहीं -- आणि आपल्यासारखी सर्वपरीनें 
स्वतंत्रहि नाहीं -- आणि मार्झे वजनहि स्त्रीवर्गावर पडणार नाहीं. तुमच्या 
बक्‍्तृत्वाबद्दल, घेर्याबद्दल, वाचनावद्दल व विद्वत्तेबदद लौकिक आज सवेत्र आहे. 
तुम्हांला येथ ' वादविवादांतळी बाघीण ' म्हणतात. गेल्या सालीं टाउन हॉल- 
मध्ये त्या पुण्याच्या प्रोफेसराचे दिक्षणपद्धतीवर व्याख्यान झाले त्यावेळेस तुम्ही 
बायकांत न बसतां पुरुषांत असलां, आणि नोटबुक आणि पेन्सिल घेऊन बसलां 
त्यामुळें या प्रॉफेसरची छाती धडधडायला लागली आणि तो मोठा जवून बोलू 
लागला असें म्हणतात. ” 


£ त्यानीं नोटबुक आणि पेन्सिल यांनां भिण्याचं कारण नव्हतें. त्यांच्या 
वर्गोत विद्यार्थी नोटबुक आणि पेन्सिल घेऊन नाहीं कां बसत? ” 


“ कांहीं असो; तुम्हीं त्यांची बरीच मौज केली, प्रायोगिक शिक्षणशास्त्रावर 
तो बोलला. मुले प्रश्न करतात त्यावरून त्यांच्या ठायीं अत्यंत बालबयांत 'चौकस 
बुद्धि कशी जाणत होते, तिचा बाराव्या वर्षापर्यत विकास कसा होतो हें प्रयोगा- 
वरून कर्से काढावें हें त्यानें सांगितले, आणि त्या शानाचा शिक्षकांनी कसा 


९५१ शारदा आणि प्रियंवदा 
उपयोग कसवा हें इंग्रज व अमेरिकन अनुभवावरून सांगितलें -- आणि तुम्हीं 
त्याची अर्गदी भेबेरी उडवून दिली, ” 


“ जुळींच नाहीं - मी नुस्ता ' तुम्हांला मुळें आहेत काय? तुम्हांला 
इकडच्या मुलांचा कांहीं अनुभव सांगतां येईल कीं. नाहीं ?' म्हणून प्रश्न 
केला, माझा उद्देद्व त्यांची भंबेरी उडविण्याचा मुळींच नव्हता. आपल्या- 
कडील मुलांचा अभ्यास होऊन कांहीं कमजास्त कळलें असल्यास तें समजावें 
म्हणून मी सहज कुतूहलबुद्धीने विचारिलें. ” 


“ आम्ही हें कसें कबूल करूं ! तुम्हाला नेहमीं दुसर्‍याच्या अभ्यासांतळे 
व्यंग काढणारेच प्रश्न कसे सुचतात £ तुम्हीं तो प्रश्न करताच अध्यक्ष हंसले, 
आणि सर्व लोकहि हंसले, 


५ मला त्या प्रश्नांत हेसण्याजोगें काय़ होतें, हें अजून गूढ पडलें आहे; 
आणि मी कांहीं वेड्यासारखा प्रश्न विचारला असें मळा वाटत नाहीं. ” 


५ तें हसणे तुमच्याविरुद्ध नव्हतें, ते तुमची तारीफ करणारें होतें. 
तुमच्या एका प्रश्नाने त्याच्या व्याख्यानाची तुम्ही किंमत केली, ऐकणाऱ्या तव 
मंडळीस तेव्हांच कळळें कीं एस्वादे प्रायोगिक शिक्षण शास्त्रावर यानें पुस्तक 
वाचल आहे; आणि त्यावरूम हा व्याख्याता कांहीं तरी बोलत आहे. स्वतःच्या 
मुलाचे मन जाणण्याची त्याने कांहींच खटपट केली नाहीं; किंवा आपल्याकडील 
मुलांचे त्यानें कांहीं अवलोकन केले नाहीं, ” 


4 


“ घृण तें त्यानें कबूल केलें -- त्यांचें लम्नच झालं नाहीं म्हणून 
सांगितले ना!” 


५: म्हुणजे त्यांचें पुस्तक्रीं ज्ञात बाहेर पडलें. 
५ पुस्तकी शञानानें बोलू नये असे कोठें आहे? ” 


४ मग तुम्ही स्वतः त्यांनीं कांहीं अवलोकन केलें नाहीं हें जाहेर कां 
काढळे १ 9१ 


गॉडवर्नांतील व्रियंवदा २९२ 


“ मी त्याबद्दल त्यांस दोष कोठें दिला ! मुलांविषयीं त्यांस अत्यंत 
जिज्ञासा असून त्यानां मुलें नसल्याने त्यानां सूक्ष्म निरीक्षणाची संधि मिळाली 
नाहीं यांत त्यांचा दोष काय ! मला तर त्यांच्याविषयीं अत्यंत सहानुभूति वाटली, 
मला जर आपल्या अल्पवयी मुलींच्या जिज्ञासा आणि महत्त्वाकांक्षा या विषयावर 
अनुभवाने बोलायला सांगितलें तर बोलतां येईल. पण मुलांच्याविषयीं कोठें 
बोलतां येईल ! व अभेकांच्या मनाविषयीं तर कांहींच सांगतां येणार नाहीं ; 
माझेहि जै ज्ञान आहे तें पुस्तकीच आहे. या सवं गोष्टी लक्षांत घेऊन मला 
त्यांच्याविषयीं तर “ तो आपल्यासारखाच दुदैवी आहे ! अशी भावना उतपन्न 
झाली, ” 

५ तुम्ही त्याचें अज्ञान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाहीं १ ” 

“ मुळींच नाहीं, ” 

“ आमचा तर असा समज झाला कीं तुम्हीं त्याची चांगली फजिती 
उडविली, आणि ती तशी उडविण्य़ासाठीं तो काय बोलत होता हें तुम्ही 
टिपून घेत होतां, 

“ प्रियबदे, आपल्या महाराष्ट्रांत दुसऱ्याने कांहीं करावयाचें योजिले 
म्हणजे त्याचे काहीं तरी उणें बाहेर काढावे अशी प्रवृत्ति आहे असें मी ऐकते, 
पण माझा हेतु त्याचें उणें काढण्याचा मुळींच नव्हता. मला जी जिज्ञासा होती 
ती मी व्यक्त केली एवढेंच, पण दुसऱ्याचे उणें काढण्याचा तूं मजवर जो 
आरोप केलास तोहि तुझा गैरसमजच आहे. पण या समजाबद्दल मी तुला 
मुळींच दोष देत नाहीं. कां कीं, माझ्यासंबंधानें पुष्कळांचा असा गेरममज 
झाला आहे कीं, मी सहज जिज्ञासेनें एखाद्याला प्रश्न करतें आणि तो प्रश्न त्या 
मनुष्याला सोडवितां आला नाहीं म्हणर्जे मी त्याची परीक्षाच घेत आहे कीं काय 
असा त्याचा समज होतो. आणि याबद्दल मला फार वाईट वाटतें. कां कीं 
ज्यांनां मी आपल्यापेक्षां अधिक समजणारे असें समजतें व ज्यांच्यापासून 
आपला ज्ञानाचा दृष्टीनें कांहीं फायदा होंईल असें बाटतें, त्यांनांच मी प्रश्न 
विचारते, आणि ती माणसें मजसंबंधानें वाहेट मत करून घेतात, मी हें 


२२३ शारदा आणि प्रियंवदा 
हायस्कूलमध्ये द्वोतें तेव्हांपासून पहात आहे. एकदां मी मास्तरला पाढरे ढग 
व काळे ढग यांत फरक काय म्हणून प्रश्न केला आणि त्यानां त्या प्रश्नाचे नीट 
उत्तर देतां आलें नाहीं तेव्हां वर्गातले मुलगे इंसू लागळे. मी दुसऱ्याची 
फजिती करते असा माझा विनाकारण दुलौंकिक झाला आहे. मला दुसऱ्याचे 
उणें काढण्याची, काय सांगू, खरोखरच इच्छा नाहीं! ” 

“ तुम्हांला लोक फार मितात. ” 

“ तसं असेल तर मला खरोखरच वाईट वाटतें, व हे जर खरें असेल 
तर मला आपली जिज्ञासा कमी केली पाहिजे. निदान मला जर कांहीं विचारा- 
वयाचे झालें तर तें सभेत न विचारता श|तप्णे मागाहून विचारण्याचा निश्चय 
मला केला पाहिजे. ” 

: मृग नोटबुक घेऊन कां बसतां? 

“ मला वाचलेले चांगले ग्रंथ आणि चांगली ऐकलेली व्याख्यानें याच्या 
टीपा लिहून ठेवाव्या ही संवय कालेजमर्थ्यें असतांना लागली म्हणून. त्या 
प्रोफेसरांच्या व्याख्यानाच्या टीपा मजजवळ अजून आहेत, त्या पुन्हां मी एक 
दोनदां पाहिल्याहि आहेत, ” 

:: घण तो प्रोफेसर तर, तुम्ही मोठ्या आढ्यते'वोर, दुसर्‍याचा उणेपणा 
बाहेर काढून आपल्या शौनाचा तोरा मिरविणारी ब्राई असा आपला समज करून 
घेऊन गेला. ” 

“ छे, ही गोष्ट तर फारच वाईट झाली. त्यांनीं मञसंबंधीं विनाकारण 
चुकीचे मत बनविळे आह. मला त्या प्रोफेसरनां पत्न लिहून कळविले पाहिजे 
ब जर मी त्यांचा कमीपणा बाहेर काढण्यासाठी ब्रोलळळें असे वाटत असलें तर 
मला त्यांची माफी मागितली पाहिजे. तुम्हांला माझ्य़ा प्रश्नाविषयी काय 
वाटले £ ” 

“ आम्हांला तर तुमचे प्रश्न ऐकून फार आनंद झाला, आम्हाला वाटलें 
कीं तुम्ही त्या प्रोफेवरची ऐट चांगळी आहेर काढलो, तो मानसशास्त्राचा 


गोंडवनांतील प्रियंवदा २२४ 


अभ्यास करावा, आहेवापांनीं मुलांच्या मनाचा अभ्यास करावा आणि 
त्याप्रमाणें शिक्षणयोजना करावी म्हणून ऐटीनें सांगायला आला होता, त्याचा 
नक्षा एका नागपूरच्या बाईने उतरबिला यामह्ृल आम्हांला तर उलट अभिमान 
वाटला, आणि आमचे दिनकर भावोजी म्हणाले कीं, नागपूरच पाणी तुम्ही 
त्या पुणेकराला दाखविले, ” 


“ तुम्ही ज्या कामगिरीचें भ्रय माझ्यावर शछादूं पहातां त्या कामगिरीचे 
श्रय मला नाहीं आणि मला तसले श्रय नको आहे ; आणि व्याख्यान देणारा 
एस्बादा मनुष्य जरी थोतांडी विद्वान असला तरी त्याचा थोतांडीपणा जाहेर 
काढून मला काय मिळणार आहे ! आणि शिबाय प्रोफेसर भातखंडे हे ग्ह॒स्थ 
थोतांडी नाहींत, त्यानीं जी पुस्तकांतली माहिती सांगितली ती बरोबर सांगितली, 
त्याला स्वतःच्या अबलोकनाची जोड नव्हती एवढेंच, मला स्वतःला अव- 
लोकनाची संधि कोठें मिळाली आहे? त्यांनाहि मिळाली नाहीं तर मी 
त्यांबद्दल त्यांस कसा दोष देऊं ? ” 

“ तर मग तुमच्याकडून ही आविष्करणाची कामगिरी झाली ती नकळतच 
झाली १ १9 

:: छु, छे, ती कामगिरी नव्हे, दुसऱ्याचे अश्भमन बाहेर काढण्याचा 
प्रयत्न करणें हा निःत्रळ उद्धडपणा आहे; आणि हा उद्धटपणा माझ्या हातून 
नकळत झाला. पण झाला तो अगदी उद्धटपणा झाला, हें मला कवूल. केळे 
पाहिजे. ” 


“: आम्ही आपल्याविषयीं ज्या गोष्टीबद्दल अभिमान बाळगतों तो. गोष्ट 
म्हणजे सद्गुण नसून दुर्गुण आहे असं तुम्हीं म्हणतां, आणि तो दुरगुण आपल्या 
अंगी नसूत्त त्या गुणांचं श्रेय अगर दोष आमच्याकडून तुमच्यावर विनाकारण 
लादल्या जात आहे असे म्हणतां काय ? ” 


:< अगदीं खरें; माझा हेतु जिज्ञासातृतति हा असतो, तो साध्य होत 
नाहीं ; वक्ता प्रश्न विचारल्यामुळें गोंधळांत पडतो, तेव्हां तों मी त्याची फजिती 


२२५ शारदा आणि प्रियंवदा 


करूं पहाणारी आहे असं तमजतो, आणि लोक मला त्याची फजिती केल्याच 
अय देतात. जिज्ञासूस याहून दुःखकारक गोष्ट कोणती आहे? कळक्रळीनें 
चौकशी करणारा डिटेक्टिव्ह समजला गेल्याने अर्से त्यास दुःख होते. तसेच 
जिज्ञासूस तो भाविष्करणपर आहे अशा लोकिकानें दुःस होतें. थोतांडी बिद्वा- 
नांची डिटेक्टिव्ह ही प्रसिद्धि मला नको आहे. लोकानीं मला जिज्ञासू म्हणूनच 
ओळखावे. ” 

: तुम्हीं आतां व्याख्यात्यास सावेजनिकपणें प्रश्न विचारण्याचे सोडून 
देणार तर £ ” 

“ दिळेंच पाहिजे. ” 

“ तुमचा निश्चय ऐकून नागपूरच्या पुष्कळ लोकाना वाईट वाटेल; 
नागपूरच्या व्याख्यानांतली एक मजा जाईल. ” 

“ती कशी काय?” 

“-नागपूरची मंडळी जी व्याख्याने करविते ती आपलें शान वाढावें 


म्हणून थोडीच करविते ? कांहींतरी मजेदार कोणी तरी बोटळें पाहिज एवढ्या- 
साठीं करविते. ” 


: घण सर्वच व्याख्याते विनोदी किंवा खुमासदार बोलणारे कोठें 
असतात १ ” 


५ पण अशा प्रसंगीं कोणी तरी भोळतर मनुष्य पहावयाचा आणि त्याचे 
व्याख्यान करवावयाच; आणि नंतर बाररूममध्यें नाहीं तर जात त्यावर कुत्सित 
चर्चा करावयाची आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठीं व्याख्यान करावयाचे ही 
आजची पद्धति आहे. ? 


:: मुंडळींनां व्याख्याने ज्ञानासाठी नको असतात काय!” 
:: मुळींच नाहीं. माही तर स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह, ज्ञातिभेद, वेदांत- 


विषय आणि काव्य एवढ्यावरच चर्बितचर्वणाचीं व्याख्याने पुन्हां पुन्हां .क्रां 
29 


गोंडबनांतील प्रियंवदा २२८ 


अनददटपपशपाण फपाप्ापापा? पपी प 0५ 00000० एनी पी पी प00 टी 


ना: -->->->> ----__-२ ---->_ _ > 


करविलीं असतीं ? या विषयांवर नवीन कोण काय सागणार आहे? आपल्या 
खुशिक्षित मंडळींना याच विषयावर गप्पा मारतां येतात, आणि इतक्या अनेक 
मंडळींनां टीका करण्यासाठीं मूलग्रेथ हवा आणि म्हणून या क्षेत्रांतलाच 
व्याख्यानविषय हवा. जर गहन बिषय असला तर त्यावर टीका करणारानां तें 
व्याख्यान फार गेरसोईचे होतें. ” 

“: मग पुण्यासुंबईहून येथे येणारानां व्याख्यानाचा इतका आग्रह कां? ” 


“ त्यांत तर मजा जास्तच येते, पुकळदां हे पुण्यामुंबईकडचे शहाणे, 
मध्यप्रांतांतले लोक अगदीं मागासलेले, यांना साध्या गोष्टीहि समजायला कठिण 
आहेत अश्या कल्पना घेऊन येतात, आणि ल्याप्रमाणें बोलत सुटतात. आणि ते 
तशी कल्पना करून घेऊन बोलायला लांगळे म्हणजे आमच्या नागपूरकरानां 
हसायला एक नबीन साधन प्राप्त होते. अर्थात आम्हीं त्याच्या व्याख्यानांत 
कांहीं नवीन नाहीं, म्हणून पुष्कळसे जाडे जाडे संस्क्रुत शब्द आहेत म्हणून 
ओळखतों, तथापि त्यांनीं व्याख्यान देऊन लोकाच्या विचारशून्य अंधारांत 
आपल्या नवीन विचारांचा दिवा कसा लावला याची तारीफ करतों आणि त्या 
व्याख्यात्याची बोळवण करतों. आणि नंतर त्याच्या भोळसरपणाबद्दल हर्वे तितकें 
हसतो. ” 

£ तर मग मी प्रश्न विचारून व्याख्यात्याला एखादे वेळेस निरुत्तर करतें 
हें तरी लोकांना कसें आवडले ? हे. तर त्यांच्या गोड शब्दानीं बोळवण 
करण्याच्या पद्धतीच्या विरुद्ध झालें, ” 


“ आवडले एवढ्याचसाठीं कीं, तुमच्या पुण्याकडच्या लोकांनीं विदरत्तेचें 
अवडंबर किती जरी माजविळें तरी नागपूरची एखादी बाई तुम्हाला वेळेवर 
कशी चूप करते याची चुणूक दाखवावयाला तुमच्यासारखीचे प्रश्न उपयोगी 
पडतात. ” 

“ तर मी माझ्या नकळत नागपूरच्या मंडळीच्या हातांतळे परक्याला 
भोंसकण्यास हत्यार होतें, ” 


२२७ शारदा आणि प्रियंथदा 


1 जाड लाडल डवड डा हणा गी 


“या नागपूरच्या भावनाशीं तुम्हांस सहानुभूति नसेल तर तुम्ही केवळ 
नागपूरकरांच्य़ा हातांतळें खेळणें होतां हें उघड आहे. ” 


:- अस्सं ! तरी म्हटळे कॉ, मला त्या बंगाली वक्त्याच्या ' स्पिरिच्युअल 
वैधव्याच्या व्याख्यानाच्या वेळेस अध्यक्षत्व कसें दिलें ! प्रियेवदे, तुला असल्या 
तऱ्हेच्या नागपुरी पद्धती आवडतात काय? ” 


“ कां आवडू नयेत ! खरे सांगायचे म्हणजे अशा मौजा करण्याच्या 
कामांत मीहि पुष्कळदां पुढाकार घेतला आहे. माझा रामचंद्र आणि मी या 
दोघांनां देखील असल्या गोष्टी आवडतात, व्याख्यात्याला सन्मानपूर्वक बोलवावे 
आणि त्याला कांहीं तरी बावळटपणानें भरलेली गंभीर बार्क्यें बोलायला लावावें 
असें करण्यांत मला देखील मोज वाटते. वेळप्रसंगी त्याची टवाळकी करावी असेंहि 
वाटते. एकदां एका व्याख्यात्याचे फार लांबट झालेलें व्याख्यान बंद करावयाचे 
होते. तेव्हां मुलानीं खालीं टाळ्या वाजविल्या, आणि त्यांनां तसें करण्यांत 
माझ्या रामचंद्राने उत्तेजन दिलें. हे मला वरून दिसले; मीं बायकांत बसलें 
होतें. तेव्हा मी कांहीं लहान मुलांनां चिमटे घेऊन रडायला लावलें आणि 
आम्हीं व्याख्यान बंद पाडले ; आणि माझ्या रामचंद्राला ही गोष्ट कळली तेव्हां 
त्यानें त्याबद्दल माझी फार तारीफ करून अगदीं एक गोड गोड दिला. ” 

“ प्रियंवदे, हें काय हें ! ” 

“ कांहीं असो ; मला त्यावेळेस जो एक गोड गोड मिळाला त्याची 
किंमत मला ब्तमानपत्रांतल्या स्तुतीपेक्षां आणि सुशिक्षितपणा आणि साधुत्व 
याबद्दल नांव होण्यापेक्षा जास्त आहे, ” 


“ प्रियवदे, तुमच्या दोघाच्या मानसिक सायुज्याची ही भावना पाहून 
मला इतकें तुझ्याविषयी प्रेम वाटते कीं त्यावरोबर तुझ्या या वाईट वागणुकीची 
क्षमा करावीशी वाटते, खरोग्वर नवरा आणि बायको यांनीं एकदिलाने 
तिसऱ्याची टबाळी केली तर तीमुळे दोघांतलें प्रेम वाढतें काय ! मला वाटतें 
वाढतहि असेल. ” 


गॉडवनांतील प्रियंवदा स्ट 


न करना कलला लपवली टनाला य 20 नह क्यो मालन 


“: नवरा जे करतो तें बाईट असळें तरी बायकोला कोतुकारचेच वाटतें. 
नवरा करतो, तर तें चक कसें असेल, ही भावनाहि कांहीं नवीन नाही. 
: ज्या घरीं तूं गेलीस बाळे, त्या घरचे तुज लागले चाळे' ही म्हण आजमी 
किती वर्षे ऐकते आहे. दोघांनीं मिळून तिसऱर्‍्याची टवाळी करण्याने प्रेम 
वाढतें कीं नाहीं हें मला ठाऊक नाहीं. पण दोघाना एकमेकांच्या मसलतींत 
शिरायला जास्त सवड होते हँ मात्र खरे. ” 


:< प्रियंवदे, व्याख्याने वगेरे ऐकण्याचा आणि करविण्याचा हेतु समाज- 
सुधारणा हा आह्दे कीं, समाजाला थट्टा करायला आणि मोजेला साधन हा 


आहे ! 


५: मला ' व्याख्यान पद्धतींचा हेतु ' असले जाडे जाडे प्रश्न नको आहेत. 
माझ्या स्वतः संबंधाने सांगावयाचें म्हणजे मी व्याख्याने करमणुकीची साधनें 
म्हणून समजतें. ज्याला. तात्त्विक गोष्टी सांगावयाच्या असतील त्यांनीं त्या 
पुस्तकांत लिहाव्यात,. आम्हां नागपूरकरांची व्याख्याने योजण्याची आणि नंतर 
व्याख्यात्यांची त्यांच्या पाठीमागे टवाळी करण्याची पद्धति अत्यंत योग्य वाटते. 
आपल्या नीरस आयुष्यांत बोलण्याला विषयच नाहींत. इंग्रज लोकांनां बोला- 
यला जेवढे विषय असतील तितके आपल्याकडे नाहींत, बायकांच्या पोषाखावर 
टीका करण्याची चाल आपल्याकडे नाहीं अशा वेळेत आमचे गरीन निचारे 
पुरुष्र काय करणार ! ” 


“ आणि तूं नागपूरकर कधीं बनळीस ! तुझ्यापेक्षा जास्त वर्षे मी 
नागपुरांत घालविलीं अहेत. ” 


“ असतील, पण माझें दोन पिढ्या नागपुरांत असलेल्या कुडंधांतल्या 
मुलावरोभर लम झालें आहे, त्यामुळें मी नागपूरकर झालें, तुम्ही मात्र येथ 
उपरी आहांत. बायकांचा दर्जा नबऱ्याप्रमाणें ही सवे लोकांची जुनी पद्धत 
आहे. "04 


“ € नागपूरकर? हा दर्जा आहे काय? ” 


२२९ शारदा आणि प्रियंवदा 


न, वनय माका न 


11 अर्थात आहे, १५ 
“तो कसा?” 


“ महाराष्ट्रांतील महाराष्ट्रीय ग्हणजे काय? त्यांची कतघगारी एवढीच कीं, 
त्यांच्या देशांत मुसलमान आले असता त्यानीं आपलें संरक्षण केलें पण आमच्या 
गोंडवनांतळे म्हणजे नागपूरचे महाराष्ट्रीय म्हणजे ज्यानीं स्वतःचं संरक्षण तर 
केलेच पण इतर लोकांनाहि आपल्या कबजाखालीं आणलें. तर नागपूरकर ही' 
पुणेकरांची सुधारून वाढविलेली आवृत्ति होय, नागपूरकर हा अर्थात भर्चिक 
उच्चतर कोटींतील मानव होय. ” 


५ काय चाबट झाली आहेस -तुला इतकें तत्वत्ञतान कोणी शिकविठे? 
नवीन आलेल्या कोकणस्थ मुलीनें नागपूरचा अभिमान बाळगून दुसऱ्या कोंकणस्थ 
बाईशीं तिला पुणेकर समजून भांडायचे ! तुला या हेंगाडे बोलणाऱ्या नागपुऱ्या- 
मर्ध्ये लोकप्रिय व्हाबयाचें आहे काय १” . 

“ बुरे तें असो, तुम्ही स्त्रियांच्या उन्नतीसाठी काय करणार ! ” 

“ मीच तुला विचारते कीं, मी काय करणार ? ?? 

“६ तुपतच्या ज्ञानाचा फायदा इतर स्त्रियांस करून द्यावा. ” 


“६ आणि तो कसा ! इतर स्त्रियांच्या कोणत्या कार्यास मी मदत करूं 
शकेन? 


५ त्यांचे ग्रह सुधारण्यासाठी तुम्हीं त्यास सूचना कराव्यात, ? 


“ आणि मला ग्रहव्यवस्थेची काय माहिती आहे? सात आठ मुले, 
नवरा, आणि स्वतः इतक्यांचा संसार पंचबीस तीत रुपयांत करून दाखविणाऱ्या 
बायका मीं पाहिल्या आहेत. त्यांच्याकडे पाहिलें म्हणजे वाटतें कीं मीं यांनां 
काय सांगणार! मला एकटीला पक्षास साठ रुपये खच येतो, त्यांतला दहा बीस 
रुपये खचे पुस्तकांकडेच होतो. पण त्या पंचबीपत तीस रुपयांत संसार करणाऱ्या 
बायकांनां पुस्तकें बाचीत पडा आणि मुलाकडे दुलेक्ष करा म्हणून सांगू, कीं त्या 
पंचबीस तिसांतळे कांहीं रूपये पुस्तकांकडे खःचे करा म्हणून सांगू १ ” 


गोंडवनांतीळ प्रियंवदा २३० 


“६ प्रग तुम्हांस त्या बायकांविषयीं काय वाटते ? ” 


:: मला असें वाटतें कीं त्या सर्व माझ्यापेक्षां अधिक सुशिक्षित आहेत, 
त्यांनां मुलाच्या संगोपनाचा अनुभव आहे, मुलाच्या आवडी-निवडी, मनोरंजन, 
एकमेकांमधली वागणूक याची माहिती त्यांनां जास्त आहे, मी त्यांनां कदाचित 
रजे बोलावयाचे तें आणि मळा जें समजलें आहे तेवढेच त्या प्रोढ शब्दांनी 
संगतवार सागू दाकणार नाहींत आणि मी ते सांगूं शकेन एवढेंच, मला तर 
आतां अशी शंका उंपस्थित होऊं लागली आहे कीं मुलींनां शिक- 
विण्याच्या धंद्याला देखील मी लायक आहे काय - आणि मोकळेपणालं अंत- 
निरीक्षण करूं लागले म्हणजे ' मी नाहीं ' असेंच उत्तर येते. मला जरी मी 
लायक नाहीं असें कळलें तरी उपजीविकेच्या अन्य साधनाच्या अभावामुळे मला 
शिक्षकत्व सोडतां येणार नाहीं. ” 


“: आतां तुम्हांला आपण अज्ञानी आहोंत असें दाखविण्याची इच्छा झाली 
आहि काय? ” 


“ माझे अज्ञान आतां मला पूर्णपणें कळूं लागलें आहे. आणि प्रत्येक 
संतारांत असलेली स्त्री माझ्यापेक्षा अधिक सुशिक्षित आहे असें वाटूं लागलं 
आहे. ”? 

“ तर मग मी देखील तुमच्यापेक्षां अधिक सुशिक्षित असणें शक्‍य 
काढे. ११ 


: प्रियेंबदे, मला तुझ्यापेक्षा अधिक ज्ञान आहे असें म्हणत नाहीं. कां 
कीं, पुष्कळ गोष्टींमध्ये मला तुलाच सहा विचारावासा वाटतो. स्त्री या नात्यानें 
मी तुझ्यापेक्षा वरी च अज्ञानी आहे, ” 


£ मला तुम्हीं हरभऱ्याच्या झाडावर चढवतां वाटतें? मी जरी एखाद्या 
व्याख्यात्याची टवाळी करण्यांत नवऱ्याला सामील होत असलें, तरी तुमच्यांत 
आणि माझ्यांत फरक काय आहे हें विसरण्याइतकी मी उद्धट झालें नाहीं, 
तुमर्चे बाचन, तुमचे विचार हें पाहून मला मी सामान्य स्त्रीपाशीं बोलत आहे 


२३१९ शारदा आणि प्रियंवदा 


>>>: ? नी 0 0 0 . “70 "८ “ण 
न्न 


असें मुळींच वाटत नाहीं, मी उलट म्हणते कीं तुमच्या वाचनाइतकं वाचन 
ज्यांचे झाळें आहे असे पुरुषहि थोडेच दिसतात. ” 


: तें स्वरंहि असेल, तरीहि मला मी स्त्री या नायानें अगदी अडाणी 
आहे अशी भावना होऊं लागली आहे. ” 


“ पुष्कळ विद्वान लोकांना ' मी पूवी िद्रान आहे असें मला वाटत हातें, 
पण माझें ज्ञान वाढल्यानंतर मी अगदी अज्ञानी आहे असें कळूं लागलें ) असें 
म्हणण्यांत आनंद वाटतो. तीच फॅशन तुम्हीं उचलली नाहीं काय ! ” 


“ अर्थात नाहीं. ” 


“ त्याच्या ' बदारकिंचिजश्ञोहं ' या बोलण्यांत आणि आपल्या बोलण्यांत 
मग फरक तो काय? ” 


€ फरक पुष्कळच आहे. असल्या विनयशील विद्वानांची विद्वान 
म्हणून ख्याति सवेत्र झाली म्हणजेच आपण अज्ञानी आहों असें सागण्यास 
त्यांनां फावते, ही एक त्यांच्यासंबंधानें लक्षांत ठेवण्याजोगी गोष्ट आहे. आणि 
शिवाय ते विनयशीलपणाची कीति मिळविणारे विद्वान दुसऱ्या त्याच्यापेक्षाहि 
कमी विद्वानांनां आपल्यापेक्षा अधिक जाणते म्हणून समजत नाहींत, किंवा 
म्हणत नाहीत, मी तुला मजपेक्षां अधिक जाणती असें समजतें. ” 


:: आणि ती कोणत्या बाबतींत १” 


“ ह्ञी या नात्यानें तूंच काय तर अनेक स्त्रिया माझ्यापेक्षां श्रेष्ठ आहेत 
अशी भावना मला होऊं लागळी आहे. ज्या स्त्रियांना पत्नी, किंबा माता या 
नात्याने जगाची माहिती झाली आहे त्या स्त्रियांस मी माझ्यापेक्षा कमी कसें 
समजू ? त्यांनां ग्रांथिक शिक्षण नसेल. अनेक गोष्टींबिषयीं विचार करतां येत 
नसेल, पण विचार करतां येणें ही गोष्ट शिक्षणाचा मुख्य भाग आहे असें मी 
आतां समजत नाहीं. ” 


गोंडबरनांतील प्रियंवदा ०१३२ 


८ आवनांचे शिक्षण आणि भावनांची वाढ हदी तितकीच महत्त्वाची गोष्ट 
आहे, किंब्रहुना जास्त महत्वाची गोष्ट आहे. ” 


: म्हणजे काय -- भावनांचे शिक्षण म्हणले काय आणि ते कसें 
वाढवावयाचं ? ” 


:: घरमार्थाच्या मार्गात ज्याप्रमाणें ज्ञान हें अंतिम शिक्षण धरले जातें 
आणि भक्ति आणि कम यांचे शिक्षण अगोदर असतें .तोच निग्रम आपणांस 
रोजच्या' व्यबहारांतेहि लागूं आहे. ज्या स्त्रीस मातृत्वाची भावना प्रत्रल असेल 
तीच स्त्री आपल्या मातृत्वाच्या कार्यास उत्तम प्रकारें लायक करणारें झिक्षण 
मिळवील, यासाठीं व्यक्तीच्या शिक्षणामध्ये भावनादिक्षणास प्राधान्य दिले 
पाहिजे. भाषना जेणेंकरून उत्कट होतील तेन्हांच कार्य करण्याची उत्कटता 
वाढेल, आणि तेव्हाच खऱ्या शिक्षणास प्रारंभ होईल, ' पाहिजे तो कळवळा 
झग बळा काय उणे ! या उक्तींत तरी हेंच शिक्षणतत्त्व तांगितळें आहे. ” 


“ तुर मग तुम्ही भावनास प्राधान्य देतां -- देत अंताल; पण आम्ही 
बायका तुमच्यापेशां अधिक सुशिक्षित कशा ? भावनाचे शिक्षण तरी आम्हांस 
कोठें आहे? असतें तर आम्ही सर्वच भायका कवयित्री बनला असतों. ” 


“ जर आयुष्यातील पत्नीत्व आणि मातृत्व, पुत्रविरह, पुत्रश्षोक इत्यादि 
अनुभवलेल्या स्त्रिया जर कवित्व करूं लागल्या तर त्या मजपेक्षां खात्रीनें अधिक 
सुंदर कविता लिहितील, ” 


“ आणि आमचे भावनांचें दिक्षण तरी कोठें झालि आहे ! तुम्हाला असें 
वाटतें काय कीं आम्हास आपल्या भावनांसा विकास करण्यासाठी पुष्क्ळसें क्षेत्र 
आहे ? शारदाबाई, तुम्ही समाजांत फारशा वाढला नाहीं, तुम्हांला कांहीं 'वर्षे 
सर्वसामान्य परिस्थितींत घालवावी लागलीं तथापि अष्ठीकडे सात आठ 'वर्षे, 
'तुमःची गणना तीघ्र बुद्धीच्या स्वतंत्र प्रवृत्तीच्या' 5्य्तींत होऊन इतर 'त्त्रियांस' जीं 
बंधने आहेत त्यांपासून अत्रद्ध अशा स्थितींत गेलीं -- त्यामुळें सर्व मानवी 
भावनांस पिळून काढणारी जी रूढी आहे त्या रूढीच्या चरकांतून तुम्ही पूर्णपणें 


२३३ शारदा आणि प्रियंवदा 
पिळून निघाला नाहीं, आयुष्याच्या पूर्वीच्या मागात तुम्हासहि रूढीचा चरक 
जाणवला असेल पण अलीकडच्या स्वातंत्र्यामुळें पूर्वीच्या गोष्टींचा थोडासा विसर 
पडला असेल, आज स्त्रियानां अवशय अद्या भावनाची वाढ होण्यास तरी कोठें 
जागा आहे १ स्त्रियांना आज नवऱ्यास पत्र पाठवावयाची तरी किती चोरी-- 
त्यांत वडिलांचा उपमदे होतो अशी समजूत आहे; ' आम्ही काय तुझ्या नव- 
ऱ्याची खुशाली तुला कळवीत नाहीं, तर तुला स्वतंत्र पत्र यायला पाहिजे १" 
अशी टीका प्रत्येक लिहिता-वाचतां येणारी स्त्री अनुभवीत नाहीं काय ? स्त्रीने 
किंवा पुरुषाने आपल्या स्वतःच्या मलास सासुसासरे घरात जिवंत अत्ततां खेळ- 
विणें ही अमर्यादा समजली जात नाही काय १ एवढेंच नव्हे तर धार्मिक 
गोष्टीनी देखील या भावनांच्या विकासास अनेंक अडचणी उत्पन्न करून ठेवल्या 
आहेत. आई सोवळ्यांत असली आणि मूल तिला विळखा मारण्याप्तांठीं 
प्रेमानं आले म्हणजे ' गिवशील ' असच ती ओरडेल, या तऱ्हेची प्रवृत्ति 
आहे तोपयत पत्नीत्त आणि मातृत्व या भावनांची उत्कटता कशी उतपन्न 
होणार १ ज्रियांनीं पुस्तकें कोणती वाचचावीं याविषयी सुशिक्षित लोकहि निर- 
निराळीं बंधनें घालूं इच्छितात कीं नाहीं -- मी तर असे पाहिलें आहे कीं 
बऱ्याच लोकाना असे वाटते कीं संतलीलामृत, भक्तिलीलामृतसारखींच पुस्तकें 
स्रियांनी वाचावी ; दुसरी वाचूच नयेत. तुम्हास भावनाचा विकास झाला 
पाहिजे हो गोष्ट पटली असल्यामुळ, तुम्ही स्वतःच्या भावनांचा विकास झाला 
नाहीं, इतरांचा झाला आहे अशी खोटी समजूत करून घेता. छे छे, आपल्या 
समाजांतील स्त्रियांच्या मनामध्ये भावनांचाहि विकास सभ्यतेच्या खोट्या कल्प- 
नांनी होऊं दिला नाहीं. ” 


“८ तरी देखील मी म्हणत कीं त्यांच्या मनांत भावनांचा विकास मजतपेक्षां 
अधिक झाला असावा, ” 

६ खात्रीनें नाहीं. '” 

:: तूं अर्से कसें म्हणशील ! तुझे सगळें म्हणणें खरें धरलें तरी काय निष्पन्न 
होतं ? स्त्रियांना पुरुषांविषयो मनांत प्रेम उत्पन्न झालें तरी तें दाखबितां येणार 


गोडवनांतील प्रियंवदा २३४ 
नाहीं, व मुल्ाविषयींहि प्रेम उत्पन्न झालें तरी ते व्यक्त करतां येणार नाहीं, 
पण ही अडचण जेव्हां भासते तेव्हां प्रेमाचे काये व्हावयाचे ते होऊन 
गोले असते ; प्रेमाचा जन्म झाल्याशित्राय या अडचणी भासूं लागल्या काय ! 
प्रेमाचा उद्धव झाला असला म्हणजे या अडचणींतून प्रम मार्गे काढीत नाहीं 
काय ! नबराबायकोस एकमेकास पत्र पाठविण्याची चोरी असतां पत्रव्यबहार 
आपल्य़ा समाजांत चालूं नाहींत काय १” 


५: ते आहेतच. ” 


: घ्रेमाचा उद्भव झाला म्हणजे प्रेम अडचणींतून मागग काढते आणि 
आत्मविकहास करून घेत. पण प्रेम उद्भवळेंच नाहीं तर प्रेमामुळे जें काहीं 
अध्यात्मिक शिक्षण स्त्रीपुरुषानीं मिळवावयाचे ते मिळवाबयाचे राहून जात 
नाहीं काय? ” 

:< य्रेसाला तुम्ही अध्यात्म्याचे शिक्षण बनविता. इतक्या उच्च तर्‍हेनें 
प्रेमाची वाखाणणी तुम्ही प्रेमाचा अनुभव घेतल्याशिवाय केली नाहीं. खरें ना, 
हें शारदाबाई ? ” 

५ मी प्रेमाचा अनुभब घेतला आहे? छे, हें मुळींच ग्वरें नाहीं, ” 


“६ झारदाबाईू, तुम्ही प्रेमाची इतकी ठच्च तऱ्हेने थोरवी वर्णन करूं 
लागला, आपल्या आयुष्याची अशिश्षितता आणि व्यर्थेता बोळू लागलां, इतर 
सामान्य स्रियांना आपल्यापेक्षा अधिक अनुभवी वब त्यामुळें अधिक तुशिक्षित, 
आणि त्यामुळें अधिक भाग्यवान अस जे बोळूं लागला तें सर्व प्रेमाच्या नाग्रती- 
शिवायच काय ? हें सर्व बोलणें प्रेमामुळे ज्या भावना उत्पन्न होतात त्यांच्या 
पुस्तकी ज्ञानानेंच काय? शारदाबाई, हें मळा मुळींच खरं वाटत नाहीं-मला 
वाटते शारदाबाई, आपल्या मनांत प्रेमविकार जागत झाला आहे हें तुम्हीं 
लपवू इच्छिता. प्रेमविकार जाग्रत होणें ही गोष्ट अनुचित अर्से तुम्हीं समजतां 
आणि तो नाकबूल करतां; हें परिस्थितीचे दडपणच तुमच्यावर पडले भाहे. 
क्लिवांनीं परपुरुषांच चिंतन करूं नये, परपरुष्राविषयीं प्रेमविकार उत्पन्न होऊं देऊं 


२३५ शारदा आणि प्रियंवदा 
नये, मृत पतीलाच आपला पती समजावें, अन्य पुरुषाविषयीं प्रेम भावना जर 
मनांत उत्पन्न झाली तर ती इतकी लाजेची गोष्ट कीं ती तर कोठेंच बोलूं 
नये, या तऱ्हेची समाजांत जीं मते प्रचलित आहेत आणि ज्यांचें सुंदर 
शब्दानीं वर्णन धार्मिक काव्य-ग्रेथांतून येतें त्या कल्पनांच्या बाहेरून होण्याऱ्या 


दडपणामुळे तुम्हांस आपल्या अंतःकरणांत उत्पन्न झालेले प्रेमविकार नाकारण्याची 
प्रवृति होंत नाहीं काय? तुमचे वैजनाथशार्त््यावर प्रेम नडलें नाहीं काय? ? 


6 वेजनाथशार््यांविषयीं मला काय भावना वाटते तिचें मला पृथक्करणच 
करता येत नाहो -- पण वैजनाथशास्तरयांसंबंधाची माहिती तुला कोठून ! 


५: दाष्दाला ग्हणजे डा. भुसकुऱ्यांना हरिभय्याचे पत्र आलें; त्यांत 
हरिभय्यानें आपला बिंत्राबाईशीं पुनर्विवाह होणार हें कळविलें; आणि एंक 
मोठा गाजेल असा पुनर्विवाह, आणि तो वैजनाथशास्त्री आणि शारदाबाई यांचा 
कदाचित्‌ होईल म्हणून लिहिलें आहे. ” 

: हुरिभय्याला एकादी स्त्री एस्वाद्या पुरुषाबरोबर फिरायला गेली ब बोलत 
बसली म्हणजे पुनर्विवाहच दिसणार, बिंबाबाईलाहि आमच्या एकत्र बोलण्यांत 
पुनर्बिबाह दिसूं लागला, ” 


: तर मग तुमच्या मनांत वैजनाथशारूयाविषयीं कोणती भावना उत्पन्न 
झाली ? 

५८ तीच मळा कळत नाहीं -- मला प्रथमतः आदर, दया ही उत्पन्न 
झाली, या सशोधकास अन्नपाण्याच्या सोईवांचून दिवस काढावे लागतात याबद्दल 
दुःख वाटलें आणि आपण यांची चांगली काळजी घ्यावी असें वाहूं लागले, 
आणि ते जरी मजपेक्षां वडील आहेत तरी त्यानां लहान मुलगा समजून त्यांच्या 
सुखाकडे लक्ष द्यावे असें वाटूं लागलें -- म्हणजे थोडक्यांत सांगावयाचे 
म्हणजे मातृत्वाची भावना उत्पन्न झाली. स्त्रीपुरुषांतलें जे संभोगध्येय प्रेम असतें 
तत्सहद भावना उत्पन्न झाल्या नाहींत ; प्रेम हा शब्द ज्या अर्थानें वापरला 
जातो त्या अर्थाचे प्रेम उत्पन्न झालें नाहीं, ” 


गोडवनांतील प्रियवदा २३६ 


न्याल जड कनतााजा -ापा यासा --.- ----.-:::4-२-->-----: ----:-पपणपप"- --ऱ-------->>:->--->-<॥-ा-८८277710000._्ययकळकजक 


“ शारदाबाई, तुमच्याशी या विषयावर बोलतांना मात्र मी अधिक 
सुशिक्षित आहे असें मला वाटूं लाग आहे. उत्कट प्रेम करणाऱ्या पत्नीच्या 
ठायीं मातृत्वाची भावना किती तीत्रत्वानें जागत असते ही गोष्ट प्रत्येक स्त्रीच्या 
अनुभवाची आहे. जुन्या संस्कृत कवीनांही या स्रीस्वमावाचा अनुभव आल्या- 
शिवाय कां ' भोज्येषु माता शयनेषु रंभा * ही ओळ त्यांच्या लेखणींतून बाहेर 
पडली ? 


: हुं पहा, मातृस्नेह वाटणें हे वेवाहिक प्रेमाचा भाग आहे ही गोष्ट 
माझ्या फारशी लक्षात आली नाहो, पण तुझ्या बोलण्यावरून असें दिसते कीं 
या गोष्टीची जाणीव सवे लोकांस असली पाहिजे. ” 


“: त्र मग आतां पुढचा कार्यक्रम काय ! ” 
“ ुढर्‍या कार्यक्रम कसला आला आहे ? ” 


“ म्हणजे तुमची भावना, तुमचे उत्कंठित झालेलें मन हीं सव वैजनाथ- 
शास्त्र्यांच्या लक्षांत आलीं आहेत कीं नाहींत ! त्यांनां तुजभद्दल कांद्दीं प्रेम 
उत्पन्न झालें आहे कीं नाहीं? ” 


५ झला त्यांच्या मनाची मुळींच माहिती नाही. ” 


“ शारदाबाई, हें सवे तुमर्चे करणें अप्रयोजक आहे. जर पुरुषाविषयीं 
स्रीच्या मनांत प्रेम उत्पन्न झाल असेल, आणि स्त्रीला जरी ते शाब्दांनीं व्यक्त 
करणें लोकरीतीच्या दृष्टीने अयोग्य असले तरी तीच गोष्ट अनेक क्रियांनी व्यक्त 
करणें स्त्रीचे कतव्य आहे. पुरुषांस देखील त्यांच्यावर प्रेम करणारी स्त्री मिळणें 
सोपें आहे काय! स्वतःचे प्रेम व्यक्त करणाऱ्या स्त्रियांस यूरोपांत लाघवी 
समजतात आणि स्त्रीने पुरुषांस आपल अंतःकरण मोकळे करणें हे गैर समजतात, 
पण हे जे सवे विधिनिषेध झाळ आहेत ते सामान्यांसाठी आहेत. तुमच्या- 
सारख्या क्रषितुल्य स्त्रीपुरुषांसाठीं खास नाहींत. पुरुष हा पैशाचा ठेवा किंबा 
स्रीचं उदरपोषण करण्यास साधन अशी ज्या व्यवहारांत कल्पना आहे, त्या 
व्यवहारांत स्त्रियांनी लगट करणे म्हणजे आपले उदरपोघण त्यावर लादण्याचा 


२३७ शारदा आणि प्रियवदा 
प्रयत्न करणें आहे. पण येथें तशी गोष्ट नाहीं. तुम्ही स्वतःचे उद्रपोषण 
करण्यास समर्थ आहांत आणि कदाचित त्याचेंढि उद्रपोषण करून लांनां 
ऐतिहासिक संशोधन करण्यास त्यांस अधिक समथ कराल, आपल्या महाराष्ट्रात 
शास्त्रसंवधन, इतिहास संशोधन इत्यादि क्रिया करण्यास द्रव्याचा अभाव आहे, 
अशा प्रसंगीं असल्या कामात गंतलेल्या पुरुषांविषयीं प्रेमादर उत्पन्न होऊन 
त्याच्या रक्षणासाठीं मातृत्वाच्या भावानें युक्त असें प्रेम उत्पन्न झालेल्या महा- 
राष्ट्रीय स्त्रिया त्यांच्याशीं विवाहास प्रवृत्त होतील तर त्या स्त्रियाविषयीं येथील 
स्रीवर्गास अभिमानच वाटेल, प्रसंगीं जगातील सुखाची आश्या असलेल्या 
आम्ही, तुम्हांस सुशिक्षित व संपन्न विधुरांची मागणी येण्याचा संभव असल्यामुळे, 
तुम्ही संपत्तीत रहार्वे असें वाटून, तुम्ही त्या जोगड्याबरोबर लग्न कशाला लावतां 
असेंहि बोलूं, पण तुम्ही आमचा उपदेश दुलक्षिळा याबद्दल तुमच्याविषयी 
आमच्या मनांत आदरच राहील, ” 


“प्रियेवदे, तुला टवाळ मुलगी ग्हणू , कीं प्रेमाची भाष्यकार म्हणूं ! 
तुझें हें बोलणें हृदयातून आहे कीं दुसरीला बनवून तिची मौज करावी या हेतूनें 
आहे, हें मला कांहींच कळत नाहीं, ? 

: शारदाबाई, मला टवाळकी करण्याची थोडीशी आवड आहे हें मी 
नाकबूल कर्से करूं ? पण हेंहि लक्षांत ठेबा कीं, स्त्रीचा प्रेमाचा विषय मी 
टवाळी'चा कधींहि करणार नाहीं -- मला इतके त्याचे पावित्य वाटतें. त्या 
विषयावर ज मी बोलेन तें गंभीरपणानेंच बोलेन, नवरा उपयुक्त कामात गुंतला 
असतां बायकोने काम करून दोघांचेहि पोट भरण्यास तयार व्हावें हें मी कुढुंबास 
कमीपणाचे मुळींच समजत नादी. तुला आता खरें सांगायला हरकत नाहीं, 
सध्यां मुलींच्या शाळेंत मी जी नोकरी केवळ करमणुकीसाठी पत्करिली म्हणून 
जो बोभाटा करविला आहे, तो अजिबात खोटा आहे. ती नोकरी मी केवळ 
पेशासाठींच करीत आहे. माझ्या रामचंट्राला तेथे अगदीं काट फसरीनें रहाण्याला 
देखील कमींत कमी दीडरो रुपये महिना खचे येतो. मी जे येथ पन्नास रुपये 
नोकरी करून मिळवितें ते खरोवर माझ्या रामचंद्रासाठींच आरेत; त्या पैशाचा 


गोंडवनांतील प्रियंवदा २३८ 


नट*प-ब--०८५०*०० पापा 00 >> न स--- --_ ---> प --- -:---:-:--:-----०-- 


माझ्या रामचेद्राला उपयोग आहे आगि हे सासूबाइंनाहि ठाऊक आहे, पण जणू 
काय मला हे ठाऊकच नसावेसें मी दाखविते. मी पगार सासूबाईंच्या हातीं 
आणून देते. आमचा घरचा खच पन्नासच रुपयात चालतो आणि त्यामुळें 
मामंजीनीं ज्या प्रमिसरी नोटा घेऊन ठेवल्या आहेत त्यांचे सव व्याज तिकडे 
पाठवावयास सांपडतें. ” 

“ तूं नोकरी करतेस हे राममाऊला ठाऊक आह काय? ” 


त्यांनां मी शिकवावयास जाते हें ठाऊक आहे, घरीं असून राहण्याचा 
कंटाळा येतो म्हणून मी नोकरी करण्याची सबब लिहिली, आणि तीच सबब 
सासूब्राईनाहि सांगितली आणि शिकवायला जायला सासूबाईची परवानगी 
मिळाली, मला पगार मिळतो की काय हे माझ्या रामचंद्राला काहींच लिहिले 
नाहीं, ” 

“पण ही छपवाछपबी नव्हे काय ? ” 

“ ब्रायको मेहनत करून आपल्याला पैसे पाठविते हे माझ्या रामचंद्राला 
समजलें तर आपल्या सापत्तिक स्थितीबद्दल त्यास फार दुःख होईल, म्हणून मी 
मुद्दाम सत्य लपविले आहे, ” | 

“सत्य लपविणें तूं योग्य समजतेस काय ! तुझा हेतु चांगला आहे, 
पण तेवढ्याने लपंडाबाचे समर्थन होईल काय हें मला सांगतां येत नाहीं, ” 


: बाई गे, ताच्विक सत्याची अभिमानी मी कोठें आहे ? मला तत्यवत्तो- 
पणापेक्षां माझ्या रामचंद्राचे सुख ही अधिक महत्त्वाची गोष्ट वाटते. मी 
कबूल करतें कीं, सत्यासत्यतेचा तंतोतंत हिशोज करणाऱ्याच्या दृष्टीनें मी असत्य- 
वादी आई व कदाचित्‌ पापीहि असेन, पण मला तितकी पापाची तरी पर्वा 
कोठें आहे?” 

५ ट्रियवदे, मी तुला मुळींच दोष देत नाहीं, माहे अंतःकरण विचार- 
शील तर तूं जे करतेस तें योग्यच आहे असे मला तें सांगेल, पण नीति- 
शास्त्राच्या दृष्टीने मी विचार करूं लागळे म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी अतत्य 


२३९ शारदा आणि प्रियंवदा 


पपप कण शण 0 शी 0? 0) 00 शण णी शण)? "टा 


आणि लपंडाव द्दी योग्य आहेत काय असा जर कोणी तास्विक प्रश्न केला तर 
नी तिद्यास्त्रवेत्त त्या परिस्थितींत तरी असत्य योग्य धरतील काय असा मनांत 
विकल्प उत्पन्न होतो. माझ्या नीतिशास्त्रविषयक कल्पना अलीकडे सामान्यतः 
समाजापासून अलिप्त राहिल्याने पुस्तकी बनू लागल्या आहेत. आणि त्यामुळें 
मी संदेहांत मात्र पडतें, ” 

“ कांहीं असो, मी नीतिशास्त्राचा तात्विक दृष्टीने विचार करूं शकत 
नाहीं, नवरा जेवीत नसला आणि चहा घेत असला तर त्या चहांत अधिक दूध 
मिसळून देणें, आणि चुकून पडलें म्हणून सागणे; जेवावयाला बसला म्हणजे 
हातून त्याच्या ताटात जास्त तूप पडू देणें, ब तें चुकून पडल्याचे ढोग करणें 
या गोष्टी आई आणि सासू या दोघींपासून शिकले आहे, आणि मला त्यांत 
लबाडी वाटेनाशी झाली आहे. नाहीं तर हे पुरुष काय करतात, आपल्याला 
आणि बायकाना सारखें खायला मिळावें म्हणून आग्रह धरतात आणि मला तूप 
इतकेंच पुरें म्हणून सांगतात, अर्थात आम्हांठा थोडीशी बायकी हुझारी 
लढवावी लागते, ” 

५ प्रियेवदे, मला असें वाटतें कीं मुलावर प्रेम करणाऱ्या आईचें, किंवा 
नवऱ्यावर प्रेम करणाऱ्या बायकोचे वर्तन त्याच्या बोलण्याशीं विसंगत आहे काय, 
असल्यास त्या दोषी आहेत काय १? याविषयीं सामान्य नीतिशास्त्राचे सिद्धात 
लावून उपयोगी नाहीं, किंवा लावावयाचे झालेच तर त्या मताला प्रत्यक्ष अनु- 
भवाची जोड मिळून मर्यादा उत्पन्न झाल्या पाहिजेत, ” 

: बुरे तें असो; आतां वैजनाथशास्त्री कोठें आहेत? ” 

: कोठें आहेत तें मला माहीत नाहीं. मी त्यानां त्यांचा पुढचा कार्यक्रम 
विचारला तेव्हां मी प्रथम नागपूरला जाऊन पुढें दुसरें कोठेंतरी जाईन एवढेंच 
त्यानीं सांगितर्ले. ” 

: ते नागपूरला आले होते, आणि आमचे वधु डो. भुस्कुटे आणि 
आमचे दिनकर भावोजी हे त्यानां मेटावयाला गेळे होते, व आमच्याकडे एक 
दिवस जेवावयाला या म्हणून आमंत्रण करण्य़ासहि गेळे होते. ” 


गोंडवनांतोल प्रियंवदा २७० 

: मृग ते आळे काय? ” 

५ छे, व्याख्यान देण्याचें त्यानीं नाकारले. ते म्हणाले ' व्याख्यान देण्याचा 
उपयोग काय १? कोणी एखादा वर्ग संघटित होऊन कांहीं काये करणारा असेल 
तर त्यांनां व्याख्यान देण्याचा उपयोग. ' तर मग दिनकर भावोजीनीं आमच्या 
आखाड्यांत या म्हणून सांगितलें, तेव्हां ते आखाडा पहावयास गेले, तेथे 
आखाड्याचे चालक एक पुण्याहून आलेले होते, ते लाठीओथाटी शिकवून 
हिंदुस्थानाला स्वतंत्र करण्याचा मागे आपण कसें आचरीत आहोंत म्हणून 
सांगत होते. तेव्हां वेजनाथशास्त्रो ' तुम्ही शरीरसंपादनासाठीं लाठीबोथाटी 
चाळू ठेवा पण त्यानें स्वराज्य मिळणार अशी जर तुमची कल्पना असेल तर 
तुम्ही वेडे आहांत ? असें म्हणाले आणि तेथें शास्त्रीबोबांचें वस्तादजींशीं भांडण 
लागलें -- बेरें तें असो, तुम्हीं वेजनाथशास्त्र्यानां आपल्या मनांतील भावनांचा 
भावनांचा पत्ता लागू दिला काय? ” 


“६ झी त्याच्याविषयीं उत्पन्न झालेली स्नेहबुद्धि त्यांस दाखविली नाहीं 
असें नाहीं, मी त्यास रायपुरास आहात तोपर्यंत माझ्याकडे किबा बिंबाबाईकडे 
जेवायला या म्हणून आग्रह केला, पण त्यानीं त्याची आवड्यंकता नाहीं म्हणून 
सांगितलें, मी नंतर त्यांच्यासाठी लाडू करून त्यांच्याकडे फराळासाठीं पाठविले, 
ते त्यानीं घेतले, पण तुम्हाला त्याच्यासाठी फार स्वच पडला असेल तर त्यासाठीं 
दोन रुपये घ्या म्हणून त्यानीं दोन रुपये पाठविले, ” 


६ हु जिंत्राबाईला कळले काय? ” 

“ तिला तें कळल्यावांचून राहिले नाहो. ” 

“ ती काय म्हणाली १” 

: ती कांहीं विशोष बोलली नाहीं पण तिच्या एकंदर वर्तनावरून असें 
दिसले कीं ती मला आपल्यापेक्षा कमी समजते. तित्म असें वाटतें कीं पुरुषाशी 


कसें वागावें, त्यांनां आपल्याकडे कसें बळवून घ्यावें या गोष्टी मास्तरीणबाईनां 
समजत नाहींत, ” 


२७१ शारदा आणि प्रियंवदा 

: शारदाबाई, जिंबाबाईच्या या प्रकारच्या समजुतीचा तुम्हीं आपल्या 
मनावर परिणाम होऊं देऊं नका. आपलें गरीञाचे लग्न कसें होईल या 
फिकिरींत पडलेला हरिभय्या --याला वश करून घेणें आणि वेजनाथशास्त्रया- 
सारख्या जगाकडे तुच्छतेने पहाणाऱ्या आग्रही विद्रानास आपलासा करून घेणें 
या गोष्टी सारख्याच भाहींत. जर तुम्ही त्यास आपल्याशी लग्न कगवयास लावले 
तर तो स्त्रीजातीचा मौ विजयच समजेन, ” 


€ स्त्रियांनी लगट करून पुरुष्राला आपल्या जाळयात ओढणें ही गोष्ट 
योग्य आहे काय!” 


“ मला तर गेर वाटत नाहीं, जगातले पुरुष आहेत कोणाताठीं ? बायका- 
साठींच आहेत ना?” 


ट्ट मग १ ?) 
“ जगांतट षि १) 
जगांतल्या पुरुषी बमंशास्त्रीय कल्पना झुगारून द्या, 


€ प्रियंवदे, मला गेल्या दोन तीन दिवतात असें वाटूं लागळे आहे कीं, 
तुझ्या मानसिक स्थितींत फरक पडूं लागला आहे. तूं स्त्रियांचे हक्क इत्यादि 
गोष्टी पूर्वी बोलत नव्हतीस, ” 


: मला उलट असें वाटूं ढागलें आहे कीं, तुमच्याच भावनात वेजनाथ- 
शास्त्रयांची ओळख झाल्यापासून फरक पडूं लागला आहे, तुम्ही नाकारता 
पण जगांतील तात्विक दृष्टीनें विचार करून दोष काढण्याकडे जी तुमची वृत्ति 
होती त्यापेक्षां आज तुमच्या ठायौं अधिक कोमल वृत्ति उत्पन्न झाली आहे. 
तुम्ही लबाड सुथारकांनां चाबकाने बडविण्याची भाषा या वेळेस बोलत नाहीं. ” 


येथ हें सांगितलें पाहिजे कीं ज्ञारदाबाईंच्या शेकेत कांदीं सत्य होतें. गेल्या 
तीन वर्षात प्रियंवदेच मन आणि भावना ही रामभाऊ गेला त्यावेळेस होत्या 
तश्वाच ' अगदीं गोड * राहिल्या असें सांगणें म्हणजे जगाचा क्रम प्रियेवदेच्याच 
बाबतींत निराळा झाला असें होईल, आणि प्रियंवदा मात्र अगदीं गोड राहिली 
असे आर सारितळे तर ती आमची काढंब्ररीची नायिका म्हणन ती गोड 


गोंडवनांतील प्रियंवदा २४२ 
राहिली असे स्पष्टीकरण द्यावें लागेल, शारदाबाईस या वेळेस भेटणारी प्रियेवदा, 
थोडीशी चिडखोर, बरीचशी एखाद्या गोष्टीवर वारंवार विचार करून सामान्य 
दुःखे कल्पनेनें वाढविणारी, थोड्या गंभीर वृत्तीची अशी झाली होती, पण तिची 
स्वाभाविक आनंदीवृत्ति नादींशी झाली नव्हती, नबऱ्याच्या जाण्याचें गडबडीचें 
तिचे दिवस काहीं अंशीं नवर्‍याला निरनिराळे कसे कसे अनुभव येतील, नवरा 
आपणांस काय लि १ल, आपण त्यास काय लिहूं इत्यादि कल्पना करण्यांतच गेलें. 
पहिले पांच सहा महिने विलायतेच्या अनुभवाविषयी नवऱ्याला अनेक कुतूहल- 
मय प्रश्न विवारण्यात, नवऱ्याच्या प्रत्येक हालचाली सासूज्ाईस समजावून 
सागण्यात गेले. याच कालांत प्रियेबदा इंग्रजी कादंबऱ्या निराळ्या दृष्टीनें बाचूं 
लागली. मेफेअर, साऊथ केन्झिगटन, रीजंट्स पाके इत्यादि स्थानें तिला 
अधिक ठाऊक झालीं. लंडनचा एक नकाशा तिनें नवऱ्याकडून मागविला 
होता. त्यात निरनिराळे पाक हिरव्या रंगाने दाग्यवविळे होते. तिकडे नवरा 
अमुक रस्त्याने गेला असेल इत्यादि कल्पना करण्यात काही महिने गेल्यानंतर त्या 
विषयाचाहि तिळा वीट आला, आणि तिला रोजचा कार्यक्रम कंटाळवाणा भासू 
लागला, रोज उठावयाचे, नित्यविधि करावयाचे, दिनकर भावोजीस जेवण 
करून द्यावयाचे, कसा तरी दिवस घालवावयाचा, जें पुस्तक हाताशीं येईल तें 
बाचावयाचे इत्यादि गोष्टी करूनहि तिचा वेळ जात नसे. नवऱ्याची आठवण 
करून सवे वेळ घालवावयाचा हें राक्य तरी करस आहे? 

प्रियवदेळा ज बराच काळपर्यंत रिकामयण मिळाले त्या वेळात तिचे डोके 
नेरेंच चाळू लागळे,. ' स्त्रियास अन्याय फार होतो, जे धमेशास्त्राचे किंबा 
नीतिचे नियम तयार झाले आहेत ते जरेच पुरुषी आहेत ' इत्यादि भावना 
तिच्या मनांत जोरानें संचार करूं लागल्या, आणि त्यावेळेस जर नागपुरास 
स्त्रियांचा अभिमान बाळगणारें वतमानपत्र चाळू असतें तर लोकांच्या मनाला 
धक्का देणारे अनेक विचार तिच्या लेखणींतून बाहैर पडले असते, 


“८ माझ्या मनांत फारसा फरक झाला नाहीं, ” शारदाबाई म्हणाल्या, 
:: नुसेळ झाला पग जगाकडे पहाण्याच्या भावनेंत खास झाला आहे, ” 


2-० क फाकटापप्टशापालापग न्न >>> 


२४२३ शारदा आणि प्रियंघदा 


५ माझ्या भावनेत झाला आहे कीं नाहीं हे मला सांगतां येत नाहीं पण 
तुझे डोके काहीं तरी निराळे विचार करीत आहे असं मला वाटतें, ” 

“ तें अगदीं खरें आहे, माझ्या मनांत फारच फरक पडला असावा 
अशी मलाच ठोका येते. स्त्रियांच्या कार्यासंबंधानें माझ्या मनांत पुष्कळ 
निरनिराळे विचार जाग्रत होत आहेत. पुष्कळदा मी पहाते कीं स्त्रियांच्या 
गर्भाशयास क्षेत्राची उपमा लोक देतात, जो शोताचा मालक आहे त्यानेच 
कोणत्या प्रकारचें बीं शोतात पेरावयाचे हें ठरवावयाच कीं बियांच्या मालकाने 
शेत शोधावयाचे ! जगांत काय प्रकार चाळू आहे! ” 

:: ब्रियांचा मालक काहीं शोत शोधीत नाहीं. 

“ ल्म स्रोखर पुरुषाच्या इच्छेने न ठरतां बायकांच्या इच्छेने ठरलीं 
पाहिजेत आणि यासाठीं बायकांच्यातर्फे वरशोधनाची पद्धति मला, पुरुषांनी 
: प्रपोज ' करण्याची वाट पहात बसण्यापेक्षा अधिक योग्य वाटते. ” 

“ घण ही लहान मुलीच्या बापाची गोष्ट झाली ; मोठ्या जरायकांनीं काय 
करावें? ” 

“ आपल्याला जो पुरुष आवडतो तो पकडण्याचा निकरानें प्रयत्न करावा, 
जै फळ हातीं येईल ते येईल. वैजनाथशास्त्री पुनर्विवाहास अनुकूल आहेत 
क! य , 2. 

“ वेजनाथशास्त्र्यांचे पुनर्विवाहाविषयीं मत कसें काय आहे कोण जाणें -- 
पुनर्विबाहाच्या प्रश्नास प्राधान्य जे रानडे वगेरे मंडळी देतात, त्याबद्दल अत्यंत 
तुच्छतेचें उद्गार त्यांनीं काढले, ते म्हणाले ' इंग्रजांचे राज्य घालवून देण्यासाठीं 
सर्व प्रकारची शास्त्रीय जोपासना करण्याऐवजी तो महाद्या पुनर्विवाह लावीत 
बसला आदे, ? ” 


“६ घाबरून तुम्ही काय नि्णेय काढाल! *' 


:: वैजनाथशास्त्री पुनर्विवाहाच्याविरुद्धच असतील असा निर्णय काढीत 
नाही. निदाम मी त्यांची पुनर्बिवाहास अविरुद्धता केवळ कल्पितहि असेन. 


गोंडथनांतील प्रियंवदा २४४ 


पण त्यांच्या बोलण्यावरून राष्ट्रास कोणती चळवळ अवदय आहे याविषयीं यांचें 
मत त्यांनीं व्यक्त केलें. पुनर्विवाहाच्या युक्तायुक्ततेवर मत त्यानीं दिलें नाहीं, ” 

“ राष्ट्रास पुनर्विवाह अवशय आहे किवा नाहीं हें सांगण्यास स्त्रियांस 
अधिक अधिकार आहे, पुरुषांस नाहीं. मी वैजनाथशास्त्र्यांप्रमाणें इतिहासश 
नाहीं, पण मला त्याबद्दल फिकीरहि वाटत नाहीं. त्यांनां ठाऊक काय असतात 
तर पुरुषी इतिहास, या पुरुषी इतिहासांत सत्य काय असतें ! माझ्या मनात 
अनेक विचार येतात पण ते पद्धतशीर मांडण्याची विद्वत्ता मला नाहीं. तुम्ही 
विद्रान आहांत; तुम्हीं माझे बिचार जास्त चांगलें मांडूं शकाल पण मला काय 
वाटतें तें सागतें. राष्ट्र म्हणजे बायका. पुरुष नव्हे. राष्ट्र्रक्षण ग्हणजे 
बायकांचे रक्षण; पुरुपारचें रक्षण नव्हे, राष्ट्रांतले पुरुष नाहींसे झाले तरी 
थोडक्या पुरुषांच्या साहाय्यानें अनेकपत्नीपद्धति सुरू करून किंबा बायकी भार्षेत 
ओोलावयाचें झाल्यास सामुच्चयिक पतिपद्धति सुरू करून एका पिढींत पुन्हां राष्ट्र 
गजबजवितां येईल, पण राष्ट्रातल्या बायकाच नाहींशा झाल्या ग्हणजे राष्ट्र 
गेलेच, यासाठीं राष्ट्रांतल्या क्ीवर्गानें समाजसंरक्षण हे आपलें कर्तव्य म्हणून 
स्वीकारले पाहिजे. पुरुष हें धमशास्त्राचे प्रश्न सोडविण्यास अगटी नालायक 
आहेत आणि याचें मुख्य कारण ते पुरुष आहेत हें होय. एखाद्या जमिनीचा 
विशिष्ट ती पेरण्याकडे उपयोग करावा, कीं करूं नये हें ज्याप्रमाणें जमिनीच्या 
मालकाने ठखावयाचें असतें, ब्रियांच्या व्यापाऱ्याने ठरखावयाचें नसतें 
त्याप्रमाणें प्रजोत्पादनाचा प्रश्न केवळ स्त्रियांनी आपल्या इच्छेने सोडवावा, 
विवाह आणि प्रजोत्पादन या विषयीं झालेले सर्व पुरुषी नियम व्यर्थ आहेत.” 


“६ प्रियेबदे, तुझं मत कोणीकडे वहावत जात आहे? ” 


“ कोणीकडेहि वहावत जाईना, तें बहावत तसें जाऊं देण्यास कोणती 
हरकत आहे ! तुम्हांला ज्या मताकडे मार्झे तत्व वहावत जाईल अशी भीति 
वाटत असेल त्या विषयावरच बोलते. स्त्रियांनी लग्न न लावतां प्रजोत्पत्ति 
करण्यास सुरवात केली तरी ती गोष्ट तत्वतः चूक नाहीं असें मी म्हणेन, लम 
म्हणजे कॉय, तर अपत्याची जबाबदारी पुरुषावर टाकायची पद्धति, ” 


२४५ शारदा आणि प्रियंवदा 
: चुरें तर प्रियवदे, रामभाऊ इंग्लंडला गेला आहे. क्षेत्राची मालक 
तू आहेस तर तुला वाटेल ती मोकळीक आहे काय? ” 


: मुळींच नाही. मी लम केळे आहे, लम केले नसते तर माझ्य़ा 
तत्त्वाप्रमाणे मला मोकळीक असती. त्या तत्त्वाप्रमाणे वागण्याचे धेय मला 
असतें कीं नसतें ही गोष्ट निराळी, ” 


५ प्रियेवदे, तू॑ अगदी चहाटळ झाली आहेस, ” 


“ शारदाबाई, लग्न झालेल्या बायका किती चावटपणाच्या गोष्टी बोलतात 
याची तुला माहिती नाहीं. मी बोलतें ते॑ तुला जरी चावटपणाचें वाटलें तरी 
तत्त्व स्पष्ट मांडण्यासाठीं मी बोलत आहे. माझें म्हणणें हेंच आहे कीं, राष्ट्राचे 
रक्षण होणें, किंवा राष्ट्र नष्ट होणें ही गोष्ट स्त्रीसंख्येवर आहे, पुरुष संख्येवर 
अवलंबून नाहीं. आणि राष्ट्रश्षण, जातिरक्षण इत्यादि गोष्टीस जर अधिक 
महत्त्व असेल, तर प्रजोत्पाजन ज्या स्त्रियांना करावे लागणार त्यांनां नी तिनियमांनीं 
बद्ध करण्याचा अधिकार पुरुषांस पोंचतच नाहीं, राष्ट्राची लोकसंख्या वाढ- 
विण्याची शक्ति स्त्रीसंख्येवर व त्यांच्या विवाहित स्थितीवर अवलंबून राहणार, 
तर ज्या पुरुषांचे राष्ट्रसंख्यावधेनांतील काये अप्रधान आहे त्यांनीं नीतिनियम 
उत्पन्न करावेत हा कोणता न्याय ? ” 

€ प्रियंबदे, तूं जें बोलतेस ते थोडेसे पटते, पण ते पटते असें कबूल 
करण्यास धैय होत नाहीं, ” 

“ शारदाबाई, मी तुमच्यासारखी विद्वान नाहीं. पण मला असे वाटतें 
कीं बायकांनीं आपलें धमेशाळ्त आपल्या इच्छेनेच तयार करण्याची वेळ आली 
आहे. जो पुरुष आवडला त्यास आपलासा करण्यासाठीं किंबा जो आपला 
नवरा असेल त्याला आपल्या हातांत . ठेवण्यासाठीं स्त्रीनं जर कांहीं खटपटी 
केल्या तर त्यांस मी मुळींच गेर समजत नादीं. विधवा आणि कुमारिका हे 
मेद मी मुळींच मानीत नाहीं. जिला नवरा आई, आणि जिला नवरा नाहीं, 
ह दोनच भेद आहेत. जिला नवरा नसेल तिनें इच्छा असल्यास तो 


गोंडवनांतील प्रियंवदा २४७६ 


मिळविण्याचा प्रयत्न करावा असे माझे मत आहे. मौ तुम्हाला आतां एवढेंच 
म्हणतें कीं तुम्ही वैजनाथशास्त्र्यांनां पकडलेंच पाहिजे. ” 


६: घण ते कसें करावयाचें ? ” 


“तें मी तुमच्यावरच सोंपवि्ते. एका बाईचा सहा दुसरीला उपयोगी 
पडणार नाहीं. मी पुरुषांची कल्पना माझ्या रामचंद्रावरून करणार, आणि 
रामचंद्र व वैजनाथशास्त्री या दोन अगदीं मिन्न प्रकृती आहेत, ” 


“ त्री कांहीं सामान्य गोष्टी निघतीलच, ” 


“ तर मग एवढेंच सांगते कीं तुमची आठवण त्यानां नेहमी राहील अर्से 
करा, पत्रव्यवहार ठेवा. इतिहासतत्त्वाच्या अभ्यासासाठी पाहिजे तर तो असू 
द्या. अनेक शंका विचारा. त्यांना बादात जिंकल्यासारवे करूं नका, उलटा 
स्वतःचा पराभव करून ध्या, त्यांच्याकडून शंकासमाधान झाल्यासारखे दाखवा, 
तथापि पत्रांत त्यांनां प्रकतीची काळजी घेण्यासाठीं लिहा, त्यांची जेवण्याची 
सोय नीट नसते त्याबद्दल तुम्हांस अ दुःख वाटतें तं त्यांना दिसूं द्या. आणि 
एखाद्या दिवशी त्यांनीं आजारी पडल्याची बातमी दिली म्हणजे चटकन त्यांच्या 
गांवी समाचाराठीं किंबा शुश्रेष्रसाठीं जा. वैजनाथशारूयांस लोक विद्वान्‌ 
म्हणतील पण त्यांच्या नित्य जेवणाची सोय कोठें होत नाहीं हें त्यांस ठाऊकच 
आहे, अशा वेळेस तुम्हीं त्यांच्यासाठी इतकी फिकीर दाखबितां तिचा परिणाम 
त्यांच्या मनावर झाल्याशिवाय रहाणार नाहीं.” 


प्रियंबदेचा हा अनुभवपूर्ण सहा शारदाबाईनीं ऐकला काय ! तो सल्ला 
वैजनाथद्यारूयातारख्या व्यक्तीच्या वाबतींत उपयोगी पडला काय ते पाहूं 


२४७ वैजनाथ शास्त्री 


प्रकरण २१ व 
वैजनाथक्यास्त्री 


वेजनाथशास्त्री धुळ्याचे हे केवळ नावाखातरच होते. त्याचे कॉलेजचं 
शिक्षण झाल्यानंतर बरे बरीच वर्षे पुणें व मुंबई येथेच असत. पुण्यातल्या एका 
स्वार्थत्यागी शिक्षण संस्थेत त्यांनीं वर्ष-सहा-महिने नोकरी केली होती पण तेथें 
देखील त्यांची वागणूक स्वैरपणाची होती. वचक जबरा असे. इतर मास्तर- 
मंडळींत फारसें न मिळणारे असे ते त्यावेळेसच होते, आणि याचे कारण शिक्ष क- 
वगे पोटभरू आहे, ज्ञानसंवधेक नाहीं अशी त्याची समजूत होती हें होते. 
त्यांनां आपण इतरांपेक्षा डउन्च आहों ही भावना फार लहानपणापासून असे. 
त्यांचे इतिहासशास्त्रज्ञ म्हणून नांव होण्यापूर्वी देखील आपण इतरापेक्षा शहाणे 
आहोंत म्हणून त्यांनां भावना असे, ते कलिजांत असतां गणिते तर त्यांनीं 
अनेकदां अशी सोडविलीं कीं प्रोफेसरला सोडविता आलीं नाहींत. एवढेंच नव्हे 
तर त्यांच्या यूरोपियन प्रोफेसरला त्यांच्याइतक्या मार्मिकपणानें इंग्रजी कविता 
वाचतां येत नाहीं असे त्यांस वाटत असे. 


इंग्रज प्रोफेसरास इंग्रजी भाषा तरी आपल्याइतकी समजते किवा नाहीं 
असा संडाय त्यांस येत असे, पाणिनि ज्याला समजला त्याला व्याकरणदास्त्र 
समजटें, आणि त्यानें तें शास्त्र इंग्रजी भाषेच्या अभ्यासाला लावलें म्हणजे तो 
अभ्यासक सध्याच्या गचाळ इंग्रज प्रोफेसरापेक्षां खात्रीने अधिक जाणता होईल; 
आणि ज्याअर्थी वेजनाथशास्त्र्यांस पाणिनीने बापरलेलें व्याकरणशास्त्र अधिक 
समजत आहे त्याअर्थी त्यांस त्यांच्या इंग्रज प्रोफेसरापेक्षा इंग्रजी भाषेचे व्याकरण 
अधिक समजतें असें ते समजत. 


वैजनाथशास्त्री बी. ए. जरी झाळे होते, तरी त्यांस शास्त्रीबोवा म्हणत. 
आणि याचें कारण त्यावेळेस कालेजमध्यें जाण्यापूर्वीच त्यांना कोणी चेष्टेने शासत्री- 
बोवा हें उपपद लावलें होते आणि तें पुढें चाळूं राहिलें; आणि त्यांस तीच 
पढवी अधिक आवडे, त्यांचे लम झालें होतें. पण त्यांची पत्नी त्यांच्या 


गोंडवनांतील प्रियंवदा २४८ 


>>> 


बयाच्या पंचबीसाव्या वर्षीच वारली. पत्नीच्या दोवटच्या दिवसांत त्यांनीं तिची 
काळजी फारच ममतेने घेतली असा त्यांच्यावर आरोप आहे. तसेंच ते आपल्या 
पहिल्या पत्नीस फार प्रेमार्ने वागवीत होते असें ' मूर्वे ! लोक म्हणतात. पण 
तें शक्‍यच नव्हते. शास्त्रीबोवासारख्या इतिहास भक्तास स्त्रीवर प्रेम करण्या- 
इतक्या हलक्या कोटींतले ठरविण्याचा कोणा तरी पाजी लोकांचा हा नीच प्रयत्न 
असला पाहिजे !! एवढें खरें कीं त्याची पत्नी जेव्हा वारली तेव्हां 'मी 
आतां स्वतंत्र झालों ' असें त्यांनीं स्वतः उद्गार काढले होते. ते विधुर झाले; 

तेव्हां आतां तुम्ही दुसरें लम्न करा म्हणून अ्यांनीं त्यांनां उपदैदा केला त्यांस 
: तूं गाढव आहेस, तुला दुसऱ्यांच्या पंचायती कशाला पाहिजेत १ ' म्हणून 
त्यांची त्यांनीं संभावना केली ; शास्त्रीबोबंचे उपजीविकेचे साधन निश्चित 
असे कांद्दींच दिसत नव्हते ; त्यामुळें मुलींच्या बापांनीं त्यास आग्रहहि केला 
नाहीं, आणि त्यामुळें त्यांची पुढील विधुरावस्था सक्तीची होती किंवा खुशीची 
होती हेंहि सांगतां येत नाहो. त्यांस ती गेरसोयीची वाटत होती हें खरें, पण लग्न 
केलें तर जायको आपला किती तरी वेळ घरगुती गोष्टीकडेच लावील याची त्यांस 
धास्ती वाटे. त्यांची पेशाच्या दृष्टीने ' गैरसोय ' नेहेमी होतीच पण त्यांची 
शरीरप्रकृति मूळचीच कणखर असल्यासुळे ते अनेक अपेष्टांतेन देखील जिवंत 
राहिल. 


वेजनाथशास्त्रौ यांचा आणि शारदाबाईंचा विवाह झाला किंवा नाहीं या 
विषयींची उत्कंठा पुष्कळांना लागली असेलच, वाचकांनां ताटकळत ठेवण्याचे 
आम्हांत कारण नाहीं. शारदाबाई व वैंजनाथशास्त्री यांचा पत्रव्यवहार अनेक 
अनेक वर्षे चालू होता. शास्त्रीबोबा धुळ्यास होते, हातानें स्वयंपाक करतां 
करतां कंटाळले. स्टोव्ह, कुकर, केवळ दुधावर रहाण्याची पद्धति, केवळ 
फळें खाऊन रहाणें, या सर्वे क्रिया करून कंटाळले. त्यांनां कधीं स्वयंपाकाला 
बाईही ठेवतां येईना. बाई सड्या मनुष्याकडे स्वयंपाकास राहिली तर सर्वे गांबभर 
चेष्टा होणार आणि पुण्याचे इतिहासविषयावरचे टीकाकार ' अस्त्रायफट बाई 
स्वयंपाकाला ठेवणारे वे जनाथशास्त्री) असा उल्लेख करून त्यांचें इतिह्ाससिद्धांत 


२४९ वेजनाथक्ञास्त्री 


क टनली पपणापीणणपायीतील् जा पॅ?१0ण??0"ी0 टा पणाणी शाशी पीती अ 2 न्न न्न :-- -:- --:: 2 -र्‍पापशिणिएणीपशा पपप"? ?0े? 0 (शी? लणाणी ए*टलफशणी शशश ए0िहटीणॉर्ण0?0णिा 0 वीपशीशण 0) 0ी?0ीण 


खोडून काढणार, आणि तसा उछलाव करतांना ' स्वयंपाकाला ) या शब्दावर खाच 
देण्यासाठीं तो शब्द उलय्या स्वल्पविरामात लिहिणार इत्यादि गोष्टी बेजनाथ- 
शास्त्र्यांस दिसूं लागल्या; आणि शेवटीं आपल्या जेवणाची चागली सोय असल्या- 
शिवाय इतिहाससंशोधन अशक्य आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात चांगल्या तऱ्हेने 
आली, आपल्याला कोणी नाहीं, आपली फिकीर कोणी बाळगीत नाहीं, 
आपली किंमत जगास कळत नाहीं अशी जगाविरुद्ध त्याचीं तक्रार होतीच. 
शास्त्रीबोबास आपल्या कतेत्वाविषयीं गवे वाटत होता हा केवळ जनप्रवाद आहे. 
शास्त्रीभोबांस इतिहाससंतद्ध अनेक शास्त्राचे ज्ञान होते. मानवेतिहास, मानब- 
बंशक्षास्त्र, समाजरास्त्र, राजनीतिशास्त्र, प्राचीन लिपिशास्त्र ही शास्त्र ज्या 
प्रमाणे अवगत झोतीं त्याप्रमाणेंच भोवतालच्या समाजाचेह्ि त्यास ज्ञान होतें. 
भोंबतालचे लोक केवळ क्षुद्र जीव आहेत, त्याना समाजात प्रगतीचा अभाव 
आहे याची लाज नाहीं, आणि अशा आधुनिक जगांत शास्त्राची काळजी 
बाळगणारे, देशाच्या पारतंत्र्याबद्दल लाज वाटणारे असे आपण एकटेच आहोत 
ही वस्तुस्थिति आह अशी त्यांची पक्की खात्री झाली होती. भोंबवतालचा लोक- 
समाज आणि शास्त्रीबोबा या दोघामध्ये जे हें अंतर आहे त्याच्या ज्ञानास, 
म्हणजे केवळ समाजशास्त्रीय ज्ञानाच्या या अल्प अंशास भोवतालचे अज्ञामी 
लोक “ गर्व ! म्हणतात, हा केवळ अवलोकन दृष्टीनें उत्पन्न झालेला * भाषाभेद ? 
आहे असें त्यांस बाटत होते. आपली खरी किंमत जगास कोठे कळणार! 
सध्याचे सुशिक्षित महाराष्ट्रीय म्हणजे निव्वळ कारकून आदत ; प्रोफेसर तर 
इतके क्षुद्र जंतू आहेत कीं, त्यांस ज्ञानश्रद्धा म्हणजे काय हेंहि कांहीं कळत नाहीं, 
आपला अधिकार म्हंटला म्हणज बाजीराव, बाळाजी बाजीराव, मल्हारराब 
होळकर याचे कार्य पाहून त्याच्यावर न्यायाधिशी मत देण्याची आपली योग्यता, 
पाणिनीस संस्कृत भाषेचे व्याकरण बरोबर सांगतां आळे आहे किंबा नाहीं हें 
आपण तपाशीत बसणार आणि भोंबतालचे लोक फाटक्या कलेक्टरच्या हाता- 
खालीं कारकुनी करून ज रावबहादुर झाले आहेत त्यांनां मोठे म्हणण्याइतक 
मूखे भाहेत. आपण आपलें कार्य जै कार्य चाळू ठेवावयाचे तें भोंबतालच्या 
32 


गोंडवनांतीळ प्रियंवदा २५१७ 


ना “> ५५0 "70 :“- --*----:२>>:-:- ळा न 2 2 या एना आ णा प?णा “7. “- ---_ -----:-:>>:>>-:>-> 


मूख जगासाठीं नव्हे. भोंबतालचे लोक विद्वान ग्रंथकार कोणाला ग्हणणार कीं 
शाळाखात्यानें ज्याची पुस्तकें मंजूर केलीं आहेत अशा मनुष्याला, आणि त्यांत 
देखील लोकाची बुद्धि ज्ञानविकासाच्या दृष्टीनें तयार झालेली नाही. शाळा- 
स्वात्याच्याच लोकांची तरी शास्त्रीय वाढ झाली आहे किंवा नाहीं, हें पहाण्याच्या 
दृष्टीनें पुस्तकाकडे पहाण्याइतकी कोठे अक्कल वाढली आहे, तर शाळाखात्याच्या 
मतास किंमत द्यावी !' एवादा रडका शाळा मास्तर व्याकरणा'चें चोपडे तयार 
करून शाळाखात्याकडे गेला आणि त्यानें खुशामत चागली केली तर त्याचें 
व्याकरण पास होणार, त्या मास्तरला व्याकरण थोडें तरी येत आहे किंवा नाहीं 
हे शाळाखात्याचे देशी अधिकारी कित्रा न्वात्याशीं दोस्ती ळावून महत्त्व पावलेले 
आपले लोक व्याकरणाविषयींच विचार करून न ठरवितां त्याचे पुनर्विवाहावर 
मत काय आहे याची चोकशी करून ठरविणार ! ! इंग्रज शाळाखात्याचे 
अधिकारी म्हणजे तेथले देव. तेच अगोदर शाक्लीय ज्ञानाच्या दृष्टीनं कुच- 
कामाचे, आणि त्यानीं आपल्यातले “ कोणते लोक विद्वान ! हे ठरवून माणसाची 
किमत करावयाची ! आणि त्यांच्या प्रसंदोळा लोकांनीं मान द्यावयाचा, येणेंप्रमाणें 
लोकमान्यता हा सर्व मूखपणाचा बाजार आहे आणि ती लोकमान्यता खरेदी 
करूं पाहणारे अगदीं मूर आहेत, असें वैजनाथशास्त्रयास वाटत होते. शास्त्री- 
बोवांस सर्व लोकाच्या मतांविषयीं तुच्छता जरी बाटत होती तरी त्याजरोजर 
आपली खरी योग्यता लोकास जरी समजत नाहीं याबद्दल रागहि येत होता. 
शास्त्रीनोबांस खाण्यापिण्याची जेव्हा अडचण अनेक तऱ्हेने भासू लागली, 
तेव्हां आपणच लग्न करून ,आपली व्यवस्था लागली पाहिजे असाहि विचार 
त्यांच्या मनांत उत्पक्न झाला, आणि त्याच विचाराचे पर्यवसान शारदाजाईशीं 
पुनर्विवाहांत झालें. तथापि दुजेळ लोकांच्या मनांत ज्याप्रमाणें स्त्रीप्रेम उत्पन्न 
होतें त्याप्रमाणें आपली स्थिति नाहीं. शारदाबाईबरोबर गप्पा मारण्यांत ती 
योग्य सहचरी आहे, तिच्याशी गप्पा मारण्यांत त्यांस आनंद होतो या 
गोष्टी खऱ्या आहेत, पण त्याकरितां लग्न कशाला करायला पाहिजे! 
शारदा बरोबर असली म्हणजे झाळे; पण शारदाबाई बरोबर असूं देण्याने आपण 


२५१ वेजनाथशास्त्री 


नान्नज बल जन्स् 


मूख लोकांच्या टीकेला कारण होऊं, याकरितांच ते लम्माला आणि पुनर्विवाहाला 
तयार झाले असें त्यांनीं एकदोन मंडळीस सागून टाकिले; आणि तें देखील 
अशांस कीं ज्यांच्यामार्फत ते गांवमर पसरेल, शास्त्रीबोवानां खरोखर लग्नाची 
मुळींच जरूर नव्हत. आणि पुनर्विवाहाची त्याहून तर नव्हती. जर कोणी 
सुधारकांनी आपण त्यांच्यांतलें आहों असें समजून अभिनंदनाची पत्रे पाठविली 
तर तीं पर्त्रे फाडून टाकण्याचे त्यानीं ठरविलें. 


दोघांचा पुनर्विवाह झाल्यानंतर वर्तमानपत्रांतून त्यासंबंधानें अभिनंदनपर 
उल्लेव आले, तेव्हां वैजनाथशास्त्री म्हणाले कीं, * लोक कसे ? ' मूख ' आहेत. 
वररुची आणि हेमचंद्र यांच्या प्राकृत भाषेंत जे फरक आहेत ते भिन्नकालमूलक 
आहेत कीं मिन्नस्थानमूलक आहेत याविषयींच्या माझ्या शोधाचे महत्त्व या 
लोकांनां नाहीं; आंत्रकालीन प्राकृत अंकित लेग्वांत द्विवचनांची राहिलेली 
उदाहरणें मी शोधून काढली, त्याची ग्रास किंमत नाहीं; आणि माझी दुसरी 
बायको ही कुमारी नसून विधवा होती याचंच महत्त्व यांना आहे, ” 


शारदाबाई हंसून म्हणाल्या “ भायकोमुळेंच प्रसिद्धिविषय झाल्यास त्याचा 
पुरुषांस राग येणें स्वाभाविक आहे. पण अगोदरच जो मनुष्य प्रसिद्ध आहे, 
त्याच्या विवाहाचा उल्लेख झाला तर हा गोरव पुरुषाचा नसून बायकोचा आहे. 
माझा गोरव या नात्यानें झाल्यास त्यात कांहीं बावगें आहे काय ? ” 


“ लय़ानंतर प्रेम, प्रेमानंतर भांडण हा संसारातला क्रम असतो तर 
भांडण्यास सुरुवात आजच करावयाची काय! ” 


“ तुरुवात तर कालच झाली पुस्तके जुळवितांना -?? शारदाबाई म्हणाल्या. 
तें अगदीं खरें होतं. लय़ाचा पहिला परिणाम असा झाला कीं, दोघांची 
पुस्तर्के एकत्र झाली, पुस्तकें एकञ्न करतांना संयुक्त ग्रंथाल्यांत कांहीं पुस्तकांच्या 
दोन प्रती झाल्या असें दिसले तेव्हा कोणाची पस्तर्के देऊन टाकावीत याविषयीं 
कडाक्याचा वाद झाला होता, आणि शारदाबाईनीं आपण वाचलेलीं ब खुणा 
केलेलीं पुस्तकें गमवायाला तयार नाहीं हे त्यांनीं स्पष्ट सांगितले होतें, 


गॉोंडवनांतील प्रियेवदा २५२ 


गोंडवनांतील प्रियंवदा व घरकुट्टे घराण्याचा इतिहास यांचा आपल्या 
आयुष्यक्रमावर काय परिणाम झाला याची पूर्ण कल्पना इतिहास संशोधक वैज- 
नाथशास्त्री यांस तरी असेल काय अशी चर्चा त्यावेळेस बर्डीबरच्या कांहीं 
थोड्या मंडळींत झाली. 


प्रकरण २२वं 
प्रियवदा आणि पुतळी 


डायमंड ज्युबिलीनंतर थोड्याच महिन्यानीं रामभाऊ बॅरिस्टर होऊन 
परत आला. त्याजरोबरच मध्यप्रांतातील ' काकाजी ? आडनावाचा एक पारशी 
विद्यार्थीहि बॅरिस्टर होऊन आला होता. दोघेहि एकाच वेळेस नागपूरला 
बॅरिस्टरीच्या पटावर नोंदले गेले, 


रामभाऊ परत आल्यानंतर प्रियवदेस आनंद झाला हें काय सांगावयास 
पाहिजे ? तथापि इतर लोकांना जो फरक दिसला तो हा कीं, प्रियंवदा ली 
स्वातंत्र्य, स्त्रियांचे हक, पुरुषी धर्मशास्त्र इत्यादि विषयांवर बोलण्यास अजिबात 
विसरून गेली, ती इतकी कीं तिर्चो मतें काय होतीं याचीहि पुढें लोकानांच 
काय पण प्रत्यक्ष तिलाच आठवण नाहींशी झाली. आणि ती सार्वजनिक 
आयुष्यक्रमांत पुढे कधींच आली नाहीं. तिला मुलें झालीं, आणि आपलीं मुले 
इतर मुलापेक्षा किती टवटवीत आणि स्वच्छ आहेत एवढेंच दाखविण्यांत तिला 
आनंद वाटे. दिनकर भावोजींचे लयन लवकरच झालें. त्यावेळेस तिनें आग्रह 
एवढाच घरला कीं नवराबायकोनीं एकमेकांशीं बोलतांना लाज घराबयाची नाही, 
आणि यासाठीं तिनं दोघांसहि तुम्ही महिनाभर माझ्या दादाच्या घरीं पाहुणे 
म्हणून रहा असा आग्रह धरला. आपल्या धाकट्या जावेस असें बजावले कीं 
: दिनकर भावोजी कविता करणारे आहेत, त्यांची कविता अधिक झोंकांत व्हावी 
अशी तुझी इच्छा असेल तर स्त्रीच्या प्रेमाचे केवळ कल्पनेने वर्णन करण्याचा 
प्रसंग त्याच्यावर येऊं देऊं नका, ! 


२५३ प्रियंवदा आणि पुतळी 
पुतळी पेनांगवाला ही जर कादंभरी ची नायिका असती तर तिची कथा 
सविस्तर लिहिण्याइतकी मनोरंजक झाली असती, बंडुनाना मधून मधून 
पेनांगवाला शेटजींच्या घरीं जाऊं लागले तेः्हां प्रथम तिर्चे मन बंडुनानांवर 
जडलें,पण पुढें कांदे दिवपांनी एका बॅडवाल्यावर प्रेम जडून ती बंडुनानांस 
भेटण्याचेहि टाळू लागली, तिला कोणते तरुण केव्हां आवडू लागतील आणि 
केव्हा नकोसे होतील याचा नेमच नसे. ती प्रियवदेकडे येई तेव्हा ती खरोखर 
दिनकर भावोजींशी बोलण्यास येत आहे काय, तिचें त्यावर प्रेम जडले आहे 
काय, असा प्रियेबदेत संराय आला होता आणि या सर्व गोष्टी पाहून पेनागवाला 
शोटजींस मजा वाटत असे. सुस्वभावी, पण स्वतंत्र आणि भावनाप्रिय अशा 
मुलीची संगति त्याना फारच आवडूं लागली होती, त्यांना ठाऊक होतें कीं, 
ही अछड मुलगी अनेकदां प्रेमांत पडेल आगि प्रमातून बाहेर पडेल, पुतळी 
जेव्हां बयानें पंचविशीच्या जवळ जवळ येऊं लागली तेव्हा तिच्या हृदयांतली 
खळबळ बरीच निवळली आणि ती आयुष्याकडे अधिक विचारपूर्वक पाहूं 
लागली, तिच्याशीं लग्न लावण्यास तयार असे तिच्या जातीचेच पुष्कळ लोक 
होते. पुढें एक पारशी तरुण बॅरिस्टर होऊन मध्यप्रातांतच इ. ए. सी झाला, 
तेव्हां त्याच्याशी मिस पेनागबालाचे लम्न झालें. त्यानें (मि. काकाजी यानीं ) 
पुढें इ. ए. सी. ची नोकरी सोडून देऊन बॅरिस्टरी पुन्हा पत्करली. आणि ते 
बॅरिस्टर पुढें बरेच नांवारूपाला आले. मिसेस काकाजी पुढें हुशार होस्टेस 
म्हणून नागपुरांत प्रसिद्ध झाली. आतां पुरंधीच्या वाढलेल्या प्रौढपणामुळेच 
मिसेस काकाजी आपण एका बँडवाल्यावर प्रेम कसें करीत होतों, आपलें प्रेम 
एका ब्राह्मणावर कसें जडलें होतें इत्यादि गोष्टी सांगून लोकांची बरीच करमणूक 
करतात, आणि मि. काकाजी देखील त्या गोष्टी मोठ्या मोजेनें ऐकतात. त्यांनां 
असें वाटतें कीं इतक्या जास्त लोकांवर प्रेम करून पुतळी शेवटीं आपल्याकडे 
आली त्या अथी आपली श्रेठ़ता सहजच सिद्ध झाली. पण ते कधीं कधीं 
मितेसला म्हणतात कीं ' असें फारसे मुलामुलींच्या देखत त्रोलत जाऊं नको, कारण 
मुलांची व मुलींची पारशी जातीच्या बाहेर लग्न करण्याची प्रवृत्ति झाली तर त्या 


गोंडवनांतील प्रियंवदा २५४ 


न्य डन याच जला जय ल मा० क ०224002“... 


न. तरनन-कळ्ाणान० > पणाफपशटाीटी पणी टी" 


प्रवत्तिला तुझ्या प्रेमकथांनीं उत्तेजन मिळेल.' मिसेस काकाजी उत्तर करते, ' छे ! 
अशी गोष्ट मुळींच होणार नाहीं, मुलींच्या मनांत प्रेमाचे खेळ हे त्या पंधरा 
वर्षाच्या असतांनाच सुरू व्हावयाचे. ते मग त्या आईबापांनां किंवा दुसऱ्या 
कोणाला कळबोत अगर न कळवोत, भोंवतालीं जीं तरुण माणसें असतील त्यांवर 
त्यांचे प्रेम जडायचे, आणि प्रथम दिसतात त्यापेक्षां अधिक योग्यतेची माणसें 
दिसलीं म्हणजे तें उडायचे, हा क्रम चालूच रह्ावयाचा., पुष्कळ पारशी मायका 
आपला दिल खोळून बोलायला लागल्या तर त्या माझाच अनुभव सांगतील, 
पण त्यांचे लग्न कोठें जातीच्या बाहेर झालें आहे? लग्नाचे दिवस आले म्हणजे 
आपल्या योग्यतेचे कोण आहे, आपल्या रहाणीतारखी रहाणी कोणाची आहे 
असले विचार येतील आणि मग त्या मुली पुढें पारशाशींच लयन लावतोल. 


या तऱ्हेने मिसेस काकाजी बोलायला लागली म्हणजे आपणांपेक्षां मनुष्य- 
स्वभावाविषयीं ती कांहीं अधिक जाणते असें काकाजीस वाटे आणि तेहि उत्तर 
देत कीं ' मी पैशाचा कायदा शिकलों आहे, पण प्रेमाचा कायदा कुठें शिकलों 
आहे ! 

प्रियंवदा आणि पुतळी या दोघींचेहि पती बॅरिस्टर, आणि सारख्याच 
उत्पन्नाचे, आणि त्यामुळें जवळ जवळ सारखेच पुढें आलेले, ' ज्युडिशरी ! 
मध्यें दोघेहि प्रसिद्ध होते, व दोघांनींहि पैसे चांगळे मिळविलेले. यामुळें 
दोघानाहि समाजांत बरेच प्रामुख्य आलें होतें. पण पुतळी जितकी पोषाखाच्या 
बाबतींत बरीचशी वाढत्या अमिरुचीची झाली होती तितकी प्रियंवदा नव्हती, ब 
त्यामुळें आणि ब्राह्मणी आयुष्यक्रमात उत्पन्न झालेल्या स्वाद्यपेयांच्या निबेधा मुळें 
प्रियवदा सिव्हिल लाईनमधल्या स्वागत करण्यांत कुशळ अशा स्त्रीवर्गात झळकली 
नाहीं. तथापि तिची उपयुक्तता नागपुरास कमी झाली नाहीं. हिंदु स्त्रिया ज्या 
घरांत वाटेल तेव्हां जातील, नवीन मराठी कादंबरी कोणती निघाली आहे, आणि 
कोणतें नाटक कसें आहे इत्यादि गोष्टींची चर्चा करतील असें स्थान तिचें ग्रह 
झालें होतें. तिची उपयुक्तता हिंदु पुरुषांस देखील मान्य होई. हळदी- 
कुंकुवाच्या प्रसंगीं गावांतील वकील लोकांस फराळास नोलावणें इत्यादि स्वागता'चें 


२५७५ प्रियंबदा आणि पुतळो 
प्रकार करण्यांत ती आपली कुझालता दाखवी. ज्यांचे स्वागत करावें असा वर्ग 
दोघींच्या बाबतींत निरनिराळा होता. दोघींनाहि त्याची स्तुति करणारा वग 
लाभला होता पण तो निरनिराळ्या वर्गीत होता. प्रियवदेच्या स्तुति करणाऱ्या 
वर्गोत मि, काकाजी होते, तर पुतळीची तारीफ करण्याऱ्या वर्गोत रामभाऊहि 
कधीं कर्धी असत, कधीं काकाजी बरॅरिस्टरला ' इलेक्शनला ? उभे रहावयाचे 
मनांत आलें म्हणजे सामान्य हिंदूंचें स्वागत करण्यास तयार अशा प्रियेवदेच्या 
नघऱ्याचा मत्सर उत्पन्न होई, आणि तिचे उदाहरण तो पुतळीस देई. पण 
इंग्रजी तऱ्हेची भोजनपद्धति अधिक परिचित असलेल्या पुतळीच्या नवऱ्याला 
सरकारी अधिकाऱ्यांस घरी जेवाबयास जोलविण्यास अधिक संधि मिळते याबद्दल 
रामभाऊस देखील पुतळीच्या नवऱ्याचा मत्सर होई. पुतळी कधीं कधीं 
प्रियेवदेस म्हणे कीं, ' नवरे आपल्या धरच्या बायकावर कधीं संतुष्ट नसतात, 
त्यांनां आपल्या बायकोपेक्षा दुसऱ्याची बायको अधिक चागली आहे असें 
वाटतें, ' 


प्रकरण २३ वे 
भोंतल विजय मिल्स-उपसहार 

हा घरकुट्टे घराण्याचा इतिहास इतक्यांतच कसा संपेल ! बंडुनानास तर 
मुले झालीं आहेत आणि त्यामुळें घरकुट्टे घराणें अधिक चिरंजीवी झालें आहे. 
सौ. बिंबाबाई मोघे यांचा जरी अनंतरावास सपाटून राग आला होता तरी 
तिला कोर्टात खेंचून तिची फजीति करावयाची हें, स्वाभाविक पितृवात्सल्य 
जाग्रत झाल्यामुळें म्हणा झालें नाहीं किंवा. हरिहरराव तांत्रडे यांचे दुसरे आप्त 
हरिहरराबाचा मुलगा वारल्यास आपण इस्टेटीचे मालक होऊं इत्यादि भाषा बोलू 
लागले म्हणून म्हणा, किंवा आपण पूर्वी पुनर्विबाहातर्फेचें ःयाख्यान दिलें होतें 
तें बिंबाबाईचे वकील बाहेर काढतील या धास्तीमुळें म्हणा, किंवा आपलें शरीर 


गोंडवनांतील प्रियंवदा २५६ 


*->--->“>:--“ 


खंगत चाललें आतां आपणांस जास्त काम करतां येत नाहीं या प्रकाराची 
जाणीव होऊन म्हणा त्यानीं तें योजिलेलें कार्य सोडून दिलें. ते पुढें फार 
दिवस जगलेहि नाहींत. 


रूपराम मारवाड्याच्या ताब्यांत मिल भाडवलाच्या अभावाने जाईल 
अशी धास्ती होती पण ती तशी गेली नाहीं, आणि यास रूपरामाची व्यवहार- 
दृष्टीच कारण होती. रूपरामाला गिरणी नको होती, पण आपल्या रकमेवर 
नऊ ठकथाचें व्याज नियमाने पाहिजे होते, आणि यासाठी त्यांनीं आपलें 
त्रइ्णकी डायरेक्टर म्हणून ठेविले होते. पेनांगवाला शेटजीनें घरकुट्ट्यांची 
मॅनेंजरी काढून आपल्याकडे घेण्याची खटपट केली पण स्परामनें त्यास ती 
मिळूं देण्याचे नाकारलें त्यास बंडुनानाच्या नेटाची ब धडाडीची कल्पना 
असल्यामुळें त्यास कांही गोष्टींत सहका दिल्यास किंवा खरेदी विक्री त्याच्याकडून 
काढून घेंऊन अंतर्गत व्यवस्थाच त्याच्याकडे ठेवल्यास गिरणीस फायदा पडेल, 
गिरणी चाळू राहील, आणि आपलळें व्याज चालूं राहील अशी कल्पना येऊन 
त्यानंच घरकुट्र्यास नेटानें पाठिंबा देण्याचे ठरविळे. आणि त्याचा स्वाभाविक 
परिणाम असा झाला कीं, पेनागवाला रूपरामाच्या पैशावर मधल्यामध्येंच दोनशें 
रुपये उपटीत होता त्यास स्बो मिळाला, पुढें कापसाची खरेदी व कपड्याची 
विक्री रूपरामार्ने आपल्याच ताब्यात घेतली आणि भोंसलेविजय-मिल्सर्चे काम 
सुरळीत चालू झालें, पुढच्या अनेक वर्षांत जंडुनानांचा औद्योगिक उन्नतीसाठी 
खटपट करणारा म्हणून ख्याति झाली. 


छळेखक : डॉ. श्रीघर व्यंकटेद केतकर 
एम्‌. ए., पीएच्‌. डी. 
( कार्नैल युनिव्हर्सिटी, यू.एस्‌. प.) 
जन्म--_रायपूर (म. प्र.) २ फेब्रुवारी १८८४. 
मृत्यु--पुणे, १० एप्रिल १९३७. 


समाज झासरूजञ, राजत्ासन शास्रज्ञ, पसमाज - सुषारक, 
भर्थज्यासरज्ञ, इतिहास संद्रोधषक, राजकारणी, व्यापक 
दृष्टीच विद्वान महापुरुष, 


मुरव्य ग्रंथ । भारतायांच्या जातींचा इतिहास ? खंड, 
भारतीयांचे मर्थत्रास, हिंदू कायदा, भारतीचांचें 
संमाजझास, निल्दाखांचे राजकारण, व्हिक्योरयस 
इंडिया, महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण, प्राचीन महाराष्ट्र 
( सातवाहन प्रवे / भाय ? व हे. अप्रकाशित, मराठी 
ज्ञानकॉडा प्रसख संपादक, विद्यासेवक संपादक, माझें 
बारा वर्षार्चे काम. 


षांतील. प्रियंवदा, ग्रांसासू, 
गुझातावादी, परागंदा, भटक्या. 


साहित्य, खीका, वगेरे छोकरडॉ लेख, मासिके व वतसानप्त्रांत 
लिहिले. 


सवे वेझामर प्रवास करून, समाजानिरीक्षण करून, वाड्मयाचें 
गाढ 'अवगाहन करून त्यांनीं मराठी साहित्य व जीवन 
यांत नवयूयाचा प्रास केला/--के, एजवाहे, टिळक 
वगैरे , मह्याराषट्राच्या विदत्परपरेतील एक भअल्योकेक 
मह्यापरुष,